Home Blog Page 188

कापूस व सोयाबीन अनुदानासाठी ई-पीक पाहणी अट रद्द

0

मुंबई — राज्य शासनाने सन 2023 च्या सोयाबीन कापूस अनुदानासाठी ई पीक पाहणी नोंदीची अट रद्द केली आहे त्या संबंधित शासननिर्णय दि. 27 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

सन 2023 च्या सोयाबीन व कापूस अनुदानासाठीराज्यातील शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीमध्ये नोंद नसल्यामुळे अपात्र ठरविण्यात आले होते. मात्र ई-पीक पाहणीची अट रद्द करून संबंधित तलाठ्यांकडे 7/12 उताऱ्यावर सोयाबीन व कापूस या पिकाची नोंद असलेल्या शेतकऱ्यांना ही अर्थसहाय्य देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
सन 2023 च्या खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन या पिकाची लागवड केली आहे व ई- पीक पाहणीमध्ये पोर्टलवर नोंद नाही; परंतु संबंधित तलाठ्यांकडे 7/12 उताऱ्यावर या पिकाच्या लागवडीची नोंद असलेल्या शेतकऱ्यांना सोयाबीन व कापूस अनुदानासाठी पात्र ठरविण्यात आले आहे.
राज्यातील सन 2023 च्या खरीप हंगामातील ई पीक पोर्टलवर नोंद असलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5000 रु. 2 हेक्टरच्या मर्यादेत इतके अर्थसहाय्य मंजूर करण्याचा शासन निर्णय 29 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आला होता. मात्र 27 सप्टेंबर 2024 च्या शासननिर्णयानुसार पिकाच्या ई-पीक पाहणी नोंदीची अट रद्द करण्यात आली आहे.

एसडीएम कार्यालयातील कर्मचारी लाच घेताना पकडला

0

बीड — येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात कार्यरत असणारा निलेश धर्मादास मेश्राम याला ७ हजार रूपयांची लाच घेतांना आज दि. २७ शुक्रवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील कौटूंबिक

न्यायालयातील जुनी इमारत उपविभागीय कार्यालय रूम नं १०९ या ठिकाणी ७ हजार रूपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले.

या संदर्भात माहिती अशी की, गेवराई हद्दीतील राक्षसभूवन रोड व जयहिंद नावाचे हॉटेल असून सदर हॉटेलवर दारूबंदी विभागाकडून व गेवराई पोलिस ठाण्याकडून ६५ ई प्रमाणे २ गुन्हे दाखल होते. त्या गुन्ह्यात त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई – करण्यासाठी त्यांना उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय बीड येथून कलम ९३ ब प्रमाणे त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई – करण्यासाठील नोटीस बजावण्यात आली होती. त्या नोटीसच्या अनुषंगाने बंदपत्र लिहून देण्यासाठी व सदर प्रकरण बंद – करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे याने स्वतःसाठी २ हजार रूपये व महिला उपविभागीय अधिकारी यांच्यासाठी ५ हजार रूपये अशी एकूण ७ हजार रूपये लाचेची मागणी पंचासक्षम करून सदर

लाच पंच साक्षीदारासमक्ष स्विकारली आहे. या संदर्भात मेश्राम यांना ताब्यात घेतले असून बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई संभाजीनगर येथील लाचलुचपत पोलिस निरीक्षक शिवाजीनगर हरिदास डोळे पोलिस निरीक्षक, वाल्मिक कोरे लाचलुचपत प्रतिबंधक संभाजीनगर पोलिस निरीक्षक यांनी संदिप आटोळे पोलिस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली मुकूंद आघाव अप्पर पोलिस अधीक्षक, सुरेश नाईकनावरे पोलिस उपअधीक्षक, पोलिस हवालदार साईनाथ तोडकर, पोह. राजेंद्र ननदिले, चालक सी.एन. बागुल छत्रपती संभाजीनगर यांनी कारवाई केली.

बजरंग सोनवणेंची खासदारकी धोक्यात ? खंडपीठाची नोटीस

0

छत्रपती संभाजीनगर — बीड चे खासदार बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका माजी नगरसेवक अमर नाईकवाडे, नारायण शिरसाट यांनी ॲड. शशिकांत ई शेकडे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर 27 सप्टेंबर रोजी न्यायमूर्ती ए.एस.वाघवसे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यात प्रतिवादी बजरंग सोनवणे यांना चार आठवड्यात कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश न्यायमूर्तींनी दिले.

अधिक माहिती अशी की, बीड लोकसभा मतदार संघातून निवडून आलेले उमेदवार बजरंग सोनवणे यांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार पंकजा गोपीनाथ मुंडे यांचा लोकसभेत 6553 मतांनी पराभव केला होता. बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल केलेली होती. प्रतिवादी बजरंग सोनवणे यांना निवडून आल्याचे जाहीर केलेला निर्णय रद्द करावा अशी मागणी याचिकेतून करण्यात आलेली आहे. दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की काही मतदान केंद्रावरील मतांवर आक्षेप घेण्यात आलेला आहे. तसेच पोलिंग बूथ केंद्रांची संख्या वाढवताना राजपत्रानुसार प्रसिद्ध करणे गरजेचे असताना सुद्धा निवडणुकीच्या ऐन तीन दिवस अगोदर पोलिंग बुथ केंद्र वाढवलेले असून त्यामुळे ४२६१ लोक मतदानापासून वंचित राहिलेले आहेत. ते बुथ कायद्याच्या दृष्टीने बेकायदेशीर आहेत तसेच सदरील पोलिंग बुथचे मतदान हे मतमोजणी करताना मोजता येणार नाही. ते मतदान हे अवैध असून त्याच्यावर आक्षेप घेण्यात आलेला आहे. माजलगाव शहरांमधील बूथ क्रमांक ६८ केंद्रावरील ईव्हीएम मशीनमधील घोळामुळे ७७४ मतदान हे मोजण्यात आलेले नाही. व वैध असणारे ११५६ पोस्टल मतदान हे बेकायदेशीरपणे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद केलेले आहेत. तसेच निवडणूक निर्णय घोषित करताना 909 मतांचा फरक आढळून येत आहे. हे सर्व सर्व मतदान निवडणुकीच्या निकालावर परिणामकारक ठरणारे आहे. तसेच प्रतिवादी बजरंग सोनवणे नामनिर्देशन फॉर्म भरताना शपथपत्रात खोटी माहिती पुरवलेली आहे. या आदी मुद्द्यावर खंडपीठाने याचिका दाखल करून घेतलेली आहे . व प्रतिवादींना चार आठवड्यात कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे. तर याचीकाकर्त्याच्या वतीने ॲड शशिकांत ई. शेकडे यांनी बाजू मांडली. त्यांना ॲड. पृथ्वीराज ए. ढाकणे, ॲड. बी. एस. बोडखे ,ॲड. विशाल थावरे, ॲड.आर.जी.नरवडे व एन.एस. राठोड यांनी सहकार्य केले. चौकट उत्पन्नाचे स्त्रोत फक्त शेती आणि दुग्ध व्यवसाय बजरंग सोनवणे यांनी आपल्या उत्पन्नाचा सोर्स शेती आणि दुग्ध व्यवसाय असल्याचे निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथ पत्रात नमूद केले आहे. शेती आणि दुग्ध व्यवसाय असताना त्यांनी दाखवलेली संपत्ती मात्र 200 कोटी रुपयांच्या पुढे आहे. ते येडेश्वरी साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर असताना त्यांनी शपथ पत्रात तसा उल्लेख केला नाही. त्यामुळे यावर देखील याचिकेतून आक्षेप घेण्यात आला आहे. एकूण झालेले मतदान आणि मोजलेले मतदान यात फरक बीडमध्ये मतदानाच्या दोन दिवस अगोदर बूथ क्रमांक 86 ए, 130 ए, 139 ए,140 ए, 170 ए, 190 ए, 12 ए असे एकूण 7 बूथ अचानक वाढविण्यात आले. त्यामुळे 4261 मतदारांना मतदान करता आले नाही. तर माजलगाव मधील बूथ क्रमांक 68 वरील 774 मतदान मोजण्यात आलेलं नाही. याशिवाय वैध असलेले पोस्टल मतदानात एकूण 1156 मतदान बाद करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने एकूण झालेले मतदान आणि प्रत्यक्ष मोजले गेलेले मतदान यांच्यात जवळपास 909 मतांचा फरक असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

हाॅस्टेल राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार!

0

केज — हॉस्टेलवर राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला तु आजारी असल्यामुळे दवाखान्यात दाखवायचे आहे मामाने दवाखान्यात बोलवले आहे.अशी बतावणी करून हॉस्टेल समोरून अपहरण केले. अंबाजोगाई महामार्गावरील एका लॉजच्या मागील बाजूस घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना गुरुवारी उघडकीस आली. याप्रकरणी दोघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड तालुक्यातील अल्पवयीन मुलगी शिक्षणासाठी तिच्या मामाने केज येथील हॉस्टेलवर ठेवले आहे. दरम्यान दहिफळ चिंचोली येथील सनी उर्फ स्वप्निल पाडळे, अमोल अंकुश जाधव हे दोघे बुधवारी रात्री नऊच्या सुमारास होस्टेलवर गेले. तुझे मामा उपजिल्हा रुग्णालयात आलेले आहे. तुला आजारपणामुळे दवाखान्यात दाखवायचे आहे यासाठी मामांनी बोलावले आहे. असे म्हणून दोघांनी तिला मोटार सायकल वर बसवले. अंबाजोगाई महामार्गावर असलेल्या एका लॉज च्या मागील खुल्या जागेत तिला घेऊन गेले. यावेळी सनी उर्फ स्वप्नील पाडळे याने मुलीवर बळजबरीने अत्याचार केला. त्यानंतर पीडित मुलीला तिच्या मुळगावी नेऊन सोडले.अत्याचारामुळे घाबरलेल्या पिडीत मुलीने आईवडिलांना घडलेली घटना सांगितली.नातेवाइकांनी लागलीच केज पोलिस पोलीस ठाण्यात धाव घेतली.या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून केज पोलिस स्थानकात बाल लैंगीक प्रतिबंधक, पोक्सो कायद्यानुसार सनी उर्फ स्वप्नील पाडळे आणि अमोल अंकुश जाधव या दोघांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे करीत आहेत.

मोटार सायकल चोरांची टोळी पकडली; 16 दुचाकी जप्त

0

बीड — मोटार सायकली चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज पकडली. यावेळी सोळा मोटारसायकली जप्त करून चोरीचे बारा गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळवले आहे

मोटारसायकली चोर गेवराई तालुक्यातील चिखली येथे येणार असल्याची गुप्त माहिती पो.स्टे. शिवाजीनगर गुरनं 470/2024 कलम 303(2) भा.न्या.सं. या मध्ये चोरी गेलेल्या मोटार सायकलचा समांतर शोध घेत असतांना मिळाली.खात्रीलायक खबर मिळताच पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांना खबर देवुन त्यांनी तात्काळ कारवाई करण्यासाठी सुचना दिल्या वरुन पोउपनि खटावकर यांनी गेवराई येथे पथकासह सापळा लावुन बातमी प्रमाणे मोटार सायकल वरुन येणाऱ्या दोन इसमांना ताब्यात घेवुन नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नावे रमेश छबु गिरे वय 26 रा.चिखली ता.गेवराई, मच्छिंद्र बबन राठोड वय 22 वर्ष रा.मानसिंगतांडा ता.गेवराई असे सांगितले त्यांना त्यांचेकडे असलेली मोटार सायकल बद्दल विचारले असता त्यांनी चोरी केली असल्याचे सांगितले व त्यांचे कडे अधिक चौकशी केली असता त्यांनी बीड शहर, दिंद्रुड, गेवराई, पाटोदा, माजलगाव, तलवाडा, तसेच पाथर्डी, अंबड, शेवगाव परिसरातुन मोटार सायकली चोरलेल्या असल्याचे सांगितले. यावेळी आरोपींच्या ताब्यातुन एकुण 16 मोटार सायकली जप्त करण्यात आल्या. त्यापैकी 12 मोटार सायकलचे गुन्हे उघडकीस आलेले असुन बीड जिल्हयातील विविध पो.स्टे.अंतर्गत 09 गुन्हे व जालना व अहमदनगर जिल्यातील 03 असा एकुण 7, लाख63 हजार रुपयाचा मोटार सायकलचा मु्द्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.आरोपी रमेश छबु गिरे रा.चिखली ता.गेवराई याचा पुर्व गुन्हे अभिलेख पाहता त्याने पुर्वी शिरुर कासार हद्दीमध्ये जनावर चोरी केल्या आहेत. सदर आरोपीतांकडुन आणिखीन इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असुन दोन्ही आरोपी व 16 मोटार सायकलचा मुद्देमाल पो.स्टे.शिवाजीनगर यांचे ताब्यात देण्याची प्रक्रिया चालु आहे. दरम्यान ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि श्रीराम खटावकर, स.फौ संजय जायभाये, पो.हअशोक दुबाले, कैलास ठोंबरे, दिपक खांडेकर, सोमनाथ गायकवाड, बाळु सानप, विकास वाघमारे, अर्जुन यादव, देविदास जमदाडे, निलेश ठाकुर, विकी सुरवसे, सिध्देश्वर मांजरे यांनी मिळुन केलेली आहे.

सासर्‍याने प्रेम विवाह केला; सुनेला सात पिढ्या समाजातून बहिष्कृत करण्याचा निर्णय जात पंचायतीने घेतला

0

बीड — सासऱ्याने प्रेम विवाह केला. जात पंचायतीने अडीच लाखाचा दंड ठोठावला तो दंड सासर्‍याने भरलाच नाही. शेवटी याची विचारणा मुलाकडे करण्यात आली मात्र त्यांनीही रक्कम भरण्यास असमर्थता व्यक्त केल्यानंतर जात पंचायतीने सात पिढ्यांना समाजातून बहिष्कृत करण्याचा निर्णय दिला. त्यामुळे सासऱ्याच्या प्रेमविवाहाची शिक्षा सुनाला मिळाली आहे ही घटना आष्टी तालुक्यातील डोईठाण येथे घडली आहे.या प्रकरणी ९ जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सासऱ्याने समाजाची परवानगी न घेता प्रेमविवाह केल्यामुळे त्यांना त्यावेळी अडीच लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यांनी तो न भरल्याने सुनेसह मुलाला जात पंचायतमध्ये बोलावले. त्यांनीही असमर्थता दर्शविल्याने पंचांनी या कुटुंबाला सात पिढ्या समाजातून बहिष्कृत करण्याचा आदेश दिला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यास जीवे मारू अशा प्रकारच्या धमक्याही देण्यात आल्या आहेत. हा प्रकार २२ सप्टेंबर २०२४ रोजी आष्टी तालुक्यातील डोईठाण येथे घडला आहे. हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न झाला होता.मात्र अखेर ९ जणांविरोधात आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा
जात पंचायतचा मुद्दा समोर आल्याने खळबळ उडाली आहे मालन शिवाजी फुलमाळी (३२ वर्षे) असं या पीडित महिलेचे नाव आहे. मालन यांचे सासरे नरसू फुलमाळी यांनी समाजाची परवानगी न घेता प्रेमविवाह केला होता. त्यांची जात नंदीवाले (तीरमाली) अशी आहे. सासऱ्याने प्रेमविवाह केल्यानंतर जात पंचायत बसविण्यात आली.
यामध्ये नरसू फुलमाळी यांना २ लााख ५० हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला. पण अनेक वर्षे उलटल्यानंतरही त्यांनी हा दंड भरला नाही. त्यामुळे २१ सप्टेंबर २०२४ रोजी अहमदनगरच्या नेवासा तालुक्यात राहणारे शिवाजी पालवे यांच्यामार्फत जात पंचायतमध्ये मालन यांना बोलावण्यात आले. ही पंचायत आष्टी तालुक्यातील डोईठाण येथे भरवण्यात आली होती.या पंचायतीमध्ये मालन आपले पती शिवाजी आणि मुलांसह तिथे पोहचल्या होत्या. या ठिकाणी पंचांसह समाजाचे ८०० ते ९०० लोकं आगोदरच एकत्र आले होते. त्यादिवशी निर्णय झाला नसल्याने त्यांना २२ सप्टेंबर रोजी पुन्हा जात पंचायतीत बोलवले. सकाळी ११ पंचांसमारे त्यांना उभे केले. सासऱ्याने दंड भरला नाही म्हणून तुम्ही भरा असे त्यांना सांगण्यात आले. तुम्हीही दंड भरला नाही तर समाजातून तुम्हालाही बहिष्कृत करू, तसेच पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारू अशा धमक्या देण्यात आल्या.शेवटी मालन यांनी दंड भरू न शकल्याने पंचांनी त्यांच्यासह त्यांच्या कुटूंबाला ७ पिढ्या समाजातून बहिष्कृत करण्याचा आदेश देण्यात आला. त्यामुळे मालन यांनी आष्टी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यावरून आष्टी पोलिस ठाण्यात गंगाधर बाबु पालवे, उत्तम हनुमंत फुलमाळी, गंगा गंगाराम फुसमाळी, चिन्नु साहेबराव फुलमाळी, सुभाष फुलमाळी, बाबुराव साहेबराव फुलमाळी, शेटीबा रामा काकडे, सयाजी सायबा फुलमाळी,गुलाब पालवे यांच्यासह इतर पंचांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या सर्वांवर सामाजिक बहिष्कार अधिनियम 2016 मधील जनतेचे महाराष्ट्र संरक्षण 4,5,6 तसेच बीएनएस 189 (2), 351 (2) (3), 352अशा कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीडच्या रेल्वे स्थानकाला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव

0
बीड — भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे बीड रेल्वे स्थानकाला नाव देण्यात यावे. त्या अनुषंगाने बीड आंबेडकरी समूहाने एकत्रित येवून गुरुवार (दि.26) सप्टेंबर रोजी बीड रेल्वे स्थानकाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर असे नाव दिले आहे. त्यानंतर आंबेडकरी समूहांने बीड जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन नावाची नोंद घ्यावी असे निवेदन दिले.
आंबेडकरी समूहाने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बीड रेल्वे स्थानकास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे. ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर अवघा देश चालतो आहे. त्या व्यक्तीच्या नावाला कोणीही विरोध करता कामा नये. तसेच रेल्वे आल्याचे श्रेय लोकप्रतिनिधींनी घेऊ नये कारण प्रत्येक नागरिकाच्या टॅक्समधून बीड रेल्वेचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. परळी तालुक्यापर्यंत रेल्वे होती. मात्र सदरील रेल्वे बीडपर्यंत येण्यास प्रदीर्घकाळ लागला आहे. बीड जिल्ह्याच्या मागासलेपणाला लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत.त्यामुळे बीड जिल्ह्याचा विकास म्हणावा तेवढा झालेला नाही.जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात असंही म्हटलं आहे की,आबेडकरी समूहाचे एक शिष्टमंडळ लवकरच केंद्र सरकारला प्रत्येक्ष भेटणार आहे. या निवेदनावर शेकडो आंबेडकरी जनतेच्या स्वाक्षरी आहेत.
पोलिसांनाही दिलेले निवेदन
बीड रेल्वे स्थानकास आंबेडकरी समूहांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाव देऊन तसा नाम फलक लावला आहे.त्यामुळे पोलीस प्रशासनाने या नाम फलकाचा अवमान होणार नाही, याची खबरदारी आणि काळजी घ्यावी.त्याकरीता पोलीस संरक्षण द्यावे अशा मागणीचा निवेदन आंबेडकरी समूहाने पोलीस प्रशासनास दिलं आहे.

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार !

0

वडवणी — नवऱ्याने टाकून दिल्यानंतर दोन अपत्यांसह वडवणी मध्ये राहणाऱ्या महिलेवर ओळखीच्या व्यक्तीने अश्लील व्हिडिओ काढून समाज माध्यमावर व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पिडीच्या तक्रारीवरून वडवणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवऱ्याने सोडून दिल्यानंतर आपल्या दोन मुलांसह एक महिला वडवणी मध्ये राहते खाजगी दवाखान्यात काम करून – ती आपला उदरनिर्वाह चालवत आहे..५ फेब्रुवारी २०२४
रोजी सकाळी ही महिला कामावरून घरी जात असताना तिच्या ओळखीचा असणारा व्यक्ती स्कार्पिओ गाडी घेऊन आला व या महिलेला चहा पिऊ या असे म्हणत वडवणी शहरातील एका हॉटेलवर चहा पिण्यासाठी घेऊन गेला दोघांनीही चहा घेतल्यानंतर थोड्याच वेळात महिलेला चक्कर येऊ लागली महिलेने घरी जाण्यासाठी विनंती केली.मात्र महिला थोड्यावेळाने बेशुद्ध पडल्याचा फायदा घेत आरोपीने वडवणी बीड रोडवरील असलेल्या एच पी पेट्रोल पंपाजवळच्या शेतात नेले महिला बेशुद्ध असताना आरोपीने त्या महिलेवर बलात्कार केला तसेच तिचे अश्लील फोटो काढले. जेव्हा महिला शुद्धीवर आली असता ती नग्न अवस्थेत होती झालेल्या प्रकार तिने आरोपीला विचारला असता आरोपीने तुझे मोबाईल मध्ये अश्लील फोटो काढले आहेत तू मला वारंवार भेट नाही भेटल्यास हे अश्लील फोटो फेसबुक इंस्टाग्राम वर वायरल करण्याची धमक्या दिल्या भयभीत झालेल्या महिलेने याबाबत कुठेही वाच्यता केली नाही या महिलेच्या मोबाईलवर आरोपीच्या मित्राने चार दिवसा पूर्वीच अश्लील भाषेत चॅटिंग केली व यापूर्वी झालेला प्रकार या महिलेला सांगितला तसेच अश्लील फोटो पुन्हा वायरल करण्याच्या धमक्या पुन्हा ब्लॅकमेल करत असल्याने महीलेने पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी विरुद्ध कलम ३७६ भादवी सह कलम ७५ (२), ३०८ (२) भा. न्या.सं. सह कलम ६७ आयटी अॅक्ट सह कलम ३(१) (ई), ३(१) (डब्ल्यु) (आयआय), ३(२) (व्ही) अ.जा. ज.अ.प्र.अं.गुन्हा नोंद केला आहे.

अब्रुनुकसान प्रकरणी संजय राऊतांची जेलवारी टळली;अटकपूर्व जामीन मंजूर

0

मुंबई — किरीट सोमय्याच्या पत्नी मेधा सोमय्या वरील आरोपानंतर संजय राऊत विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला होता. शिवडी कोर्टाने या प्रकरणी राऊतांना दोषी मानत १५ दिवसांची कैद आणि २५ हजारांचा दंड ठोठावला.यानंतर संजय राऊतांच्या वतीने जामिनासाठी आणि शिक्षेवरील स्थगितीसाठी वरच्या कोर्टात अर्ज करण्यात आला. यात संजय राऊतांना मोठा दिलासा मिळाला आहे. संजय राऊतांचा अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.१५ हजारांच्या जात मुचलक्यावर संजय राऊतांना जामीन मंजूर झाला आहे. ३० दिवसांच्या आत वरच्या कोर्टात अपील करून दाद मागण्याची मुभा कोर्टाकडून देण्यात आली आहे.

देशाच्या सर न्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान गणपतीचे मोदक खाण्यासाठी जातात, मग आमच्यासारखे लोक भ्रष्टाचाराविरोधात आवाज उचलतात त्यांना न्याय कुठून मिळणार. हे अपेक्षितच आहे असं सांगत संजय राऊतांनी पहिली प्रतिक्रिया दिली. आम्ही कोर्टाचा आदर करतो. युवक प्रतिष्ठानच्या माध्यमातून मीरा भाईंदरमध्ये काही काम झाले होते त्यात काही बेकायदेशीर घडले, हे मी बोललो नाही तर मीरा भाईंदरचे विरोधी पक्षनेते प्रविण पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होते. त्यावर तिथले आमदार प्रताप सरनाईक यांनीही तपास व्हावा, त्यात भ्रष्टाचार झालाय म्हटलं होते. त्यावर विधानसभेत चर्चा झाली. त्यानंतर कायदेशीर कारवाई व्हायला हवी यावर विधानसभेत चर्चा होऊन कायदेशीर आदेश पारित केला. हे जर मी बोललो असेल तर माझ्याकडून अब्रुनुकसानी कशी झाली, हे सगळे ऑन रेकॉर्ड आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

अस आहे प्रकरण !

मीरा-भाईंदर महापालिकेकडून मीरा-भाईंदर शहरात १५४ सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली. त्यापैकी १६ शौचालये बांधण्याचे कंत्राट भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवा प्रतिष्ठानला मिळाले होते. बनावट कागदपत्र सादर करुन मेधा सोमय्या यांनी मीरा-भाईंदर पालिका अधिकाऱ्यांची फसवणूक केली, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. मेधा सोमय्या यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांना कोर्टात आव्हान दिले होते. या प्रकरणात दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर यात संजय राऊत यांना अब्रुनुकसानीच्या प्रकरणात १५ दिवसांचा तुरुंगवास आणि २५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

श्रेयवादासाठी शहरातील अक्षरशः चाळण झालेल्या रस्त्यांना मंजुरी दिली नाही !

0

पालकमंत्री साहेब बीड शहरातील विकास कामात भेदभाव करू नका- खुर्शीद आलम

बीड — बीड शहरात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान योजनेंतर्गत जालना रोड ते अमरधाम स्मशानभूमी (बिंदुसरा नदीवरील पूल) पर्यंतच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण व पक्की नालीबांधकाम करण्यास मंजुरी मिळून या कामाला सुरुवात होणार असल्याचे समजते. हे समजल्यानंतर आनंद झाला. मात्र सोबतच दुःख झाले. दुःख याचे कि, केवळ श्रेयवादासाठी म्हणजे जे काही केलं ते आम्हीच केलं असे दिसावे म्हणून बीड शहरातील अक्षरशः चाळण झालेल्या इतर रस्त्यांना मात्र अनेक प्रयत्न केल्यानंतरही मंजुरी मिळाली नाही.
बीड शहरात विविध ठिकाणी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान राज्यस्तरीय महाअभियान योजनेंतर्गत रस्ता व नालीबांधकाम करण्यासाठी एकूण 17 कामे प्रस्तावित होती. यामधीलच एक प्रस्तावि असलेल्या रस्त्यापैकी जालना रोड ते अमरधाम स्मशानभूमी (बिंदुसरा नदीवरील) पर्यंत रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्याच्या कामास लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेंतर्गत मंजुरी मिळून येत्या 8 ते 10 दिवसात मा.पालकमंत्र्यांच्या हस्ते या कामाचे उदघाटन होऊन सुरुवात होणार असल्याचे समजले आहे. परंतु या 17 कामांपैकी बीड शहरात सध्यस्थीतीला अत्यावश्यक असलेल्या गावठाणमधील धोंडीपुरा येथील बलभीम चौक-माळीवेस चौक-राजुरी वेस येथील पोस्ट ऑफिस-कबाड गल्ली वेस-माळीवेस पोलीस चौकी पर्यंतचा रस्ता, तसेच राजुरी वेस येथील बलभीम चौक-माळीवेस चांदणी चौकापर्यंत व अजिजपूर येथील नुरी मस्जिद ते कागदी वेस येथील पोस्ट ऑफिस-कबाडगल्ली वेस-माळीवेस पोलीस चौकीपर्यंत सिमेंट काँक्रीट रस्स्त्याची अक्षरश: चाळणी झाली आहे. ही बाब लक्षात घेवून आ.संदीप क्षीरसागर दि.12 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठक घेवून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) नगर परिषद अंतर्गत टप्पा क्र.2 मधील बचत खर्चातुन सदरील कामे करण्याचे मागणी केली होती. यावर मा.जिल्हाधिकारी यांनी मा.मुख्याधिकारी यांना रितसर प्रस्ताव दाखल करण्याचे सुचविले होते. यावर मा.मुख्याधिकारी यांनी दि.26.08.2024 रोजी मा.जिल्हा सह आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला. परंतु पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी यांना सांगुन सदरील प्रस्ताव प्रलंबित ठेवला व या कामांची मंजुरी अडवली. अशा प्रकारे बीड शहरातील अत्यावश्यक असलेल्या कामांमध्ये खोडा आणला. जालना रोड ते अमरधामपर्यंतच्या रस्त्याला तातडीने मंजुरी मिळाली याचे खरोखरच समाधान आहे. कारण हा रस्ता करणे खुप आवश्यक होते. परंतु या सोबतच आ.संदिप क्षीरसागर यांनी मागणी केलेले रस्तेही आवश्यकच आहेत. मग केवळ श्रेयवादासाठीच लोकांसाठी आवश्यक असलेली कामे अडवुण बीड शहरातील विकास कामामध्ये पालकमंत्र्यांनी अन्यायकारक भेदभाव करू नये असे न.प.चे माजी सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष खुर्शिद आलम यांनी पत्रकाद्वारे म्हटले आहे.