बीड — आष्टी शहरातील नगरपंचायत निवडणुकीतील बोगस मतदाराच्या अहवालावर कारवाईबाबत जिल्हाधिकारी बीड यांनी 14 ऑगस्टपर्यंत शपथपत्र दाखल करावे अन्यथा शासनाचे काहीही म्हणणे नाही, असे समजून पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती श्रीमती विभा कंकणवाडी व न्यायमूर्ती संजय देशमुख यांनी दिले आहेत.
आष्टी विधानसभा मतदारसंघांमध्ये (Ashti Assembly Constituency ) 1 नोव्हेंबर 2023 च्या प्रारूप यादीमध्ये जवळपास 550 मतदारांची नावे बनावट कागदपत्राच्या आधारे नगरपंचायत हद्दीत, भागात समाविष्ट करण्यात आल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते राम सूर्यभान खाडे, नदीम शेख व इतरांनी केल्या होत्या. सदरील प्रकरणांमध्ये तत्कालीन आमदार बाळासाहेब आजबे यांनी देखील तक्रार केली होती. या प्रकरणांमध्ये उपविभागीय अधिकारी (Sub-Divisional Officer)पाटोदा (patoda)यांनी चौकशी करून जिल्हाधिकारी बीड (collector Beed) यांच्याकडे अहवाल सादर केला.तसेच संबंधित मतदारांच्या नमूद वास्तव्याच्या ठिकाणी जाऊन चौकशी करून पंचनामे केले होते. त्यामध्ये सदरील मतदार नमूद पत्त्यावर वास्तव्यास नसल्याचे आढळून आले होते. (Aurangabad High Court) तसेच सदरील 550 नावे बनावट व खोट्या कागदपत्राच्या आधारे समाविष्ट करण्यात आल्याचे नमूद करून सदरील प्रकरणासंबंधीत मतदान केंद्र स्तर अधिकारी (बीएलओ) यांना दोषी धरून त्यांच्या प्रशासकीय विभागामार्फत कारवाई करण्यासाठीचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना पाठवण्यात यावा, अशी शिफारस करण्यात आली होती.
विशेष म्हणजे बोगस मतदारांनी नगरपंचायत आष्टीच्या निवडणुकीमध्ये मतदानही केले होते. अर्जदार राम सूर्यभान खाडे, शेख नदी रसिक यांनी निवडणूक आयुक्त, नगर विकास सचिव, मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे केली होती. आष्टी मधील कर्मचारी शिवकुमार तांबे यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करून रहिवासी प्रमाणपत्र दिल्याचे निष्पन्न झाले होते. तरीही, फौजदारी कारवाई झाली नाही. त्यामुळे संबंधीतांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी राम खाडे व अजीम शेख यांनी ॲड. नरसिंह जाधव यांच्या मार्फत फौजदारी याचिका दाखल केली होती.सदरील याचिकेत या पुर्वीच्या सुनावणीत जिल्हाधिकारी कार्यवाही करणार आहेत किंवा नाहीत? याबाबतचा खुलासा शपथपत्रात करण्याचे आदेश खंडपीठाने दिले होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी 12 जून रोजीच्या सुनावणीत कुठलेही शपथपत्र दाखल केले नाही. त्यामुळे आता 14 ऑगस्टपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी शपथपत्र दाखल केले नाही तर शासनाचे काही म्हणणे नाही, असे गृहीत धरून पुढील निर्णय घेण्यात येईल असे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. पुढील सुनावणी 26 ऑगस्ट रोजी ठेवली आहे. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. नरसिंह जाधव हे काम पाहत आहेत.
उच्च न्यायालयात शपथपत्र दाखल करण्यासाठी बीड जिल्हाधिकाऱ्यांना 14 ऑगस्टची डेडलाईन
गोरक्षकांना आवर घाला; अजित पवारांच्या पोलिसांना स्पष्ट सूचना
मुंबई — गोवंश हत्या बंदीतून बाहेर असलेले आणि कायदेशीररित्या परवानगी असलेल्या प्राण्यांच्या वाहतुकीवर स्वयंघोषित गोरक्षक आक्षेप घेत असतात. उत्तर भारतात गोरक्षकांनी घातलेल्या गोंधळामुळे अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत.
आता राज्यातही हा प्रश्न उद्भवला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरिष्ठ पोलिसांना निर्देश देत गोरक्षकांवर आवर घालण्यास सांगितले. जिल्हा पोलीस प्रमुखांनी पशुधन वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यापासून खासगी व्यक्तींना रोखावे, असे निर्देश त्यांनी दिले.
बुधवारी कुरेशी समुदायाच्या शिष्टमंडळाशी झालेल्या बैठकीनंतर अजित पवार यांनी या सूचना दिल्या आहेत. या बैठकीसाठी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. बैठीकत उपस्थित असलेल्या सूत्रांनी द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांनी रश्मी शुक्ला यांना एक पत्रक काढण्याची सूचना दिली. जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याचा अधिकार कोणत्याही खासगी व्यक्तींना नाही, याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश या पत्रकाद्वारे जिल्हा पोलिसांना देण्यात यावे, असे अजित पवार म्हणाले.
गोवंश हत्याबंदी कायद्यानंतर कथित गोरक्षक कायद्याच्या आडून म्हैसवर्गीय म्हणजे भाकड म्हैस आणि रेड्यांच्या वाहतुकीचे ट्रक अडवितात आणि जबरदस्तीने पैशांची मागणी करतात, अशी तक्रार कुरेशी समुदायाने अजित पवारांसमोर मांडली. तसेच बेकायदेशीर गोरक्षकांवर बंदी घालावी, कायदेशीररित्या परवानगी असलेल्या प्राण्यांच्या वाहतुकीला संरक्षण द्यावे, दाखल केलेले खोटे खटले मागे घ्यावेत आणि प्राण्यांच्या वाहतुकीवर घातलेले निर्बंध कमी करावेत, अशा मागण्यांचे निवेदन कुरेशी समुदायाकडून करण्यात आले. “कुरेशी समुदाय पारंपरिकपणे मांस व्यापाराशी संबंधित आहे आणि महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राशी संबंधित अर्थव्यवस्थेचा भाग आहे. या समुदायाच्या व्यापाऱ्यांवर आणि जनावरांची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही”, असे उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
बेकायदा गोरक्षकांकडून होत असलेल्या छळाबाबत कुरेशी समुदायाच्या शिष्टमंडळाने अजित पवार यांना निवेदनाद्वारे माहिती दिली. “कुरेशी समुदायातील व्यापारी आणि कायदेशीररित्या परवानगी असलेल्या प्राण्यांची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात गोरक्षकांनी केलेल्या हिंसक कृत्यांमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामुळे समुदायाला जूनपासून संप पुकारावा लागला आहे. भाकड जनावरांसाठी खरेदीदार नसल्यामुळे शेतकरीही अडचणीत सापडले आहेत. २०१५ मध्ये गोवंश हत्याबंदी कायदा झाल्यानंतर कायद्याने परवानगी असलेल्या म्हैसवर्गीय प्राण्यांच्याही वाहतुकीवर परिणाम होत आहे”, अशी माहिती निवेदनाद्वारे देण्यात आली.
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या आमदार सना शेखही उपस्थित होत्या. त्यांनी शिष्टमंडळाची मागणी अजित पवारांसमोर मांडली. तसेच असामाजिक घटकांमुळे जनावरांची कायदेशीर वाहतूक करणाऱ्यांना नाहक त्रास भोगावा लागत आहे, अशी माहिती विधानपरिषदेचे आमदार संजय खोडके यांनी दिली. कायद्यानुसार फक्त पोलिसच वाहनांची तपासणी करू शकतात, असे असूनही बेकायदेशीर गोरक्षकांचा धोका वाढत असून त्यावर वेळीच उपाययोजना करण्याचे आवश्यक असल्याचे खोडके म्हणाले.
नशेडी नातवाकडून आजीवर जीव घेणा हल्ला; आई-वडिलांनाही केले जखमी (crime)
परळी — व्हाइटनरच्या नशेच्या आहारी गेलेल्या नातवाने आज्जीवर पैशासाठी जीवघेणा हल्ला केला तर त्याला रोखण्यासाठी आलेल्या आई-वडिलांवरही हल्ला करून गंभीर जखमी केल्याची खळबळ जनक घटना (Parli)तलाब कट्टा फूले नगर परिसरात सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.पोलिसांनी (police)आरोपीला अटक केली आहे.
शहरातील तलाब कट्टा भागात राहणाऱ्या कुरेशी कुटुंबातील 80 वर्षीय जुबेदा इब्राहिम कुरेशी घरात बसलेल्या असताना अरबाज रमजान कुरेशी हा वीस वर्षीय नातू नशेत घरी आला. अरबाजने आजीकडे पैशाची मागणी केली. आजीने पैसे देण्यास इन्कार केला. शिवीगाळ करूनही आजी पैसे देत नाही म्हणून संतप्त झालेल्या अरबाजने हातात असलेल्या सत्तूरने आजीच्या तोंडावर वार केला. यावेळी झालेल्या गोंधळाचा आवाज ऐकून अरबाज ची आई समीना रमजान कुरेशी व वडील रमजान इब्राहिम कुरेशी हे दोघेही धावत आले. अरबाज ने केलेल्या हल्ल्याने आजी अत्यावस्थ स्थितीत गेली. आई आणि वडील धावून आल्याचे पाहताच अरबाज याने त्या दोघांवरही हल्ला चढवला. यात दोघेही गंभीररित्या जखमी झाले आहेत. घटना घडल्यानंतर अरबाज पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला.मात्र घटना घडल्यानंतर काही क्षणातच संभाजीनगर पोलिसांनी (Sambhaji Nagar police) घटनास्थळी धाव घेतल्यामुळे आरोपीला पकडण्यात यश आले. पोलीस निरीक्षक संजय ढोणे यांनी ताबडतोब कारवाई करत आरोपीला पकडून जखमी वृद्ध आजीला अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात (SRT hospital ambajogai)पाठवून दिले. तर आरोपीच्या आई-वडिलाला प्राथमिक उपचार करून त्यांना देखील अंबाजोगाई येथील रुग्णालयात (hospital) दाखल करण्यात आले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
26 लाख लाडक्या बहिणीं चौकशीच्या फेऱ्यात!
मूंबई — मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना(ladki bahan Yojana) सुरु होण्यास आता एक वर्ष पूर्ण झालं आहे. राज्य सरकारकडून गेल्या वर्षभरापासून 1 कोटी पेक्षा जास्त महिलांना या योजनेच्या माध्यमांतून दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे.पण विधानसभा निवडणुकीनंतर(assembly election) या योजनेचे निकष(criteria) तपासले जात आहेत. यामध्ये लाखो महिला या अपात्र असल्याचं समोर आलं आहे. आतादेखील राज्यातील 26 लाख महिला या अपात्र असल्याची माहिती समोर आली आहे. या महिलांची आता चौकशी होणार आहे. यासाठी सरकार घरोघरी जावून या महिलांचा शोध घेणार आहे.
विशेष म्हणजे रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात नुकताच जुलै महिन्याचा हप्ता जमा झाला आहे. पण आता लाडक्या बहिणींची चिंता वाढवणारी बातमी आहे. कारण राज्य सरकार आता राज्यातील तब्बल 26 लाख लाडक्या बहिणींची चौकशी होणार आहे. राज्यातील 26 लाख महिलांच्या घरी जावून चौकशी केली जाणार आहे.
महिला बालकल्याण विभागाचं जिल्हा प्रशासनाला पत्र
लाडकी बहीण योजनेसाठी विविध निकष ठेवण्यात आले होते. त्या निकषांच्या आधारे लाभार्थी महिलांनी अर्ज दाखल केला होता. आता सरकार घरोघरी जावून लाभार्थी महिलांचे अर्ज आणि पात्रता तपासणार आहे. विशेष म्हणजे लाभार्थी महिलांची चौकशी करण्यासाठी महिला बाल कल्याण विभागाकडून जिल्हा प्रशासनाला आदेश देण्यात आला आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाला (district administration)आदेशाचं पत्र देण्यात आलं आहे.
अंगणवाडी सेविका कसा तपास करणार?
जिल्हा पातळीवरील महिला आणि बालकल्याण विभागाच्या अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून ही अपात्र लाभार्थी महिला शोधण्याची मोहीम आता सुरु करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेत (ladki bahan Yojana)एकाच घरातील दोन पेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. मात्र दोन पेक्षा जास्त आणि 21 ते 65 वर्षे वयोगटात न बसणाऱ्या तब्बल 26 लाख महिलांना या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली होती. या महिलांची यादी महिला आणि बालकल्याण विभागाने तयार केली आहे.
अंगणवाडी सेविका असलेल्या एका महिलेने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “दोन प्रकारचे निकष सांगितले आहेत. वयोमर्यादा बरोबर आहेत, बोगस कागदपत्रे भरले आहेत का, अशा प्रकारची तपासणी करा. त्यांचा निर्गम उतारा पाहा, टीसी पाहा, अशा प्रकारची तपासणी करा. घरातील तीन महिला असतील तर दोघांना पात्र करा आणि एकीला अपात्र करा. टॅक्सधारक (tax holder), वाहनधारक (vehicle owner), चारचाकी आहे का, याची तपासणी करा. चारचाकीचा नंबर बघा. याबाबत घरोघरी जावून चौकशी करा, असा आदेश दिला आहे”, अशी प्रतिक्रिया एका अंगणावाडी सेविकेने दिली.
आज खाकी वर्दी ही गहिवरली..! अश्रूंना मोकळी वाट मिळाली..! हरवलेल्या मुलाची आठ वर्षानंतर आईशी भेट झाली
AHTU आणि LCB टीमची संयुक्त कार्यवाही…
बीड — दाटलेला कंठ, माया ममतेच्या आनंदाश्रूत पोलीस अधीक्षक कार्यालय (SP office)भावनेच्या लाटेत चिंब झालेलं पाहायला मिळालं. गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी कठोरतेसाठी ओळख असलेली खाकी वर्दीतील माणूसपणाचं दर्शन घडलं. आठ वर्षांपूर्वी घरातून निघून गेलेल्या मुलाचा शोध घेऊन तो अडाणी असलेल्या आई वडिलांच्या स्वाधीन केला. माय लेकराची भेट होत असताना अश्रूंच्या आलेल्या महापुरात खाकी ही काही काळ गहिवरल्याचं चित्र दिसलं.
सोळा वर्षाचा अल्पवयीन मुलगा राजु काकासाहेब माळी वर्ष (2017 चे वय) हा घरातून निघून गेला होता. याबाबत माहीती अशी की राजु हा दहावीचे शिक्षण घेण्यासाठी संगमेश्वर विद्यालय नालवंडी (sangameshwar School nalvandi)येथे शिकायला होता . त्याची राहण्याची सोय नसल्याने तो शिक्षक ज्ञानेश्वर राऊत यांच्या घरी राहत होता. आई वडीलांची परिस्थिती एकदम हलाखीची होती . आई वडील ऊसतोड कामगार असल्याने कर्नाटक राज्यात कामासाठी गेले होते. डिसेंबर 2017 मधे राजु हा शाळा सुटल्यावर कोणाला काही एक न सांगता निघून गेला. याबाबत त्याच्या आई वडिलांना माहिती मिळाली तेव्हा त्यांना कर्नाटक (Karnataka) वरून येण्यास आठ दिवस लागले. राजू चे आई वडिलांना वाटले की राजू काही दिवसात परत येईल, व ते दोघेही अशिक्षित असल्याने त्यांनी गुन्हा दाखल केला नाही. असे करत पाच ते सहा वर्ष निघून गेले. पण राजु परत आलाच नाही, मग 2023 मधे त्याच्या आई ने पोस्टे पिंपळनेर (pimpalner police)ला गुन्हा दाखल केला. सदर गुन्हा जानेवारी 2025 मधे मानवी तस्करी विरोधी पथक(Anti Human Trafficking Unit)ला वर्ग झाला. पीएसआय पल्लवी जाधव यांनी मानवी तस्करी विरोधी पथकाचा पदभार घेतल्यावर या गुन्ह्याच्या फाइल चे बारकाईने अवलोकन केले. आणि तपासास सुरवात केली. राजूच्या आईवडिलांची भेट घेतली त्यांचे अश्रु आणि दुःख खूप वेदनादायक होते. त्यानंतर राजूच्या शाळेत जावून त्याचे शिक्षकांची ही भेट घेतली व त्याच्या बाबत माहिती घेतली. त्यानंतर मागचे पाच वर्ष गुन्हा का दाखल झाला नाही म्हणून शिक्षक ज्ञानेश्वर राऊत यांची भेट घेतली. कारण सदर शिक्षकाच्या घरी राजू राहत होता, एखादा मुलगा आपल्या ताब्यातून निघून गेल्यावर त्याने गुन्हा दाखल का केला नाही? त्यांनीच राजु चे काही बरेवाईट तर केले नसेल ना असा संशय पीएसआय पल्लवी जाधव यांना आला. मग पीएसआय पल्लवी जाधव यांनी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत (SP Navneet Kanvat) यांची भेट घेवून गुन्ह्याबाबत सर्व माहिती सांगितली व सदर शिक्षकावर संशय असले बाबत ही सांगितले. सरांनी सांगितले की तुम्ही पुढील तपासात स्थानिक गुन्हे शाखेची( LCb) मदत घ्या. व तसा आदेश त्यांनी पोनी शिवाजी बंटेवाड एलसीबी यांना दिला. पोनि बंटेवाड यांनी पीएसआय पल्लवी जाधव यांच्या मदतीसाठी पीएसआय श्रीराम खटावकर यांना आदेश दिला. त्यानंतर दोघांनी मिळून तपास सुरू केला. सदर शिक्षकाकडून काही एक माहिती मिळाली नाही. त्यानंतर पीएसआय खटावकर यांनी टेक्नीकल (technical team)टीम च्या मदतीने राजू ची माहिती काढली. मिळालेल्या माहितीवरून राजूचे लोकेशन पुणे (Pune) येथे असल्याचे समजले. व त्याला शोधून विश्वासात घेवून पुणे वरून बीड ला आणले.
आज सकाळी पीएसआय खटावकर यांनी राजू ला पुढील तपासकामी पीएसआय पल्लवी जाधव यांच्या ताब्यात दिले.त्यानंतर त्यास पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या समोर हजर केले. त्यावेळी तेथे राजूचे आई वडील ही हजर होते. त्यांच्यासाठी ही विशेष भेट एस पी नवनीत कांवत यांनी घडवून आणली.
दरम्यान ही कार्यवाही पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोनि शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक पल्लवी जाधव , पोलीस उप निरीक्षक श्रीराम खटावकर , पोलीस हवालदार असिफ शेख, आनंद म्हस्के, हेमा वाघमारे , उषा चौरे, प्रदीप येवले, अशोक शिंदे, पोना अर्जुन यादव, पोलीस शिपाई प्रदीप वीर, योगेश निर्धार सर्व नेमणूक मानवी तस्करी विरोधी पथक(AHTU )व स्थानिक गुन्हे शाखा ( LCB team) यांनी केली. पोलिसांच्या या कामगिरीचं जिल्हाभरातून कौतुक होत आहे.
गोसावीं चा “नेक” राहिला नाही “नूर”, वाहतोय अवैध दारूचा महापूर
बीड — नेकनूर पोलीस ठाणे (neknoor police) हद्दीत खेडोपाडी (rural area)उघडलेल्या धाब्यांमधून (dhaba)अवैध दारूची सर्रास विक्री केली जात आहे. यामध्ये गोवा राज्यातून (Goa)तस्करी केलेली दारू देखील उपलब्ध होऊ लागली आहे. तीच स्थिती महामार्ग तसेच राष्ट्रीय महामार्गावरील(National Highway) धाब्यामध्ये देखील पाहायला मिळत आहे. यातून पोलीस (police)ठाण्याला मोठी कमाई होत असली तरी गरिबांची घरं उध्वस्त होऊ लागली आहेत. एकूणच ठाणे प्रमुख चंद्रकांत गोसावींचा नेक नूर राहिला नसल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
नेकनूर हे पोलीस ठाणं पूर्वीपासूनच कमाईच मोठ ठिकाण मानलं जातं. पोलीस अधीक्षक नवनीत कांवत (SP Navneet kavat)सारखा प्रामाणिक अधिकारी जिल्ह्यात आल्यानंतर काही काळ नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांना थोडा लगाम लागला होता. मात्र पोलीस अधीक्षकांचा आपल्या अधिकाऱ्यांवर असलेला विश्वास सध्या तरी धोकेदायक ठरू लागला आहे. याचं सगळ्यात मोठे उदाहरण म्हणजे नेकनूर पोलीस ठाणे होय. नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर धाबे(dhaba) उघडण्यात आले आहेत. या धाब्यांमधून मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री होऊ लागली आहे. याला कुठलाही लगाम घालण्याचं काम केलं जात नसल्याने गोरगरिबांची घरं मात्र उध्वस्त होऊ लागली आहेत. तरुण पिढी (young generation)दारूच्या व्यसनाच्या आहारी जाऊन जीवनाची राखरांगोळी करत असल्याचं सध्या तरी दिसत आहे. मागेल तिथे दारू मिळत असल्याने कायदा सुव्यवस्थेचा(law and order) प्रश्न देखील निर्माण झाला आहे. तळीरामांच्या शिव्यांच्या लाखोळीला रस्त्यावरून जाणाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. एकट्या चौसाळा (chausala) शहराचाच विचार केला तर बस स्थानका जवळ चार ते पाच ठिकाणी अवैध दारू तसेच बनावट ताडी मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय महामार्ग असो की राज्य महामार्ग प्रत्येक धाब्यावर दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर दारूचा प्रत्येक ब्रँड (brand)ग्राहकांच्या सेवेला उपलब्ध होऊ लागला आहे. तो देखील दीडपट दराने.दारू विक्रेते मात्र यातून कोट्याधीश होत असले तरी गोरगरिबांची संसार मात्र उध्वस्त होऊ लागली आहेत. या संदर्भात तक्रार करायची तर कोणाकडे हा देखील मोठा प्रश्न आहे. शेतातला माल चोरीला गेला तर त्याची तक्रार नोंदवून घेतली जात नाही गुन्हा दाखल होत नाही. पोलीस अधीक्षकांचा (Sp)फोन गेला गुन्हा दाखल करा म्हणून तरीही त्यांचा आदेश मानला जात नाही. इतकी मग्रुरी ठाणे प्रमुखांकडून दाखवली जाते. या मग्रुरीचा अनुभव चौसाळा परिसरातील फळबाग चोरीच्या घटनेतून जनतेला लिंबागणेश परिसरातून विद्युत पंप चोरीला गेले दोन महिन्यापासून तक्रार दिली याची सुद्धा दखल गोसावी ला घ्यावी वाटली नाही. बरं हे प्रकरण सामाजिक कार्यकर्त्याच्या बाबतीत घडलं होतं. सर्वसामान्यांची परिस्थिती काय असेल हे सांगणं अवघड आहे. विद्युत मोटारी चोरीची बातमी माध्यमामधून समोर आल्यानंतर मात्र गुन्हा दाखल केला. जर ही स्थिती असेल तर अवैध दारूची तक्रार कोण आणि कशी घेणार? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. एकंदरच गोसावींच्या कारकीर्दीत अवैध दारू विक्रेत्यांसह चोरट्यांना सुगीचे दिवस आल्याचे पाहायला मिळत आहे. यातून ठाणे प्रमुखाला मोठ्या प्रमाणावर खळ मिळत असलं तरी सर्वसामान्य जनता मात्र भरडून निघत आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कांवत हे प्रामाणिक अधिकारी असले कर्तव्यदक्ष जरी असले तरी आशा मुजोर अधिकाऱ्यांच्या कर्तबगारिने मात्र पोलीस दलावर शिंतोडे उडले जातात यामुळे अशा धंद्यांना आळा घालावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
केज पोलिसांनी गुटख्याचा ट्रक पकडला; एक कोटीचा मुद्देमाल जप्त
केज — केज (Kaij) ते कळंब रोडवरील एचपी पेट्रोल पंपासमोरून अशोक लिलॅन्ड (Ashok Leyland)कंपनीच्या ट्रकमधून अवैध गुटख्याची (gutkha)वाहतूक होत असल्याची माहिती केज पोलिसांना मिळताच छापा(police raid) मारला यावेळी गुटख्याचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत एक कोटींचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. शुक्रवारी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत
रईसोद्दीन अमीरोद्यीन शेख वय 50 वर्षे रा. मिल्लतनगर ओकाला रोड ता.जी. रतलाम, राज्य मध्यप्रदेश(Madhya Pradesh) व परशुराम मोहन गायकवाड रा. एकनाथ वाडी ता. पाथर्डी जि अहिल्यानगर हमु. बीड या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर जालिमसिंग (रा. बेहरामपुर, पुर्ण नाव माहीत नाही.रुपेश मालपाणी रा. कळंब जि. धाराशिव हे दोघे फरार आहेत. ट्रक चालक रईसोद्दीन अमीरोद्यीन शेख, परशुराम गायकवाड बेकायदेशीररित्या, महाराष्ट्र राज्यात बंदी घातलेला असताना राज निवास पान मसाला(pan masala), राजनिवास पान मसाला तंबाखु, डायरेक्टर स्पेशल पान मसाला, डायरेक्टर स्पेशल पान मसाला तंबाखु (tobacco) चा माल चोरटी विक्री करण्याकरीता ट्रक क्र. एम. एच.डीडीओ 1 एस. 9442 घेवुन जात असताना केज ते कळंब रोडवरील एचपी पेट्रोल पंपासमोरून (HP petrol pump)पोलिसांनी ताब्यात घेतला. यावेळी 74 लाख 72 हजारांचा गुटखा व 27 लाखांचा टेम्पो असा 1 कोटी 1 लाख, 52 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि मांजरमे हे करत आहेत.
अंबाजोगाईत (Ambajogai)रात्रीत चार दुकाने फोडली; व्यापाऱ्यात दहशत
अंबाजोगाई — बुधवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या चार ठिकाणी दुकाने फोडून ऐवज लंपास केल्याची घटना घडली. ही सर्व ठिकाणे वर्दळीच्या भागात असूनही चोरट्यांनी हात साफ केल्याने पोलीसांच्या(police) कार्यक्षमतेवर नाराजी व्यक्त होत आहे.
नगर परिषदेसमोर (Municipal Council)असलेल्या मुख्य रस्त्यावरील(Main Street) पॅराडाईज वाईन शॉप (wine shop), प्रशांत नगरमधील डॉ. तट यांचा दाताचा दवाखाना (dental clinic) व बनाळे यांचे किराणा दुकान, तसेच कलावती हॉस्पिटल (hospital)खाली असलेले मेडिकल स्टोअर अशी चार ठिकाणं या चोरट्यांनी लक्ष्य केली. या चोऱ्यांमध्ये नेमका कितीचा ऐवज चोरीला गेला आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.पॅराडाईज वाईन शॉपमध्ये स्कॉर्पिओ गाडीतून (Scorpio car )आलेल्या तीन चोरट्यांनी चोरी केली असल्याचे प्राथमिक सीसीटीव्ही फुटेजमधून (CCTV footage)समोर आले आहे.विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरीही चोरी झाली होती. त्या प्रकरणातील चोर अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यातच आता पुन्हा चार दुकाने फोडून चोरट्यांनी पोलीस यंत्रणेलाच थेट आव्हान दिल्याची चर्चा शहरात सुरू आहे.दरम्यान गस्तीसाठी पोलिसांची गाडी रात्री फिरते, परंतु इतक्या वर्दळीच्या भागात सलग चार ठिकाणी चोरी होत असताना गस्ती पथक काय करत होते, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.या घटनांमुळे व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, पोलिसांनी तातडीने ठोस कारवाई करून चोरांचा शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे.
सासऱ्याचा खून केला जावयाला जन्मठेप
अंबाजोगाई — सासऱ्याच्या खूनप्रकरणी जावयाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असल्याचा निकाल अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या (District and Sessions Court)न्यायाधीश डॉ. रचना तेहरा यांनी दिला. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ॲड.लक्ष्मण फड यांनी प्रभावी युक्तिवाद सादर करून आरोपीला दोषी ठरवण्यात निर्णायक भूमिका बजावली.
दोन वर्षापूर्वी अंबाजोगाई तालुक्यातील केंद्रेवाडी येथे हत्या घडली होती. मृत दत्तात्रय रामा गायके यांची मुलगी रेखा हिचा विवाह रामेश्वर बळीराम गोरे (रा. हिंगणगाव कोथाळा, ता. कळंब, जि. धाराशिव) याच्यासोबत झाला होता. मात्र, लग्न होऊन आठ वर्षांनंतरही दोघांना अपत्य झाले नाही. त्यामुळे रामेश्वरने दुसरे लग्न करण्यासाठी पत्नी रेखावर दबाव टाकण्यास सुरुवात केली. त्यासाठी तिच्या वडिलांनी परवानगी द्यावी, असा तगादा तो लावत होता. या कारणावरून तो रेखाला आणि तिच्या कुटुंबाला मानसिक त्रास देत होता.दरम्यान, मयत दत्तात्रय यांचा मुलगा मल्हारी याचे लग्न ११ जून २०२३ रोजी निश्चित झाले. यामुळे आरोपी रामेश्वरच्या मनात याचा राग होता. दि. ७ जून २०२३ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तो केंद्रेवाडी येथे आला. यावेळी दत्तात्रय हे शेतातील आखाड्यावर झोपले होते. आरोपीने त्यांच्याबद्दल चौकशी केल्यानंतर रात्रीच्या अंधारात आखाड्यावर गाठले आणि धारदार शस्त्राने तब्बल २७ वार करून त्यांचा निर्घृण हत्या केली या प्रकरणी धारूर पोलीस(dharur police) ठाण्यात कलम ३०२ भादंवि अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाची जबाबदारी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमार कुमावत Asp Pankaj Kumar Kumawat यांच्याकडे सोपवण्यात आली. कुमावत यांनी घटनास्थळाचा सखोल तपास करून आरोपीविरुद्ध सबळ पुरावे न्यायालयात सादर केले.सरकार पक्षातर्फे एकूण आठ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. यामध्ये शेजारील शेतकरी बंडू गिरी, लक्ष्मण केंद्रे व तपास अधिकारी पंकज कुमावत यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. ॲड. लक्ष्मण फड यांनी पुरावे (evidence) व साक्षीदारांच्या जबाबांवर आधारित प्रभावी युक्तिवाद सादर केला. त्यांच्या युक्तिवादास मा. न्यायालयाने(court) मान्यता देत आरोपी रामेश्वर गोरे याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या खटल्यात ॲड. अनंत तिडके यांनी सरकार पक्षाला सहाय्य केले.
ऊसतोड कामगाराच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar)
बीड — बीड(Beed) जिल्ह्याची ओळख ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून आहे. परंतु ऊसतोड कामगारांसाठी विविध कल्याणकारी (welfare scheme)अशा योजना आहेत. ऊसतोड कामगारांचे जीवन सुखकर होऊन त्यांच्या जीवनात स्थिरता, सुरक्षितता निर्माण करण्यासाठी गोपीनाथ मुंडे(Gopinath Munde) ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापन करण्यात आलेली आहे. या महामंडळाच्या माध्यमातूनही विविध योजना राबविण्यात येतात. त्याचा लाभ सर्व कामगारांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री(guardian minister) अजित पवार Ajit Pawar यांनी दिली.
जिल्हा परिषद Zpव सामाजिक न्याय विभागाच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे जिल्ह्यातील ऊसतोड कामगार आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन व मिशन साथी उपक्रमाचा शुभारंभ पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी सर्वश्री आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, प्रकाश सोळंके, सुरेश धस, धनंजय मुंडे, संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित, नमिता मुंदडा, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.राजेश देशमुख, जिल्हाधिकारी (collector )विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (Ceo)जितीन रहमान आदींसह जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्पवार म्हणाले, कष्टकरी ऊसतोड कामगार स्वाभिमानी आहे. त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम शासन करत आहे. बीडमध्ये ऊसतोड कामगाराचे अनेक प्रश्न, समस्या आहेत. त्या दूर करण्यासाठी शासन सदैव त्यांच्या पाठिशी आहे. त्यांच्या प्रत्येक पाल्याला उत्तम शिक्षण मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. ऊसतोड कामगारांच्या पाल्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे. ऊसतोड कामगारांसाठी अनेक योजना आहेत. त्यांचा लाभ सर्वांनी घ्यावा, यामध्ये सदस्यांना ओळखपत्र देण्यात येते. केवळ २० रूपयांमध्ये अर्ज करता येतो. संत भगवान बाबा वसतिगृह योजनेंतर्गत २२ वसतिगृह राज्यात मंजूर करण्यात आली आहेत, त्यापैकी १६ वसतिगृह सुरू आहेत. या वसतिगृहांना आर्थिक मदत देण्यासही शासन सकारात्मक आहे. ऊसतोड कामगारांची पुढची पिढी ऊसतोड कामगार राहणार नाही, याची काळजी घेऊन त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यात येईल, असेही पवार म्हणाले.
आजच्या नवतंत्रज्ञानाच्या काळात साधनेही आधुनिक स्वरूपात बाजारात (market) उपलब्ध झालेली आहेत. यांत्रिकीकरण वाढत आहे, त्यामुळे सर्वांना काळानुरूप बदलावे लागेल, असेही ते म्हणाले.
शासनाने सीट्रीपलआयटीच्या माध्यमातून याठिकाणी कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावे, यासाठी मदत होणार आहे. या केंद्रातून आगामी काही वर्षात दरवर्षी ७००० कुशल विद्यार्थी निर्माण होण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील कौशल्यवर्धक तंत्रशिक्षण व व्यावसायाभिमूख रोजगाराच्या (Skill-enhancing technical education and vocational employment)
संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टी सीट्रीपलआयटी प्रकल्प बीड जिल्ह्यात निर्माण करण्यात येत आहे. बीड जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी पुढकार घ्यावा शासन निधी देईल, तो सत्कारणी लावावा, असेही ते म्हणाले.
बीड-अहिल्यानगर-मुंबई रेल्वे( Beed -Ahilyanagar -Mumbai railway)लवकरच सुरू करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यासह बीड शहराजवळ किफायतशीर स्वरूपात विमानतळ (airport)असावे, यासाठीही प्रयत्न करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात आरोग्य साथी महिलांना फर्स्ट एड किटचे (प्रथमोपचार पेटी) वाटप करण्यात आले. ऊसतोड कामगारांसाठी उपयुक्त माहिती पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘बाल विवाह प्रतिबंधक’ प्रतिज्ञेने समाजातील सकारात्मक बदल घडवण्याचा निर्धारही सर्वांनी यावेळी व्यक्त केला
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. या कार्यक्रमात ग्रामीण गृहनिर्माण (घरकुल) चॅटबॉट सुविधेचा प्रारंभ करण्यात आला. मेळाव्यास उपस्थित सर्व महिलांना पवार यांनी रक्षाबंधनाच्या शुभेच्छाही दिल्या.