Home Blog Page 129

आ. संदीप क्षीरसागरांनी महावितरणचा मुद्दा विधानभवनात गाजवला;हायटेक कंपनीच्या चौकशीची केली मागणी

0

प्रस्ताव मंजूर होत नाही अन् झाले तर कामे लवकर होत नाहीत; हायटेक कंपनीच्या चौकशीची केली मागणी

मुंबई — बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मतदारसंघातील वीज, पाणी, रस्ते, स्वच्छता यासह नागरीकांच्या दैनंदिन अडचणींवर लक्ष केंद्रित केले आहे. अनेकवेळा महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन ही काहीच फरक पडत नसल्याने, सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात प्रश्न उत्तर सत्रात महावितरण कंपनीच्या गलथान कारमाराची चिरफाड केली.
               बीड शहर, बीड ग्रामीण व शिरूर कासार तालुक्यात महावितरणचा गलथान कारभार सुरू आहे. या विरोधात आज आ. संदीप क्षीरसागर यांनी पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करीत महावितरण आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्या मिलिभगतवर बोट ठेवत चिरफाड केली असून, आधीच प्रस्ताव मंजूर होत नाही आणि झाले तरी काम लवकर पूर्ण होत नाही. तसेच मागील दोन वर्षांपासून आरमोड केबल चे काम पूर्ण न केलेल्या हायटेक कंपनीची चौकशी करावी अशी मागणी केली. आ.क्षीरसागर म्हणाले की, महावितरणचे कोणतेही काम असले की, प्रथम आरडीएसएस योजनेचे नाव पुढे केले जाते. या योजनेतून एखादे काम करण्यासाठी प्रस्ताव दाखल केला तरी त्यास लवकर मंजुरी मिळत नाही. मंजुरी मिळाली तर ते काम लवकर होत नाही. माझ्या शहरात १५ सप्टेंबर २०२३ पासून मंजूर असलेले आरमोड के बल टाकण्याचे काम सुरु आहे. दोन वर्ष झाली हे कामच पूर्ण होत नाही. हे काम हायटेक कंपनीकडून करण्यात येत आहे. हा गैरप्रकार महावितरण आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुरू आहे. यासोबतच बीड तालुक्यातील पाली येथे ३३/११ के.व्ही. उपकेंद्र मंजूर आहे. परंतु याचे काम सुरू नाही. तसेच ११ के.व्ही. लाईन बदलणे, तसेच जीर्ण तारा बदलणे, पोल शिफ्टिंग अशी कामे कधी होणार आहेत? आणि दोन वर्षांपासून केबल टाकण्याचे काम संथगतीने करणाऱ्या हायटेक कंपनीची चौकशी करणार का? असे प्रश्न आ. क्षीरसागर यांनी सभागृहात उपस्थित केले.

नराधम शिक्षक विजय पवार वर बाललैंगिक अत्याचारासह ॲट्रॉसिटी चा दुसरा गुन्हा दाखल

0

बीड — उमाकिरण लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी विजय पवार याच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट तसेच बाललैंगिक अत्याचाराचा आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.
खाजगी कोचिंग क्लासेस मध्ये झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी पालक व विद्यार्थ्यांनी पुढे येऊन गुन्हा नोंद करावा असे आवाहन केले होते. अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी शिक्षक विजय पवार व प्रशांत खटोकर या दोघांना न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी शनिवारी भेट घेत पीडितेची व पालकांशी चर्चा केली. 2023 मध्ये विजय पवार विरोधात जिल्हा परिषदेचे सीईओ यांच्याकडे बाललैंगिक अत्याचाराची तक्रार केली होती. मात्र या प्रकरणात काहीच कारवाई झाली नव्हती. या प्रकरणात चौकशी करून गुन्हा दाखल करण्याच्या सूचना चाकणकर यांनी दिल्या होत्या. दरम्यान विजय पवार विरोधात बाललैंगिक अत्याचार (पाॅक्सो अॅक्ट) तसेच ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन-तीन दिवसांपूर्वीच पवारच्या संस्थेत शिक्षण घेत असलेल्या मुलीच्या पालकांनी पुढे येत पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.

सर्वोच्च न्यायालयातील नोकऱ्यांमध्ये आता ओबीसींनाही आरक्षण लागू

0

नवी दिल्ली — सर्वोच्च न्यायालयातील नोकऱ्यांमध्ये केवळ एससी-एसटीच नाही तर ओबीसी-दिव्यांग जनांनाही आरक्षण मिळणार आहे.दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने प्रथमच कर्मचारी नियुक्त्यांमध्ये इतर मागासवर्गीय ( ओबीसी ) प्रवर्गासाठी आरक्षण लागू केले आहे.
त्याच प्रमाणे शारीरिकदृष्ट्या अपंग, माजी सैनिक आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या आश्रितांसाठी देखील आरक्षण देण्यात आले. याआधी सर्वोच्च न्यायालयात असे कोणतेही आरक्षण नव्हते.
दरम्यान, न्यायालयात कर्मचारी नियुक्त्यांमध्येअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती(एससी/एसटी)साठी आरक्षण लागू करण्याचा अलीकडेच घेण्यात आला होता. त्यानंतर आता ओबीसी आरक्षणदेखील लागू करण्यात आले आहे. तब्बल ६४ वर्षांनंतर यासंदर्भात निर्णय घेण्यात आला असून आता सर्वोच्च न्यायालय कर्मचाऱ्यांच्या भरतीमध्ये ओबीसी, एससी, एसटी, दिव्यांगजन, माजी सैनिक व स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.महत्त्वाचे म्हणजे, सरन्यायाधीशांनी एक खूप मोठा व महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता सर्वोच्च न्यायालय त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या भरतीत एससी/एसटी व्यतिरिक्त ओबीसी, दिव्यांग जन, माजी सैनिक व स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांना आरक्षणाचा लाभ देणार आहे. सर्वोच्च न्यायालयातही समाजातील सर्व घटकातील लोकांना नोकरीत समान संधी मिळावी यासाठी हा बदल करण्यात आला आहे. सामाजिक न्यायाच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे.

नवीन निर्णय काय आहे?

हा निर्णय मुख्य न्यायाधीश बीआर गवई यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी व सेवक(सेवेच्या अटी आणि आचारसंहिता) नियम, १९६१ च्या नियम ४अ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. राज्यघटनेच्याकलम १४६(२) अंतर्गत सर्वोच्च न्यायालयस्वतःचकर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी नियम ठरविते. आता या सर्व राखीव वर्गांना केंद्र सरकारने निश्चित केलेल्या आरक्षणानुसार लाभ मिळणार आहे.

सावकार डॉ. लक्ष्मण जाधव च्या त्रासाला कंटाळून कपडा व्यापाऱ्याची आत्महत्या

0

बीड — भाजप पदाधिकारी डॉ.लक्ष्मण जाधव व त्याची पत्नी यांच्या सावकारकीतून झालेल्या त्रासाला कंटाळून 42 वर्षीय कपडा व्यापाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.


राम दिलीप फटाले वय 42 वर्ष.रा काळा हनुमान ठाणा बीड असं आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्याचं नाव आहे. राम फटाले हे कपड्याचा व्यापार करत होते आठवडी बाजारात ते दुकान लावून कपडे विक्री करायचे. कपडा व्यवसायासाठी त्यांनी डॉ. लक्ष्मण जाधव या सावकाराकडून कर्ज घेतले होते. कर्जाची रक्कम व्याजासह देऊन देखील जाधव पती-पत्नीकडून मानसिक त्रास देत शिवीगाळ केली जात होती. सावकाराने फटाले यांच्याकडून चेक घेतला होता. पैसे परत देऊनही आणखी पैशाची मागणी करत चेक परत देण्यास इन्कार केला जात होता. याबरोबरच त्यांनी काही पतसंस्थांकडून देखील कर्ज घेतलेले होते. कोरोना नंतर कपडा विक्रीत घट झाली धंदा बसला खर्च वाढला. त्यामुळे व्याजही वाढत गेले जानेवारी महिन्यामध्ये सावकाराच्या रकमेची परतफेड देखील केली. शनिवारी रात्री फोनवरून सावकाराने शिवीगाळ केली. पहाटे पाच च्या सुमारास राम फटाले यांची पत्नी सुलभा झोपेतून उठली. तोपर्यंत राम यांनी पंख्याला दोरी बांधून लटकल्याचे दिसले. त्यांनी मृत्यूपूर्वी सावकार डॉ. लक्ष्मण जाधव व त्याची पत्नी यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची सात पानी चिठ्ठी लिहून ठेवली.डाॅ. लक्ष्मण जाधव हा भाजपच्या भटके विमुक्त आघाडीचा जिल्हाध्यक्ष आहे.
दरम्यान याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास चव्हाण करत आहे.

महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

0

मुंबई — महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र राहणार आहोत. महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न साकारण्यासाठी आम्ही एकत्र असणार आहोत.’, असं राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले.
राज्यात हिंदी भाषा सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत मराठी भाषा विजय दिवस साजरा केला. यानिमित्ताने २० वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर आले. ते काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अखेर राज ठाकरेंनी यावेळी भाषण करताना थेट सरकारवर जोरदार टीका केली.तसंच, ‘हिंदी भाषा बोलणारी राज्यच आर्थिकदृष्या मागास आहेत. ज्या राज्यांना आर्थिक विकास करता आला नाही आणि आम्ही त्यांची हिंदी भाषा शिकायची का? हिंदी भाषासाठी वाईट नाही वाटत. भाषा कोणतीही चांगलीच असते. एक भाषा उभी करायला खूप मेहनत असते. अशाच भाषा उभ्या राहत नाहीत. हा भाषेचा मुद्दा कुठून आला. या हिंद प्रांतावर सव्वाशे वर्षे मराठ्यांनी राज्य केले. इतक्या प्रदेशावर आम्ही राज्य केले तर आम्ही मराठी लादली का? मराठा साम्राज्य सगळीकडे पसरले होते तेव्हा आम्ही मराठी लादली का? महाराजांच्या काळात हिंदी भाषा नव्हती ती २०० वर्षापू्र्वी आली.’, असा इतिहास सांगत राज ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मुलं इंग्रजी शाळेत शिकले यावरून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. त्यावर आता राज ठाकरे यांनी उत्तर दिलं. ‘आम्ही मराठी माध्यमात शिकलो. आमची मुलं इंग्रजीत शिकले. तर आम्हाला विचारचात हे इंग्रजी मिडियम मध्ये शिकतात. बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे इंग्रजीबद्दल शिकले होते. त्या दोघांबदद्ल तुम्ही शंका घेऊ शकता का? लालकृष्ण आडवाणी क्रॉन्वेंट स्कूलमध्ये शिकले होते. त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का? दक्षिण भारतात बघा तमिळ, तेलगूच्या प्रश्नांवर सर्व एकत्र उभे राहतात. उद्या मी हिब्रू भाषेत शिकेल. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. तुमचा कडवटपणा तुम्ही कुठून शिक्षण घेतेले यामध्ये नसतो. बाळासाहेब ठाकरेंनी मराठीच्या अभिमानाबद्दल तडजोड नाही केली. म्हणे एक भाषा सर्वांना बांधून ठेवते. आजपर्यंत काय वाकडे झाले?’, असा सवाल राज ठाकरे यांनी सरकारला केला.
सरकार पुढे काय राजकारण करणार याबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ‘यांचं पुढचं राजकारण म्हणजे पुन्हा जातीत विभागायला सुरूवात करतील. पुन्हा जातीत तुम्हाला विभागतील. मराठी म्हणून तुम्हाला एकत्र येऊ देणार नाही.’ यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना असे देखील सांगितले की, ‘विनाकारण कुणाला मारायची गरज नाही. पण जास्त नाटकी केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे. पण चूक त्यांची पाहिजे. असं कोणतीही गोष्ट कराल त्याचे व्हिडीओ काढू नका. आपले आपल्यामध्येच त्यांना कळाले पाहिजे. मारणारा कधी सांगत नाही तर मार खाणारा सांगत असतो मला मारलं. याचा अर्थ उटसूट कुणाला मारायचे नाही.’

जि.प. तांदळवाडी घाट व तांदळेश्वर विद्यालयांमध्ये अवतरली पंढरी

0

चौसाळा — आषाढी एकादशीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांदळवाडी घाट व तांदळेश्वर विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गावातून दिंडी काढण्यात आली.

जिल्हा परिषद तांदळवाडी घाटच्या विद्यार्थ्यांनी साकारलेली विठ्ठल रुक्मिणीची भूमिका खास आकर्षण ठरली व प्रत्येक दारात या विठू रुखमायीची पूजा करण्यात आली,व ग्रामस्थांनी या दिंडीचे स्वागत आपल्या दारात सडा रांगोळी ने केले,पालखी मध्ये विठ्ठल रुखमाई ची मूर्ती, विद्यार्थ्यांची वारकऱ्यांची वेशभूषा यामुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

गावकऱ्यांनी महिला भगिनींनी मोठ्या उल्हासात दिंडीमध्ये सहभाग घेत फुगडी, गवळण,अभंग,भजन करत यामध्ये मंत्रमुग्ध झाले..दिंडीची सांगता विठ्ठल मंदिरात झाली.. दिंडी साठी विशेष सहकार्य शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री.प्रशांत खोसे यांचे लाभले, तसेच सर्व विद्यार्थ्यांना महाप्रसादाची व्यवस्था शिक्षण प्रेमी श्री.अनिल विक्रम खोसे ,श्री.समाधान भैरू खोसे,श्री.शहादेव लक्ष्मण खोसे, यांच्यातर्फे करण्यात आली.. याप्रसंगी श्री.गोरख जगताप,श्री.आनंद खोसे व प्रचंड संख्येने ग्रामस्थ व महिला भगिनीनी हिरीरीने सहभाग नोंदवला..
तांदळेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.श्यामजी डाके सर व जि.प.प्रा.शाळा,तांदळवाडी घाट शाळेचे मुख्याध्यापक श्री.लक्ष्मण क्षीरसागर सर यांनी सर्वांचे आभार मानले..

लैंगिक अत्याचार प्रकरणी विजय पवार व खटोकर ला न्यायालयीन कोठडी

0

बीड — कोचिंग क्लासेस मधील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी विजय पवार आणि प्रशांत खटोकर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.दोन्ही आरोपींना आज न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते.
लैंगिक छळ प्रकरणात या दोघांना यापूर्वी दोन दिवसांची आणि त्यानंतर पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. पोलिसांनी
आतापर्यंत याप्रकरणी पोलिसांनी 30 जणांचे जबाब नोंदवले असून पीडितेच्या मैत्रिणी, कुटुंबीय, क्लासमधील काही जणांचा समावेश आहे. पोलिसांनी खाटोकरची दुचाकी जप्त केली असून दोघांचे मोबाइल, टॅब, लॅपटॉपही जप्त केले आहेत. तर क्लासमध्ये 40 सीसीटीव्ही कॅमेरे असून त्यांचे डीव्हीआर जप्त केले आहेत. पोलिसांनी या घटनेतील लॅपटॉप, मोबाईल, सीसीटीव्ही फुटेज फॉरेन्सिक लॅबला तपासणीसाठी पाठवले आहे. तसेच 30 पेक्षा अधिक जणांचे जबाब देखील नोंदवले आहेत. आज प्रशांत खाटोकर व विजय पवार यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून, पुढील तपासासाठी पोलिसांकडून पुरावे संकलनाची प्रक्रिया सुरू आहे.

आ.संदीप क्षीरसागरांच्या पुढाकारातून मिळणार निराधारांना आधार

0

संजय गांधी, श्रावणबाळ योजनेचे नवीन ३७८ प्रस्ताव मंजूर

बीड — बीड ग्रामीण व शहरी भागातील ३७८ निराधार, दुर्बल‌ लोकांचे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजनेंतर्गत प्रस्ताव मंजूर झाले असून आ.संदीप क्षीरसागर यांच्या पुढाकारातून आणि प्रयत्नातून निराधारांना आधार मिळणार आहे.
पात्र वयोवृद्ध निराधार, अपंग, विधवा, परिक्तत्या, दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या समाजातील दुर्बल घटकांना शासनाकडून संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजनेंतर्गत आर्थिक सहाय्य केले जाते. बीड विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील नागरिकांच्या, या योजनांच्या प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करून निकषपात्र नागरिकांना लाभ देण्याचे निर्देश आ.संदीप क्षीरसागर यांनी प्रशासनाला दिले होते. त्यावर प्रशासनाकडून आलेल्या प्रस्तावावर कार्यवाही करत २९ मे २०२५ च्या बैठकीत संजय गांधी निराधार योजनेंतर्गत शहरी भागातील ४५ तर ग्रामीण भागातील ६२ नागरिकांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. यासोबतच श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजनेंतर्गत शहरी भागातील ४६ तर ग्रामीण भागातील २२५ नागरिकांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत‌. दरम्यान काही अर्ज त्रुटीत असून त्याच्या पुर्ततेसाठी तहसील कार्यालयात संपर्क करण्याचे आवाहनही आ.क्षीरसागर यांनी केले आहे.

माकडाची लाकडं, चुलीला साकडं; गोसावी म्हणतात गुन्हा नोंद नाही केला तर कोण करणार माझं वाकड?

0

चौसाळा — चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालावर दरोडे टाकायला सुरुवात केली असली तरी गुन्हा नोंद करून घेणं नेकनूरचे ठाणे प्रमुख चंद्रकांत गोसावींना जीवावर येऊ लागला आहे. सयाजी शिंदे यांचा धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चौसाळ्यात सात एकर डाळिंब बागेतील 22 टन फळ चोरून नेली. 22 ते 23 लाखाचा हा दरोडा पडून देखील चोरांना अभयदान देण्याचं काम केलं जात आहे.

( फळ चोरीला जाण्यापूर्वी अशी फळधारणा झालेली होती)

या प्रकरणात आठ दिवस उलटूनही अद्याप गुन्हा नोंद करून घेण्याची गोसावींना गरज वाटली नाही. मग्रुरी इतकी की एस पीं च्या आदेशालाही त्यांनी फाट्यावर मारत हम करे सो कायदा ही भूमिका घेतली आहे.

(चोरी झाल्यानंतर बोडखी झालेली झाड)
गेल्या दोन महिन्यांपासून चौसाळा बायपास वर किरकोळ वाटमारीच्या अनेक घटना घडल्या असल्या तरी या घटनांची दखल पोलिसांनी घेतली नाही. गुन्हा नोंद केला गेला तर नाहीच नाही उलट तक्रार द्यायला आलेल्या लोकांनाच भीती घालण्याचं काम केलं गेलं. “चोरांना मेसाई धार्जीन”अशी म्हण प्रचलित आहे. याचाच अपभ्रंश करून चोरांना “नेकनुर पोलीस धार्जीन” असं म्हटलं जाऊ लागला आहे. अवैध धंद्यांना आश्रय मिळालेलाच आहे. पण आता शेतकऱ्यांच्या शेतमालावर देखील दरोडा पडू लागला आहे. असं म्हणतात की माकडं लाकडं गोळा करून शेकोटी करतात. या शेकोटीला जाळ नसतो. पण ही लाकडं जळणाला जर वापरली तर ती लाकडं जळत नाहीत. न पेटलेल्या लाकडातली उष्णता शेकोटी भोवती बसलेली माकड शोषून घेतात. त्यामुळे “माकडांची लाकडं चुलीला साकडं“अशी म्हण देखील प्रचलित आहे. अशीच काहीशी स्थिती नेकनूरचे ठाणे प्रमुख चंद्रकांत गोसावींनी करून ठेवली आहे. कायद्यातली ऊर्जा ताकत त्यांनी शोषून घेतली. परिणामी जनतेला नेकनूर पोलिसांचं साकडे पडू लागला आहे. हे सांगण्याला कारणही तसंच आहे. चौसाळा बायपास वर सयाजी शिंदे यांची सात एकर डाळिंबाची बाग आहे. उन्हाळ्यात तळहाताच्या फोडाप्रमाणे बाग सांभाळला, टॅंकरने पाणी आणून झाड जोपासली. उन्हाळ्याची तीव्रता कमी व्हावी यासाठी क्रॉप कव्हर टाकण्यात आले. यावर्षी विक्रमी उत्पादन काढण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला. डाळिंबाचं पिक जोमान आलं. बागेतली फळ खरेदी करण्यासाठी व्यापारी चकरा मारू लागले. एवढ्यात चोरट्यांची नजर बागेवर पडली. रात्रीत बागेतली सगळी फळ चोरांनी तोडून नेली. 22 टनाहून अधिकचे डाळिंब फळ चोरून नेले. वीस ते पंचवीस लाखाचे शेतकऱ्याचे नुकसान झाले.
सकाळी ही बाब लक्षात येताच चौसाळा पोलीस चौकीला फिर्याद देण्यासाठी शिंदेंनी धाव घेतली. पोलिसांनी लेखी तक्रार स्वतःकडे ठेवून घेतली. ठाणे प्रमुख गोसावी रजेवर आहेत दोन दिवसानंतर गुन्हा नोंद करण्यात येईल असं सांगण्यात आलं. पण गुन्हा नोंद झालाच नाही. शिंदेंनी नेकनूरच्या चकरा देखील मारल्या. एक दोन टन माल चोरीला गेल्याची तक्रार द्या. एवढी मोठी चोरी झाल्याची तक्रार घेता येत नाही असं स्पष्ट गोसावींनी सांगितलं. तक्रार दाखल करून घेतली जात नाही म्हणून शेवटी सयाजी शिंदे या शेतकऱ्याने पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडे धाव घेतली. एसपी समोर त्यांनी कैफियत मांडली. एस पींनी याची दखल घेत तात्काळ गुन्हा नोंद करून घेण्यात यावा असा आदेश चंद्रकांत गोसावींना दिला. पण एसपींच्या आदेश मानतील ते गोसावी कसले? हम करे सो कायदा असं म्हणत एसपींच्या आदेशाला देखील त्यांनी सवयीप्रमाणे फाट्यावर मारलं. या प्रकरणात नऊ दिवसाचा कालावधी उलटून गेला असला तरी अद्याप गुन्हा नोंद झालाच नाही. चंद्रकांत गोसावींच्या चोरांना अभय देण्याच्या मानसिकतेमुळे त्यांच्या प्रामाणिकपणावरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. वाटमारी करणाऱ्या चोरांना गोसावी कुठपर्यंत अभयदान देणार? एसपींच्या आदेशाला असंच आणखी किती वेळेला फाट्यावर मारणार? माकडाची लाकडं कधी सुटणार जनते पुढचं साकडं? असं म्हणण्याची वेळ आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दखल न घेतल्यामुळे सयाजी शिंदे हे शेतकरी पोलीस आयुक्त, गृहमंत्री यांच्याकडे आता तक्रार करणार आहेत. एस पी नवनीत कावत यांच्या कारकिर्दीलाच काळीमा फासण्याचा काम गोसावी सारखी मंडळी करू लागली आहे ‌.शेतकऱ्यांना पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या कारकिर्दीत तरी न्याय मिळणार का? असा प्रश्न पडू लागला आहे.

खाजगी क्लासेस लैंगिक छळ प्रकरणातील पवारचा आणखी एक कारनामा समोर

0

बीड — उमाकिरण शैक्षणिक संकुलातील विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणातील आरोपी प्रशांत खाटोकर आणि विजय पवार या दोघांची पोलीस कोठडी वाढवण्यात आल्यानंतर विजय पवार चा आणखी एक कारनामा समोर आला.
. विजय पवार हा माझ्या मुलीला केबिनमध्ये बोलावून बॅड टच करायचा असा आरोप कथित पीडित मुलीच्या पालकांनी केला आहे. विजय पवार संचालक असलेल्या एका शाळेत दोन वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने एका विद्यार्थिनीला शाळेमध्ये झालेल्या वादाच्या कारणातून त्रास दिला गेल्याची तक्रार संबंधित मुलीच्या पालकांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. माझ्या मुलीलाही शाळेबाहेर उभा करायचे. तर कधी केबिनमध्ये बोलावून बॅड टच करायचे असा आरोप या पालकांनी केला आहे. या सर्व प्रकरणात कारवाई व्हावी यासाठी संबंधित पालकाने गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा केला. परंतु अद्याप कारवाई झालेली नाही. आता पोलीस अधीक्षकांनी आवाहन करताच या पालकांनी समोर येत ही तक्रार केली आहे. आता या तक्रारीवर पोलीस अधीक्षकांकडून तपास केला जाणार आहे.