नवी दिल्ली — केंद्र सरकारने मनरेगा (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम 2005) अंतर्गत काम करणाऱ्या कोट्यवधी कामगारांना मोठा धक्का दिला आहे. दरवर्षी जाहीर होणारी वेतनवाढ यावर्षी अद्याप जाहीर झालेली नाही, ज्यामुळे सुमारे 7 कोटींहून अधिक कामगार प्रभावित झाले आहेत.
सरकारकडून नवीन VB-G RAM G योजना 2025 (विकसित भारत-गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन – ग्रामीण) लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या योजनेची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.

वेतनवाढ का थांबली?
केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय यांनी सर्व राज्यांना कळवले आहे की,2026-27 आर्थिक वर्षासाठी नवीन वेतन दर VB-G RAM G योजना लागू झाल्यानंतरच जाहीर केले जातील
तोपर्यंत 2025-26 चे जुने वेतन दरच लागू राहतील
यंदा वेगळं काय?
मागील 13 वर्षांपासून वेतनवाढ फेब्रुवारी-मार्चमध्ये जाहीर होत होती मात्र यावर्षी
एप्रिलचे 15 दिवस उलटल्यानंतरही घोषणा नाही
⚖️ कायद्यातील तरतूद
मनरेगा अंतर्गत वेतन दर हे कलम 6(1) अंतर्गत जाहीर केले जातात आणि ते दरवर्षी 1 एप्रिलपासून लागू होतात मात्र यंदा ही प्रक्रिया उशिरा सुरू असल्यामुळे कामगारांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
कामगारांवर परिणाम
वेतनवाढ लांबणीवर,महागाईत वाढ,ग्रामीण भागातील उत्पन्नावर परिणाम,रोजगार हमी योजनेवर अवलंबून असलेल्यांची अडचण वाढणार
नवीन VB-G RAM G कायदा 2025 लागू झाल्यानंतरच नवीन वेतन दर जाहीर
कामगारांना वाढीव मोबदला मिळण्याची शक्यतातोपर्यंत मात्र कोट्यवधी कामगारांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.




