नाळवंडीच्या उर्वरित रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू —आ.विजयसिंह पंडित
बीड — नाळवंडी नाका ते नाळवंडी रस्त्यावरील ६४ लाख रुपय किंमतीच्या रस्ता कामाचे उद्घाटन
आ. विजयसिंह पंडित यांच्या हस्ते करण्यात आले आहे. सदर काम जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत करण्यात येत असून उर्वरित नाळवंडी रस्त्याच्या कामाचा प्रश्न देखील राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून मार्गी लावू अशी ग्वाही यावेळी बोलताना आ. विजयसिंह पंडित यांनी दिली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांनी नाळवंडी नाक्याच्या पुढे ते उड्डान पुलापर्यंत रस्ता कामासाठी व नळकांडी पुलासाठी ६३ लाख रुपयाचा निधी जिल्हा वार्षिक विकास योजनेअंतर्गत दिलेला आहे. या रस्ता कामाचे उद्घाटन मंगळवार दिनांक ६ जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आ. विजयसिंह पंडित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक बाळासाहेब गुंजाळ, नगरसेवक दत्ता जाधव, अरिफ खान, नगरसेवक शेख निजामभाई, आनंद पवार, भाऊसाहेब डावकर, इनामदार खय्युम, ईश्वर पवार, बाबूलाल पवार, संतोष जाधव, विलास घनवट, अनिल देवकर, संजय इटकर, अनिल पवार यांच्यासह परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. विजयसिंह पंडित म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या माध्यमातून विकास कामांना गती येत आहे. नाळवंडी नाका ते नाळवंडी या रस्त्यासाठी अनेक वेळा आंदोलने झाली. खरंतर हा रस्ता पूर्वीच होणे गरजेचे होते परंतु तसे झाले नाही. आता हा रस्ता जिल्हा वार्षिक नियोजन मधून ९०० मीटर होत आहे पुढे या रस्त्यावर एक पूल असून त्याबरोबर उर्वरित रस्त्याचे काम देखील राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या माध्यमातून लवकरच मार्गी लावू, रस्ता कामांमध्ये गुणवत्ता आणि दर्जा घसरता कामा नये अशा सूचनाही आ. विजयसिंह पंडित यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या .
यावेळी नाळवंडी रोडवरील खडी क्रेशर चालक संघटनेच्यावतीने बीड नगरपालिकेत आ. विजयसिंह पंडित यांना मोठ्या प्रमाणात यश आल्याबद्दल त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी खडी क्रेशर चालख हरिभाऊ क्षिरसागर, राजाभाऊ कानडे, सतीश चिपाडे, बाळासाहेब कानडे, आनंद पवार, अमोल गायकवाड, प्रेमराज गुंजाळ यांच्यासह आदींची उपस्थिती होती.











या सोहळ्यात संपादक शेख मुजीब यांची प्रमुख उपस्थिती होती. हा कारखाना स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.कारखान्याची अत्याधुनिक वैशिष्ट्ये या फर्निचर कारखान्यात अत्याधुनिक डिझाइन तंत्रज्ञान आणि उच्च दर्जाची मशिनरी बसवण्यात आली आहे. येथे बेड, वॉर्डरोब, सोफा सेट्ससह घरगुती आणि कार्यालयीन फर्निचर वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. “ग्राहकांच्या प्रत्येक गरजेनुसार दर्जेदार, टिकाऊ आणि आकर्षक फर्निचर तयार करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. आम्ही स्थानिक साहित्याचा वापर करून खर्च कमी ठेवणार आहोत,” असे आयोजकांनी सांगितले. कारखान्यामुळे ग्राहकांना बाहेरील शहरात जाऊन फर्निचर खरेदी करण्याची गरज भासणार नाही.शुभारंभ सोहळ्यातील प्रमुख उपस्थिती आणि भाषणेया शुभारंभ सोहळ्यात आमदार विजयसिंह पंडित, शेख मुजीब, नगराध्यक्ष बीड, तहसीलदार चंद्रकांत शेळके, सय्यद शाकेर, दैनिक रिपोर्टरचे संपादक शेख तय्यब, शहरातील शेख निजाम, शेख एजाज (खन्ना भैय्या), रफीक पठाण, खुर्शीद आलम, अमीर भाई, पत्रकार शेख तालीब, पत्रकार शेख आयुब, सय्यद इरफान यांसह मोठ्या संख्येने नागरिक, उद्योजक व पत्रकार उपस्थित होते. आमदार पंडित म्हणाले, “अशा उद्योगांमुळे बीडचा विकास वेगवान होईल आणि स्थानिक तरुणांना रोजगार मिळेल.” तहसीलदार शेळके यांनी कायदेशीर मंजुरी आणि भविष्यातील सहकार्याबाबत आश्वासन दिले.