Home Blog Page 24

पत्नी नांदायला आली नाही ; संतापलेल्या पित्याचा दोन चिमुरड्यांना जाळण्याचा प्रयत्न

0

माजलगाव (बीड) — जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पत्नी नांदायला येत नसल्याच्या कारणावरून संतापलेल्या पित्याने स्वतःच्या दोन लहान मुलींना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना माजलगाव तालुक्यातील लहामेवाडी येथे घडली असून, वेळेवर हस्तक्षेप झाल्याने मोठा अनर्थ टळला.

काय घडले नेमके?

फिर्यादी अश्विनी महेश सोमासे (वय 33, रा. टालेवाडी) या पतीसोबत झालेल्या कौटुंबिक वादामुळे सध्या माहेरी राहत होत्या.
दि. २ मे रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता, त्यांचे पती महेश विष्णू सोमासे हे दुचाकीवरून दोन्ही मुलींना घेऊन लहामेवाडी येथे आले.त्यांनी पत्नीला “नांदायला चल” असे सांगितले. मात्र अश्विनी यांनी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींसमोर बैठक घेऊन वाद मिटवण्याचा प्रस्ताव दिला. यामुळे संतापलेल्या आरोपीने संतापाच्या भरात गंभीर पाऊल उचलले.

मुलींवर डिझेल ओतून जाळण्याचा प्रयत्न

आरोपीने धमकी देत दुचाकीवरील पिशवीतून डिझेलचा कॅन काढून आपल्या ५ वर्षांच्या मृणाल आणि ४ वर्षांच्या मृण्मय या चिमुरड्यांच्या अंगावर डिझेल ओतले. त्यानंतर काडीपेटी काढून त्यांना पेटवण्याचा प्रयत्न केला.

वेळेवर मदत – अनर्थ टळला

या प्रकारामुळे अश्विनी आणि त्यांच्या आईने आरडाओरडा केला. आवाज ऐकून नातेवाईक आसाराम चिंचोलकर तात्काळ घटनास्थळी धावून आले. त्यांनी आरोपीच्या हातातील डिझेलचा कॅन आणि काडीपेटी हिसकावून घेतली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

पोलिसांत गुन्हा दाखल

घटनेनंतर आरोपीने पत्नी व माहेरच्या लोकांना जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात आरोपी पतीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय, देशातील सर्व रेकॉर्ड मोडले

0

बारामती — महाराष्ट्रातील बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीच्या उमेदवार व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ऐतिहासिक विजय नोंदवत देशातील सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांनी तब्बल २ लाख१८ हजार ९३० मतांनी विजय मिळवत आधीचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला.
यापूर्वी सुनील कुमार शर्मा (साहिबाबाद, उत्तरप्रदेश) यांच्या नावावर २,१४,८३५ मताधिक्याचा विक्रम होता, जो आता बारामतीत मोडला गेला आहे.

 मतदान आणि मतमोजणीचा आढावा

बारामती पोटनिवडणुकीत एकूण ५८.१७% मतदान झाले.
एकूण मतदार: —  ३लाख ,८४हजार ,५७९
मतदान करणारे: २,२३,७०५
मतमोजणी सोमवारी (४ मे) सकाळी ८ वाजता बारामती MIDC येथील गोदामात सुरू झाली. पहिल्याच फेरीपासून सुनेत्रा पवार यांनी मोठी आघाडी घेतली आणि ती शेवटपर्यंत कायम ठेवली.

18व्या फेरीतच जुना विक्रम मोडला 

१८व्या फेरीतच सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांनी २०१९ मध्ये केलेला १ लाख ६५ हजार‌ २६५ मताधिक्याचा विक्रम मोडला. त्यानंतर प्रत्येक फेरीत त्यांचे मताधिक्य वाढत गेले आणि अखेर त्यांनी नवा इतिहास घडवला.

2024 निवडणुकीचा संदर्भ

२० नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बारामतीत ७१.२७% मतदान झाले होते. त्या वेळी “पवार विरुद्ध पवार” अशी थेट लढत झाली होती: यावेळी अजित पवार यांना  १ लाख ८१ हजार १३२ मते पडली होती. युगेंद्र पवार यांना  ८० हजार २३३ मते
त्यात अजित पवार १लाख ,९०९ मतांनी विजयी झाले होते.

 पोटनिवडणूक कशी लागली?

अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर ही पोटनिवडणूक लागली. निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र अपक्ष व छोट्या पक्षांमुळे निवडणूक झाली.
या निवडणुकीत एकूण २२ उमेदवार रिंगणात होते, परंतु सुनेत्रा पवार यांच्या प्रचंड लाटेमुळे सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले.

 

नसरापुर प्रकरणी आरोपीला फाशीची मागणी; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

0

बीड — पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापुर येथे साडे तीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून झाल्याच्या घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबाणेशकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात, प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून ३० दिवसांत आरोपपत्र दाखल करावे व पीडित कुटुंबाला तातडीने न्याय मिळवून द्यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. “अनेक प्रकरणांमध्ये केवळ घोषणा होतात, पण खटले वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात. या प्रकरणात तरी ठोस व तातडीची कारवाई व्हावी,” अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.

आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा द्यावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. याचवेळी न्याय मागणीसाठी आंदोलन करणाऱ्यांवर लाठीमार करणा-या पोलिस यंत्रणेचाही निषेध करण्यात आला.आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड सुनेत्राताई पवार निवेदन पाठविण्यात आले.

या आंदोलनात शेख युनुस, रामनाथ खोड,मुबीन शेख, सय्यद सादेक ,रामधन जमाले,बाजीराव ढाकणे,प्रा.डी.जी.तांदळे, डॉ.संजय तांदळे, किष्किंधा पांचाळ, मुस्ताक शेख
आदींचा सहभाग होता.

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

0

केज — शहरातील एका भागात राहत असलेली शालेय शिक्षण घेत असलेली १५ वर्ष १० महिने वयाच्या मुलीचा पंधरा दिवसापूर्वी दि. १४ एप्रिल रोजी दुपारी १:०० ते ३:०० वा. च्या दरम्यान एका नराधमाने पाठलाग करून तिला आणि तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देवून तिला त्याच्या राहते घरी बोलावुन घेतले. त्या नंतर त्याने त्या अल्पवयीन मुली सोबत बळजबरीने आणि जबरदस्तीने शारीरिक लैंगिक संबंध प्रस्थापित केले.

सदर घटने बाबत कोणाला काही सांगितल्यास मुलीच्या आई-वडील व भावाला जिवे मारण्याची धमकी दिली.तसेच मुलीच्या मोबाईलवर आरोपीने व्हिडीओ कॉल करुन त्याचे मोबाईलची स्क्रीन शेअर केली आणि त्याच्याकडे असलेल्या पेनड्राईव्ह मधील बळजबरीने लैगींक अत्याचार केलेला व्हिडीओ दाखवला. तसेच आता सांगेल तसे कर. असे म्हणुन कपडे काढ म्हणाला, परंतु तिने नकार दिला असता व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. दरम्यान या प्रकरणी २ मे रोजी पीडितेच्या तक्रारी वरून केज पोलिस ठाण्यात रेहान रियाज शेख याच्या विरुद्ध गु. र. नं. २५८/२०२६ भा. न्या. सं. ७४, ७५, ७६, ७८(१), ७९, ६४(२) (ळ), ६५(१), ३५१(२) (३) आणि पोक्सोचे कलम ४, ६, ८, १०, १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पिंक पथकाचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे तपास करीत आहेत. या गुन्ह्यातील आरोपी रेहान शेख यास न्यायालयासमोर हजर केले असता त्याला ६ मे पर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पाणीटंचाई, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात घेतली आ.संदिप क्षीरसागरांनी आढावा बैठक

0
उन्हाळ्याच्या काळात पाणीटंचाई भासू नये यासाठी नियोजन करण्याच्या दिल्या प्रशासनाला सुचना
बीड  —  उन्हाळ्याच्या काळात नागरिकांसमोर पाणीटंचाई सारखे संकट उभे राहू नये. त्या संदर्भात नियोजन करून तातडीने पाणीटंचाईच्या अनुषंगाने उपाययोजना कराव्यात अशा सुचना आ.संदिप क्षीरसागर यांनी प्रशासनाला केल्या आहेत. उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या आणि पीक विम्याच्या अनुषंगाने आ.संदिप क्षीरसागर यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकी दरम्यान त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना सुचना दिल्या आहेत.
                 सोमवार (दि.4) रोजी पाणी टंचाई आणि शेतकर्‍यांच्या विविध समस्या यांच्या अनुषंगाने आ.संदिप क्षीरसागर यांनी शासकीय विश्रामगृह बीड येथे पंचायत समिती, कृषी विभाग आणि इतर विभागांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत बीड मतदारसंघातील बीड व शिरूर (का.) तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये पाणी टंचाई सारखी भीषण समस्या निर्माण होऊ नये यासाठी टँकरने पाणी पुरवठा, जलस्त्रोत अधिग्रहण आणि इतर उपाययोजना करण्या संदर्भात विस्तृत चर्चा करण्यात आली. पाणी टंचाईला होऊ नये यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर नियोजन करून उपाय योजनांची अंमलबजावणी तात्काळ करावी, अशा सुचना आ.क्षीरसागर यांनी दिल्या. तसेच, पीक विमा, पी.एम.किसान योजना तसेच शेतकर्‍यांसाठी शासनाकडून राबविण्यात येणार्‍या विविध योजना आणि शेतक·यांच्या दृष्टीने त्यामध्ये असलेल्या अडचणी या बाबत देखील यावेळी आ.क्षीरसागर यांनी कृषी विभागाच्या अधिका·यांकडून आढावा घेवून आवश्यक त्या सुचना केल्या. या बैठकीस माजी आ.सय्यद सलीम, बीड पंचायत समिती,  शिरूर (का.) पंचायत समिती, कृषी विभाग येथील संबंधित अधिकारी यांची उपस्थिती होती.

आवश्यक असलेल्या गावांमध्ये टँकर मागणीसाठी प्रस्ताव सादर करा- आ.संदिप क्षीरसागर 

बीड विधानसभा मतदारसंघातील बीड व शिरूर का. तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये उन्हाळ्यातील होणा·या पाणी टंचाई साठी आवश्यक असलेल्या गावांनी ग्रामपंचायतीचा ठराव घेवून टँकर मागणीचे प्रस्ताव आपल्या पंचायत समितीकडे सादर करावेत, असे आवाहन आ.संदिप क्षीरसागर यांनी केले आहे.

पंढरपूर कॉरिडॉरला ४ हजार कोटींची मंजुरी; १ ऑगस्टपर्यंत भूसंपादन पूर्ण होणार !

0

मुंबई –जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर (Pandharpur) शहराच्या विकासासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत पंढरपूर कॉरिडॉर आणि शहर विकास प्रकल्पाला अंतिम मंजुरी देण्यात आली आहे.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी तब्बल ₹४,००० कोटींचे बजेट निश्चित करण्यात आले असून, पुढील ५० वर्षांच्या गरजा लक्षात घेऊन हा आराखडा तयार करण्यात आला आहे. आमदार समाधान अवताडे (Samadhan Avatade) यांनी सांगितले की, १ ऑगस्टपर्यंत भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे, ज्यामुळे विकासकामांना गती मिळणार आहे.

काय होणार बदल?

या प्रकल्पांतर्गत विठ्ठल रुक्मिणी मंदिर ( Vitthal Rukmini Temple )परिसरात भव्य कॉरिडॉर उभारण्यात येणार आहे. याशिवाय शहरातील रस्ते, वाहतूक व्यवस्था आणि इतर नागरी सुविधांचे आधुनिकीकरण केले जाणार आहे.

आषाढी एकादशीसारख्या मोठ्या उत्सवांमध्ये लाखो भाविक पंढरपूरला येतात. एआय आकडेवारीनुसार, मागील आषाढी एकादशीला सुमारे २८ लाख भाविकांनी येथे दर्शन घेतले होते. त्यामुळे भविष्यातील वाढती गर्दी लक्षात घेऊन हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे.

भाविकांना मोठा दिलासा

या विकासामुळे भाविकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागणार नाही. अधिक सुरक्षित, सुलभ आणि जलद दर्शनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच गर्दी व्यवस्थापन सुधारल्याने अपघातांचा धोका देखील कमी होणार आहे.

व्यापाऱ्यांसाठी काय?

सुरुवातीला स्थानिक व्यापाऱ्यांनी विस्थापनाच्या भीतीने विरोध केला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले की, या प्रकल्पामुळे पंढरपूरमध्ये पर्यटन वाढेल आणि स्थानिक व्यापाराला मोठा फायदा होईल.

जागतिक धार्मिक पर्यटन केंद्राचा दर्जा

राज्य सरकारचा विश्वास आहे की, या प्रकल्पामुळे पंढरपूर कॉरिडॉर मुळे (Pandharpur corridor) हे शहर आंतरराष्ट्रीय स्तरावर एक प्रमुख धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित होणार आहे

पत्नी, मेहुणी, साडू ने आठ महिन्यापूर्वी केलेला खून उघडकीस

0

बीड — गेवराई तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना उघडकीस आली आहे. पत्नीनेच आपल्या पतीचा बहिण व मेव्हण्याच्या मदतीने खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावत पुरावे नष्ट केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. या घटनेचा उलगडा गेवराई पोलिसांनी तब्बल आठ महिन्यानंतर केला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

पोलीस ठाणे गेवराई हद्दीतील पांढरवाडी फाटा परिसरात ही घटना घडली. मृत उध्दव तुकाराम शिंदे (वय 50) हे पत्नी संगीता शिंदे यांच्यासह पुण्यावरून नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते.मात्र, पती-पत्नीमध्ये नेहमीप्रमाणे वाद सुरू झाला आणि 6 सप्टेंबर 2025 रोजी हा वाद विकोपाला गेला. यावेळी संतापाच्या भरात पत्नी संगीता शिंदे हिने तिची बहिण सविता वाजे आणि मेहुणे विष्णु वाजे यांच्या मदतीने उध्दव शिंदे यांचा गळा आवळून खून केला.

पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

खून केल्यानंतर आरोपी विष्णु शिंदे याने आपल्या दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने मृतदेह उसाच्या शेतात टाकला. काही दिवसांनी दुर्गंधी येऊ लागल्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने प्रेत गोणीत भरून शहागड येथील जुन्या पुलावरून गोदावरी नदीत फेकून दिले.इतकेच नव्हे मृतदेह फेकून दिल्यानंतर दोन-तीन दिवसानंतर मृताची मोटारसायकल देखील विष्णू वाजे व त्याचा अल्पवयीन मुलगा यांनी एका नातेवाईकांच्या मदतीने जुन्या पुलावरून नदीत टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

मिसिंग’ तक्रारीतून उलगडा

या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, मुख्य आरोपी असलेल्या पत्नीनेच पुण्यातील सिंहगड पोलीस ठाणे आयुक्तालय या ठिकाणी पती हरवल्याची तक्रार दाखल केली होती.
मात्र, 2 मे 2026 रोजी मृताचा मुलगा शुभम शिंदे व सिंहगड पोलीस ठाण्यातील अंमलदार गेवराई पोलीस ठाण्यात आले. यावेळी शुभम शिंदे याने माझ्या वडिलांचे काही बरे वाईट झाले असावे अशी शंका गेवराई पोलिसांसमोर व्यक्त केली.

पोलिसांचा वेगवान तपास

पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला आरोपींनी टाळाटाळ केली, पण पोलिसी चौकशीत अखेर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
या प्रकरणात एकूण 3 आरोपींना अटक करण्यात आली असून, मुख्य आरोपी संगीता शिंदे हिलाही पुण्यातून नरे पोलीसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले आहे.

गुन्हा दाखल

या प्रकरणी मयताचा मुलगा शुभम उद्धव शिंदे यांच्या तक्रारीवरून गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 268/2026 अंतर्गत भा.न्या.सं. कलम 103(1), 238, 66(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनी दीपक लंके करत असून मयताची गोदावरी नदीत फेकलेली मोटार सायकल व सांगाडा मिळून आला आहे.
दरम्यान ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक, सचिन पांडकर, विभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके, यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि किशोर पवार, सपोनि.दिपक लंके, सपोनि. संतोष जंजाळ, सपोनि. अण्णासाहेब पवार, पोउपनि. प्रदीप आढाव, पोउपनि. उदगीरकर, श्रेणी. पोउपनि. सुरेश पारधी, श्रेणी. पोउपनि. इसाक शेख, राजु भिसे,कल्याण राठोड, राऊत, चंद्रसेन माळी, सुंदर राठोड, गोरक्ष डोके, धिरज खांडेकर, जितेंद्र ओव्हाळ, दिनेश ढाकणे, महादेव कदम, रेखा तुपे, रेशमा पौळे यांनी केली.

नसरापूर अत्याचार प्रकरणाचा तपास 6 अधिकाऱ्यांची एसआयटी टीम करणार

0

पुणे — जिल्ह्यातील नसरापूर येथे 1 मे रोजी घडलेल्या अत्यंत संतापजनक घटनेने संपूर्ण राज्य हादरलं आहे. एका 65 वर्षीय व्यक्तीने चार वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली असून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास सहा अधिकाऱ्यांची एस आय टी टी करणार आहे

एसआयटी  SIT मार्फत तपास सुरू

या गंभीर प्रकरणाचा तपास आता स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम (SIT) मार्फत केला जाणार आहे. राज्य सरकारने सहा अधिकाऱ्यांची टीम तयार केली असून त्यात दोन महिला अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. पुणे ग्रामीण पोलिसांतील वरिष्ठ अधिकारी या तपासात सहभागी झाले आहेत.

नेमकं काय घडलं?

1 मे रोजी दुपारी, घरासमोर खेळणाऱ्या चिमुकलीला आरोपीने “वासरू दाखवतो” असं सांगून गोठ्यात नेलं. तिथे तिच्यावर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या केली. त्यानंतर मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवण्यात आला.
चिमुकली बराच वेळ दिसली नाही म्हणून शोधाशोध सुरू झाली आणि शेवटी गोठ्यात तिचा मृतदेह आढळला. सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपी मुलीला घेऊन जाताना स्पष्ट दिसल्याने गुन्हा उघडकीस आला.

ग्रामस्थांचा संताप, रस्तारोको

या घटनेनंतर नसरापूरमध्ये प्रचंड संताप उसळला. संतप्त नागरिकांनी पुण्यातील नवले पूल परिसरात रस्तारोको आंदोलन केलं. आरोपीला पकडून ग्रामस्थांनी त्याला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं.

कोर्टातही आरोपीचे धक्कादायक वर्तन

आरोपीला कोर्टात हजर केल्यावर त्याने “ही किरकोळ मारामारीची केस आहे” असा दावा केला, ज्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. न्यायालयाने आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पूर्वीही दोन गुन्हे, पुराव्याअभावी सुटका

हा आरोपी यापूर्वीही दोन वेळा अशाच गंभीर गुन्ह्यांमध्ये संशयित होता, मात्र पुरावे न मिळाल्यामुळे तो निर्दोष सुटला होता. त्यामुळे या वेळेस कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी अधिक तीव्र झाली आहे.

पीडित कुटुंबाची भूमिका

पीडित मुलीवर शनिवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या वडिलांनी स्पष्ट भूमिका घेत, “मुलीला न्याय मिळेपर्यंत कोणत्याही नेत्यांनी भेटायला येऊ नये,” असं सांगितलं. “राजकारणासाठी फोटो काढण्यापेक्षा न्याय महत्त्वाचा,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

बीड हादरलं! ३ वर्षांच्या नातीवर आजोबाचा अत्याचार; आरोपी अटकेत

0

बीड — महाराष्ट्रातील महिलांवरील आणि लहान मुलींवरील अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस गंभीर होत चालल्या आहेत. पुण्यातील नसरापूर येथील घटनेनंतर आता केज तालुक्यात एक अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे.
केज तालुक्यात ५० वर्षीय आजोबाने स्वतःच्याच ३ वर्षांच्या चिमुकल्या नातीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची आई आपल्या ३ वर्षांच्या मुलीसह माहेरी आली होती. १६ ते २५ एप्रिल या कालावधीत संधी साधून आरोपी आजोबाने या चिमुकलीवर दोन-तीन वेळा अत्याचार केला.
घटनेनंतर मुलीला त्रास जाणवू लागल्याने तिने आईला हा प्रकार सांगितला. ही बाब समजताच आई हादरली आणि तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पोलिसांची कारवाई

युसुफवडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवला. आरोपीविरुद्ध पॉक्सो ऍक्ट POCSO कायद्याच्या कलम ४ आणि ६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘पिंक पथका’चे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके यांच्या पथकाने आरोपीला तात्काळ अटक केली आहे. सध्या आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असून पुढील तपास सुरू आहे.

वाढत्या घटनांमुळे चिंता

भोर, चाकण आणि आता बीड येथे घडलेल्या सलग घटनांमुळे राज्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांकडून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.

एलपीजी सिलेंडर महाग! 1 मेपासून ₹993 ने दरवाढ; हॉटेलमध्ये जेवणही होणार महागणार

0

नवी दिल्ली — देशभरात 1 मे 2026 पासून कमर्शियल एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी 19 किलोच्या कमर्शियल सिलेंडरच्या दरात थेट ₹993 रुपयांची वाढ केली आहे.

या वाढीनंतर कमर्शियल सिलेंडरची किंमत आता सुमारे ₹3071 वर पोहोचली आहे. एप्रिल महिन्यात हीच किंमत ₹2078 होती.

का वाढले एलपीजीचे दर?

इराण-अमेरिका तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे एलपीजीच्या किमतींवर मोठा परिणाम झाला आहे.

तसेच काही राज्यांतील निवडणुका संपल्यानंतर ही दरवाढ करण्यात आल्याची चर्चा देखील सुरू आहे.

 घरगुती ग्राहकांना दिलासा

सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देत घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. त्यामुळे घरगुती वापरासाठी सध्या तरी दर स्थिर ठेवण्यात आले आहेत.

 हॉटेल आणि व्यवसायांवर मोठा परिणाम

कमर्शियल सिलेंडर महाग झाल्यामुळे हॉटेल चालकांचा खर्च वाढणार आहे त्यामुळे खाद्य पदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे काही ठिकाणी हॉटेल बंद करण्याचे निर्णय घेतला गेला याचा थेट फटका ग्राहकांना बसणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हॉटेलमधील जेवण महाग होऊन ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.