सर्वसामान्यांच्या न्यायाचं काय?
बीड / केज — टाकळी येथील हॉटेल चालक विलास घुले हे वाद सोडवायला गेल्यानंतर त्यांचा खून झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. घटनेला चार दिवसाचा कालावधी उलटला असला जनता रस्त्यावर उतरली असली विधानसभेत लोकप्रतिनिधींना आवाज उठवावा लागला.
आयजींना छ. संभाजीनगर मधून बीडमध्ये डेरे दाखल व्हावे लागले त्या वेळेला पोलीस अधीक्षकांना जाग आली अन् आंदोलकांना सामोरे जाण्याची उपरती आली. कुटुंबीयांनी मृतदेह पोलीस ठाण्यात आणून ठेवला मात्र तीन तासाहून अधिक काळ आंदोलकांना ठाण्याबाहेर ठेवून केज पोलीस ठाण्यात चर्चेचं गुऱ्हाळ कोणासोबत गाळत बसलेत असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. दरम्यान बीडमध्ये आंदोलनाशिवाय न्यायच मिळत नाही असं चित्र सध्यातरी निर्माण झालेला आहे.

गेल्या एक ते दीड वर्षांमध्ये बीडच्या कायदा सुव्यवस्थेची लक्तरं वेशीवर टांगण्याचं काम होत असल्याचं पाहायला मिळतं. जिल्ह्यात झालेल्या खून प्रकरण असोत की अपहरणासारखे गंभीर गुन्ह्यांमध्ये न्यायासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात अथवा पोलीस ठाण्यात दुःख बाजूला सारून आंदोलन करण्याची वेळ आणली जात असल्याचं प्रत्येक घटना मधून उघड होत आहे. जनतेमधून एसपींच्या कारभारावर प्रश्नचिन्ह जोपर्यंत निर्माण केले जात नाही तोपर्यंत गुन्हाच दाखल होत नाही ही नव्याने कावतांनी त्यांनी सुरू केलेली परंपरा अजूनही कायम असल्याने केज सह बीडमध्ये आंदोलक आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे त्याला कारणही तसंच घडलं आहे.केजच्या टाकळी येथील हॉटेलचालक विलास घुले या तरुण व्यावसायिकाचा निर्घृण खून झाला. या विषयाला गंभीर वळण मिळाले. शनिवारी हत्येची घटना घडल्यानंतर मंगळवारी, २३ जून २०२६ रोजी केज शहरात नवा संघर्ष पाहायला मिळाला.
संतप्त नातेवाईक आणि टाकळीच्या गावकऱ्यांनी विलास घुले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास नकार देत मृतदेह केज पोलीस ठाण्यात आणून ठेवला. या घटनेनंतर प्रचंड खळबळ उडाली.आंदोलनकर्त्यांनी आज दिवसभर प्रचंड घोषणाबाजी करत रस्ते अडवून धरले बंद पाळण्यात आला. शहरासह जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले.विलास घुलेच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी आणि गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार समोर यावा एवढीच न्याय अपेक्षा ठेवत आंदोलनाचा मार्ग स्वीकारला हजारोंच्या संख्येने सकाळपासून आंदोलक रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले.सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर यांनी अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात थांबून विलास घुले याच्या पार्थिवाची उत्तरीय तपासणी करून घेतली आणि दुपारी साडेबारा वाजता मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. मात्र, नातेवाईकांनी हा मृतदेह गावाकडे न नेता, दुपारी ठीक ३ वाजता केज पोलीस ठाण्याच्या प्रांगणात आणून ठेवला आणि तिथेच ठिय्या मांडला.या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत एकूण 9 आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यापैकी 6 आरोपींना अटक केली असली मात्र,आंदोलक व घुले कुटुंबातील मारेकऱ्यांचा मुख्य कट ज्या उमेश मानेवर हल्ला करण्याचा होता, त्याची दुसरी स्वतंत्र फिर्याद पोलिसांनी नोंदवून घ्यावी या संपूर्ण कटाच्या मागे केजचे स्थानिक खासदार बजरंग सोनवणे यांचे सुपुत्र सौरव सोनवणे यांचा हात असल्याचा आरोप करत, त्याला मुख्य आरोपी बनवून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करावा. गुन्ह्यातील सर्व 9 आरोपींना त्वरित अटक करावी आणि स्थानिक पोलिसांऐवजी ‘एसआयटी’ (SIT) नियुक्त करून या प्रकरणाचा तपास सीआयडी किंवा विशेष पथकामार्फत करावा.अशी मागणी केली जात आहे. पोलीस खात्यातील आयपीएस अधिकाऱ्यांची शिष्टाई देखील गेल्या चार दिवसापासून फेल गेल्याच चित्र आंदोलकांच्या आक्रमक पावित्र्यामुळे निर्माण झालं.
न्यायासाठी विधानसभेत आवाज उठला
दरम्यान विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, नमिता मुंदडा यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली.
आयजीनां यावे लागले बीडमध्ये
छ.संभाजीनगरचे आयजी विलास घुले हत्या प्रकरण विधानसभेत गाजल्यानंतर आय जी वीरेंद्र मिश्रा बीडला आले. तरीही पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी एसी केबिन न सोडता “जे होईल ते पाहून घेऊ” अशी भूमिका घेतल्याने आय जी स्वतः केज कडे रवाना झाले. त्यावेळी एस पी मात्र खडबडून जागे झाले. आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी आयजींना ओव्हरटेक करत नेकनुर हून पुढे निघून गेले. त्यानंतर आयजी बीडमध्ये वापस आले.
चर्चेच गु-हाळ चालूच?
एस पी नवनीत कांवत केज पोलीस ठाण्यात गेल्यानंतर आंदोलकांना त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर काढले. आंदोलकांनी तिथेही ठिय्या दिला. याच दरम्यान लक्ष्मण हाके देखील आंदोलनामध्ये सहभागी झाले. आंदोलक बाहेर असताना पोलीस अधीक्षक गेल्या तीन साडेतीन तासापासून चर्चेच गुऱ्हाळ गाळत बसले आहेत. अजूनही या प्रकरणात तोडगा निघाला नाही. दरम्यान सगळे आंदोलक बाहेर असताना एस पी कोणा सोबत चर्चेच गु-हाळ गाळत बसले आहेत हे त्यांनाच ठाऊक असल्याचं संतप्त आंदोलक चर्चा करताना दिसत आहेत.
एस पीं ची भूमिका बघू करू ची च !
गेल्या चार दिवसापासून विलास घुले हत्या प्रकरण गाजत असताना शनिवारी बीडमध्ये आलेले एस पी बघू करू च्या च भूमिकेत असल्याचा पाहायला मिळालं. मी सोमवारी अधीक्षक पदाचा कारभार घेतला असं त्यांनी सांगितलं असलं तरी दोन दिवस होत आले तरी कुठली तर भूमिका त्यांनी घेतली नाही. आंदोलकांना शांत करण्याची व प्रकरण थंड करण्याची जबाबदारी चेतना तिडके व एम वेंकटरम यांच्यावर सोपवून एस पी नी बघ्याची भूमिका घेतली. आज मंगळवारी सकाळी देखील आंदोलकांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून आंदोलन केले.तरी त्या आंदोलकांना सामोरे जाण्याची भूमिका पोलीस अधीक्षकांनी घेतलीच नाही.
विलास घुले च्या भावाचं स्टेटमेंट घेणार नंतर भूमिका ठरवणार?
दिवंगत विलास घुले यांचे बंधू रमेश घुले यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेत एसपींनी चर्चा सुरू केली आहे. त्याचा स्टेटमेंट घेऊन खासदार पुत्राचा या हत्या प्रकरणात सहभाग आहे का? हे पाहून कारवाई करणार असल्याची भूमिका कांवत यांनी घेतली आहे. याला देखील एक तासाहून अधिक कालावधी उलटला आहे.
दरम्यान या प्रकरणात काय कारवाई होते. पोलीस अधीक्षक काय भूमिका घेतात? घुले कुटुंबियांना न्याय मिळेल का? यासारखे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.



