मुळुकवाडीत मध्यरात्री धाडसी चोरी; ३ तोळे सोने अन् ५० हजारांची रोकड लंपास

 साडेचार लाखांचा ऐवज लंपास

लिंबागणेश — बीड तालुक्यातील मुळुकवाडी येथे मध्यरात्री चोरट्यांनी घर फोडून सुमारे साडेचार लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.

मुळुकवाडी येथील संदिप अंबादास ढास हे गाय आजारी असल्याने रात्री शेतात मुक्कामी होते. दरम्यान मध्यरात्री सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास द्वारकाबाई ढास यांना शेजारील खोलीत आवाज आल्याने जाग आली. त्यांनी घराच्या गच्चीवर झोपलेल्या प्रतिक्षा ढास यांना याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी फोनवरून शेतात असलेल्या संदिप ढास यांना चोरीची माहिती दिली.

संदिप ढास यांनी तातडीने घरी येऊन पाहणी केली असता घरातील दोन्ही कपाटे फोडलेल्या अवस्थेत आढळून आली. कपडे अस्ताव्यस्त पडलेले होते तसेच सोन्याचे दागिने ठेवण्याच्या डब्या उघड्यावर पडलेल्या दिसून आल्या. घरातील ३ तोळे सोने आणि खत खरेदीसाठी ठेवलेली ५० हजार रुपयांची रोकड असा एकूण सुमारे साडेचार लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे त्यांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच नेकनुर पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मंगेश साळवे व लिंबागणेश पोलीस स्टेशनचे राठोड यांना फोटो व व्हिडिओ पाठवून घटनेची माहिती दिली. याप्रकरणी नेकनूर पोलिस घटनास्थळी भेट देऊन कारवाई करणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान नेकनूर पोलीस ठाणे हद्द चंद्रकांत गोसावी यांच्या कार्यकाळात चोरट्यांसाठी नंदनवन झाले होते. नेकनूर चे प्रभारी पोलीस अधिकारी मंगेश साळवे चोरट्यांना आळा घालण्यात कितपत यशस्वी होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून

चोरट्यांचा शोध घेऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles