Home आरोग्य महाराष्ट्रात टीबीचा स्फोट? ११ हजार गावांमध्ये धोक्याची घंटा

महाराष्ट्रात टीबीचा स्फोट? ११ हजार गावांमध्ये धोक्याची घंटा

0
9

मुंबई — महाराष्ट्रात वाढत्या तापमानासोबतच क्षयरोग (टीबी) पुन्हा एकदा गंभीर संकट बनताना दिसत आहे. केंद्र सरकारच्या १०० दिवसांच्या विशेष टीबी निर्मूलन मोहिमेत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. राज्यातील तब्बल ११,०९१ गावे ‘हाय रिस्क’ श्रेणीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विशेष म्हणजे, मोहिमेच्या अवघ्या पहिल्या ३५ दिवसांतच ६,१११ नवीन टीबी रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. नांदेड मधील ४०४,अहिल्यानगर मधील ४०१, बीड मधील ३४४ तर छत्रपती संभाजी नगर मधील ३३९ गावांचा यामध्ये समावेश आहे.

एआय (AI) तंत्रज्ञानाने शोधली ‘हाय रिस्क’ गावे

केंद्र सरकारने २०२५ पर्यंत भारत टीबीमुक्त करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या मोहिमेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स ( Artificial Intelligence (AI)) आधारित  व्हीएमटीबी टूल्स (VMTB Tool’) चा वापर करून गावे ओळखण्यात आली.
गावे निवडताना कुपोषणाचे प्रमाण,लसीकरण स्थिती,भौगोलिक परिस्थिती,तंबाखू व जीवनशैली सवयी या निकषांचा वापर करण्यात आला.
यामध्ये यवतमाळ (५३९ गावे) आणि अमरावती (५०४ गावे) हे जिल्हे सर्वाधिक धोक्यात असल्याचे दिसून आले.

राज्यभर मोठी तपासणी मोहीम

आरोग्य विभागाने आता राज्यभरात दीड कोटी नागरिकांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. १४ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाची तपासणी, कुपोषण व मधुमेह असलेल्या भागांवर विशेष लक्ष, तंबाखू सेवन जास्त असलेल्या गावांमध्ये फोकस करण्यात येणार आहे.

हाय रिस्क’ जिल्ह्यांची यादी सर्वाधिक धोक्यातील जिल्हे

यवतमाळ – ५३९ गावे
अमरावती – ५०४
नाशिक – ४८८
रायगड – ४८८
नागपूर – ४८२
पुणे – ४७९
इतर प्रमुख जिल्हे:
चंद्रपूर – ४६७
सातारा – ४४२
गडचिरोली – ४३३
नांदेड – ४०४
अहिल्यानगर – ४०१
बीड – ३४४
छ. संभाजीनगर – ३३९
आणखी जिल्हे:
सोलापूर – २९१
जालना – २४२
लातूर – २३८
परभणी – २१२
सांगली – १८४
धुळे – १७१

का वाढतोय टीबीचा धोका?

तज्ज्ञांच्या मते पुढील कारणांमुळे टीबीचा प्रसार वाढतोय कुपोषण आणि कमजोर रोगप्रतिकारक शक्ती,मधुमेह व इतर दीर्घकालीन आजार,तंबाखू व धूम्रपान,गर्दीची राहणीमान व्यवस्था यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात टीबीचा वाढता धोका लक्षात घेता लवकर निदान आणि उपचार हीच सर्वात मोठी गरज आहे. प्रशासनाने सुरू केलेली मोहीम महत्त्वाची असली तरी नागरिकांनीही वेळेवर तपासणी करून सहकार्य करणे अत्यावश्यक आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here