Home जिल्हा नीट (NEET) निकालानंतर  परळीतील विद्यार्थी बेपत्ता; कुटुंबीयांकडून पोलिसांत तक्रार

नीट (NEET) निकालानंतर  परळीतील विद्यार्थी बेपत्ता; कुटुंबीयांकडून पोलिसांत तक्रार

0
8

परळी (जि. बीड) —  नीट (NEET) परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील परळी शहरातील एक विद्यार्थी अचानक घरातून निघून गेल्याची घटना समोर आली आहे. आदित्य राठोड असे बेपत्ता विद्यार्थ्याचे नाव असून, त्याचा गेल्या काही दिवसांपासून शोध सुरू आहे. या घटनेमुळे राठोड कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

आदित्यने नुकतीच नीट परीक्षा दिली होती. वैद्यकीय शिक्षणासाठी महत्त्वाची असलेल्या या परीक्षेत त्याला अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नसल्याने तो काही दिवसांपासून तणावात असल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. निकाल जाहीर झाल्यानंतर तो कोणालाही काहीही न सांगता घराबाहेर पडला. त्यानंतर त्याच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.

आदित्य घरी परतला नसल्याने कुटुंबीयांनी नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या मदतीने त्याचा शोध घेतला. संभाव्य ठिकाणी चौकशी करूनही त्याचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर त्याचे वडील भगवान राठोड यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

तक्रारीची नोंद घेतल्यानंतर परळी शहर पोलिसांनी आदित्यचा शोध सुरू केला आहे. पोलिसांकडून विविध ठिकाणी माहिती घेण्यात येत असून, कुटुंबीय आणि नातेवाईकही त्याचा शोध घेत आहेत.

दरम्यान, परीक्षेतील अपेक्षित यश न मिळाल्याने विद्यार्थ्यांवर निर्माण होणारा मानसिक ताण हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र, या प्रकरणात आदित्यचा नेमका ठावठिकाणा अद्याप स्पष्ट झालेला नसून, पोलिसांकडून त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here