“शितल”तेच्या कौतुकाची वरात अन् हागायला परात! पिडीत दारात अन गुन्हेगार जोरात!!

सीओंच्या पत्राची दखल कधी घेणार? छाया पांचाळला न्याय कधी देणार?

बीड — कर्तव्यदक्ष, सिंघम, प्रामाणिक अधिकारी म्हणून कौतुकाची “वरात” काढून कितीही गाजावाजा केला जात असला तरी मुळता:च कर्म दरिद्री पणा असल्याने गुन्हेगारासमोर “शितल” होणाऱ्या “कुमारा” कडून न्यायाची अपेक्षा कशी करणार? न. प.चे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांना केबिनमध्ये जाऊन दोघांनी जिवे मारण्याची धमकी दिली. शिवीगाळ केली. शासकीय कामात अडथळा आणला या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे पत्र शहर पोलीस ठाण्याला दिले. पण मिरवल्या जात असलेल्या बिरूदावलींशी सुतराम संबंध नसलेल्याने पुन्हा आरोपींची “ब”ळेच “लाळ” चाटल्याचं पाहायला मिळालं. तीच स्थिती डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसूती दरम्यान मृत्यू झालेल्या छाया पांचाळ प्रकरणातही पाहिला मिळाली. ठाणेदाराच्या केबिनमध्ये ठिय्या देखील मांडला पण कारवाई करण्याची उपरती आलीच नाही. मोठमोठ्या प्रकरणांची ही स्थिती तर चिल्लर प्रकरणात काय? अन् एस पीं चा कारभार झालाय गोगलगाय असं म्हणण्याची वेळ आली आहे.

जीएसटी अधिकारी सचिन जाधवर आत्महत्या प्रकरणात न्याय मिळावा म्हणून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या पीडित कुटुंबाचा सावलीसाठी उभारलेला मंडप काढणारा डोक्याने “शितल” असलेल्या कुमाराच्या  कर्तव्यदक्षतेचा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आदेश पालन करणारा म्हणून नेहमीच तोरा मिरवणारा ठाणेदार आहे. पण किती जरी तोरा मिरवला असला तरी कर्तव्यदक्षतेच वास्तव मात्र भयानक आहे.

खाकी वर्दी फक्त रुबाब दाखवायलाच असते एवढाच काय तो तिचा उपयोग बाकी अवैध धंद्यांना दिलेला आश्रय हा भाग वेगळा असला तरी सर्वसामान्यांना न्याय मिळणं अवघड झाला आहे. नुसतीच पोलीस दलात आधुनिकता आणून कर्तव्यदक्षतेचा अभाव असला तर त्याचा फायदा काय? असा प्रश्न मात्र आता निर्माण झाला आहे सामान्यांचा द्या सोडून इथे मुख्याधिकारी पदावर बसलेल्या अधिकाऱ्याला देखील न्याय मिळण अवघड होऊन बसला आहे. बीड न.प‌.चे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांच्या केबिनमध्ये घुसून शेख निजाम अमीन रा. मसरत नगर व शेख इम्रान निजाम रा. मसरत नगर या दोघांनी त्यांना शिवीगाळ केली. मारण्यासाठी अंगावर धावून गेले. जीवे मारण्याची धमकी दिली शासकीय कामात अडथळा आणला. एवढी मोठी गंभीर घटना घडली. या संदर्भात सात मे रोजी शहर पोलीस ठाण्याला मुख्याधिकारी फडसे यांनी गुन्हा नोंद करण्याबाबत अधिकृत पत्र दिले. या घटनेला तीन दिवसाचा कालावधी उलटला असला तरी अद्याप गुन्हा नोंद करताना कर्तव्यदक्ष ठाणेदाराच्या हाताला लकवा मारला गेला. गुन्हा नोंद करण्याची हिम्मत झाली नाही. तीच स्थिती वर्षभरापूर्वी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे छाया गणेश पांचाळ हिचा प्रसूती दरम्यान अति रक्तस्त्रावाने मृत्यू झाला. यासाठी वारंवार आंदोलन केली गेली. जिल्हा नियोजन समितीच्या इमारतीवर शोले स्टाईल आंदोलन केले. या प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सतीश कुमार सोळंके आणि शहर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी अहवाल मागवून दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिले. अधिकाऱ्यांच्या या मधाळ, शितल आश्वासनाने न्याय मिळण्याची आशा पल्लवीत झाली. पण वैद्यकीय अहवाल हाती पडल्यानंतर देखील पुन्हा गुन्हेगारांच्या बाबतीत नेहमीप्रमाणेच ““ळेच “लाळ“चाटण्याचा प्रयत्न केला जातोय. शेवटी कंटाळून शहर पोलीस ठाण्याच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या केबिन मध्येच सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब मोरे व पीडीत कुटुंबातील महिलेने ठिय्या आंदोलन सुरू केले. पण जिथे “शितल”डोक्याने मधाळ वाणीपुढे पोलीस अधीक्षकासारखा आयपीएस अधिकारी पघळतो. मग नागवं नाचलं तरी सूट देतो. तर मग खेडवळ पीडित कुटुंब का पघळणार नाही. न्याय मिळेल अशी अपेक्षा का ठेवणार नाही ? शेवटी सत्ते पुढे शहाणपण देखील चालत नाही. जिथे पोलीस अधीक्षकांचा वरदहस्त आहे. तिथे न्याय काय मिळणार? मग ते मुख्याधिकारी असो किंवा गाजलेलं छाया पांचाळ मृत्यू प्रकरण असो असं म्हणण्याची वेळ जनतेवर आली आहे. या सारख्या अनेक घटनांमुळे कर्तव्यदक्षतेचा ढोल बडवणारा प्रत्यक्षात मात्र कर्तव्यदक्षतेची “वानवा” असलेल्या व्यक्तींनाच “कौतुकाची वरात अन् हागायला परात” पीडित दारात अन् आरोपी जोरात” अशी म्हण जनतेत गमतीने वापरली जाऊ लागली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles