बीड — नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकरी व शेतमजुरांचे मोठे नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ’नवचेतना ’ सर्वांगीण विकास केंद्र सरसावले असून बीड जिल्ह्यातील दीड हजार पूरग्रस्तांना संसार उपयोगी वस्तू व किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. बुधवारी बीड तालुक्यातील हिंगणी बुद्रुक येथील 65 गरजूंना संसार उपयोगी साहित्य व किराणा किट चे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेच्या प्रमुख मनीषा घुले यांची विशेष उपस्थिती होती.
मागील पंधरवड्यात मराठवाड्यात बहुतां जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या होत्या, अनेक शेतकऱ्यांच्या शेतात आजही पाणी साचलेले आहे. हातात तोंडाशी आलेली पिके आसमानी संकटामुळे उध्वस्त झाली आहेत. या सगळ्या परिस्थितीमुळे शेतकरी व शेतमजुरांवर मोठे संकट ओढवले आहे. या बिकट परिस्थितीमध्ये बीड मधील नवचेतना सर्वांगीण विकास केंद्राच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्या मनीषा घुले यांनी शेतकरी व शेतमजूर यांना मदतीचा हात दिला आहे .
बीड जिल्ह्यात अति पावसामुळे झालेल्या नुकसानीचे प्रशासन पंचनामे करत आहे शासनाची मदत येण्यासाठी वेळ जाणार आहे तोपर्यंत जिल्ह्यातील गोरगरीब नागरिकांना मदत व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून नवचेतना सर्वांगीण विकास केंद्राच्या वतीने मदत केली जात आहे मराठवाड्यातल्या विविध भागांमध्ये अनेक संस्था शेतकरी व शेतमजुरांच्या मदतीसाठी धावून आलेल्या आहेत अनेक ठिकाणी मदत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे याचाच एक भाग म्हणून नवचेतना सर्वांगीण विकास केंद्राच्या वतीने बीड तालुक्यातील गरजवंत शेतकरी व शेतमजूर यांना मदत केली जात आहे.
नवचेतना सर्वांगीण विकास केंद्राच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्या मनीषा घुले यांनी बीड जिल्ह्यातील विविध भागात एकूण दीड हजार पूरग्रस्त नागरिकांना संसार उपयोगी वस्तू व किराणा साहित्याचे वाटप केले आहे. गेवराई सह इतर तालुक्यांमध्ये देखील संस्थेच्या वतीने मदतीचा हात गरजूंना दिला आहे. यामध्ये बुधवारी बीड तालुक्यातील हिंगणी बु. येथील गरजूंना संसार उपयोगी वस्तू व किराणा किटचे वाटप करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या मनीषा घुले, सुरज वैष्णव, दत्ता घुले, बबनदास वैष्णव, आदींची उपस्थिती होती.

