मुंबई — उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवासी भाड्यात १० टक्के वाढ लागू केली असून, प्रत्येक तिकिटावर ₹२ स्वच्छता अधिभार आकारण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ बुधवारपासून लागू झाली असून, प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काय आहे निर्णय?
एसटीकडून १०% भाडेवाढ लागू करण्यात आल्यानंतर प्रत्येक तिकिटावर ₹२ स्वच्छता अधिभार लावण्यात आला आहे. १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत उन्हाळी सुट्ट्यांतील वाढती गर्दी लक्षात घेऊन निर्णय

प्रवाशांची नाराजी
यापूर्वीच एसटीने काही महिन्यांपूर्वी भाडेवाढ केली होती. त्यामुळे आता पुन्हा हंगामी वाढ केल्याने सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक ताण वाढल्याने कुटुंबासह प्रवास करणे महाग झाले आहे.लांब पल्ल्याच्या प्रवासाचा खर्च देखील वाढला आहे“भाडेवाढ झाली, पण सुविधा कुठे आहेत?” असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गावी जाणारे प्रवासी
पर्यटनासाठी जाणारे नागरिक देवदर्शनासाठी जाणारी गर्दी यामुळे एसटी बसमध्ये प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते.
इंधन दरवाढ,बस देखभाल खर्च,अतिरिक्त सेवा व्यवस्थापन , या कारणांमुळे भाडेवाढ आवश्यक असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगितले जात आहे.वाढत्या प्रवासी संख्येमुळे महसूल वाढून
मागील नुकसान (दिवाळी काळातील) काही प्रमाणात भरून निघणार आहे
समस्या अजूनही कायम
्भाडेवाढ झाली असली तरीबसची स्वच्छता अपुरी,वेळेचे पालन नाही,आरामदायी प्रवासाचा अभाव या समस्या जैसे थेच आहेत त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी अधिक वाढली आहे.

