Sunday, December 14, 2025
Home Blog Page 3

मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेत मराठवाडयाने गाठला उच्चांक

0

छ. संभाजीनगर — ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेत महाराष्ट्राने विश्वविक्रम केला आहे. महावितरणने एकाच महिन्यात 45 हजार 911 सौर कृषिपंप लावण्याचा जागतिक उच्चांक गाठला आहे.यामध्ये मराठवाडयात 26,721 सौर कृषिपंप बसवून नविन उच्चांक केला आहे.राज्याच्या एकूण आकडेवारीच्या 60 टक्के वाटा हा छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालया अंतर्गत येणा—या छत्रपती संभाजीनगर, लातूर व नांदेड परिमंडलातील आठ जिल्हयांचा आहे.या विक्रमाची गिनिज बुकमध्ये यशस्वी नोंद झाली आहे. मुख्यमंत्री .देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज गिनीज बुकतर्फे विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा आज पार पाडला.

शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनल्स आणि कृषिपंप असा संपूर्ण संच देण्याच्या ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ या योजनेत महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे.त्यात विशेषता:हा छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालय अंतर्गत एका महिन्यात 26,721 सौर कृषिपंप बसवून विश्वविक्रमात आघाडी घेवून मोलाचा वाटा उचलला आहे.यासाठी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक.लोकेश चंद्र (भाप्रसे) व सहव्यवस्थापकीय संचालक आदित्य जीवने (भाप्रसे) यांनी क्षेत्रिय कार्यालयातील अभियंते व सौर कृषिपंप बसविणारे व्हेन्डर यांच्याशी समन्वय ठेवून सतत पाठपुरावा करून आवश्यक त्या सूचना केला. शेतक—यांनी सौर कृषिपंप मागणी केल्यानंतर कर्मचा—यांनी सौर कृषिपंप बसविण्यासाठी तात्काळ स्थळ पाहणी करून सौर कृषिपंप बसवितांना येणा—या अडचणी सोडविण्याबाबत सूचना केल्या. त्यामुळे मराठवाडयाने ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेत नवीन उच्चांक गाठला आहे. सौर कृषिपंप बसवितांना अडचणी आल्यास महावितरणच्या जवळच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक आदित्य जीवने (भाप्रसे) यांनी केले आहे.

सौर कृषिपंप बसविण्यात आलेली आकडेवारी पुढील प्रमाणे

जिल्हा                    सौर कृषिपंप

छत्रपती संभाजीनगर.                3102
जालना.                                   6958
छ. संभाजीनगर परिमंडल           10060

नांदेड                                         975
परभणी.                                      3182
हिंगोली.                                      2100
नांदेड परिमंडल.                         6257
लातूर                                          900
बीड                                           7467
धाराशिव.                                   2037
लातूर परिमंडल                        10404
मराठवाडा                                26721

राज्यात मागास समजल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्याने राज्यात पहिला नंबर पटकावला आहे. राज्यात सर्वाधिक ७४६७ सौर कृषी पंप बसवून आघाडी घेऊन १ क्रमांक पटकावला आहे. मागास भागाची ओळख पुसून जिल्हाच नाव गिनीज बुकमध्ये आघाडीचा जिल्हा असं सिद्ध करून दाखवले आहे.

सरकारी सुरक्षेवर विश्वास नाही; स्ट्रॉंग रूमची राखण मी देखील करणार — न.प उमेदवाराच्या पतीची मागणी

0

परळी — नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार संध्या देशमुख यांचे पती दीपक देशमुख यांनी सरकारच्या सुरक्षा यंत्रणेवर भरवसा नसून, ईव्हीएम मशिन ठेवलेल्या स्ट्राँग रूमजवळ झोपण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी केली. दीपक देशमुख यांच्या या मागणीपुढं बीड प्रशासन आवाक झालं आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नगरपालिका निवडणुकांची मतमोजणी एकाच दिवशी 21 डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे काल झालेल्या नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीला तब्बल 16 दिवस जाणार आहेत. तोपर्यंत ईव्हीएममधील  मत सुरक्षित राहतील का या विचारानं उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.

परळी नगरपालिकेची निवडणूक चांगलीच गाजली. मतदान झालेल्या ईव्हीएम मशिन आता कडक बंदोबस्तामध्ये स्ट्राँग रूममध्ये ठेवल्या गेल्या आहेत. यासाठी बीड प्रशासनाने तगडा पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. परंतु या सुरक्षा यंत्रणेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवाराच्या पतीने दीपक देशमुख यांना भरवसा नाही. लोकांनी आम्हाला केलेली मत सुरक्षित ठेवण्याची आमची देखील जबाबदारी आहे. त्यामुळे मला स्ट्राँग रूमजवळ झोपण्याची परवानगी मिळावी. तशी त्यांनी बीड प्रशासनाकडे देखील मागणी केली आहे.दीपक देशमुख म्हणाले, “आम्हाला इथं अंथरून-पांघरून घेऊन येत, राहण्याची मुभा द्यावी. तशी आमची व्यवस्था देखील करावी. कारण आमचं भविष्य या स्ट्राँग रूममध्ये आहे. स्ट्राँग रूममधील आमचा कोणावरही भरोसा नाही.” स्ट्राँग रूमकडे जाण्या-येण्याची आमची व्यवस्था होत नाही. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांना मी पत्र देणार, असेही दीपक देशमुख यांनी म्हटले.आमची इथंच व्यवस्था करा, 24 तासाची. उमेदवारांसह मी या स्ट्राँग रूमच्या परिसरात थांबणार आहे. मी सकाळी झोपेतून उठून स्ट्राँग रूमकडे आलो आहे. यासाठी निवडणूक आयोगाकडे मागणी करणार आहे. मला इथं कशी व्यवस्था करायची, हे त्यांनी सांगावं मी माझं अंथरूण-पांघरूण घेऊन इथं येऊन बसेल. मला इथेच थांबायचं आहे आणि या स्ट्राँग रूमचं रक्षण करायचा आहे. जाण्या येण्यामुळे दमछाक होत आहे. दुसरीकडे माझे पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. त्यांच्यासाठी वीस तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यांचा प्रचारही मला करायचा असल्याचं दीपक देशमुख यांनी सांगितला आहे.

200 वर्षांनंतर दंडकर्म पारायण पूर्ण करणारा 19 वर्षांचा अहिल्यानगरचा देवव्रत महेश रेखे कोण? ही परीक्षा कठीण का मानली जाते?

0

अहिल्यानगर — काशीच्या पवित्र मातीत गेल्या दोन महिन्यांपासून एक ऐतिहासिक आध्यात्मिक साधना सुरू होती. शुक्ल यजुर्वेदाच्या माध्यंदिनी शाखेतील सुमारे 2000 मंत्रांचे अत्यंत कठीण ‘दंडक्रम पारायण’ 19 वर्षांच्या वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे याने पूर्ण केले आहे.जवळपास 200 वर्षांनंतर दंडक्रम पारायण पुन्हा भारतात पार पडले असून या यशामुळे तरुण देवव्रत देशभरात चर्चेत आला आहे.
पारायण पूर्ण होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवव्रतचे अभिनंदन करत म्हटले “देवव्रत रेखेंनी केलेली ही साधना पुढील पिढ्या लक्षात ठेवतील. 2000 मंत्रांचा दंडक्रम इतक्या अचूकतेने 50 दिवसांत संपवणे हा असाधारण पराक्रम आहे.” काशीमध्ये हा अनोखा उपक्रम झाला याचा विशेष उल्लेख पीएम मोदींनी केला आहे.

देवव्रत रेखे कोण आहे?

मूळ गाव : अहिल्यानगर

वडील : वेदब्रह्मश्री महेश चंद्रकांत रेखे

वैदिक शिक्षण : सांगवेद विद्यालय, वाराणसी

रोजची साधना : 4 तास दंडक्रमाचा अभ्यास

मित्र आणि गुरूजनांच्या मते देवव्रतची स्मरणशक्ती, एकाग्रता आणि शिस्त विलक्षण आहे.

दंडक्रम पारायण म्हणजे काय?

दंडक्रम हा वैदिक पाठाचा सर्वात अवघड प्रकार मानला जातो.

मंत्र उलट-सुलट दोन्ही प्रकारे म्हणावे लागतात

स्वर, लय, उच्चार यांची अत्यंत बारकाईने जुळवाजुळव करावी लागते

पूर्ण पारायणात एक कोटीपेक्षा जास्त शब्दांचा उच्चार करावा लागतो

यासाठी स्मरणशक्ती, शारीरिक-मानसिक नियंत्रण आवश्यक आहे

विद्वानांच्या मते, वेदपठणाच्या एकूण 8 पद्धतींपैकी हा सर्वात कठीण प्रकार आहे.

इतिहासात फक्त दोन वेळा हा पराक्रम झाला आहे

पहिल्यांदा – 200 वर्षांपूर्वी नाशिकमध्ये, वेदमूर्ती नारायण शास्त्री देव यांनी

दुसऱ्यांदा – आता काशीमध्ये, देवव्रत रेखे यांनी (2 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2025)

त्यांना ₹1,01,116 देऊन सन्मानित करण्यात आले.

दंडक्रमला ‘कठीण परीक्षा’ का म्हणतात?

दीर्घ साधना आवश्यक

मंत्र पाठात एकही चुक चालत नाही

उलट-सरळ पाठांतर

श्वसन, स्वर आणि स्मरणशक्तीचा ताळमेळ

रोजच्या साधनेत शिस्त

यामुळेच दंडक्रमाला वैदिक परंपरेचा ‘मुकुटमणी’ असेही संबोधले जाते.

माजी आमदार अमरसिंह पंडितांच्या हत्येचा कट;पंडितांचे पीए अमृत डावकरांच्या आरोपाने खळबळ

0

बीड — राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हत्येचा कट होता. आपण उभे असताना अचानक येत टोळक्याने आपल्याला गंभीर मारहाण केली. आपलाही खून झाला असता मात्र चालक मध्ये आल्याने आपण बचावलो असल्याचा आरोप अमरसिंह पंडित यांचे स्वीय सहाय्यक अमृत डावकर यांनी केल्याने खळबळ माजली आहे.

गेवराईत नगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान मंगळवारी पवार व पंडित गटांत वाद अचानक उफाळला.यानंतर एका टोळक्याने पंडितांच्या कृष्णाई बंगल्यावर चालून येत या ठिकाणी असलेल्या अमृत डावकर यांना बेल्ट, लाथा आणि दांडक्याने मारहाण केली. यामध्ये डावकर यांच्या डाव्या डोळ्याला इजा झाली असून त्यांच्या हातावर आणि पाठीवर मारहाणीच्या जखमांचे व्रण आहेत. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात सध्या उपचार सुरु आहेत.आपल्याला मारहाण करणारे माजी आमदारांचे भाऊ इतर पाच सहा जणांसह पोचले. आलेले सर्वजण अमरसिंह पंडित यांच्या खुनाचा कट रचूनच आले होते. माजी आमदारांचे बंधू खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगून आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबतचे लोकही गुंड प्रवृत्तीचे होते.त्यांनी आपले वाहन बाहेर उभा असलेल्या वाहनावर आदळले. हा आवाज ऐकून मी कार्यालया बाहेर आल्यानंतर अमरसिंह पंडित यांना संपवून टाकायचं असे घोळक्यातील लोक म्हणत होते. अमरसिंह पंडित येथे नाहीत नेमकं काय घडलं असं शांततेत त्यांना विचारलं मात्र अमरसिंह पंडित इथे नाहीत म्हणून मला संपवून टाकू, असेही हल्लेखोर म्हणत होते असा आरोप अमृत डावकर यांनी केला.
तत्कालीन शिवसेना तालुका प्रमुखाच्या खुन प्रकरणात न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला व्यक्ती आणि शिक्षा भोगलेला व्यक्ती कारागृहाच्या बाहेर आला तरी त्याचे वर्तन कसे असेल? असे डावकर म्हणाले. आपल्याला बचाव करण्याची संधीही दिली नाही. आपलाही खून झाला असता मात्र, मला मारहाण होत असताना चालक मध्ये आल्याने आपण सुदैवाने बचावलो असल्याचं अमृत डावकर यांनी वृत्तवाहिन्यांना सांगितलं. या आरोपानंतर बीड जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

खगोल प्रेमींसाठी खास पर्वणी; चार डिसेंबरला दिसणार “सुपरमून”

0

मुंबई — आकाशात एक दुर्मिळ आणि मोहक खगोलीय घटना पाहायला मिळणार आहे. पहिल्यांदाच दत्तजयंती आणि मार्गशीर्ष पौर्णिमा या दिवशी म्हणजेच गुरुवार, ४ डिसेंबर रोजी ‘सुपरमून’ दिसणार आहे. इतकेच नाही तर चंद्र नेहमीपेक्षा जास्त मोठा, तेजस्वी रूपात आकाशात चमकणार आहे.पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी याबाबत माहिती दिली.

चंद्र पृथ्वीपासून सुमारे ३ लाख ८४ हजार किलोमीटर अंतरावर असतो. मात्र या मार्गशीर्ष पौर्णिमेला चंद्राची पृथ्वीपासूनची जवळीक कमी होऊन ते अंतर केवळ ३ लाख ५६ हजार ९६२ किलोमीटर राहणार आहे. चंद्र पृथ्वीच्या एवढा जवळ आल्यानं तो आकाशात नेहमीपेक्षा तब्बल १४ टक्के मोठा दिसणार आहे. एवढंच नाही तर या जवळकीचा परिणाम त्याच्या चमकदारपणावरही होणार असून चंद्राचा प्रकाश जवळपास ३० टक्क्यांनी वाढून तो जास्त तेजस्वी आणि मनमोहक दिसण्याची शक्यता आहे.या विलक्षण दृश्याचा आनंद संपूर्ण भारतभरातील नागरिकांना घेता येणार आहे. चंद्र सायंकाळी ५.१८ वाजता पूर्व दिशेला उगवेल आणि त्यानंतर रात्रभर आकाशात त्याचे दिमाखदार रूप पाहायला मिळणार आहे. पुढच्या दिवशी सकाळी ७.१४ वाजता पश्चिमेकडे मावळेपर्यंत त्याचे दर्शन घेता येईल. जवळपास १४ तासांहून अधिक काळ आकाशात हा चमकदार पूर्ण चंद्र झळाळत राहणार आहे.

असा तेजस्वी आणि मोठा चंद्र दिसण्याचा हा योग दुर्मिळ असतो. पुढील सुपरमून भारतातून २४ डिसेंबर २०२६ रोजी पाहायला मिळेल, असेही सोमण यांनी सांगितले. त्यामुळे खगोलप्रेमींसाठी आणि आकाशनिरिक्षणाची आवड असणाऱ्यांसाठी उद्याची रात्र अतिशय खास पर्वणी ठरणार आहे.

कर्म दरिद्री सरकारचा कारनामा; अतिवृष्टी मदतीसाठी प्रस्तावच केंद्राला पाठवला नाही — कृषिमंत्री

0

नवी दिल्ली — मराठवाडा आणि विदर्भात सोयाबीन, मका, द्राक्ष, कांदा, ऊस यासारख्या शेतपिकांचं मोठं नुकसान झालं होतं. तसेच अनेक गावं पाण्याखाली गेली होती.केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी संसदेत लेखी उत्तर देत यासंदर्भात माहिती दिली आहे.
अतिवृष्टीनंतर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविलेला नाही, असं त्यांनी लोकसभेत दिलेल्या उत्तरात म्हटलं आहे. याशिवाय केंद्र सरकारला अतिवृष्टीग्रस्त क्षेत्राची माहिती देण्यातही राज्य सरकारची गंभीर चूक झाल्याचं दिसून येत आहे.

शिवराजसिंग चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकारने केंद्राला केवळ एक लाख 10 हजार 309 हेक्टर शेती नष्ट झाल्याचे सांगितलं आहे. मात्र, राज्याच्या कृषीमंत्र्यांनी सांगितलेला आकडा 14 लाख हेक्टर आहे. म्हणजे राज्यात 14 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं असताना राज्य सरकारने केवळ 10 हजार 309 हेक्टर शेती नष्ट झाल्याची माहिती दिल्याचं स्पष्ट होतं आहे. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

दरम्यान, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. लोकसभेत जी प्रश्न उत्तरं येतात ती 35 दिवस आधी आलेली असताना. मदतीसाठीचा आपला जो अहवाल आहे, तो केंद्र सरकारला पाठवण्यात आला आहे. त्यांची टीमदेखील राज्यात येऊन गेली आहे. हा अहवाल आता अंतिम टप्प्यात आहे. याशिवाय पायायभूत सुविधांचं जे नुकसान झालं आहे. त्याची जी मदत केंद्र सरकारकडून घ्यायची आहे. त्यासाठी केंद्राची टीम अद्याप आलेली नाही. पुढच्या आठवड्यात ती येण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याचाही अहवाल पाठवला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी संसदेत लेखी उत्तर देत यासंदर्भात माहिती दिली आहे. अतिवृष्टीनंतर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविलेला नाही, असं त्यांनी लोकसभेत दिलेल्या उत्तरात म्हटलं आहे. याशिवाय केंद्र सरकारला अतिवृष्टीग्रस्त क्षेत्राची माहिती देण्यातही राज्य सरकारची गंभीर चूक झाल्याचं दिसून येत आहे.

प्लॉटच्या वादातून सख्ख्या भावाला संपवलं

0

बीड — वडिलांच्या नावे असलेला प्लॉट मला दे, असे म्हणत मोठ्या भावाने आपल्या सख्ख्या लहान भावाच्या डोक्यात काठी मारली. हा प्रकार शनिवारी रात्री १०  सुमारास शहरातील इमामपूर रोडला घडला. सकाळी उठल्यावर जखमीला रक्ताच्या उलट्या झाल्या आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. मोठ्या भावाला विचारल्यावर आपण काही केलेच नाही, असा आव त्याने आणला. या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत पेठ बीड पोलिस ठाण्यात नोंद नव्हती, परंतु मोठ्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

सविस्तर माहिती अशी कि, सचिन शहाजी फरताडे (वय ३५) असे मयताचे नाव आहे. तर शशिकांत फरताडे (वय ४४) असे आरोपीचे नाव आहे. शहाजी फरताडे यांना चार मुले आहेत. ते आचारी असून बीड शहरातील इमामपूर रोडला वास्तव्यास आहेत. शशिकांत हा दुसरा, तर सचिन सर्वात लहान मुलगा होता. तो अविवाहित होता. शनिवारी रात्री १० च्या सुमारास शशिकांत हा गांजा व दारूची नशा करून घरी आला. कोणालाही काही न बोलता त्याने आई दत्ताबाई यांचा गळा धरत हातावर काठी मारली. मोठा भाऊ अशोक सोडविण्यासाठी गेल्यावर त्यांच्या डोक्यात कुऱ्हाड मारली. वडील शहाजी मदतीला धावले, तर त्यांच्याही मनगटावर काठीने मारहाण केली. एवढ्यात सचिन तेथे आला. शशिकांतने नशेत त्याच्यावरही हल्ला चढवला. एक काठी त्याच्या डोक्यात बसली. यात तो जखमी झाला होता. रविवारी सकाळी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. पेठबीड पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात आणला. शवविच्छेदन करून तो नातेवाइकांच्या ताब्यात दिला. उशिरापर्यंत ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

हेमंत क्षीरसागर यांचा संदीप क्षीरसागर यांना पाठिंबा

0

बीड — आमदार संदीप क्षीरसागर यांचे भाऊ हेमंत क्षीरसागर यांनी मोठा निर्णय घेतल्यानं नगरपालिका निवडणुकीत नवे राजकीय समीकरण तयार झालं आहे. निवडणुकीच्या आदल्या दिवशी म्हणजे आज हेमंत क्षीरसागर यांनी त्यांचे भाऊ संदीप क्षीरसागर यांना पाठिंबा दिला आहे.

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी पुतणे योगेश क्षीरसागर यांना नगरपालिका निवडणुकीत पाठिंबा दिल्यानंतर निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे आज आमदार संदीप क्षीरसागर यांचे भाऊ हेमंत क्षीरसागर यांनी संदीप क्षीरसागरांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका एबीपी माझाशी बोलताना जाहीर केली.

मागील बीड नगरपालिका निवडणुकीत हेमंत क्षीरसागर यांनी महत्त्वाची भूमिका बजावून उपनगराध्यक्ष पद मिळवले होते. मात्र, काका जयदत्त क्षीरसागर यांच्या भूमिकेनंतर शेवटच्या दिवशी त्यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांनी निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी उभे केलेल्या उमेदवार स्मिता वाघमारे यांना पाठिंबा देऊन नवे राजकीय समीकरण निर्माण केले आहे.

हेमंत क्षीरसागर काय म्हणाले?

आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. यावर्षी बीडची नगरपालिका निवडणूक पाहिली तर सर्वसमावेशक चेहरा हा स्मिता वाघमारे म्हणून बीड शहरात समोर येत आहे. स्मिता वाघमारे यांचे आणि आमचे अनेक वर्षांपासूनचे कौटुंबिक संबंध आहेत. विष्णू वाघमारे आणि माझे गेल्या 15 वर्षांपासून वैयक्तिक संबंध आहेत. आजचा शेवटचा दिवस आहे. सर्व मित्र परिवार, प्रत्येक मित्र परिवारातील सहकारी आपण काय करायचं असं म्हणत होते. विष्णू वाघमारे 25 वर्षांपासून बीड शहरात काम करत आहेत. सर्व सामान्यांच्या मुलभूत गरजांसाठी ते कामी येऊ शकतात, त्यामुळं त्यांना मदत करायचं ठरवलं आहे. आम्ही आता स्मिता वाघमारे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीत अनेक पक्ष, अनेक उमेदवार रिंगणात आहेत, अशावेळी मतदार काम करणारे चेहरा पाहून मतदान करतील, असं हेमंत क्षीरसागर म्हणाले.

गेवराई शहराच्या सर्वांगीण विकासासाठी घड्याळाला मतदान करा – अमरसिंह पंडित

0

गेवराई — गेवराई नगर परिषदेची निवडणुक आपण विकासाच्या मुद्यावर लढवत आहोत. नगर पालिकेची सत्ता आम्हाला स्वतःचा विकास नाही तर शहराचा कायापालट करण्यासाठी पाहिजे आहे. विकास कामांचा आराखडा आमच्याकडे तयार आहे, 35 कोटी रुपयांची विकास कामे मंजुरही झाली आहेत, त्यापैकी दहा कोटी रुपयांची विकास कामे पूर्ण देखील झालेली आहेत. उर्वरित विकास कामे गतीने करण्यासाठी आणि गेवराई शहराची नवी ओळख निर्माण करून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसह सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांनी केले. गेवराई शहरात विविध ठिकाणी कॉर्नर बैठका, प्रचार रॅली, मतदारांच्या गाठीभेटी आणि संवाद साधताना ते बोलत होते.

गेवराई नगर परिषद निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, आ. विजयसिंह पंडित यांनी गेवराई शहर पिंजून काढले. यावेळी अमरसिंह पंडित यांनी विविध प्रभागात मतदारांच्या गाठीभेटी घेऊन विकास कामांच्या मुद्यावर घड्याळ चिन्हाची निवड करून गेवराई नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आणण्याचे आवाहन कले. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. विकासाचा मुद्या सोडून विरोधक मतदारांची दिशाभूल करत आहेत, मतदारांनी मात्र धमक्या, अफवा आणि भुलथापांना बळी न पडता निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन केले.

गेवराई नगर परिषद निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शितलताई महेश दाभाडे यांच्यासह प्रभाग 1 मधील सौ. गंगासागर विठ्ठल पवार व भास्कर भिकाजी काकडे, प्रभाग 2 चे विश्वजित प्रल्हाद शिंदे व सौ. संध्या राधेशाम येवले, प्रभाग 3 चे विलास दौलत गुंजाळ व श्रीमती नजमा बेगम निजाम शेख, प्रभाग 4 चे सौ. संगीता दादासाहेब घोडके व शाहरूख खाँ पठाण, प्रभाग 5 चे अशोक छगनराव गायकवाड व सौ.अंजुश्री महेश मोटे, प्रभाग 6 चे सौ. वैशाली किशोर कांडेकर व श्रीमती जाकेरा बेगम इस्माईल शरीफ, प्रभाग 7 चे सौ. पुजा रजनीकांत सुतार व मनोज प्रभाकर धापसे, प्रभाग 8 चे सौ. अंजु संतोष सुतार व विनोद उर्फ तुळशीराम निकम, प्रभाग 9 चे सौ.मंगल आत्माराम हजारे व श्रीकृष्ण विश्वनाथ मुळे, प्रभाग 10 चे सौ. रेणुका शिवलिंग संभाहारे व शेख खाजा कटूमियाँ या सर्व उमेदवारांच्या नावासमोरचे घड्याळाचे चिन्ह दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन माजी आ. अमरसिंह पंडित यांनी केले आहे.

शेत तलावात बुडून सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू

0

आष्टी — खेळत खेळत शेत तलावाजवळ गेलेल्या सख्ख्या बहीण-भावाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना  टाकळसिंग येथे शनिवारी सकाळी सव्वाआठ वाजता घडली. श्रावण रोहिदास चव्हाण (वय ८) व श्रावणी रोहिदास चव्हाण (वय १०) (मूळ रा.कुसवडगाव, ता. जामखेड, जि. नगर) अशी मयत भावंडांची नावे आहेत.

जामखेड तालुक्यातील कुसवडगाव येथील मजूर रोहिदास चव्हाण (वय ३५) हे सध्या मजुरी करण्यासाठी आष्टी तालुक्यातील टाकळसिंग येथे कुटुंबासह आलेले असून, याच ठिकाणी राहात आहेत. त्यांचा मुलगा श्रावण रोहिदास चव्हाण व मुलगी श्रावणी रोहिदास चव्हाण हे दोघे बहीण-भाऊ २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८:१५ वाजता खेळत खेळत शेतकरी शिवाजी दौंडे यांच्या शेतात गेले. यावेळी शेत तलावात पाय घसरून पडल्याने दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक हिंगे हे करत आहेत.