महाराष्ट्रात 15 ऑगस्टला कुठे कोण करणार ध्वजारोहण? सरकारकडून यादी जाहीर; बीडमध्ये सुनेत्रा अजित पवार

बीड — भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्ट रोजी देशभरात उत्साहात साजरा केला जाणार आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच विविध शासकीय संस्थांमध्ये ध्वजारोहणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातही स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमांचे नियोजन पूर्ण झाले असून, राज्य सरकारने विविध जिल्ह्यांमध्ये ध्वजारोहण करणाऱ्या प्रमुख व्यक्तींची यादी जाहीर केली आहे.

राज्यातील प्रमुख शासकीय कार्यक्रमांमध्ये मुंबईतील मंत्रालयात मुख्यमंत्री ध्वजारोहण करणार असून पुण्यात राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. दरम्यान, रायगड आणि नाशिक जिल्ह्यांतील ध्वजारोहणाच्या जबाबदारीवरून सत्ताधारी नेत्यांमध्ये निर्माण झालेल्या चर्चेलाही आता पूर्णविराम मिळाला आहे.

बीडमध्ये सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण

सरकारच्या जाहीर केलेल्या यादीत बीड जिल्ह्यासाठी सुनेत्रा अजित पवार यांचे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे यंदाच्या स्वातंत्र्यदिनाचा मुख्य ध्वजारोहण सोहळा त्यांच्या हस्ते पार पडणार आहे.

कोणत्या जिल्ह्यात कोण करणार ध्वजारोहण?

राज्य सरकारच्या यादीप्रमाणे विविध जिल्ह्यांची जबाबदारी पुढीलप्रमाणे देण्यात आली आहे—

  1. ठाणे – एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे
  2. बीड – सुनेत्रा अजित पवार
  3. नागपूर – चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे
  4. अहिल्यानगर – राधाकृष्ण सिंधूताई एकनाथराव विखे-पाटील
  5. नंदूरबार – हसन सकिना मियालाल मुश्रीफ
  6. सांगली – चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्चु पाटील
  7. नाशिक – गिरीष गिता दत्तात्रय महाजन
  8. पालघर – गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक
  9. जळगाव – गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील
  10. अमरावती – दादाजी रेश्माबाई दगडू भुसे
  11. यवतमाळ – संजय प्रमीला दुलीचंद राठोड
  12. रत्नागिरी – उदय स्वरूपा रविंद्र सामंत
  13. धुळे – जयकुमार नयनकुवर जितेंद्रसिंह रावल
  14. जालना – पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे
  15. नांदेड – अतुल लिलावती मोरेश्वर सावे
  16. चंद्रपूर – अशोक जनाबाई रामाजी उईके
  17. सातारा – शंभूराज विजयादेवी शिवाजीराव देसाई
  18. मुंबई उपनगर – ॲड. आशिष मिनल बाबाजी शेलार
  19. वाशिम – दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणे
  20. लातूर – शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले
  21. सोलापूर – जयकुमार कमल भगवानराव गोरे
  22. हिंगोली – नरहरी सावित्रीबाई सिताराम झिरवाळ
  23. छत्रपती संभाजीनगर – संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट
  24. धाराशिव – प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक
  25. रायगड – भरत विठाबाई मारूती गोगावले
  26. बुलढाणा – मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील)
  27. सिंधुदुर्ग – नितेश निलम नारायण राणे
  28. अकोला – आकाश सुनिता पांडुरंग फुंडकर
  29. कोल्हापूर – प्रकाश सुशिला आनंदराव आबिटकर
  30. गडचिरोली – आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल
  31. भंडारा – माधुरी मिरा सतिश मिसाळ
  32. वर्धा – डॉ. पंकज कांचन राजेश भोयर
  33. परभणी – श्रीमती मेघना दीपक साकोरे-बोर्डीकर
  34. गोंदिया – इंद्रनील अनिता मनोहर नाईक

रायगड-नाशिकच्या चर्चेला पूर्णविराम

स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणावरून रायगड आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये कोणाला जबाबदारी मिळणार, याबाबत सत्ताधारी नेत्यांमध्ये चर्चा रंगली होती. अखेर सरकारने ध्वजारोहणाची जबाबदारी निश्चित करून यादी जाहीर केली आहे. त्यामुळे या विषयावरील संभ्रम दूर झाला आहे.

15 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये शासकीय पातळीवर स्वातंत्र्यदिनाचे कार्यक्रम उत्साहात पार पडणार असून, ध्वजारोहणासोबतच राष्ट्रगीत, स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles