बीड : राष्ट्रीय महामार्गावरील “भेगा” मिटेना अन् प्रशासनाची “टीर ” बडवण्याची हौस फिटेना

बीड — जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाला जागोजागी मोठ्या भेगा पडलेल्या असुन या भेगांमध्ये दुचाकी वाहने अडकुन झालेल्या अपघातांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असुन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेकांना अपंगत्व आले आहे. सामाजिक कार्यकर्त्यांकडून दर्जेदार दुरूस्तीसाठी वांरवार निवेदने,आंदोलनाद्वारे पाठपुरावा करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमएससीआरडी आणि जिल्हा प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नसतानाच बीड जिल्हा प्रशासन मात्र जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या नावाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या बैठकीत जिल्ह्यातील रस्ते अपघातातील मृत्युंच्या प्रमाणात ३३ टक्क्यांची लक्षणीय घट झाली असुन या प्रभावी कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्यात बीड जिल्हा रस्ते सुरक्षेच्या बाबतीत दुसरा क्रमांक पटकावला असल्याची माहिती देत स्वत:ची टीर बडवुन घेताना दिसत असल्याची संतप्त प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबाणेशकर यांनी दिली आहे.


बीड जिल्ह्यातुन जाणारे खामगाव ते पंढरपूर, अहमदपूर ते अहिल्यानगर, पैठण ते पंढरपुर आदी राष्ट्रीय महामार्गांवर मोठमोठ्या भेगा पडलेल्या असुन भेगांमध्ये दुचाकीचे चाक अडकुन मागील ४ वर्षात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी काटेरी बाभळी आल्याने वाहनधारकांना अडथळा येत आहे तर काही ठिकाणी दुभाजकाच्या आजुबाजुला मोठ्या प्रमाणात माती साचल्याने वाहने घसरून पडण्याच्या घटना घडलेल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते यांनी लेखी तक्रारी केल्यानंतर दर्जेदार सिमेंट ब्लॉक कट करून दुरुस्ती करण्याऐवजी डांबरीकरण करून रस्त्याच्य भेगा थातुरमातुर बुजवण्यात येत असुन जिल्हा प्रशासनाचे याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याचे बोलले जाते.

रस्ते सुरक्षा समितीच्या अध्यक्ष आणि सचिवांच्या आदेशाला कंत्राटदारांकडून केराची टोपली

रस्ते सुरक्षासारख्या गंभीर विषयावर आयोजित केलेल्या बैठकीला व्हिडिओ कान्फरन्सद्वारे उपस्थित न राहिलेल्या सदस्यांबाबत जिल्हाधिका-यांनी तिव्र नाराजी व्यक्त करून कामात हलगर्जीपणा करणा-या संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असली तर रस्ते सुरक्षा समितीचे अध्यक्ष आणि सचिव यांच्या आदेशाला कंत्राटदारांकडून सुद्धा केराची टोपली दाखवली जाते. बीड तालुक्यातील अहमदपूर ते अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी मार्गावर लिंबागणेश येथील भालचंद्र विद्यालयासमोरील अपघात प्रवणक्षेत्राची दि.२६ जुन २०२५ रोजी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि रस्ता सुरक्षा समितीचे सचिव कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग रविंद्र तोंडे यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली होती.या अनुषंगाने दि.६ नोव्हेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने गतिरोधक बसविण्याबाबत लेखी आदेश काढले होते. ६ महिने उलटुनही अद्याप गतिरोधक बसविण्यात आले नसुन कंत्राटदाराने या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे दिसून येत आहे त्यामुळे एकंदरीतच जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि कंत्राटदार दोघांवरही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles