शिरूर का.– बीड जिल्ह्यात फक्त आरोपींच्या नावात, घटना स्थळांच्या, पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये बदल होतो आहे. मात्र हत्येचे सत्र दररोज सुरू आहे. पोलीस अधीक्षकांनी इतकी कायद्याची जरब ईतकी बसवली आहे की गुन्हेगारांना कमी आणि जनतेलाच कधी कुठे काय घडेल म्हणून धास्ती बसली असल्याचं पाहायला मिळत आहे. शिरूर तालुक्यातील खोकरमोह शिवारात एका 30 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना सोमवार दि.२ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.
शिरूर का.तालुक्यातील खोकरमोह शिवारात रायमोह येथील कलरचे काम करणारा चांद उर्फ (गुड्डू) अलाउद्दीन तांबोळी वय 30 वर्ष या तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना सोमवारी सकाळी 8 च्या सुमारास उघडकीस आली असून खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. घटनास्थळी शिरूर पोलीस ठाण्याचे पोनि.प्रवीण जाधव व रायमोह पोलीस चौकीचे रवी उबाळे व अन्य कर्मचारी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.

