Home Blog Page 187

परळीच्या “नाथा” घरची रीत न्यारी;बीडचा शेतकरी मरणादारी!बीडच्या 10 शेतकऱ्यांच्या साडे 19 एकर वरच अतिवृष्टी?

0

बीड — राज्य सरकार “लाडका शेतकरी”अशी घोषणा करून मुक्ताफळ उधळीत असलं तरी बीड जिल्ह्याची त-हा न्यारीच बनली आहे.परळीच्या “नाथा”ने जिल्ह्याचा शेतकरी “अनाथ” असल्याची पुन्हा एकदा जाणीव करून दिली. अतिवृष्टीने शेतकऱ्यांच नुकसान झालं. त्याचं कंबरड मोडलं. पण हे बीड जिल्ह्यातील फक्त दहा शेतकऱ्यांच्या साडे 19 एकर क्षेत्रावरील शेतकऱ्यांच्या बाबतीत घडलं.त्यामुळे राज्यातील अतिवृष्टी बाधित एक लाख 83 हजार 907 शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार असली तरी बीडच्या बीडच्या अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांच्या हातावर धतुऱ्याच दिला जाणार असल्याचं शासनादेशावरून चित्र स्पष्ट झालं आहे.

 

राज्याच राजकारण परळी भोवती केंद्रित असल्याचं जिल्ह्यातील प्रत्येक जण अभिमानाने सांगत असलं. तरी कृषी मंत्री पदासारखं महत्त्वाचं पद असताना शेतकऱ्यांना मात्र फायदा झाल्याचं समाधानाने सांगितलं जात नाही.पंगतीत बसलं तर हक्काचा वाढपी असं गरजेचं असतो.मात्र बीडच्या बाबतीत उलटीच त-हा सध्या पाहायला मिळत आहे. अतिवृष्टीने बीडसह राज्यात दाना दान उडवली. कृषिमंत्र्यांनी बीडच्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत. आश्वासन दिली. परळीच्या जाहीर कार्यक्रमात मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसमोर बोलताना लाडकी बहीण तसं आता शेतकरीही लाडका असल्याची वल्गना केली. याला फार दिवसही लोटले नसताना बीडच्या शेतकऱ्यांची अतिवृष्टी अनुदानात फसवणूक झाल्याचं व लाडका शेतकरी ही घोषणा नुसता प्रसिद्धीचा फंडा होता हे जाहीर झालं. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जुलै ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे कंबरड मोडलं. आशाळभूत नजरेने शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांना आर्त हाक दिली. पण राज्याच्या राजकारणा मश्गुल असल्यामुळे ती आर्त हाक कृषी मंत्र्यांच्या कानावर गेलीच नाही. आता लाडका शेतकरी म्हणणाऱ्या सरकारने अतिवृष्टी अनुदान जाहीर केलं आहे. अतिवृष्टी ग्रस्त राज्यातील एक लाख 83 हजार 907 शेतकऱ्यांना ती मिळणार आहे. 138 कोटी 55 लक्ष 48 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. मात्र बीड जिल्ह्याच्या हातात अक्षरशः वाटाण्याचा अक्षदा दिल्या गेल्या आहेत. बीड जिल्ह्यात फक्त दहा शेतकऱ्यांच्या 7. 8 हेक्टर म्हणजेच साडे 19 एकर क्षेत्रावर अतिवृष्टी झाल्याचं शासन आदेशावरून स्पष्ट होत आहे. याच दहा शेतकऱ्यांना दोन लाख 80 हजार रुपयांचा निधी वाटप करण्यात येणार आहे. बीडच्या शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा या शासन आदेशावरून केल्याचं चित्र स्पष्ट होऊ लागलं आहे. अशा कृषिमंत्र्यांच्या उदासीनतेमुळे बीड जिल्हा शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत नावा रूपाला का येणार नाही? जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येणाऱ्या काळात तरी न्याय दिला जाणार आहे की नाही? शेतकऱ्यांची आर्त हाक कानावर जाणारच की नाही? यासारखे प्रश्न आता जनतेतून विचारले जाऊ लागले आहेत.

चंदन सावरगाव जवळ बस पलटी; 16 जखमी

0

बीड — अंबाजोगाई-बीड मार्गावरील चंदन सावरगाव येथील हॉटेल मोरया जवळ एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे.अहमदपूर-छ‌.संभाजीनगर ही एसटी बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली.

या अपघातात बसमधील 16 जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली. बस चालकाकडून रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या नादात बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे.


अहमदपूरहून छत्रपती संभाजीनगरकडे ही बस निघाली होती, त्यावेळी, अंबाजोगाई-बीड मार्गावरील चंदन सावरगाव येथे बसचा अपघात झाला. या एसटी मधून 40 पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत होते. मात्र, दुर्घटनेत त्यातील 16 जखमी झाले आहेत. अपघात झाल्यानंतर परळी येथे बंदोबस्त ला जाणारे कर्मचारी विशाल क्षीरसागर, सचिन गर्जे अंमळनेर, बाबासाहेब राख अंमळनेर पोलीस ठाणे, व मदन क्षीरसागर पाटोदा पोलीस ठाणे यांनी मदत केली.

जखमींना केज येथील उपजिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले असून तिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत. तसेच, अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयामध्ये देखील काही जखमींना उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान, या अपघातात एसटीचा चालक ही गंभीर जखमी झाला

देशी गायी ‘राज्यमाता-गोमाता’ म्हणून घोषित

0

मुंबई — राज्यात आणि देशातील देशी गायींचे भारतीय संस्कृतीत वैदिक काळापासून असलेले स्थान, देशी गायींच्या दुधाची मानवी आहारातील उपयुक्तता, आयुर्वेद चिकित्सा पध्दती, पंचगव्य उपचार पध्दती तसेच देशी गायींच्या शेण आणि गोमुत्राचे सेंद्रिय शेती पध्दतीत असलेले महत्वाचे स्थान विचारात घेवून गोमातेसाठी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे.

देशी गायींना यापुढे राज्यमाता- गोमाता म्हणून घोषीत करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. गायींच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना जाहीर करण्यात आली आहे.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. या बैठकीत वेगवेगळ्या खात्यामधील एकूण ३८ निर्णय घेण्यात आले आहेत. आपल्याकडे अगदी सुरुवातीपासून गायीला खूप महत्व आहे. केवळ धार्मिकच नव्हे तर वैज्ञानिक आणि आर्थिक महत्व असल्यामुळे गायीला आपण कामधेनु म्हणतो. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर देशी गायींच्या जाती आहेत.
देवणी, लालकंधारी, खिल्लार, डांगी, गवळाऊ अशा जाती आहेत. यामध्ये दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पशुपालकांना देशी गायींचे पालनपोषण करण्यास प्रेरित करण्याच्या दृष्टीने देशी गायीस ‘राज्यमाता- गोमाता’ घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने आज हा निर्णय घेण्यात आला आहे.

बियर बार फोडून चोरट्यांनी पावणे दोन लाखाची दारू पळविली

0

केज — महामार्गावर असलेल्या एका बियर बारचे कुलूप तोडून एक लाख 78 हजार रुपये किमतीची विदेशी दारू लंपास केली असल्याची घटना केज मध्ये घडली आहे.

अधिक माहिती अशी की, केज केज-मांजरसूंबा या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८-डी वर असलेल्या रेणू पेट्रोल पंपाच्या शेजारी रघुनाथ अभिमान थोरात यांचे रेणू बियर बार व हॉटेल आहे. शनिवारी २८ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १२ वा. च्या सुमारास हॉटेलचे मॅनेजर गौरव महिंन्द्र दास व ७ ते ८ कामगार हॉटेलची दारे कुलूप लावून हॉटेलच्या स्टाफरुमध्ये झोपले होते. मध्यरात्री चोरट्यांनी हॉटेलच्या दरवाजाचे दोन्ही बाजूची कुलुपे कटरने कापून बियरबारच्या असलेल्या गोदामातील विदेशी मद्याचे १ लाख ७८ हजार ५८० रूपये किमतीचे २७ बॉक्स चोरून नेले. चोरी केल्यानंतर चोरट्यांनी दोन्ही दरवाजे बाहेरून बंद केले होते. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. रघुनाथ थोरात यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार केज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केज पोलीस पुढील तपास करत आहेत.

होम मिनिस्टर कार्यक्रमास बाराव्या दिवशीही महिलांचा प्रचंड उत्साह कायम

0

धांडे गल्लीतील रस्ता महिलांच्या सहभागाने फुलून गेला .

बीड — गेल्या 12 दिवसापासून सुरू असलेल्या होम मिनिस्टर चंपावती सम्राज्ञी २०२४ खेळ पैठणीचा या कार्यक्रमाची लोकप्रियतेची महिलांमध्ये क्रेझ निर्माण झाली आहे. पैठणी जिंकण्यापेक्षा चार भिंतीच्या आतील जीवन काही क्षण स्वतःच्या आनंदासाठी, दसऱ्याच्या घर कामाच्या व्यस्ततेतुनही या कार्यक्रमाचा आंनद घेण्यासाठी महिला दिवसेंदिवस या कार्यक्रमास प्रचंड उत्साहाने सहभागी होत आहेत.हिरीरीने सहभागी होत आहेत.
धांडे गल्ली प्रभाग क्रमांक 14 धांडे गल्ली चौक या ठिकाणी आज स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

काकू- नाना प्रतिष्ठान आयोजित माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या कार्यक्रमाची लोकप्रियता शिगेला पोहोचली आहे.हजारोच्या संख्येने महिला या कार्यक्रमात सहभागी होत आहेत.या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रतिभा विनोद धांडे, सौ.शकुंतला बद्रीनाथ शिंदे,सौ.यमुना लक्ष्मण सुस्कर,सौ.वर्षा लहू बागलाने,सौ.स्वाती सदाशिव धांडे,महिला आघाडीच्या अध्यक्ष सौ. जयश्रीताई विधाते,माजी सभापती सौ.उषाताई सरवदे,सौ.प्रेमलताताई चांदणे,सौ.किर्तीताई पांगारकर- साळुंके,सौ. भारतीताई राजेश क्षीरसागर, डॉ सौ.अंजलीताई पांगारकर,सौ.शारदा डुलघज सौ. संजीवनी ताई पौळ सौ. सिंधुताई पौळ,सौ.गीता ताई जयंत वाघ,सौ.डोंगर ताई आदी मान्यवर महिलांची उपस्थितीत पारपडले.होम मिनिस्टर चंपावती सम्राज्ञी खेळ पैठणीचा या कार्यक्रमाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे 18 सप्टेंबर 2024 ते 4 ऑक्टोबर 2024 या कालावधीत सुरू असलेल्या कार्यक्रमाने दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे.लोकप्रिय होत आहे.याचे सर्व श्रेय काकू- नाना प्रतिष्ठान आयोजित आणि माजीमंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर महिला आघाडी विचारमंच यांच्या सूत्रबद्ध नियोजनातून ही स्पर्धा दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे.

या कार्यक्रत भाग्यवान मानाच्या पैठणीची विजेती सौ.राजश्री अविनाश पिंगळे द्वितीय इमिटेशन ज्वेलरीच्या मानकरी विजेत्यां वाघोले तर तृतीय विजेत्या चौरंगाच्या मानकरी सौ.अर्चना सुरेश गिराम.या ठरल्या आहेत.तर उर्वरित सात महिलांना गिफ्ट हॅम्पर देण्यात आले.यामध्ये सौ.सुवर्णा नागनाथ धांडे,सौ.स्वाती सतीश गायकवाड,सौ.वर्षा लहू बागलाने,सौ.श्रद्धा धर्मेश पिंगळे,सौ.शोभा विकास मुळे,सौ.सोनाल विकास साळवे,सौ सपना गणेश धर्माधिकारी या मानकरी ठरल्या कार्यक्रमात बक्षिसाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.विजेत्या सर्व महिलांची 7 ऑक्टोबर रोजी बीएच.एम.एस.कॉलेज येथे होणाऱ्या खेळ पैठणीचा महाराष्ट्रातील प्रसिद्ध क्रांती नाना माळेगावकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे,यासाठी सर्व महिलांची निवड झाली आहे.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयदत्त अण्णा क्षीरसागर विचार मंचाचे सर्व नगरसेवक कार्यकर्ते यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन निवेदक सुरेश साळुंकेंनी केले,या कार्यक्रमास महिलांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

नारायण गडावर होणार मनोज जरांगे पाटलांचा दसरा मेळावा!

0

बीड — दसरा मेळाव्याची परंपरा अनेक वर्षापासून सुरू असून शिवसेनेचा मेळावा व पंकजा मुंडे यांचा मेळावा तर राज ठाकरे यांचा मेळावा याकडे राज्याचे लक्ष लागलेले असते यावर्षीपासून मनोज जरांगे पाटील नारायण गडावर दसरा मेळावा घेऊन रणशिंग फुंकणार आहे. आज या अनुषंगाने नियोजन बैठक नारायण गडावर पार पडली. या बैठकीला मराठा बांधवांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती.

घेण्यात आलेल्या बैठकीत कोणत्या ठिकाणी हा दसरा मेळावा होईल त्या ठिकाणी आलेल्या लोकांची बसण्याची व्यवस्था कशी असेल त्यानंतर पार्किंगची व्यवस्था असेल अशा सगळ्या कामाचे गावानिहाय वाटप या बैठकीमध्ये करण्यात आले आहे. बीडच्या सावरगाव घाट मधील भगवानगडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा प्रसिद्ध आहे. आता नारायणगडावर मनोज जरांगे पाटील दसरा मेळावा घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आज नारायणगडावर मराठा समन्वयकांची बैठक आयोजित करण्यात आलीय. आज दुपारी तीन वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात होते. या बैठकीतच मनोज जरांगेंनी हा निर्णय घेतला आहे.
मराठा आरक्षण प्रश्नावर महाराष्ट्रात राजकीय घटनांना वेग आलेला असताना मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळावा घेण्याची घोषणा केली आहे. विधानसभेच्या निवडणूका अवघ्या महिना दीड महिन्याने होण्याची शक्यता असताना मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत यंदा दसरा मेळाव्याचं आयोजन केल जाणार आहे. हा मेळावा कुठे घ्यायचा? स्वरूप कसे ठेवायचे ? याबाबतचे नियोजन करण्यासाठी आज श्री क्षेत्र नगद नारायणगड येथे बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला बीड जिल्ह्यातील मराठा आंदोलनातील समन्वयक व मराठा समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. या बैठकीतच मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याची रूपरेषा व ठिकाण ठरवल्याची माहिती आहे. निवडणूकीच्या तोंडावर बीड जिल्ह्यामध्ये दुसऱ्या दसरा मेळाव्याची परंपरा सुरू होणार आहे.
आठवडाभर उपोषण करुनही सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. त्यामुळे आता पुढील लढाई निवडणुकीची असेल, असे संकेत मनोज जरांगे यांनी दिले होते. त्यानंतर आता बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याची घोषणा झाल्यानं विधानसभा निवडणूसाठी मनोज जरांगे सज्ज होत असल्याचे स्पष्ट होत आहे

कापूस, सोयाबीनचं अनुदान सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार !

0

मुंबई — राज्यातील शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीन अनुदान देणार असल्याची घोषणा केली असली तरी सरकार कडून टोलवा टोलवीचा खेळ सुरू आहे. मात्र ही प्रतीक्षा आता संपणार आहे. सोमवारी दि. 30 सप्टेंबर रोजी कापूस आणि सोयाबीनचे अनुदान दिले जाणार असल्याची ग्वाही कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

तसेच मुंडे यांनी, सोमवारीच कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना १० हजार दिले जातील, असेही म्हटले आहे. तर याचा फायदा सुमारे ६५ लाख कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना होईल असा दावाही मुंडे यांनी केला आहे.

राज्य सरकाराच्या कृषी विभागाकडून रविवारी २०२०, २०२१ आणि २०२२ सालातील कृषी पुरस्कारांचे वाटप करण्यात आले. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी आणि अधिकाऱ्यांचा सत्कार व पुरस्कार देऊन सी.पी. राधाकृष्णन यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दादा भुसे, मंत्री दीपक केसरकरांसह कृषी विभागाचे अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते. यावेळी मुंडे यांनी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानावरून भाष्य केले.यावेळी मुंडे यांनी राज्यातील सुमारे ९६ लाख कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपैकी ६८ लाख शेतकऱ्यांनी आधार लिंक केले आहे. या ६८ लाख शेतकऱ्यांनाच अनुदान मंजूर केले जाईल. प्रतिहेक्टरी ५ हजार २ हेक्टरच्या मर्यादेत जास्तीत जास्त १० हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात येईल. राज्यातील ६५ लाख शेतकऱ्यांमध्ये २ हजार ५०० कोटींचे वितरण सोमवारी केले जाणार असल्याचेही मुंडे यांनी सांगितले आहे.यावेळी मुंडे म्हणाले, शेतकर्‍यांच्या आनंदात आपला आनंद असून आपण मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानतो. कारण त्यांनी कमी वयात आपल्याला कृषिमंत्र्यालयाची जबाबदारी दिली. यामुळेच आज शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आखता आल्या. तर शेतकऱ्यांच्या कष्टामुळेच आपले राज्य देशात चांगले कृषि राज्य बनल्याची प्रतिक्रिया मुंडे यांनी व्यक्त केली.

अर्थमंत्री निर्मला सीतारामनवर गुन्हा नोंदवण्याचे लोक अदालतीचे निर्देश

0

बंगळुरू — इलेक्ट्रॉल बॉण्डच्या माध्यमातून खंडणी उकळल्याच्या तक्रारी वरून कर्नाटक च्या बंगळुरू येथील विशेष लोकअदालतीने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि इतर अनेक नेत्यांवर एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.

जनाधिकार संघर्ष परिषदेचे (जेएसपी) सह-अध्यक्ष आदर्श अय्यर यांनी बेंगळुरू येथील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयात तक्रार दाखल केली होती आणि केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश मागितले होते. याप्रकरणी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र, भाजप नेते नलिन कुमार कटील, केंद्रीय आणि राज्य भाजप कार्यालये आणि ई.डी. विभागाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीत म्हटले आहे की एप्रिल 2019 ते ऑगस्ट 2022 पर्यंत, उद्योजक अनिल अग्रवाल यांच्या फर्मकडून सुमारे 230 कोटी रुपये आणि अरबिंदो फार्मसीकडून 49 कोटी रुपये निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून वसूल करण्यातआले.इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून धमकी देऊन खंडणी वसूल करण्यात आल्याची तक्रार त्यांनी केली होती.या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने बेंगळुरूमधील टिळक नगर पोलिस स्टेशनला इलेक्टोरल बाँडद्वारे खंडणीच्या प्रकरणात एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. एसीएमएम कोर्टाने आदेश काढून तक्रारीची प्रत आणि रेकॉर्ड पोलिस स्टेशनला पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. प्रलंबित एफआयआरमुळे सुनावणी 10 तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

लाडकी बहिण योजना महिलांच्या हितासाठी नाही तर नेत्यांच्या स्वार्थासाठी –राज ठाकरे

0

अमरावती — लाडकी बहीण सारख्या योजना जनतेच्या, महिलांच्या हितासाठी राबवल्या जात नसून राज्यकर्त्यां च्या स्वार्थासाठी राबवल्या जात असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.

लाडकी बहिण योजनेवरून सरकारवर टीका करणाऱ्या विरोधी नेत्यांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचीही भर पडली आहे. अशा योजना म्हणजे राज्याला खड्ड्यात घालण्याचे उद्योग आहेत.
त्यामुळे जानेवारी महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठीही तिजोरी पैसे शिल्लक राहणार नाहीत, अशा शब्दात ठाकरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर कठोर टीका केली.
समाजातील कोणताही घटक काहीही फुकट मागत नाही. महिलांना अशा प्रकारे पैसे वाटण्यापेक्षा राज्यात उद्योगधंदे आणा. उत्पन्नाची साधने वाढवा, असा सल्लाही ठाकरे यांनी सरकारला दिला आहे. लाडकी बहीण सारख्या योजना जनतेच्या, महिलांच्या हितासाठी राबवल्या जात नसून राज्यकर्त्यां च्या स्वार्थासाठी राबवल्या जात असल्याचा आरोपही ठाकरे यांनी केला.
लोकसभा निवडणुकीत भाजपला पर्यायाने महायुतीला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी पूर्ण ताकतीने मैदानात उतरण्याचे निश्चित केले आहे. त्या दृष्टीने दोन दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर आलेल्या ठाकरे यांनी येथे पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर सडकून टीका केली.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी राज ठाकरे यांच्या टीकेवर पलटवार केला आहे. सरकारच्या कामामुळे ज्यांच्या पोटात दुखते असेच नेते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसारख्या महत्वकांक्षी योजनांवर टीका करत असतात, असे पटेल म्हणाले.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितली संभाव्य वेळ!

0

मुंबई — महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकी च्या तारखांबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकी च्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आलेले मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी संभाव्य वेळ दिली आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला संपत आहे. त्यामुळे त्यापूर्वी निवडणुका पूर्ण कराव्या लागणार आहेत. निवडणुकीत शहरी मतदारांच्या उदासीनतेबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली.

मुंबईत निवडणूक तयारीचा आढावा घेताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, महाराष्ट्रात 288 मतदारसंघ आहेत. यामध्ये एसटी मतदारसंघ 25 आणि एसटी मतदारसंघ 29 यांचा समावेश आहे. राज्यात एकूण 9.59 कोटी मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार 4.59 कोटी तर महिला मतदार 6.64 कोटी आहेत. 18-19 वर्षे वयोगटातील प्रथमच मतदारांची संख्या 19.48 लाख आहे. त्यांच्यामध्ये प्रचंड उत्साह आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले. ते म्हणाले की, मुंबई आणि त्याच्या आसपासच्या कुलाबा-कल्याणसारख्या भागात लोकसभा निवडणुकीत सर्वात कमी मतदान झाले आहे. यासाठी रोजंदारीवर काम करणारे आणि असंघटित क्षेत्रातील इतर लोकांनी मतदानाच्या दिवशी पगारी रजा मिळेल, असे प्रशासनाला सांगावे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवारी आणि मतदान व्हावे यासाठी आमचा प्रयत्न असेल, असे ते म्हणाले. सध्याच्या पोस्टिंगमध्ये तीन वर्षांहून अधिक काळ सेवा केलेल्या अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी आम्ही महाराष्ट्र सरकारला केली आहे. त्याचा अनुपालन अहवाल मागविण्यात आला आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे की नाही हे जाणून घेणे हा मतदारांचा अधिकार आहे. अशा उमेदवारांना उभे करण्याचे कारण राजकीय पक्षांनीही जनतेला सांगावे, असेही ते म्हणाले. महाराष्ट्रातील निवडणूक प्रचारादरम्यान वापरण्यात आलेल्या सर्व हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात येणार असल्याचेही सांगितले.