Home Blog Page 123

पुणे सोलापूर महामार्गावर धनंजय मुंडेंच्या पत्नीचा अपघात

0

परळी — कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या कारला पुणे ते सोलापूर मार्गावर गुरुवारी पहाटे अपघात झाला. ट्रॅव्हल बस सोबत कारची धडक झाल्याने अपघातात राजश्री मुंडे या किरकोळ जखमी झाल्या. सुदैवाने या अपघातात राजश्री मुंडे यांना किरकोळ दुखापत झाली असून त्या सुखरूप आहेत.

बुधवारी दुपारी राजश्री मुंडे या परळीतून कारने निघाल्या. तुळजापूर येथे तुळजाभवानीचे त्यांनी दर्शन घेतले. तेथून त्या मुंबईकडे निघाल्या. दरम्यान, पुणे ते सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी या ठिकाणी राजश्री मुंडे यांच्या कार आणि ट्रॅव्हल बसमध्ये जोरदार धडक झाली. यात राजश्री मुंडे यांच्या कारच्या समोरील बाजूचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात राजश्री मुंडे यांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यानंतर दुसऱ्या कारने त्या मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती आहे.

पंकजाताईंना राज्याच्या राजकारणात ठसा उमटवावा लागणार!

0

बीड — विधानसभा निवडणुकीची  घोषणा झाल्यानंतर पंकजा मुंडे समोर राज्याच्या राजकारणात महत्व अबाधित ठेवण्यासाठी आपल्या राजकीय चतुराईचा, खेळीचा ठसा उमटण्याच मोठ आव्हान निर्माण झालं आहे. राजकीय सारीपाटावर आपले प्यादे सुरक्षित ठिकाणी ठेवून ताकत निर्माण करावी लागणार आहे. मात्र या आव्हानाला समर्थपणे तोंड दिलं गेलं नाही तर ओहोटीला जास्त वेळ लागणार नसल्याचं चित्र सध्या तरी निर्माण झाला आहे.

स्व.गोपीनाथ मुंडे यांनी राज्याच राजकारण स्वतःभोवती केंद्रित केलं होतं. एक इशारा दिला तर अनेक आमदार आपला राजीनामा देण्यास कधीही तयार असत. त्यांना निवडून आणताना मुंडे साहेबांचे कष्टही तितकेच मोलाचे राहत असत. केवळ एवढ्या एकाच गोष्टीमुळे पक्षीय राजकारणात शेवटच्या काळामध्ये त्यांना त्रास झाला असला तरी त्यांच्याकडे फारशी वाकडी नजर पक्षातील  विरोधकांना कधीच करता आली नाही. तेवढी जरब त्यांनी निर्माण केली होती. त्यावेळेस विरोध केला तरी तो नैतिकतेला धरून केलेला असायचा. स्व पक्षातील असून किंवा विरोधक हे शिष्टाचार पाळणारे होते.जनमानसावरही साहेबांची पकड कायम होती. हीच गोष्ट पंकजा मुंडे यांना देखील या निवडणुकीत लक्षात घेणे गरजेचे आहे. पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणात पंकजा मुंडेंना देखील मोठा त्रास सहन करावा लागला. कदाचित महिला असल्यामुळे किंवा जनमानसात न मिसळल्यामुळे म्हणा किंवा जनतेला ते आपल्याला कधीच सोडणार नाहीत ते आपल्या मागेच राहणार या अति आत्मविश्वासामुळे दोन वेळेला पराभवाला सामोरे जावे लागले. विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून बंधू धनंजय मुंडे कडून पराभव स्वीकारावा लागला. त्या पराभवातूनही त्यांनी कुठलाच बोध घेतला नाही. जनतेला ग्राह्य धरण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे लोकसभेला देखील पराभवाला सामोरे जावे लागले. मराठा आंदोलन या पराभवाला कारणीभूत काही प्रमाणात असले तरी पंकजा मुंडे यांची वृत्तीच पराभवाला कारणीभूत ठरल्याचं स्पष्ट चित्र पाहायला मिळतं.

एकंदरच मुंडे साहेबांच्या निधनानंतर जनता पाठीशी उभी असली तरी त्याचा पाहिजे तितका फायदा पंकजा मुंडे यांना घेता आला नाही किंवा झाला नाही. उलट त्यांच्या राजकारणाला दिवसेंदिवस उतरती कळा लागली. हक्काचा मतदार संघ ही दुरावला गेला‌. पण शिल्लक असलेल्या पुण्याईवर त्या पुन्हा आमदार झाल्या. पण हे असंच कुठपर्यंत? होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंना तिकीट वाटपात आपल्या मर्जीतल्या नेत्यांना उमेदवारी मिळावी यासाठी जीव तोडून प्रयत्न करावे लागणार आहेत. ज्यांना मिळणार नाही त्यांना बंडखोरी करायला लावून का होईना पण निवडून आणण्यासाठी रसद पुरवावी लागणार आहे. राज्याच्या राजकारणात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवण्यासाठी 10 – 20 आमदार तरी निवडून आणावे लागणार आहेत. मग ते आपल्या पक्षातील असो बंडखोर असो की अन्य पक्षातील! जर असं करता आलं तरच येणाऱ्या काळात पक्षीय राजकारणात दखल घेतली जाईल. नाहीतर नुसतीच मेळाव्यामधून गर्दी किती जरी झाली. त्याचा फारसा फायदा पंकजा मुंडेंना होणार नाही. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता पंकजा मुंडेंचे पक्षातील विरोधक हे पाशवी महत्त्वकांक्षेचे आहेत. नैतिकता यांच्या शब्दकोषातही नाही. अनितीच राजकारण करणारे पंकजा मुंडेच्या पाठीमागे असलेलं एक गठ्ठा मतदान आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी पक्षश्रेष्ठीकडून “मुंडे” ब्रँडचा फक्त वापरच केला जाईल. ते मतदान एकदा पदरात पडलं की किमान तीन-चार वर्ष तरी मुंडे ब्रँडला फारशी किंमत नाही दिली तरी चालतं हे आज पर्यंतच अवलंबल्या गेलेली नीती आहे. आशा पक्षांतर्गत विरोधकांच्या कुरघोडींना सुरुंग लावण्याची वेळ या निवडणुकीत आली आहे.जर आपल्या हक्काचे काही आमदार निवडून आणण्यात यश आले तर पुन्हा राज्याच्या राजकारणात पंकजा मुंडे केंद्रस्थानी राहतील अन्यथा या संधीचं सोनं करता आलं नाही तर मात्र आणखी उतरती कळा लागायला वेळ लागणार नाही. बीडच्या जनतेला हे परवडणारं देखील नाही.

मराठा संघटनांनी दिला मोरजकर विरोधात आंदोलनाचा इशारा, मराठा विरोधी वागणूक सहन करणार नाही!

0

कुर्ला – माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर यांनी मराठा समाजातील ११ हून अधिक लोकांवर वेगवेगळ्या प्रसंगी खोटे ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केल्याचा धक्कादायक खुलासा संभाजी ब्रिगेड संघटनेने उद्धव ठाकरेंना पत्र लिहून केला होता. यानंतर प्रविणा मोरजकरांनी दाखल केलेले खोटे ॲट्रॉसिटीचे पुरावे देखील समोर आले होते. कुर्ल्यातील नेहरू नगर पोलीस स्टेशन मध्ये दोन मराठा समाजातील लोकांवर टाकलेल्या खोट्या ॲट्रॉसिटीचे गुन्हे एफ.आय.आर. स्वरूपात समोर आल्यानंतर मोरजकरांचे मराठा समाजाला दिलेले आव्हान संपुष्टात आले. या पार्श्वभूमीवर माजी नगरसेविका प्रविणा मोरजकरांच्या विरोधात स्थानिक मराठा समाजाने आणि अनेक मराठा संघटनांनी एकत्र येत कुर्ल्यातील मोक्याच्या परिसरात मोरजकर मराठा विरोधी असल्याचे बॅनर झळकवले. ज्यामुळे मोरजकरांच्या विरोधात असलेला प्रचंड रोष आणि माध्यमांतून जाहीर करण्यात आलेल्या त्यांच्या उमेदवारीवर मराठा समाज धगधगताना दिसला.

संभाजी ब्रिगेड संघटना ही ठाकरेंच्या शिवसेनेसह युतीत आहे, परंतु मराठा समाजाला त्रास देणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी मिळाली तर मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याचा आणि माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर यांच्या विरोधात काम करण्याचा सज्जड इशारा संभाजी ब्रिगेड संघटनेने दिला आहे. स्थानिक मराठा समाजासह इतर मराठा संघटनांनी बॅनरबाजीकरून आपला विरोध या आधीचं मोठ्या प्रमाणात दर्शवला आहे, मात्र जर मोरजकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली तर या सर्व मराठा संघटना आणि संपूर्ण मराठा समाज मोरजकर विरोधात आंदोलनात शामिल होतील आणि यावेळी बॅनरबाजीतूनच नाही तर रस्त्यावर उतरून जाहीर निषेध करतील. असे कुर्ल्यातील वातावरण आहे.

ठाकरेंची शिवसेना ही कुर्ल्यामध्ये अत्यंत प्रभावशाली दिसून येत आहे परंतु कुर्ल्यातील स्थानिक मराठा समाज, संभाजी ब्रिगेड व इतर मराठा संघटनेने माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर विरोधात दिलेली हाक ही ठाकरेंच्या शिवसेनेला बॅक फूटला टाकणारी आहे. मराठा समाजाने प्रविणा मोरजकर विरोधात दिलेला आंदोलनाचा इशारा हा आगामी कुर्ल्यातील निवडणुकीचे वारे बदलू शकतो.

फरार गुटखा माफीया महारुद्र मुळे च्या पीएसआय बाळराजे दराडेंनी मुसक्या आवळल्या

0

बीड – गुटखा तस्करी व विक्री प्रकरणात बीड ग्रामीण दिंद्रुड सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असलेला फरार आरोपी आबा उर्फ महारुद्र मुळे यास बीड ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे यांनी अटक केली.मागच्या सहा महिन्यांपासून पोलीसांच्या हातावर तूरी देण्यात यशस्वी होत होता.

बीड ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे यांना महारुद्र मुळे जमिनीच्या व्यवहारासाठी अंबडला असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार दराडे यांनी अंबडला धाव घेतली.यावेळी मुळे हा अंबडच्या बस स्थानकातील एका हॉटेलमध्ये नाश्ता करताना पोलिसांना दिसून आला.दराडे आणि ग्रामीण पोलीस कर्मचारी दिसताच मुळेने हॉटेलमधून पळ काढण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत दराडे यांच्या हाताला मोठी दुखापत झाली होती.बीड जिल्ह्यात गुटख्याची तस्करी आणि विक्री करण्यात मुळेचा मोठा सहभाग असल्याचे पोलीस तपासातूंन समोर आले होते.सिरसाळा येथे गुटख्याचा मोठा साठा 6 महिन्यापूर्वी जप्त करण्यात आला होता.यात मुळे मुख्य आरोपी होता.त्यानंतर दिंद्रुडमध्ये एक कंटेनरच पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यावेळी 70 लाखांचा गुटखा आणि बीड ग्रामीण पोलिसांनी दीड ते दोन महिन्यापूर्वी केलेल्या कारवाईत 30 लाखांच्या आसपास गुटखा ताब्यात घेतला होता.या तिन्ही प्रकरणात त्याच्यावर गुन्हे दाखल होते. मागच्या काही काळापासून मुळे बीड जिल्हयातून फरार होता.अखेर त्याला अंबडच्या बसस्थानकातून सपोनि बाळराजे दराडे यांनी ताब्यात घेतले.या कारवाईत सतीश मुंडे,नामदेव सानप,श्री.निर्धार यांचा समावेश होता.

न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी हटली! आता हातात तलवारी ऐवजी संविधान

0

नवी दिल्लीभारतीय न्यायव्यवस्थेने ब्रिटीशांचा काळ मागे टाकून नवे स्वरूप स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे केवळ चिन्हच बदलले नाही, तर न्यायदेवतेने वर्षानुवर्षे डोळ्यावर बांधलेली पट्टीही काढून टाकण्यात आली आहे.

आता कायदा आंधळा नसल्याचा संदेश सर्वोच्च न्यायालयाने देशाला दिला आहे.

सुप्रीम कोर्टात डोळ्यावर पट्टी नसलेला लेडी ऑफ जस्टिसचा अर्थात न्यायदेवतेचा नवा पुतळा उभारण्यात आला आहे. आता तलवारीऐवजी संविधान न्यायदेवतेच्या पुतळ्याच्या हातात दिसत आहे. काही काळापूर्वी ब्रिटीश कायद्यात बदल करण्यात आले आहेत. त्यानंतर आता न्यायदेवतेच्या नव्या रुपामुळे ही बदलांची नांदी ठरणार असल्याचे द्योतक दिसत आहे. देशात कायदा आंधळा नाही आणि तो शिक्षेचे प्रतीकही नाही असा संदेश देण्यासाठी तलवारीऐवजी संविधान पुस्तिकेची जागा घेतलेली दिसतेय.

न्यायदेवतेच्या पुतळ्याच्या डोळ्यावर पट्टी जी असते त्याचा अर्थ म्हणजे कायद्यासमोर सर्व समान आहेत आणि याचेच प्रतिनिधित्व करण्यासाठी ती होती, याचा अर्थ असा की न्यायालये समोर दिसणाऱ्या लोकांची संपत्ती, शक्ती किंवा स्थितीचे इतर चिन्हक पाहू शकत नाहीत, तर अधिकार आणि अन्यायाला शिक्षा देण्याची शक्ती दर्शवते.
सरन्यायाधीशांच्या सूचनेनुसार..

प्राप्त माहितीनुसार, सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांच्या आदेशानुसार सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींच्या वाचनालयातील नवीन पुतळ्याचे डोळे उघडे ठेवण्यात आले आहेत. या न्यायदेवतेच्चा डाव्या हातात संविधानाच्या जागी तलवार आहे, याकडेही एक प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. इंग्रजाच्या काळातील वारसा वारसा मागे सोडण्याचा हा एक भाग असू शकतो. याआधीच भारतीय न्याय संहिता सारख्या वसाहती काळातील फौजदारी कायद्याच्या जागी भारतीय न्याय संहिता लागू करण्यात आली आहे.

सरन्यायाधीशांच्या कार्यालयाशी संबंधित माहितीनुसार, न्यायमूर्ती चंद्रचूड यांचा असा विश्वास आहे की भारताने ब्रिटिश वारशातून पुढे जावे आणि कायदा कधीही आंधळा नसतो, तो सर्वांना समानतेने पाहतो. हा संदेश देण्यासाठी लेडी ऑफ जस्टिसचे स्वरूप बदलल्याचे द्योतक आहे. पुतळ्याच्या हातात तलवार नसून राज्यघटना असली पाहिजे, जेणेकरून देशाला एक संदेश जाईल की ती न्याय देतात. राज्यघटना ही तलवार हिंसेचे प्रतीक आहे पण न्यायालये घटनात्मक कायद्यांनुसार न्याय देतात.

तराजूचा अर्थ

न्यायदेवतेच्या उजव्या हातातील न्यायाचा तराजू आहे. तो तसाच आहे कारण तो समाजातील संतुलनाचे प्रतिनिधित्व करतो आणि निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी दोन्ही बाजूंच्या तथ्ये आणि युक्तिवादांचे न्यायालय सत्याच्या कसोटीवर वजन करतात.

तहसीलदाराची मुस्लिम विरोधी चंद्र “कला” मागच्या तारखेत निकाल देण्याची तयारी ?

0

बीड — मौजे वासनवाडी शिवारातील गट क्र. 150/अ मधील फेरफारात मंडळ अधिकाऱ्यांनी केलेल्या चुका कायम ठेवत खरेदीदाराचे खरेदी केलेले क्षेत्र घटवण्याचा घाट तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी घातला आहे.

तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्यावर पैठण पोलीस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल असल्या कारणाने त्यांना निवडणूक कामकाजातून वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागेवर ‌ नरेंद्र कुलकर्णी यांच्याकडे तहसीलदार पदाचा कारभार सोपविण्यात आला आहे. विभागीय आयुक्तांनी तसे आदेश दिले आहेत.

लाचेच शेण खाताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडलेला सचिन सानप या मंडळाधिकाऱ्याने हा फेर केला होता. मौजे वासनवाडी शिवारातील गट क्र.150/अ मधील फेरफार क्रमांक 3050 रद्द करण्यात यावा यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे जमील महंमद गुलाम अहमद यांनी तक्रार दाखल केली होती. हा फेर रद्द करून हे प्रकरण तहसीलदार बीड यांच्याकडे वर्ग करण्यात आले होते. या ठिकाणी प्रकरणाशी संबंधितास लेखी म्हणणे मांडण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी देऊन संधी देण्याचे निर्देश उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले होते. सदरील प्रकरण तक्रारदार जमील मोहम्मद यांच्या वकिलांनी अर्जदारांच्या वतीने म्हणणे मांडण्याची विनंती तहसीलदारांकडे केली होती. मात्र या प्रकरणातील तक्रारदार आणि ज्याचं क्षेत्र कमी करण्यात येणार आहे अशा कुणाला ही कुठलीही नोटीस नाही. आणि विशेष तक्रारदार चे वकील निकाल राखीव ठेवण्याच्या तारखेला बाहेर गावी होते तरी निकालासाठी प्रकरण ठेवले व जमील मोहम्मद गुलाम अहमद यांचं तसेच त्यांच्या वकिलाचं लेखी म्हणने सुध्दा घेतले नाही. या प्रकरणाची सर्व सुनावणीची पूर्वतयारी “नीलकमल”च्या वरच्या कप्प्यात बसून करण्यात आली अशी चर्चा आहे . आता याप्रकरणी मागील तारखेत निकाल देऊन तक्रारदाराचं खरेदी केलेले क्षेत्र कागदोपत्री कमी करण्याचा डाव आखला जात आहे. या प्रकरणात जी चूक सचिन सानप या लाचखोर मंडळ अधिकाऱ्यांने यांनी केली त्याच चुकीची “री”ओढण्याची तयारी तहसीलदार शेळके यांनी जातीयवादी चंद्र”कला” दाखवण्याची तयारी केली आहे .

मनोज जरांगें चा सरकारला इशारा; सुफडा साफ होणारच!

0

जालना — राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होताच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मान्य न झाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्र्यांना थेट इशारा दिला आहे.

आता तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
निवडणूक जाहीर होताच जरांगेंनी माध्यमांशी बोलताना मराठा समाजाला आवाहन केलं की, मराठ्यांनी १०० टक्के मतदान करावं, एकही मतदान वाया जाता कमा नये. कारण आता अशी वेळच आली आहे. त्यांना (भाजप) आपल्याला संपवायचं आहे. विधासभेसाठी आता वेगानं आपल्याला ताकद दाखवायची आहे.मागण्या मान्य करायच्या की नाही हे तुमच्या हातात होतं कारण तुम्ही सत्तेत होतात. पण आता मतं द्यायची की नाही हे मराठ्यांच्या हातात आहे. आमची लेकरं भिकारी बनवण्यासाठी मी सर्व शक्ती लावली. आमची लेकरं सत्तेत बसली नाही पाहिजेत यासाठी पूर्ण सत्तेचा तुम्ही गैरवापर केला. पण आता तुम्हाला खुर्तीवर बसून द्यायचं की नाही हे मराठ्यांच्या हातात आहे. तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय शांत बसत नाही आणि आताही बसत नाही. त्यांच्या १७ पिढ्या आल्या तरी या महाराष्ट्रात मराठ्यांना बाजुला ठेवून ते कधीच सत्तेत येऊ शकत नाही.

कारण इथं प्रश्न नुसता मराठ्यांचा नाही. इथं प्रश्न मुस्लिमांचा गोरगरीब दलितांचा आहे. विशेष म्हणजे इथं शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. तसंच इथं अठरापगड जातीचे लोक आहेत इथं गोरगरीब ओबीसींचा, धनगरांचा प्रश्न आहे.
माझी हात जोडून मराठ्यांना विनंती आहे की आता आपल्या समाजाला तुम्ही बळ आणि शक्ती द्यायचं काम करा. आत्तापर्यंत तुम्ही सभेला जाऊन करोडोची ताकद दाखवली. यावेळी १०० टक्के मराठ्यांचं मतदान झालं पाहिजे. एकाही मराठ्याचं मतदान घरी राहता कामा नये, एकही मतदान वाया जाता कामा नये, कारण शेवटी अस्तित्वाची लढाई तुमच्या मुलांची आहे, अशा शब्दांत मराठा समाजाला त्यांनी आवाहन केलं आहे.

शरद पवारांची निवडणूक आयोगाने फेटाळली चिन्हाची मागणी

0

नवी दिल्ली — निवडणूक आयोगाने आज 15ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र आणि झारखंड येथील विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. अनेक दिवसांपासून या निवडणूकांच्या तारखांची सर्व राजकीय पक्षांकडून वाट पाहिली जात होती.

दरम्यान महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज पत्रकार परिषद घेत याबद्दलची घोषणा करण्यात आले आहे.

यादरम्यान निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हाबद्दल देखील प्रश्न विचारण्यात आला. तुतारी आणि पिपाणी चिन्हामुळे लोकसभा निवडणुकीत मोठा गोंधळ झाला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पिपाणी चिन्ह फ्रीज करणार का? कारण तशी अशी शरद पवार यांच्या पक्षाकडून करण्यात आली होती‌.
यावर उत्तर देताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले की, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने 2 मागण्या केल्या होत्या, तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह लहान आहे ते मोठं करण्याची पहिली मागणी त्यांनी केली होती. दुसरी मागणी त्यांनी पिपाणी हे चिन्ह फ्रीज करण्याची केली होती. पहिली मागणी आम्ही मान्य केली आहे. आम्ही त्यांना लिखित स्वरूपात विचारल होतं की तुमचं चिन्ह कसं असाव ते सांगा.. त्यांनी दिलेल्या आकारातील पाहिला आकार आम्ही मान्य केला आहे. पिपाणी हे चिन्ह पूर्ण वेगळं आहे… त्याला आम्ही हात लावला नाही असेही त्यांनी स्पष्ट केलं.

विधानसभा निवडणुकीच बिगुल वाजलं 20 नोव्हेंबरला मतदान

0

नवी दिल्ली — निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. तर झारखंडमध्ये 13 आणि 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरलाच निकाल लागणार आहे. झारखंडमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत.

आज 15 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांसाठी पत्रकार परिषद घेत असल्याचं निवडणूक आयोगानं पत्रक प्रसिद्ध केलं आहे. प्रत्येक निवडणुकीची एक ठरलेली प्रक्रिया असते आणि ही प्रक्रिया कधी सुरू होते, तर निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यावर. निवडणूक आयोगानं विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करताच मॉडेल कोड ऑफ कंडक्ट अर्थात निवडणूक आचारसंहिता लागू होते. आता हे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणजे आचारसंहिता काय असते? अशा आचारसंहितेची गरज काय? यातले नियम काय सांगतात? जाणून घेऊयात.

महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये किती मतदार आहेत? मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, महाराष्ट्रात 9 कोटी 63 लाख मतदार असतील. येथे 5 कोटी पुरुष मतदार आहेत. येथील एक लाख मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. महाराष्ट्रात प्रत्येक बूथवर सुमारे 960 मतदार असतील. मुंबईत मतदान केंद्र वाढवण्यात आले आहेत.

राजीव यांनी सांगितले की झारखंडमध्ये 2 कोटी 60 लाख मतदार आहेत. येथे 1 कोटी 31 लाख पुरुष तर 1 कोटी 29 लाख महिला मतदार आहेत. झारखंडमध्ये 29 हजार 562 बूथवर मतदान होणार आहे.

महाराष्ट्रात विधानसभेच्या किती जागा आहेत?

महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत, त्यापैकी बहुमतासाठी 145 जागा आवश्यक आहेत. 2019 च्या निवडणुकीत भाजपला 105, शिवसेनेला 56, राष्ट्रवादीला 54, काँग्रेसला 44 आणि इतरांना 29 जागा मिळाल्या होत्या.

झारखंडमध्ये विधानसभेच्या किती जागा आहेत?

झारखंडमध्ये विधानसभेच्या 81 जागा आहेत. गेल्या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाने (जेएमएम) 30 जागा जिंकल्या होत्या आणि भाजपने 25 जागा जिंकल्या होत्या, तर 26 जागा इतर पक्षांना गेल्या होत्या. निवडणुकीत झामुमो सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता.

मतदानासाठी महत्त्वाच्या घोषणा

जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं यासाठी आपले प्रयत्न राहाणार असल्याचं निवडणूक आयुक्तांनी सांगितलं. सिनिअर सिटिझन्स आणि दिव्यांग व्यक्तींना घरातून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. संपूर्ण मतदान प्रक्रियेचं व्हिडिओ शुटिंग केलं जाणार आहे. मतदान केंद्राबाहेर जास्त रांग असेल तर मतदारांच्या सुविधेसाठी खुर्च्या ठेवल्या जाणार आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदावारांची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागणार आहे. पैसे, मद्य, ड्रग्स वाटप्यावर कडक नजर ठेवली जाणार आहे. मतदान केंद्र दोन किलोमीटरच्या आत असावेत असं सूचना करण्यात आल्या आहेत.

पोटनिवडणुकीच्या तारखाही जाहीर झाल्या

यूपीमध्ये 13 नोव्हेंबरला 9 जागांवर पोटनिवडणूक होणार आहे.

उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये 20 नोव्हेंबरला विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे.

वायनाडमध्ये 13 नोव्हेंबरला लोकसभा पोटनिवडणूक होणार आहे.

पोटनिवडणुकीचा निकालही 23 नोव्हेंबरला लागणार आहे.

महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये किती मतदार आहेत? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, महाराष्ट्रात 9 कोटी 63 लाख मतदार असतील. येथे 5 कोटी पुरुष मतदार आहेत. येथील एक लाख मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. महाराष्ट्रात प्रत्येक बूथवर सुमारे 960 मतदार असतील. मुंबईत मतदान केंद्र वाढवण्यात आले आहेत.

भगवानगडाचे चतुर्थ महंत कृष्णा महाराज शास्त्री

0

शिरूर — पाथर्डी  तालुक्यातील एकनाथवाडी येथील श्री क्षेत्र निरंजन संस्थानचे महंत ह. भ. प. श्री.कृष्णा महाराज शास्त्री यांची श्री क्षेत्र भगवानगडाचे चतुर्थ उत्तराधिकारी (महंत) पदी श्री क्षेत्र भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांनी त्यांचा पुढील उत्तरधिकारी म्हणून कृष्णा महाराज शास्त्री यांची निवड केली आहे.असून त्यांना सोमवारी एकनाथवाडी या ठिकाणाहून ग्रामस्थांनी सकाळी ८ वाजता रथामध्ये बसवून ढोल ,ताशा, टाळ, मृदंग, हरी नामाचा जयघोष करत महिला भगिनी व पुरुष मंडळी हातामध्ये झेंडे, पताका घेऊन कृष्णा महाराज यांना भगवानगडावरती पोहोचवले. एकनाथ वाडी पासून निघाल्यानंतर रस्त्यामधील मुंगसवाडे, श्रीपतवाडी ,मालेवाडी, खरवंडी कासार, किर्तनवाडी या ठिकाणी कृष्णा महाराज शास्त्री यांचे लोकांनी भव्य असे स्वागत करण्यात आले. रस्त्याने जिकडे तिकडे गर्दीच गर्दी होती. ठिकठिकाणी जेसीबीच्या साह्याने फुलाचा वर्षावही करण्यात आला. श्री संत भगवान बाबा की जय, नामदेव महाराज शास्त्री की जय अशा घोषणा देत सर्व भाविक मंडळी भगवान गडाकडे पायी वाटचाल करत होती.

कृष्णा ‌महाराज यांच्या विषयी सांगायचे म्हणजे त्यांचे मूळ गाव तेलंगणा असून ते बारा वर्षांपूर्वी भगवानगडावरती आले. ज्ञानेश्वरी चे संपूर्ण शिक्षण भगवानगडावरील ज्ञानेश्वरी विद्यापीठामध्ये झाले. त्यांचे
एम ए पर्यंतचे शिक्षण झालेले आहे. त्यांनी बारा वर्षे ज्ञानेश्वर चे संपूर्ण शिक्षण डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्याकडून घेतले आहे. त्यांना तीन वर्षांपूर्वी एकनाथवाडी येथील निरंजन संस्था या ठिकाणी महंत म्हणून राहिले आहेत. भगवान गडावरील उत्तराधिकारी या विषयीचे ऑफिसिली ठराव झालेले आहेत. गडावरती श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या मंदिराचे काम सुरू असून ते काम 2026 ला पूर्ण होणार आहे. त्याच वर्षी भगवानगडाचा अमृत महोत्सव असून या अमृत महोत्सवामध्ये नवनियुक्त महंत कृष्णा महाराज शास्त्री यांना गादीचे हस्तांतर करण्यात येईल असे डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांनी सांगितले. पुढील काळामध्ये कृष्णा महाराज शास्त्री हे भगवानगड व भगवानगडाचा विकास करतील याचा संपूर्ण विश्वास मला आहे. या सर्व गोष्टींचा विचार करूनच मी कृष्णा महाराज शास्त्री यांची निवड केली आहे. भविष्यामध्ये अशाच माणसाची गरज भगवानगडाला आहे. अशा पद्धतीचा शब्दही त्यांनी मला दिला आहे, असे यावेळी शास्त्री यांनी सांगितले. एकनाथवाडी ग्रामस्थांनी कृष्णा महाराज शास्त्री अचानक गडावरती नियुक्त झाल्यामुळे त्यांच्यामध्ये दुःखाचे वातावरण निर्माण झाले. परंतु एकीकडे त्यांना आनंद झाला.

यावेळी दोन ते तीन हजार महिला भगिनी, पुरुष मंडळी, संत मंडळी हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. सायंकाळी पाच वाजता कृष्णा महाराज हे भगवानगड वरती पोहोचल्यानंतर भगवानगडाचे प्रधान आचार्य नारायण स्वामी जी महाराज यांनी एकनाथवाडी ग्रामस्थ यांचे भगवान बाबांची प्रतिमा देऊन स्वागत केले. या स्वागतावेळी भगवानगडाचे संपूर्ण विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.