Home Blog Page 31

महिला आरक्षणासाठी केंद्र सरकारचे मोठे पाऊल; 2029 पासून 33% आरक्षण, लोकसभा जागा 850 होणार?

0

नवी दिल्ली — केंद्र सरकारने महिला सक्षमीकरणासाठी मोठा निर्णय घेत महिला आरक्षणाशी संबंधित तीन महत्त्वपूर्ण विधेयके संसदेत सादर केली आहेत. 2023 मध्ये मंजूर झालेल्या नारी शक्ती वंदन कायद्याची पूर्ण अंमलबजावणी हे या विधेयकांचे मुख्य उद्दिष्ट आहे.
सरकारच्या प्रस्तावानुसार 2029 पासून लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी 33% आरक्षण लागू केले जाईल. यामुळे देशातील राजकारणात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

लोकसभा जागा वाढणार; 543 वरून थेट 850 पर्यंत

या विधेयकांतील सर्वात मोठा बदल म्हणजे लोकसभेतील सदस्यसंख्या वाढवण्याचा प्रस्ताव. सध्या 543 असलेल्या जागा वाढवून 850 करण्याचा विचार सरकारने मांडला आहे.
राज्यांसाठी: 815 जागा
केंद्रशासित प्रदेशांसाठी: 35 जागा
हे बदल लागू करण्यासाठी मतदारसंघांचे परिसीमन (Delimitation) करण्यात येणार आहे.

कोणती आहेत ती 3 महत्त्वाची विधेयके?

1️⃣ संविधान (131 वी दुरुस्ती) विधेयक, 2026
महिला आरक्षण लागू करण्यासाठी महत्त्वाचे
संविधानाच्या कलम 81 मध्ये दुरुस्ती
लोकसंख्येनुसार जागा वाढवण्याची तरतूद
2️⃣ परिसीमन विधेयक, 2026
2011 जनगणनेच्या आधारे मतदारसंघ पुनर्रचना
प्रत्येक राज्यात परिसीमन आयोग स्थापन
सर्व पक्षांशी चर्चा करून जागावाटप
3️⃣ केंद्रशासित प्रदेश कायदे (दुरुस्ती) विधेयक, 2026
दिल्ली, जम्मू-काश्मीर, पुदुचेरीमध्ये 33% महिला आरक्षण

विधानसभांमध्ये जागांची पुनर्रचना

 का महत्त्वाचा आहे हा निर्णय?
1976 नंतर प्रथमच मोठ्या प्रमाणात परिसीमन
महिलांना राजकारणात मोठी संधी
लोकसंख्येनुसार प्रतिनिधित्व अधिक अचूक होणार,2029 निवडणुका ऐतिहासिक ठरू शकतात

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक 2026: 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान, राजकीय समीकरणे तापली

0

मुंबई — महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा हालचाल वाढली आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर करण्यात आला असून 12 मे 2026 रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व प्रमुख पक्षांमध्ये उमेदवारीसाठी चुरस वाढली आहे.
निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार, विधानपरिषदेतील 9 आमदारांचा कार्यकाळ 13 मे 2026 रोजी संपणार आहे. यामुळे नव्या सदस्यांच्या निवडीसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

 राजकीय गणित: कोणाला किती जागा?

विधानसभेतील सध्याच्या संख्याबळानुसार संभाव्य चित्र असे दिसत आहे:
भाजप – 5 जागा
शिवसेना (शिंदे गट) – 2 जागा
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – 1 जागा
महाविकास आघाडी – 1 जागा
मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडे अतिरिक्त मते असल्यामुळे महायुतीकडून एक जास्तीचा उमेदवार दिला जाऊ शकतो. असे झाल्यास निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी होऊ शकते.

उमेदवारीसाठी चढाओढ वाढली

भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असल्याने पक्षात अंतर्गत स्पर्धा वाढली आहे.
विशेषतः राज्यसभेत संधी न मिळालेल्या नेत्यांना विधानपरिषदेची संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे.

कोणत्या आमदारांचा कार्यकाळ संपणार?

या निवडणुकीत खालील आमदारांचा कार्यकाळ संपत आहे:
उद्धव ठाकरे – शिवसेना (उबाठा)
नीलम गोऱ्हे – शिवसेना (शिंदे गट)
शशिकांत शिंदे – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)
अमोल मिटकरी – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
गोपीचंद पडळकर – भाजप
रणजितसिंह मोहिते-पाटील – भाजप
राजेश राठोड – काँग्रेस
प्रवीण दटके – भाजप
रमेश कराड – भाजप

आरक्षणाच्या मागणीसाठी मुस्लिम समाज रस्त्यावर; बीडमध्ये उद्या एल्गार

0

बीड — मुस्लिम समाजाला शिक्षण व शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी उद्या बीड शहरात भव्य एल्गार मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चामध्ये जिल्हाभरातून हजारो मुस्लिम बांधव सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

गेल्या १५ ते २० दिवसांपासून या मोर्चाची जोरदार तयारी सुरू असून, विविध भागांमध्ये कॉर्नर बैठका घेऊन नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या नेते-कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शविला आहे.

 आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत

तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण दिले होते. मात्र, हे आरक्षण नंतर रद्द करण्यात आले. न्यायालयाने शिक्षणात आरक्षणासंदर्भात सकारात्मक भूमिका दर्शविली होती, परंतु त्यावर या सरकारने कुठलीच पावलं उचलली नाही, असा आरोप आयोजकांनी केला आहे.

मागासलेपणाचा मुद्दा

मुस्लिम समाज शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागास असल्याचे सांगत, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण आवश्यक असल्याची भूमिका मोर्चा आयोजकांनी मांडली आहे.
मोठ्या संख्येने सहभाग
या मोर्चामध्ये केवळ शहरातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील मुस्लिम समाज मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याने प्रशासनाकडूनही योग्य ती तयारी करण्यात येत आहे.

उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाचे आवाहन

0

बीड  —  प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा ,मुंबई यांनी दिनांक १६ एप्रिल ते १८ एप्रिल२०२६ या कालावधीत येलो अलर्ट (yellow Alert) जारी केला आहे . कालावधीमध्ये तुरळ ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. उन्हाळ्यात तापमानात होणारी वाढ लक्षात घेता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने उष्माघातापासून बचावासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

सुरक्षेच्या उपाययोजना

तहान लागलेली नसली तरीही दर अर्ध्या तासाने पुरेसे पाणी प्यावे. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी ओआरएस (ORS), लस्सी, लिंबू पाणी, ताक आणि कैरीचे पन्हे यांसारख्या घरगुती पेयांचा वापर करावा.
बाहेर पडताना हलके, पातळ आणि सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. डोके झाकण्यासाठी छत्री, टोपी किंवा ओल्या कापडाचा वापर करावा. दुपारी १२ ते ३ या वेळेत शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे. कष्टाची कामे पहाटेच्या वेळी उरकून घ्यावीत आणि कामाच्या ठिकाणी मध्ये-मध्ये विश्रांती घ्यावी.घर थंड ठेवण्यासाठी पडदे आणि सनशेडचा वापर करावा. रात्रीच्या वेळी खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पाळीव प्राणी आणि गुरांना छावणीत ठेवावे व त्यांना पिण्यासाठी पुरेसे पाणी द्यावे.

चक्कर येणे, सतत घाम येणे, डोकेदुखी किंवा अशक्तपणा जाणवल्यास ही उष्माघाताची लक्षणे असू शकतात. अशा वेळी तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

सावधगिरीच्या सूचना

चहा, कॉफी, दारू आणि कार्बोनेटेड थंड पेये घेणे टाळावे, कारण यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नका. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या पार्क केलेल्या वाहनात सोडू नका. तापमान जास्त असताना कष्टाची कामे टाळावीत. उन्हाच्या तीव्र कालावधीत स्वयंपाक करणे टाळावे आणि स्वयंपाकघरात हवेशीर वातावरण ठेवावे.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अधिक माहितीसाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सोशल मीडिया हँडलला (@SDMAMaharashtra) भेट द्यावी किंवा जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावरील सूचनांचे पालन करावे. स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा उष्माघातापासून बचाव करण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

भीम जयंतीत डीजेवर पोलिसांची कारवाई; 27 ठिकाणी गुन्हे दाखल

0

बीड — विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त बीड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात मिरवणुका काढण्यात आल्या. मात्र या उत्सवात डीजे वापरावर घालण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे पोलिसांनी कडक कारवाई करत एकूण 27 ठिकाणी गुन्हे दाखल केले आहेत.
जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी जयंतीपूर्वीच नागरिकांना डीजे टाळून पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले होते. तरीही अनेक ठिकाणी या सूचनांकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले.

कुठे किती गुन्हे दाखल?

परळी (संभाजीनगर पोलीस ठाणे) – 12 (11 डीजे + 1 मारामारी)
माजलगाव – 6
पेठ बीड – 3
बीड शहर – 1
गेवराई – 1
तलवाडा – 1
अंबाजोगाई शहर – 1
परळी शहर – 2
एकूण: 27 गुन्हे नोंद

नियमांचे उल्लंघन, पोलिस अॅक्शन मोड मध्ये 

सायंकाळनंतर काढण्यात आलेल्या मिरवणुकांमध्ये अनेक ठिकाणी डीजेच्या मोठ्या आवाजात नृत्य आणि गर्दी दिसून आली. न्यायालय व पोलिसांनी घालून दिलेल्या ध्वनीप्रदूषण नियमांचे उल्लंघन झाल्याने पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली.
सध्या देखील काही ठिकाणी चौकशी व पुढील कारवाया सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

सासऱ्याचा सुनेवर अत्याचार; पतीही आरोपी वडिलांच्या कृत्याला पतीचा पाठिंबा!

0

खुलताबाद — शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका 23 वर्षीय विवाहित तरुणीवर तिच्याच सासऱ्याने वर्षभर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणात पीडितेच्या पतीलाही सहआरोपी करण्यात आले असून तो सध्या फरार आहे.

पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, सासऱ्याने गेल्या वर्षभरात वारंवार तिच्यावर जबरदस्ती केली. या प्रकाराची माहिती तिने सुरुवातीला सासूला दिली, मात्र तिने प्रकरण दडपून ठेवले.
यानंतर पीडितेने आपल्या पतीला सर्व सांगितले असता, त्याने उलट सासऱ्याचे समर्थन करत अमानुष प्रतिक्रिया दिली. पुढे पतीने तिला सोडून दुसऱ्या महिलेसोबत राहण्यास सुरुवात केली.

धक्कादायक बाब

पती घर सोडून गेल्यानंतरही सासरा रात्रीच्या वेळी तिचा छळ करत राहिला. या काळात पीडितेने एका मुलीला जन्म दिला.सामाजिक भीतीमुळे पीडिता गप्प राहिली होती. मात्र 15 दिवसांपूर्वी ती माहेरी गेल्यानंतर तिने आई आणि भावाकडे संपूर्ण घटना सांगितली.14 एप्रिल रोजी सासरा तिला घेण्यासाठी माहेरी आला असता, कुटुंबीयांनी त्याला रोखले आणि पीडितेला पोलिसांकडे जाण्यास मदत केली.
खुलताबाद पोलिसांनी आरोपी सासऱ्याला अटक केली आहे.न्यायालयाने 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली पती फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत

मनरेगा कामगारांना मोठा धक्का! वेतनवाढ रखडली, 7 कोटी कामगार प्रतीक्षेत

0

नवी दिल्ली — केंद्र सरकारने मनरेगा (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम 2005) अंतर्गत काम करणाऱ्या कोट्यवधी कामगारांना मोठा धक्का दिला आहे. दरवर्षी जाहीर होणारी वेतनवाढ यावर्षी अद्याप जाहीर झालेली नाही, ज्यामुळे सुमारे 7 कोटींहून अधिक कामगार प्रभावित झाले आहेत.
सरकारकडून नवीन VB-G RAM G योजना 2025 (विकसित भारत-गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन – ग्रामीण) लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या योजनेची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.

वेतनवाढ का थांबली?

केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय यांनी सर्व राज्यांना कळवले आहे की,2026-27 आर्थिक वर्षासाठी नवीन वेतन दर VB-G RAM G योजना लागू झाल्यानंतरच जाहीर केले जातील
तोपर्यंत  2025-26 चे जुने वेतन दरच लागू राहतील

यंदा वेगळं काय?

मागील 13 वर्षांपासून वेतनवाढ फेब्रुवारी-मार्चमध्ये जाहीर होत होती मात्र यावर्षी
एप्रिलचे 15 दिवस उलटल्यानंतरही घोषणा नाही
⚖️ कायद्यातील तरतूद
मनरेगा अंतर्गत वेतन दर हे कलम 6(1) अंतर्गत जाहीर केले जातात आणि ते दरवर्षी 1 एप्रिलपासून लागू होतात मात्र यंदा ही प्रक्रिया उशिरा सुरू असल्यामुळे कामगारांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
कामगारांवर परिणाम
वेतनवाढ लांबणीवर,महागाईत वाढ,ग्रामीण भागातील उत्पन्नावर परिणाम,रोजगार हमी योजनेवर अवलंबून असलेल्यांची अडचण वाढणार
नवीन VB-G RAM G कायदा 2025 लागू झाल्यानंतरच नवीन वेतन दर जाहीर
कामगारांना वाढीव मोबदला मिळण्याची शक्यतातोपर्यंत मात्र कोट्यवधी कामगारांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

इंधनदर वाढीचा झटका बसणार; पेट्रोल ₹18 तर डिझेल ₹35 पर्यंत महागण्याची शक्यता

0

नवी दिल्ली — देशात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे लवकरच पेट्रोल-डिझेल दरात मोठी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. विशेषतः निवडणुका संपल्यानंतर ही दरवाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर मोठा परिणाम होऊ शकतो.

कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी चढउतार

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर अस्थिर आहेत.फेब्रुवारी अखेरीस: $73 प्रति बॅरल,मार्चमध्ये वाढ होऊन $120 प्रति बॅरल झाले.एप्रिलमध्ये किंचित घट होऊन $100 प्रति बॅरल झाली ही पातळी अजूनही उच्च असल्यामुळे भारतातील तेल कंपन्यांवर आर्थिक ताण वाढत आहे.

तेल कंपन्यांना मोठा तोटा

पेट्रोलवर अंदाजे ₹18 प्रति लिटर तोटा
डिझेलवर अंदाजे ₹35 प्रति लिटर तोटा
काही आठवड्यांपूर्वी दररोज तोटा: ₹2,400 कोटी होता .सध्या हा तोटा कमी होऊन ₹1,600 कोटी रुपये झाला आहे. कच्च्या तेलात प्रत्येक $10 वाढ झाली, की कंपन्यांचा तोटा प्रति लिटर ₹6 ने वाढतो.

 भारताचे आयातीवर अवलंबित्व

भारत आपल्या गरजेपैकी सुमारे 88% कच्चे तेल आयात करतो मध्यपूर्व देशातून 45%तर रशियामधून 35% आयात केले जाते.
म्हणूनच आंतरराष्ट्रीय बाजारातील बदलांचा थेट परिणाम भारतातील इंधनदरांवर होतो.

अर्थव्यवस्थेवर परिणाम

चालू खात्यातील तूट वाढण्याची पहिल्या तीमाहित शक्यता $20 अब्ज डॉलर होऊन रुपयावर दबाव वाढू शकतो इंधनावरील उत्पादन शुल्काचा महसूल घट पूर्वी:22%होती ती सध्या 8% इतकी आहे

दरवाढ कधी होणार?

तज्ज्ञांच्या मते, पाच राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर पेट्रोल-डिझेल दरवाढ होण्याची शक्यता जास्त आहे.कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, आयातीवरील अवलंबित्व आणि तेल कंपन्यांचा तोटा यामुळे येत्या काळात इंधनदर वाढ जवळपास निश्चित मानली जात आहे. याचा थेट परिणाम महागाई आणि सर्वसामान्यांच्या दैनंदिन खर्चावर होणार आहे.

30 हजारांची लाच घेताना अधीक्षक रंगेहात पकडला

0

बीड —  शहरातील पालवण चौक परिसरात सोमवारी (दि. 13) संध्याकाळी मोठी कारवाई करत जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) शासकीय निरीक्षणगृहाचा प्रभारी अधीक्षक कपिल भीमराव कांबळे याला 30 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

तक्रारदार हा शासकीय निरीक्षणगृहात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहे. त्याची हजेरी नियमितपणे वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यासाठी आणि आवश्यक आदेश काढण्यासाठी आरोपी अधीक्षक कांबळे याने सुरुवातीला 45 हजार रुपयांची लाच मागितली होती.त्यानंतर दोघांमध्ये तडजोड होऊन 30 हजार रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले.
रविवारी (दि. 12) या संदर्भात तक्रार प्राप्त झाल्यानंतर जालना ACBने तत्काळ पडताळणी केली. खात्री झाल्यानंतर सोमवारी पालवण चौक परिसरात सापळा रचण्यात आला.
यावेळी आरोपी कांबळे लाचेची 30 हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडला गेला. त्याला ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, आरोपीच्या घराची झडती घेण्यासाठी बीड ACBचे स्वतंत्र पथक रवाना करण्यात आले असून अधिक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. सतत उघडकीस येत असलेल्या लाचखोरीच्या प्रकरणांमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

सरासरीपेक्षा कमी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज; शेतकऱ्यांची चिंता वाढली

0

नवी दिल्ली — भारतीय हवामान विभाग (IMD) ने आज नैऋत्य मान्सून 2026 संदर्भातील पहिला अधिकृत अंदाज जाहीर केला असून, यावर्षी देशात सरासरीच्या 92% पर्जन्य होण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे हा मान्सून “सामान्यपेक्षा कमी” (Below Normal) श्रेणीत येतो.

असा आहे IMD चा अंदाज?

देशात यंदा 92% पाऊस होण्याचा अंदाज आहे.
दीर्घकालीन सरासरीच्या (LPA)87 सेंटीमीटर
90%–95% पाऊस हा  सामान्यपेक्षा कमी पाऊस मानला जातो.पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन यांनी हा अंदाज जाहीर केला.

 जून ते सप्टेंबर पावसाची स्थिती

IMD चे महासंचालक डॉ. एम. मोहापात्रा यांच्या माहितीनुसार जून, जुलै, ऑगस्ट: पावसाची स्थिती सामान्य राहण्याची शक्यता आहे
जुलै–सप्टेंबर मध्ये एल निनो परिस्थिती सक्रिय राहणार आहे.मात्र, भारतीय महासागरातील सकारात्मक स्थितीमुळे  एल निनोचा नकारात्मक परिणाम कमी जाणवण्याची शक्यता

📉 पावसाच्या श्रेणी (IMD वर्गीकरण)
टक्केवारी

हवामान विभागाने पावसाच्या मोजणीच्या पाच श्रेणी ठरवल्या आहेत. सरासरीच्या 90 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस म्हणजे अपुरा पाऊस समजला जातो. दुसऱ्या श्रेणीत 90 ते 95 टक्के म्हणजे सरासरीपेक्षा कमी पाऊस, तर तिसऱ्या श्रेणीत 96 ते 104 टक्के म्हणजे सामान्य सरासरी इतका पाऊस समजला जातो. पुढील दोन श्रेणी सरासरीपेक्षा अधिक म्हणजे 105 ते 110 टक्के आणि 110 टक्क्यांच्या पुढे अधिक पाऊस म्हणजे सर्वाधिक पाऊस समजला जातो.

 शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा?

यंदा आधीच काही खाजगी वेधशाळांनी मान्सून कमकुवत राहण्याचा अंदाज दिला होता. आता IMD च्या अधिकृत अंदाजानंतर चिंतेत वाढ झाली आहे. कमी पावसाचा पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असते
पाण्याची टंचाई वाढू शकते,ग्रामीण अर्थव्यवस्थेवर दबाव येतो त्यामुळे देशातील बळीराजा आणि कृषी क्षेत्रात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

अर्थव्यवस्थेवर परिणाम?

मान्सून हा भारताच्या कृषी आणि अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. कमी पावसामुळे:
अन्नधान्य उत्पादन घटू शकते,महागाई वाढण्याची शक्यता वाढून GDP वर अप्रत्यक्ष परिणाम होतो.