Home Blog Page 128

कापूस, सोयाबीनचं अनुदान सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार !

0

मुंबई — राज्यातील शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीन अनुदान देणार असल्याची घोषणा केली असली तरी सरकार कडून टोलवा टोलवीचा खेळ सुरू आहे. मात्र ही प्रतीक्षा आता संपणार आहे. सोमवारी दि. 30 सप्टेंबर रोजी कापूस आणि सोयाबीनचे अनुदान दिले जाणार असल्याची ग्वाही कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

तसेच मुंडे यांनी, सोमवारीच कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना १० हजार दिले जातील, असेही म्हटले आहे. तर याचा फायदा सुमारे ६५ लाख कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना होईल असा दावाही मुंडे यांनी केला आहे.

राज्य सरकाराच्या कृषी विभागाकडून रविवारी २०२०, २०२१ आणि २०२२ सालातील कृषी पुरस्कारांचे वाटप करण्यात आले. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी आणि अधिकाऱ्यांचा सत्कार व पुरस्कार देऊन सी.पी. राधाकृष्णन यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दादा भुसे, मंत्री दीपक केसरकरांसह कृषी विभागाचे अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते. यावेळी मुंडे यांनी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानावरून भाष्य केले.यावेळी मुंडे यांनी राज्यातील सुमारे ९६ लाख कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपैकी ६८ लाख शेतकऱ्यांनी आधार लिंक केले आहे. या ६८ लाख शेतकऱ्यांनाच अनुदान मंजूर केले जाईल. प्रतिहेक्टरी ५ हजार २ हेक्टरच्या मर्यादेत जास्तीत जास्त १० हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात येईल. राज्यातील ६५ लाख शेतकऱ्यांमध्ये २ हजार ५०० कोटींचे वितरण सोमवारी केले जाणार असल्याचेही मुंडे यांनी सांगितले आहे.यावेळी मुंडे म्हणाले, शेतकर्‍यांच्या आनंदात आपला आनंद असून आपण मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानतो. कारण त्यांनी कमी वयात आपल्याला कृषिमंत्र्यालयाची जबाबदारी दिली. यामुळेच आज शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आखता आल्या. तर शेतकऱ्यांच्या कष्टामुळेच आपले राज्य देशात चांगले कृषि राज्य बनल्याची प्रतिक्रिया मुंडे यांनी व्यक्त केली.

अर्थमंत्री निर्मला सीतारामनवर गुन्हा नोंदवण्याचे लोक अदालतीचे निर्देश

0

बंगळुरू — इलेक्ट्रॉल बॉण्डच्या माध्यमातून खंडणी उकळल्याच्या तक्रारी वरून कर्नाटक च्या बंगळुरू येथील विशेष लोकअदालतीने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि इतर अनेक नेत्यांवर एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.

जनाधिकार संघर्ष परिषदेचे (जेएसपी) सह-अध्यक्ष आदर्श अय्यर यांनी बेंगळुरू येथील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयात तक्रार दाखल केली होती आणि केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश मागितले होते. याप्रकरणी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र, भाजप नेते नलिन कुमार कटील, केंद्रीय आणि राज्य भाजप कार्यालये आणि ई.डी. विभागाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीत म्हटले आहे की एप्रिल 2019 ते ऑगस्ट 2022 पर्यंत, उद्योजक अनिल अग्रवाल यांच्या फर्मकडून सुमारे 230 कोटी रुपये आणि अरबिंदो फार्मसीकडून 49 कोटी रुपये निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून वसूल करण्यातआले.इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून धमकी देऊन खंडणी वसूल करण्यात आल्याची तक्रार त्यांनी केली होती.या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने बेंगळुरूमधील टिळक नगर पोलिस स्टेशनला इलेक्टोरल बाँडद्वारे खंडणीच्या प्रकरणात एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. एसीएमएम कोर्टाने आदेश काढून तक्रारीची प्रत आणि रेकॉर्ड पोलिस स्टेशनला पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. प्रलंबित एफआयआरमुळे सुनावणी 10 तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

लाडकी बहिण योजना महिलांच्या हितासाठी नाही तर नेत्यांच्या स्वार्थासाठी –राज ठाकरे

0

अमरावती — लाडकी बहीण सारख्या योजना जनतेच्या, महिलांच्या हितासाठी राबवल्या जात नसून राज्यकर्त्यां च्या स्वार्थासाठी राबवल्या जात असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.

लाडकी बहिण योजनेवरून सरकारवर टीका करणाऱ्या विरोधी नेत्यांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचीही भर पडली आहे. अशा योजना म्हणजे राज्याला खड्ड्यात घालण्याचे उद्योग आहेत.
त्यामुळे जानेवारी महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठीही तिजोरी पैसे शिल्लक राहणार नाहीत, अशा शब्दात ठाकरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर कठोर टीका केली.
समाजातील कोणताही घटक काहीही फुकट मागत नाही. महिलांना अशा प्रकारे पैसे वाटण्यापेक्षा राज्यात उद्योगधंदे आणा. उत्पन्नाची साधने वाढवा, असा सल्लाही ठाकरे यांनी सरकारला दिला आहे. लाडकी बहीण सारख्या योजना जनतेच्या, महिलांच्या हितासाठी राबवल्या जात नसून राज्यकर्त्यां च्या स्वार्थासाठी राबवल्या जात असल्याचा आरोपही ठाकरे यांनी केला.
लोकसभा निवडणुकीत भाजपला पर्यायाने महायुतीला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी पूर्ण ताकतीने मैदानात उतरण्याचे निश्चित केले आहे. त्या दृष्टीने दोन दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर आलेल्या ठाकरे यांनी येथे पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर सडकून टीका केली.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी राज ठाकरे यांच्या टीकेवर पलटवार केला आहे. सरकारच्या कामामुळे ज्यांच्या पोटात दुखते असेच नेते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसारख्या महत्वकांक्षी योजनांवर टीका करत असतात, असे पटेल म्हणाले.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितली संभाव्य वेळ!

0

मुंबई — महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकी च्या तारखांबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकी च्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आलेले मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी संभाव्य वेळ दिली आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला संपत आहे. त्यामुळे त्यापूर्वी निवडणुका पूर्ण कराव्या लागणार आहेत. निवडणुकीत शहरी मतदारांच्या उदासीनतेबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली.

मुंबईत निवडणूक तयारीचा आढावा घेताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, महाराष्ट्रात 288 मतदारसंघ आहेत. यामध्ये एसटी मतदारसंघ 25 आणि एसटी मतदारसंघ 29 यांचा समावेश आहे. राज्यात एकूण 9.59 कोटी मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार 4.59 कोटी तर महिला मतदार 6.64 कोटी आहेत. 18-19 वर्षे वयोगटातील प्रथमच मतदारांची संख्या 19.48 लाख आहे. त्यांच्यामध्ये प्रचंड उत्साह आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले. ते म्हणाले की, मुंबई आणि त्याच्या आसपासच्या कुलाबा-कल्याणसारख्या भागात लोकसभा निवडणुकीत सर्वात कमी मतदान झाले आहे. यासाठी रोजंदारीवर काम करणारे आणि असंघटित क्षेत्रातील इतर लोकांनी मतदानाच्या दिवशी पगारी रजा मिळेल, असे प्रशासनाला सांगावे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवारी आणि मतदान व्हावे यासाठी आमचा प्रयत्न असेल, असे ते म्हणाले. सध्याच्या पोस्टिंगमध्ये तीन वर्षांहून अधिक काळ सेवा केलेल्या अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी आम्ही महाराष्ट्र सरकारला केली आहे. त्याचा अनुपालन अहवाल मागविण्यात आला आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे की नाही हे जाणून घेणे हा मतदारांचा अधिकार आहे. अशा उमेदवारांना उभे करण्याचे कारण राजकीय पक्षांनीही जनतेला सांगावे, असेही ते म्हणाले. महाराष्ट्रातील निवडणूक प्रचारादरम्यान वापरण्यात आलेल्या सर्व हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात येणार असल्याचेही सांगितले.

कापूस व सोयाबीन अनुदानासाठी ई-पीक पाहणी अट रद्द

0

मुंबई — राज्य शासनाने सन 2023 च्या सोयाबीन कापूस अनुदानासाठी ई पीक पाहणी नोंदीची अट रद्द केली आहे त्या संबंधित शासननिर्णय दि. 27 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

सन 2023 च्या सोयाबीन व कापूस अनुदानासाठीराज्यातील शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीमध्ये नोंद नसल्यामुळे अपात्र ठरविण्यात आले होते. मात्र ई-पीक पाहणीची अट रद्द करून संबंधित तलाठ्यांकडे 7/12 उताऱ्यावर सोयाबीन व कापूस या पिकाची नोंद असलेल्या शेतकऱ्यांना ही अर्थसहाय्य देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
सन 2023 च्या खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन या पिकाची लागवड केली आहे व ई- पीक पाहणीमध्ये पोर्टलवर नोंद नाही; परंतु संबंधित तलाठ्यांकडे 7/12 उताऱ्यावर या पिकाच्या लागवडीची नोंद असलेल्या शेतकऱ्यांना सोयाबीन व कापूस अनुदानासाठी पात्र ठरविण्यात आले आहे.
राज्यातील सन 2023 च्या खरीप हंगामातील ई पीक पोर्टलवर नोंद असलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5000 रु. 2 हेक्टरच्या मर्यादेत इतके अर्थसहाय्य मंजूर करण्याचा शासन निर्णय 29 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आला होता. मात्र 27 सप्टेंबर 2024 च्या शासननिर्णयानुसार पिकाच्या ई-पीक पाहणी नोंदीची अट रद्द करण्यात आली आहे.

एसडीएम कार्यालयातील कर्मचारी लाच घेताना पकडला

0

बीड — येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात कार्यरत असणारा निलेश धर्मादास मेश्राम याला ७ हजार रूपयांची लाच घेतांना आज दि. २७ शुक्रवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील कौटूंबिक

न्यायालयातील जुनी इमारत उपविभागीय कार्यालय रूम नं १०९ या ठिकाणी ७ हजार रूपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले.

या संदर्भात माहिती अशी की, गेवराई हद्दीतील राक्षसभूवन रोड व जयहिंद नावाचे हॉटेल असून सदर हॉटेलवर दारूबंदी विभागाकडून व गेवराई पोलिस ठाण्याकडून ६५ ई प्रमाणे २ गुन्हे दाखल होते. त्या गुन्ह्यात त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई – करण्यासाठी त्यांना उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय बीड येथून कलम ९३ ब प्रमाणे त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई – करण्यासाठील नोटीस बजावण्यात आली होती. त्या नोटीसच्या अनुषंगाने बंदपत्र लिहून देण्यासाठी व सदर प्रकरण बंद – करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे याने स्वतःसाठी २ हजार रूपये व महिला उपविभागीय अधिकारी यांच्यासाठी ५ हजार रूपये अशी एकूण ७ हजार रूपये लाचेची मागणी पंचासक्षम करून सदर

लाच पंच साक्षीदारासमक्ष स्विकारली आहे. या संदर्भात मेश्राम यांना ताब्यात घेतले असून बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई संभाजीनगर येथील लाचलुचपत पोलिस निरीक्षक शिवाजीनगर हरिदास डोळे पोलिस निरीक्षक, वाल्मिक कोरे लाचलुचपत प्रतिबंधक संभाजीनगर पोलिस निरीक्षक यांनी संदिप आटोळे पोलिस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली मुकूंद आघाव अप्पर पोलिस अधीक्षक, सुरेश नाईकनावरे पोलिस उपअधीक्षक, पोलिस हवालदार साईनाथ तोडकर, पोह. राजेंद्र ननदिले, चालक सी.एन. बागुल छत्रपती संभाजीनगर यांनी कारवाई केली.

बजरंग सोनवणेंची खासदारकी धोक्यात ? खंडपीठाची नोटीस

0

छत्रपती संभाजीनगर — बीड चे खासदार बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका माजी नगरसेवक अमर नाईकवाडे, नारायण शिरसाट यांनी ॲड. शशिकांत ई शेकडे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर 27 सप्टेंबर रोजी न्यायमूर्ती ए.एस.वाघवसे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यात प्रतिवादी बजरंग सोनवणे यांना चार आठवड्यात कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश न्यायमूर्तींनी दिले.

अधिक माहिती अशी की, बीड लोकसभा मतदार संघातून निवडून आलेले उमेदवार बजरंग सोनवणे यांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार पंकजा गोपीनाथ मुंडे यांचा लोकसभेत 6553 मतांनी पराभव केला होता. बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल केलेली होती. प्रतिवादी बजरंग सोनवणे यांना निवडून आल्याचे जाहीर केलेला निर्णय रद्द करावा अशी मागणी याचिकेतून करण्यात आलेली आहे. दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की काही मतदान केंद्रावरील मतांवर आक्षेप घेण्यात आलेला आहे. तसेच पोलिंग बूथ केंद्रांची संख्या वाढवताना राजपत्रानुसार प्रसिद्ध करणे गरजेचे असताना सुद्धा निवडणुकीच्या ऐन तीन दिवस अगोदर पोलिंग बुथ केंद्र वाढवलेले असून त्यामुळे ४२६१ लोक मतदानापासून वंचित राहिलेले आहेत. ते बुथ कायद्याच्या दृष्टीने बेकायदेशीर आहेत तसेच सदरील पोलिंग बुथचे मतदान हे मतमोजणी करताना मोजता येणार नाही. ते मतदान हे अवैध असून त्याच्यावर आक्षेप घेण्यात आलेला आहे. माजलगाव शहरांमधील बूथ क्रमांक ६८ केंद्रावरील ईव्हीएम मशीनमधील घोळामुळे ७७४ मतदान हे मोजण्यात आलेले नाही. व वैध असणारे ११५६ पोस्टल मतदान हे बेकायदेशीरपणे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद केलेले आहेत. तसेच निवडणूक निर्णय घोषित करताना 909 मतांचा फरक आढळून येत आहे. हे सर्व सर्व मतदान निवडणुकीच्या निकालावर परिणामकारक ठरणारे आहे. तसेच प्रतिवादी बजरंग सोनवणे नामनिर्देशन फॉर्म भरताना शपथपत्रात खोटी माहिती पुरवलेली आहे. या आदी मुद्द्यावर खंडपीठाने याचिका दाखल करून घेतलेली आहे . व प्रतिवादींना चार आठवड्यात कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे. तर याचीकाकर्त्याच्या वतीने ॲड शशिकांत ई. शेकडे यांनी बाजू मांडली. त्यांना ॲड. पृथ्वीराज ए. ढाकणे, ॲड. बी. एस. बोडखे ,ॲड. विशाल थावरे, ॲड.आर.जी.नरवडे व एन.एस. राठोड यांनी सहकार्य केले. चौकट उत्पन्नाचे स्त्रोत फक्त शेती आणि दुग्ध व्यवसाय बजरंग सोनवणे यांनी आपल्या उत्पन्नाचा सोर्स शेती आणि दुग्ध व्यवसाय असल्याचे निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथ पत्रात नमूद केले आहे. शेती आणि दुग्ध व्यवसाय असताना त्यांनी दाखवलेली संपत्ती मात्र 200 कोटी रुपयांच्या पुढे आहे. ते येडेश्वरी साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर असताना त्यांनी शपथ पत्रात तसा उल्लेख केला नाही. त्यामुळे यावर देखील याचिकेतून आक्षेप घेण्यात आला आहे. एकूण झालेले मतदान आणि मोजलेले मतदान यात फरक बीडमध्ये मतदानाच्या दोन दिवस अगोदर बूथ क्रमांक 86 ए, 130 ए, 139 ए,140 ए, 170 ए, 190 ए, 12 ए असे एकूण 7 बूथ अचानक वाढविण्यात आले. त्यामुळे 4261 मतदारांना मतदान करता आले नाही. तर माजलगाव मधील बूथ क्रमांक 68 वरील 774 मतदान मोजण्यात आलेलं नाही. याशिवाय वैध असलेले पोस्टल मतदानात एकूण 1156 मतदान बाद करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने एकूण झालेले मतदान आणि प्रत्यक्ष मोजले गेलेले मतदान यांच्यात जवळपास 909 मतांचा फरक असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

हाॅस्टेल राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार!

0

केज — हॉस्टेलवर राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला तु आजारी असल्यामुळे दवाखान्यात दाखवायचे आहे मामाने दवाखान्यात बोलवले आहे.अशी बतावणी करून हॉस्टेल समोरून अपहरण केले. अंबाजोगाई महामार्गावरील एका लॉजच्या मागील बाजूस घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना गुरुवारी उघडकीस आली. याप्रकरणी दोघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड तालुक्यातील अल्पवयीन मुलगी शिक्षणासाठी तिच्या मामाने केज येथील हॉस्टेलवर ठेवले आहे. दरम्यान दहिफळ चिंचोली येथील सनी उर्फ स्वप्निल पाडळे, अमोल अंकुश जाधव हे दोघे बुधवारी रात्री नऊच्या सुमारास होस्टेलवर गेले. तुझे मामा उपजिल्हा रुग्णालयात आलेले आहे. तुला आजारपणामुळे दवाखान्यात दाखवायचे आहे यासाठी मामांनी बोलावले आहे. असे म्हणून दोघांनी तिला मोटार सायकल वर बसवले. अंबाजोगाई महामार्गावर असलेल्या एका लॉज च्या मागील खुल्या जागेत तिला घेऊन गेले. यावेळी सनी उर्फ स्वप्नील पाडळे याने मुलीवर बळजबरीने अत्याचार केला. त्यानंतर पीडित मुलीला तिच्या मुळगावी नेऊन सोडले.अत्याचारामुळे घाबरलेल्या पिडीत मुलीने आईवडिलांना घडलेली घटना सांगितली.नातेवाइकांनी लागलीच केज पोलिस पोलीस ठाण्यात धाव घेतली.या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून केज पोलिस स्थानकात बाल लैंगीक प्रतिबंधक, पोक्सो कायद्यानुसार सनी उर्फ स्वप्नील पाडळे आणि अमोल अंकुश जाधव या दोघांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे करीत आहेत.

मोटार सायकल चोरांची टोळी पकडली; 16 दुचाकी जप्त

0

बीड — मोटार सायकली चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज पकडली. यावेळी सोळा मोटारसायकली जप्त करून चोरीचे बारा गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळवले आहे

मोटारसायकली चोर गेवराई तालुक्यातील चिखली येथे येणार असल्याची गुप्त माहिती पो.स्टे. शिवाजीनगर गुरनं 470/2024 कलम 303(2) भा.न्या.सं. या मध्ये चोरी गेलेल्या मोटार सायकलचा समांतर शोध घेत असतांना मिळाली.खात्रीलायक खबर मिळताच पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांना खबर देवुन त्यांनी तात्काळ कारवाई करण्यासाठी सुचना दिल्या वरुन पोउपनि खटावकर यांनी गेवराई येथे पथकासह सापळा लावुन बातमी प्रमाणे मोटार सायकल वरुन येणाऱ्या दोन इसमांना ताब्यात घेवुन नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नावे रमेश छबु गिरे वय 26 रा.चिखली ता.गेवराई, मच्छिंद्र बबन राठोड वय 22 वर्ष रा.मानसिंगतांडा ता.गेवराई असे सांगितले त्यांना त्यांचेकडे असलेली मोटार सायकल बद्दल विचारले असता त्यांनी चोरी केली असल्याचे सांगितले व त्यांचे कडे अधिक चौकशी केली असता त्यांनी बीड शहर, दिंद्रुड, गेवराई, पाटोदा, माजलगाव, तलवाडा, तसेच पाथर्डी, अंबड, शेवगाव परिसरातुन मोटार सायकली चोरलेल्या असल्याचे सांगितले. यावेळी आरोपींच्या ताब्यातुन एकुण 16 मोटार सायकली जप्त करण्यात आल्या. त्यापैकी 12 मोटार सायकलचे गुन्हे उघडकीस आलेले असुन बीड जिल्हयातील विविध पो.स्टे.अंतर्गत 09 गुन्हे व जालना व अहमदनगर जिल्यातील 03 असा एकुण 7, लाख63 हजार रुपयाचा मोटार सायकलचा मु्द्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.आरोपी रमेश छबु गिरे रा.चिखली ता.गेवराई याचा पुर्व गुन्हे अभिलेख पाहता त्याने पुर्वी शिरुर कासार हद्दीमध्ये जनावर चोरी केल्या आहेत. सदर आरोपीतांकडुन आणिखीन इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असुन दोन्ही आरोपी व 16 मोटार सायकलचा मुद्देमाल पो.स्टे.शिवाजीनगर यांचे ताब्यात देण्याची प्रक्रिया चालु आहे. दरम्यान ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि श्रीराम खटावकर, स.फौ संजय जायभाये, पो.हअशोक दुबाले, कैलास ठोंबरे, दिपक खांडेकर, सोमनाथ गायकवाड, बाळु सानप, विकास वाघमारे, अर्जुन यादव, देविदास जमदाडे, निलेश ठाकुर, विकी सुरवसे, सिध्देश्वर मांजरे यांनी मिळुन केलेली आहे.

सासर्‍याने प्रेम विवाह केला; सुनेला सात पिढ्या समाजातून बहिष्कृत करण्याचा निर्णय जात पंचायतीने घेतला

0

बीड — सासऱ्याने प्रेम विवाह केला. जात पंचायतीने अडीच लाखाचा दंड ठोठावला तो दंड सासर्‍याने भरलाच नाही. शेवटी याची विचारणा मुलाकडे करण्यात आली मात्र त्यांनीही रक्कम भरण्यास असमर्थता व्यक्त केल्यानंतर जात पंचायतीने सात पिढ्यांना समाजातून बहिष्कृत करण्याचा निर्णय दिला. त्यामुळे सासऱ्याच्या प्रेमविवाहाची शिक्षा सुनाला मिळाली आहे ही घटना आष्टी तालुक्यातील डोईठाण येथे घडली आहे.या प्रकरणी ९ जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सासऱ्याने समाजाची परवानगी न घेता प्रेमविवाह केल्यामुळे त्यांना त्यावेळी अडीच लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यांनी तो न भरल्याने सुनेसह मुलाला जात पंचायतमध्ये बोलावले. त्यांनीही असमर्थता दर्शविल्याने पंचांनी या कुटुंबाला सात पिढ्या समाजातून बहिष्कृत करण्याचा आदेश दिला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यास जीवे मारू अशा प्रकारच्या धमक्याही देण्यात आल्या आहेत. हा प्रकार २२ सप्टेंबर २०२४ रोजी आष्टी तालुक्यातील डोईठाण येथे घडला आहे. हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न झाला होता.मात्र अखेर ९ जणांविरोधात आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा
जात पंचायतचा मुद्दा समोर आल्याने खळबळ उडाली आहे मालन शिवाजी फुलमाळी (३२ वर्षे) असं या पीडित महिलेचे नाव आहे. मालन यांचे सासरे नरसू फुलमाळी यांनी समाजाची परवानगी न घेता प्रेमविवाह केला होता. त्यांची जात नंदीवाले (तीरमाली) अशी आहे. सासऱ्याने प्रेमविवाह केल्यानंतर जात पंचायत बसविण्यात आली.
यामध्ये नरसू फुलमाळी यांना २ लााख ५० हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला. पण अनेक वर्षे उलटल्यानंतरही त्यांनी हा दंड भरला नाही. त्यामुळे २१ सप्टेंबर २०२४ रोजी अहमदनगरच्या नेवासा तालुक्यात राहणारे शिवाजी पालवे यांच्यामार्फत जात पंचायतमध्ये मालन यांना बोलावण्यात आले. ही पंचायत आष्टी तालुक्यातील डोईठाण येथे भरवण्यात आली होती.या पंचायतीमध्ये मालन आपले पती शिवाजी आणि मुलांसह तिथे पोहचल्या होत्या. या ठिकाणी पंचांसह समाजाचे ८०० ते ९०० लोकं आगोदरच एकत्र आले होते. त्यादिवशी निर्णय झाला नसल्याने त्यांना २२ सप्टेंबर रोजी पुन्हा जात पंचायतीत बोलवले. सकाळी ११ पंचांसमारे त्यांना उभे केले. सासऱ्याने दंड भरला नाही म्हणून तुम्ही भरा असे त्यांना सांगण्यात आले. तुम्हीही दंड भरला नाही तर समाजातून तुम्हालाही बहिष्कृत करू, तसेच पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारू अशा धमक्या देण्यात आल्या.शेवटी मालन यांनी दंड भरू न शकल्याने पंचांनी त्यांच्यासह त्यांच्या कुटूंबाला ७ पिढ्या समाजातून बहिष्कृत करण्याचा आदेश देण्यात आला. त्यामुळे मालन यांनी आष्टी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यावरून आष्टी पोलिस ठाण्यात गंगाधर बाबु पालवे, उत्तम हनुमंत फुलमाळी, गंगा गंगाराम फुसमाळी, चिन्नु साहेबराव फुलमाळी, सुभाष फुलमाळी, बाबुराव साहेबराव फुलमाळी, शेटीबा रामा काकडे, सयाजी सायबा फुलमाळी,गुलाब पालवे यांच्यासह इतर पंचांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या सर्वांवर सामाजिक बहिष्कार अधिनियम 2016 मधील जनतेचे महाराष्ट्र संरक्षण 4,5,6 तसेच बीएनएस 189 (2), 351 (2) (3), 352अशा कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.