सिरसाळा पुन्हा ताब्यात, तर जळगव्हाण आणि मरळवाडी सहज राखली
परळी — महाराष्ट्रातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले असून परळी तालुक्यातील तीनही ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या उमेदवारांनी एकहाती विजय मिळवत तीनही ग्रामपंचायती वरती धनंजय मुंडे यांचे एकेरी वर्चस्व सिद्ध केले आहे.
या पोटनिवडणुकीत परळी तालुक्यातील सिरसाळा या मोठ्या व मानाच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शेख नसीब यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला असून विजयानंतर त्यांनी सहकाऱ्यांच्या समवेत आ. धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयात जाऊन स्व. पंडित अण्णा मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जल्लोष केला. यावेळी सिरसाळा ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच शेख नसीब शेख रहीम, माजी सरपंच फिरोज पठाण, ग्रामपंचायत सदस्य शेख नय्युम, शेख रफिक, अक्रम पठाण, सलमान पठाण, माजी सरपंच इम्रान पठाण, उपसरपंच सुलतान पठाण, मोहम्मद इनामदार, गुड्डू पठाण, मुस्लिम संघाचे जिल्हाध्यक्ष शिराज देशमुख, सिरसाळा सेवा सहकारी सोसायटी चेअरमन नदीम भाई, जावेद पत्रकार, अशोक गलांडे, तंटामुक्त अध्यक्ष गाव समिती सिरसाळा अयोसोद्दीन इनामदार, विद्यार्थी आघाडी बीड जिल्हा अध्यक्ष शेख राजू, इरफान बॉस, रफिक बागवान आदी उपस्थित होते.

त्याचबरोबर जळगव्हाण येथील नवनिर्वाचित सरपंच संदीप वसंतराव चव्हाण यांसह राजाभाऊ सपकाळ, सुभाष जाधव, अमोल जाधव, उद्धवराव जाधव, कैलास क्षीरसागर, प्रल्हाद पंडित, शिवाजी राठोड, लक्ष्मण चव्हाण, प्रकाश चव्हाण, रामजी चव्हाण, लक्ष्मण राठोड, विश्वनाथ आडे, उद्धव सोळंके यांसह आदी उपस्थित होते.
मरळवाडी चे मयत सरपंच बापू आंधळे यांच्या पत्नी व नवनिर्वाचित सरपंच श्रीमती दीपाली बापुराव आंधळे यांच्या सह उपसरपंच वाल्मीक आघाव, चेअरमन हनुमान आंधळे, त्र्यंबक फड, विष्णू आंधळे, बाळासाहेब फड, संतराम आंधळे, परमेश्वर फड, बापुराव फड, अश्रूबा आघाव, तुकाराम व्हावळे, शिवाजी फड यांसह पदाधिकारी आदींनी जगमित्र कार्यालयात उपस्थित राहून विजयाचा जल्लोष साजरा केला.




