Home Blog Page 32

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुका 2026: 3 महिन्यांत 27 नवे आमदार? मोठी राजकीय हालचाल सुरू

0

मुंबई — महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर आता निवडणूक आयोगाने Election Commission of India  विधानपरिषदेतील रिक्त जागांबाबत हालचाली वेगाने सुरू केल्या आहेत. येत्या तीन महिन्यांत तब्बल 27 जागांसाठी निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

 काय आहे संपूर्ण घडामोड?

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडल्या जाणाऱ्या 17 जागा गेल्या तीन वर्षांपासून रिक्त होत्या. मतदारसंख्या उपलब्ध नसल्यामुळे या निवडणुका रखडल्या होत्या. मात्र नुकत्याच झालेल्या नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमुळे आता परिस्थिती बदलली आहे.
निवडणूक आयोगाने संबंधित मतदारांची माहिती मागवली असून 75% पेक्षा जास्त मतदार उपलब्ध असल्यास निवडणूक घेण्याचा नियम लागू होणार आहे.यामुळे लवकरच या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.

 आणखी 10 जागांवरही निवडणुका

विधानसभेतील सदस्यांकडून निवडल्या जाणाऱ्या 9 जागांची मुदत 17 मे रोजी संपत आहे. काँग्रेस नेत्या प्रज्ञा सातव Pragya Satav यांच्या राजीनाम्यामुळे 1 जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे एकूण 27 जागांवर निवडणुका निश्चित होण्याची शक्यता

 राजकीय समीकरण काय सांगते?

सध्याच्या परिस्थितीनुसार सत्ताधारी महायुतीला बहुमत मिळण्याची शक्यता आहे तर विरोधकांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणात मोठे बदल घडण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

MSP वर मोठी लढाई: उत्पादन खर्चाधारित हमीभाव ठरवण्याची मागणी; शेतकऱ्यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

0

नवी दिल्ली — महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी किमान आधारभूत किंमत (MSP) ठरवताना शेतीचा पूर्ण उत्पादन खर्च (C2) विचारात घ्यावा, या महत्त्वाच्या मागणीसाठी Supreme Court of India मध्ये जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेची दखल घेत न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली असून, यावर उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

🌾 काय आहे शेतकऱ्यांची मुख्य मागणी?

याचिकाकर्ते प्रकाश पोहरे, पुरुषोत्तम गावडे आणि विशाल रावत यांनी संविधानाच्या अनुच्छेद 32 अंतर्गत याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये

पुढील मुद्दे मांडले आहेत:
MSP C2 (पूर्ण उत्पादन खर्च) वर आधारित असावासरकारने त्या दराने प्रत्यक्ष खरेदीची हमी द्यावी,सध्याच्या A2+FL पद्धतीतून जमिनीचे भाडे आणि भांडवलाचा खर्च वगळला जातो
त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पूर्ण गुंतवणुकीचा परतावा मिळत नाही, असा युक्तिवाद करण्यात आला आहे.

न्यायालयातील सुनावणीतील महत्त्वाचे मुद्दे

याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठाने काही महत्त्वाच्या बाबी मांडल्या:
जमीन व भांडवलाचा खर्च निश्चित करणे राज्यानुसार अवघड ठरू शकते.
न्यायालयाने हस्तक्षेप केल्यास देशाचे आर्थिक धोरण बदलण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो‌‌
याचिकाकर्त्यांचे वकील Prashant Bhushan यांनी सांगितले की:“ही मागणी नफा (50%) नाही, फक्त शेतकऱ्यांना त्यांचा पूर्ण खर्च (C2) मिळावा, इतकीच अपेक्षा आहे.”

MSP आणि शेतकऱ्यांची स्थिती

सध्या MSP प्रामुख्याने गहू आणि तांदूळ यापुरतीच मर्यादित इतर पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळत नाही
अनेक वेळा MSP हा प्रत्यक्ष खर्चापेक्षाही कमी असतो
याचिकेत दिलेल्या माहितीनुसार:
⭐मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 17 हजारांहून अधिक शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत.
⭐मुख्य कारण – तोट्यातील शेती आणि अपुरी खरेदी व्यवस्था
C2 vs A2+FL – फरक समजून घ्या घटक
A2+FL    C2
प्रत्यक्ष खर्च (बियाणे, खत),कुटुंबाचे श्रम,जमिनीचे भाडे ्भाडवलावरील व्याज त्यामुळे C2 हा अधिक वास्तव खर्च मानला जातो जर न्यायालयाने C2 आधारित MSP लागू करण्याचे निर्देश दिले तर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते.आत्महत्यांचे प्रमाण कमी होण्याची शक्यता तसेच सरकारवर आर्थिक ताण वाढू शकतो

गेवराईत जमीन वादातून शेतकऱ्याची निर्घृण हत्या; एकाच कुटुंबातील तिघांवर खुनाचा गुन्हा

0

गेवराई (बीड ) —  तालुक्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गौंडगाव शिवारात किरकोळ जमीन वादातून 57 वर्षीय शेतकऱ्याची काठ्या आणि दगडांनी मारहाण करून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.मृत शेतकऱ्याचे नाव अर्जुन साहेबराव माळी असे असून, या प्रकरणी गेवराई पोलिसांनी एकाच कुटुंबातील तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवार, 11 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजता घडली.

काय घडले नेमके?

मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन माळी यांनी गौंडगाव शिवारातील गट क्रमांक 155 मधील गायरान जमिनीचा काही भाग मशागतीसाठी वापरात घेतला होता. या जमिनीच्या शेजारी आरोपींची शेती असल्याने दोन्ही बाजूंमध्ये आधीपासून वाद होता.
घटनेच्या दिवशी सायंकाळी, माळी हे शेतात गेले असता आरोपींनी त्यांना घेरले. शेताचा बांध फोडल्याच्या कारणावरून वाद वाढला आणि आरोपींनी काठ्या व दगडांनी अमानुष मारहाण केली.

 उपचारादरम्यान मृत्यू

गंभीर जखमी अवस्थेत माळी यांना प्रथम गेवराई येथील सरकारी रुग्णालयात आणि नंतर बीड जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, मध्यरात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

 पोलिसांची कारवाई

या प्रकरणी मृताच्या मुलगा पपेश माळी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मधुकर नायबा शिंदे,
मनोहर मधुकर शिंदे तसेच एका विधी संघर्षग्रस्ता विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1), 3(5) आणि 352 अंतर्गत खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अण्णासाहेब पवार करत आहेत. दरम्यान पोलिसांनी आरोपींच्या शोधात चक्र फिरवली असता आरोपींनी पोलिसांना थांगपत्ता लागू नये यासाठी आपले मोबाईल बंद करून ठेवले होते. दरम्यान पोलिसांना मधुकर नायबा शिंदे व मनोहर मधुकर शिंदे हे दोघे बीडच्या बार्शी नाका परिसरात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून मोठ्या शिताफीने पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या या दोन्ही आरोपींना अवघ्या सहा तासातच बेड्या ठोकल्या आहेत.

सावत्र पित्याकडून १३ वर्षीय मुलीवर अत्याचार; गुन्हा दाखल

0

केज — तालुक्यात नातेसंबंधांना काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच सावत्र पित्याने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असून, आरोपीविरुद्ध POCSO Act अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 घटना नेमकी काय घडली?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या आईने सुमारे ९ वर्षांपूर्वी पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर आरोपीसोबत दुसरे लग्न केले होते. या कुटुंबात एक लहान मुलगाही आहे.
९ एप्रिल रोजी, मुलीची आई माहेरी गेली असताना आरोपी घरी आला. घरात मुलगी एकटी असल्याचे पाहून त्याने गैरफायदा घेतल्याचे समोर आले आहे. त्याने आपल्या लहान मुलाला मोबाईलमध्ये गुंतवून ठेवले आणि मुलीशी अयोग्य वर्तन करत जबरदस्ती केली.

 मुलीने दिली आईला माहिती

घटनेनंतर आई घरी परतल्यावर मुलगी घाबरलेली आणि रडत असल्याचे दिसले. सुरुवातीला ती काही बोलली नाही, मात्र आईने विश्वासात घेतल्यावर तिने संपूर्ण प्रकार सांगितला.
पोलिसांत गुन्हा दाखल
यानंतर पीडितेच्या आईने तात्काळ केज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध:भारतीय न्याय संहिता कलम 64(3)(F), 65(1)
POCSO Act पाॅक्सो ॲक्ट कलम 4 आणि 6
अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.या प्रकरणाचा तपास पिंक पथकाचे फौजदार प्रकाश शेळके करत आहेत.

स्वर सम्राज्ञी आशा भोसले यांचं 92 व्या वर्षी निधन

0

मुंबई — ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. आपल्या चिरतरुण आवाजाने सगळ्या जगाला भुरळ घालणाऱ्या आशा भोसले या आज काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. आशा भोसले यांच्या छातीत संसर्ग झाल्याने त्यांना शनिवारी रात्री उशिरा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी आशा भोसले यांच्या निधनाची माहिती दिली.

उद्या दुपारी ४ वाजता आशा भोसले यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टी, गायन क्षेत्र आणि कला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
आशा भोसले यांचे चिरंजीव आनंद भोसले यांनी ही माहिती दिली की त्यांची आई आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झालं आहे. आशा भोसलेंचे अवयव निकामी होत गेले, त्यामुळे त्यांचं निधन झालं. आशा भोसले यांना शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. उद्या सकाळी ११ ते २ या वेळेत त्या लोअर परळ या ठिकाणी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी ४ वाजता शिवाजी पार्क या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अशी माहिती आनंद भोसले यांनी दिली.

आज संपूर्ण देश आणि महाराष्ट्र आकंठपणे दुःखात बुडाला आहे. एका युगाचा अंत झाला आहे, आपल्या आशाताई आपल्यातून निघून गेल्या आहेत. आशाताईंचं असणं हे वर्षानुवर्षे समाधानाची अनुभूती देत होतं. आपण दुःखाला कवटाळून लोकांना आनंद देणं ही त्यांची खासियत होती. त्यांचं कर्तृत्व जगाला वेड लावणारं होतं. अशा आशाताई आज आपल्यात राहिल्या नाहीत. आता कुटुंबाने सांगितल्याप्रमाणे उद्या त्यांचं पार्थिव त्यांच्या लोअर परळ येथील निवासस्थानी ठेवण्यात येईल. तिथे लोकांना अंत्यदर्शन घेता येईल. त्यानंतर शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात येतील. शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांचं नसणं हे आपल्याला आयुष्यभर दुःख देणारं आहे असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
सांगली या ठिकाणी आशा भोसले यांचा जन्म झाला होता. वयाच्या १० व्या वर्षापासून त्यांनी गायनाला सुरुवात केली होती. गिनीज बुकमध्ये सर्वाधिक गाणी गाणारी गायिका अशी त्यांची नोंद झाली आहे. आपल्या वेगळ्या आवाजाची भुरळ सगळ्या जगाला पडली होती. त्या जरी आपल्याला सोडून गेल्या असल्या तरीही त्यांचं गाणं कायमच आपल्या सोबत राहणार आहे. तो आवाज कायमच आपल्याला साथ देईल यात शंका नाही.

निर्घृण हत्या,पोलिसांचे आरोपीशी संगनमत? २८ पोलीस अधिकारी एकाच वेळी निलंबित !

0

बोकारो — झारखंडमधील बोकारो येथे घडलेल्या एका धक्कादायक हत्याकांडाने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. एका तरुणाने आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार समोर आला असून, या प्रकरणात पोलिसांच्या गंभीर निष्काळजीपणामुळे एकाच वेळी २८ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

 प्रेयसीची जंगलात हत्या

आरोपीने तरुणीला जंगलात नेऊन तिच्यावर अनेक वेळा चाकूने वार करून हत्या केली. त्यानंतर मृतदेह जंगलात टाकून पुरावे लपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 ८ महिन्यांनंतर उघडकीस आले प्रकरण

पीडित तरुणी पुष्पा कुमारी महातो ही २४ जुलै २०२५ पासून बेपत्ता होती. तिच्या आईने वारंवार पोलिसांकडे धाव घेतली, मात्र सुरुवातीला तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात आली. अखेर दहाव्या दिवशी एफआयआर दाखल झाला, पण त्यानंतरही तपासात कोणतीही ठोस प्रगती झाली नाही.

हायकोर्टाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

न्याय मिळत नसल्याने पीडितेच्या आईने झारखंड उच्च न्यायालय येथे धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानंतर तपासाला गती मिळाली आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

एकाच वेळी २८ पोलीस निलंबित

तपासात समोर आले की, पिंडराजोरा पोलीस ठाणे येथील पोलीस अधिकारी आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत होते.
निलंबित अधिकाऱ्यांमध्ये १० उपनिरीक्षक,५ सहायक उपनिरीक्षक,२ हेड कॉन्स्टेबल,११ कॉन्स्टेबल यांचा समावेश आहे. झारखंडच्या इतिहासात पहिल्यांदाच एका पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांवर एकत्रित कारवाई झाली आहे.

 लाचखोरी आणि संगनमताचे गंभीर आरोप

तपासादरम्यान उघड झाले की काही पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपींसोबत संगनमत करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. लाचखोरी, पुरावे लपवणे आणि तपासात निष्काळजीपणा असे गंभीर आरोप त्यांच्यावर लावण्यात आले आहेत.

 नवीन SIT ने उघड केला गुन्हा

डीएसपी आलोक रंजन यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले. या पथकाने काही तासांतच आरोपीला अटक केली आणि जंगलातून पीडितेच्या सांगाड्याचे अवशेष, हत्येसाठी वापरलेला चाकू आणि कपडे जप्त केले.

आईचा आरोप: सुरुवातीपासूनच आरोपी माहीत होता

पीडितेच्या आईने सुरुवातीपासूनच एका शेजाऱ्यावर संशय व्यक्त केला होता, मात्र पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. योग्य वेळी कारवाई झाली असती, तर हा गुन्हा आधीच उघडकीस आला असता.

अंबाजोगाई-लातूर रोडवर भीषण अपघात; 23 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

0

अंबाजोगाई (बीड) – अंबाजोगाई-लातूर महामार्गावर लोखंडी सावरगाव परिसरात भीषण अपघाताची घटना घडली असून, या अपघातात 23 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मृत तरुणाचे नाव अथर्व महादेव ढगे (रा. धानोरा खुर्द, ता. अंबाजोगाई) असे आहे.

कसा झाला अपघात?

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अथर्व ढगे हा आपल्या मोटारसायकलवरून (MH 44 D 7483) धानोरा (खुर्द) येथून अंबाजोगाईकडे जात होता. त्याचवेळी अंबाजोगाईहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी शिवाई बस (MH 49 BZ 9581) समोरून येत होती.
लोखंडी सावरगाव जवळ एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मोटारसायकल आणि बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की मोटारसायकलचा अक्षरशः चक्काचूर झाला.
या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने अथर्व ढगे याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

 कुटुंबावर दुःखाचा डोंगर

अथर्व हा अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याला एक विवाहित बहीण आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याच्या आई-वडिलांनी त्याला किराणा दुकान सुरू करून दिले होते आणि तो त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.त्याच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पराभूत उमेदवाराकडून भाजप नगरसेविकेच्या पती वर भ्याड हल्ला; पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

0

बीड – नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीतील पराभवाचा राग मनात धरून कबाड गल्ली परिसरात शिवसेनेच्या पराभूत उमेदवाराकडून भाजप नगरसेविकेच्या पतीवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला असून, त्यानंतर पोलिसांच्या कारवाईवरही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
प्रभाग क्रमांक ७ मधील भाजपच्या विजयी उमेदवार सौभाग्यश्री देशपांडे यांचे पती सागर देशपांडे यांच्यावर हा हल्ला झाला. तक्रारीनुसार, पराभूत उमेदवार बाळासाहेब जाधव हे निकालानंतर सातत्याने धमक्या, शिवीगाळ आणि त्रास देत होते.

📌 काय घडले नेमके?

शुक्रवारी सायंकाळी  ८ वाजण्याच्या सुमारास सागर देशपांडे आपल्या घरासमोर फोनवर बोलत उभे असताना, बाळासाहेब जाधव आपल्या मुलासह ५ ते ७ जणांना घेऊन घटनास्थळी आले. त्यांनी अचानक हल्ला करत लाथा-बुक्क्यांनी व काठीने मारहाण केली. या हल्ल्यात देशपांडे जखमी झाले. विशेष म्हणजे, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसत असून, हल्लेखोरांनी समोरून येत थेट मारहाण केल्याचे दृश्य समोर आले आहे.

पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न

या घटनेदरम्यान सागर देशपांडे यांचे वडील अरुण देशपांडे हे घराच्या गॅलरीत उभे असल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. तरीही बीड शहर पोलिसांनी त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे.यामुळे “घटनास्थळी प्रत्यक्ष सहभागी नसतानाही गुन्हा दाखल का?” असा सवाल उपस्थित होत आहे.पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. शितलकुमार बल्लाळ यांच्याशी अवैध धंद्यातून निर्माण झालेला दोस्ताना अरुण देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास कारणीभूत ठरला असल्याचं सांगितलं जाऊ लागला आहे.

📄 दोन्ही बाजूंनी गुन्हे दाखल

सागर देशपांडे यांच्या फिर्यादीवरून बाळासाहेब जाधव यांचा मुलगा व इतर ५-६ जणांवर गुन्हा दाखल झाल.तर दुसरीकडे, जाधव यांच्या फिर्यादीवरून देशपांडे पिता-पुत्रावरही गुन्हा करण्यात आला आहे.
स्थानिक पातळीवर बाळासाहेब जाधव यांचा मटका व पत्त्याच्या क्लबशी संबंधित व्यवसाय असल्याची नोंद असून, त्यांच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे.

NCERT चा निर्णय वादग्रस्त! 8 वीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवला

0

सातारा —  राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद म्हणजेच NCERT यांनी इयत्ता आठवीच्या इतिहास पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा वगळण्याचा निर्णय घेतल्याने राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया देत वृषालीराजे भोसले यांनी तो खेदजनक व निषेधार्ह असल्याचे म्हटले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी नमूद केले की, छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात मराठा साम्राज्याने दिल्लीच्या राजकारणावर आपली मजबूत पकड निर्माण केली होती. मराठ्यांचा पराक्रम सह्याद्रीपुरता मर्यादित न राहता अटकेपार पोहोचला होता, हे ऐतिहासिक सत्य आहे.

राजस्थानमधील रामपुरा मोहीम, बुंदीतील हस्तक्षेप, कक्कोरचे युद्ध तसेच पाटण आणि मेर्टा येथील विजय हे मराठ्यांच्या युद्धनीतीचे जिवंत पुरावे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्या काळात अनेक राजपूत संस्थानांनी मराठ्यांचे वर्चस्व मान्य केले होते.
अशा परिस्थितीत मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशा अभ्यासक्रमातून काढून टाकणे म्हणजे इतिहास पुसण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याची टीका होत आहे.
इतिहास हा कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक दबावाखाली बदलला जाऊ नये. तो पुराव्यांच्या आधारे पुढील पिढीपर्यंत जसाच्या तसा पोहोचवणे गरजेचे आहे. मराठ्यांच्या उत्तरेकडील प्रभावाचा पुरावा देणारा नकाशा हटवणे हे ऐतिहासिक सत्याशी प्रतारणा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
याप्रकरणी सर्व कायदेशीर बाबी तपासून लवकरच पुढील कार्यवाही केली जाईल, असा इशाराही वृषालीराजे भोसले यांनी दिला.
“हा केवळ इतिहास नाही, तर आमचा स्वाभिमान आहे आणि त्याचे रक्षण आम्ही नक्की करू,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

महाराष्ट्रात पुन्हा भूकंपाचे धक्के! मराठवाड्यानंतर चंद्रपूर हादरलं; 3.4 रिश्टरची नोंद

0

चंद्रपूर — महाराष्ट्रात आज (11 एप्रिल) भूकंपाच्या सौम्य धक्क्यांची मालिका सुरूच असून, सकाळी मराठवाड्यात हादरे जाणवल्यानंतर आता चंद्रपूर जिल्ह्यातही भूकंपाची नोंद झाली आहे. या घटनांमुळे नागरिकांमध्ये काही प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चंद्रपूरमध्ये दुपारी भूकंप

National Center for Seismology (NCS) च्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील हरदोना खुर्द येथे दुपारी 4 वाजून 22 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता
तीव्रता: 3.4 रिश्टर स्केल इतकी होती. गडचांदूर आणि राजोरा दरम्यान हरदोना खुर्द गावामध्ये जमिनीखाली दहा किलोमीटर अंतरावर केंद्रबिंदू होता.हा भूकंप सौम्य स्वरूपाचा असल्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

🌍 सकाळी मराठवाड्यातही हादरे

आज सकाळी सुमारे 8:46 वाजता मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.परभणी,हिंगोली,नांदेड तसेच विदर्भातील यवतमाळ वाशिम
या भागांमध्येही सौम्य धक्के जाणवले.

 हिंगोलीत अधिक तीव्र भूकंप

हिंगोली जिल्ह्यातील पांग्रा शिंदे परिसरात 4.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप नोंदवला गेला.
MGM APJ Abdul Kalam Astro Space Science Center चे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा भाग आजच्या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. दरम्यान
गेल्या काही दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात भूगर्भातून गूढ आवाज येणे आणि लहान-मोठे धक्के जाणवण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.