Home कृषी २०२६-२७ खरीप हंगामासाठी एमएसपी (MSP) वाढ जाहीर; सूर्यफूल, कापूस, तूरीला फायदा

२०२६-२७ खरीप हंगामासाठी एमएसपी (MSP) वाढ जाहीर; सूर्यफूल, कापूस, तूरीला फायदा

0
13

केंद्र सरकारने २०२६-२७ खरीप हंगामासाठी १४ पिकांच्या MSP मध्ये वाढ जाहीर केली. सूर्यफूल बिया, कापूस, तूर, सोयाबीन, तीळ यांना मोठा फायदा. जाणून घ्या नवीन MSP दर आणि शेतकऱ्यांवरील परिणाम.

खरीप पिकांच्या एम एस पी (MSP) मध्ये मोठी वाढ, तूर-कापूस-सूर्यफूल दर वाढले

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi )यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत २०२६-२७ च्या खरीप विपणन हंगामासाठी १४ प्रमुख खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतींमध्ये (MSP) वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला अधिक हमीभाव मिळणार आहे.


केंद्र सरकारच्या निर्णयानुसार यंदा सूर्यफूल बियांच्या MSP मध्ये सर्वाधिक ₹६२२ प्रति क्विंटल वाढ करण्यात आली आहे. त्याखालोखाल कापूस ₹५५७, कारळे (नायजरसीड) ₹५१५, तीळ ₹५०० आणि तूर ₹४५० प्रति क्विंटलने वाढविण्यात आले आहेत.
सरकारने स्पष्ट केले की, २०१८-१९ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे MSP हा अखिल भारतीय सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट पातळीवर निश्चित करण्यात आला आहे.

२०२६-२७ खरीप पिकांचे नवीन MSP दर. पिक

२०२६-२७ MSP    २०२५-२६ MSP.    ‌   वाढ

तांदूळ (सर्वसाधारण)

₹२,४४१.                  ₹२,३६९.               ₹७२

तांदूळ (ग्रेड A).         

₹२,४६१.                  ₹२,३८९.               ₹७२
ज्वारी (हायब्रीड)
₹४,०२३.                  ₹३,६९९.             ₹३२४
ज्वारी (मालदांडी)
₹४,०७३.                   ₹३,७४९.             ₹३२४
बाजरी
₹२,९००.                   ₹२,७७५.            ₹१२५
नाचणी
₹५,२०५.                  ₹४,८८६.            ₹३१९
मका
₹२,४१०.                   ₹२,४००.            ₹१०
तूर
₹८,४५०.                 ₹८,०००.             ₹४५०
मूग
₹८,७८०.                  ₹८,७६८.             ₹१२
उडीद

₹८,२००.                ₹७,८००.           ₹४००
शेंगदाणा
₹७,५१७.             .     ₹७,२६३.        ₹२५४
सूर्यफूल बिया
₹८,३४३.                   ₹७,७२१.        ₹६२२
सोयाबीन (पिवळा)
₹५,७०८.                   ₹५,३२८.          ₹३८०
तीळ
₹१०,३४६.                ₹९,८४६.          ₹५००
कारळे (नायजरसीड)
₹१०,०५२.               ₹९,५३७.            ₹५१५
कापूस (मध्यम धागा)
₹८,२६७.                 ₹७,७१०.          ₹५५७
कापूस (लांब धागा)
₹८,६६७.                  ₹८,११०.            ₹५५७

कोणत्या पिकांना सर्वाधिक फायदा?

यंदाच्या एम एस पी ( MSP) वाढीत तेलबिया आणि कडधान्यांना मोठे प्राधान्य देण्यात आले आहे. विशेषतः सूर्यफूल, कापूस, तूर, उडीद आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
सरकारच्या माहितीनुसार मूग पिकावर शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर तब्बल ६१ टक्के अपेक्षित नफा मिळणार आहे. त्यानंतर बाजरी आणि मका प्रत्येकी ५६ टक्के, तर तूर पिकावर ५४ टक्के नफा अपेक्षित आहे.
सरकारचा भर कडधान्ये आणि श्री अन्नावर
केंद्र सरकारने मागील काही वर्षांपासून कडधान्ये, तेलबिया आणि पौष्टिक तृणधान्ये अर्थात “श्री अन्न” यांच्या उत्पादनाला चालना देण्यावर भर दिला आहे. MSP वाढीद्वारे शेतकऱ्यांना या पिकांकडे वळवण्याचा प्रयत्न होत असल्याचे मानले जात आहे.

एम एस पी (MSP) अंतर्गत खरेदीत मोठी वाढ

सरकारच्या आकडेवारीनुसार २०१४-१५ ते २०२५-२६ या कालावधीत धान खरेदी ८,४१८ एलएमटीपर्यंत पोहोचली असून, २००४-०५ ते २०१३-१४ या कालावधीत ती ४,५९० एलएमटी होती.
तसेच १४ खरीप पिकांच्या शेतकऱ्यांना एम एस पी ( MSP) अंतर्गत २०१४-१५ ते २०२५-२६ या काळात तब्बल १८.९९ लाख कोटी रुपयांचे भुगतान करण्यात आले आहे. मागील कालावधीत ही रक्कम ४.७५ लाख कोटी रुपये होती.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here