Sunday, February 1, 2026

सूमार कामगिरीनंतर एलसीबी चे उस्मान शेख यांची बदली

बीड — स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख उस्मान शेख यांची लातूरच्या प्रशिक्षण केंद्रात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर कोणाची नियुक्ती होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणादरम्यान भाजप आमदार सुरेश धस यांनी पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. पोलीस निरीक्षक उस्मान शेख हे परळी पोलीस स्टेशनला होते. पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांची बदली वाल्मीक कराडच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप झाला होता.आ. सुरेश धस यांच्यासोबतच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि तृप्ती देसाई यांनीही गंभीर आरोप केले होते. उस्मान शेख यांची स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी अतिशय खराब राहिली. स्थानिक गुन्हे शाखा नावाचा प्रकार पोलीस दलात असतो याचा विसर देखील जनतेला पडला होता. किरकोळ गुन्ह्याची प्रकरणा हाताळून माध्यमामधून त्याची हाकाटी मारण्याचे काम केलं जात होतं. गंभीर व दरोड्या सारखे मोठमोठे गुन्हे उघडकीस आणायचं हे कर्तव्य आहे याचा विसर पडला होता. परिणामी स्थानिक गुन्हे शाखेचा गुन्हेगारीवरचा अंकुश पूर्ण नाहीसा झाला होता. उस्मान शेख यांना कर्तव्याचा विसर पडत असल्याच्या तक्रारी पोलीस अधीक्षकांकडे येत होत्या. एवढी मोठी जबाबदारी खांद्यावर घेत असताना साजेस काम होत नसल्याने त्यांनीच पोलीस अधीक्षकांकडे बदलीची विनंती केली होती.दरम्यान उस्मान शेख यांची लातूरच्या प्रशिक्षण केंद्रावर बदली झाली आहे.यांच्या जागी पोलीस अधीक्षक कोणाची नियुक्ती करतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles