महावितरणचा मोठा निर्णय! आता वीजपुरवठा सकाळी 7 ते 11 राहणार बंद

मुंबई — उन्हाच्या तीव्र तडाख्यात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महावितरण (MSEDCL) कडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता वीज यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीची पूर्वनियोजित कामे फक्त सकाळी 7 ते 11 वाजेदरम्यानच करण्यात येणार असून, या वेळेतच वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.

 आधी काय स्थिती होती?

यापूर्वी देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी सकाळी 10 ते दुपारी 2 किंवा 4 वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद ठेवला जात होता. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन कामांवर मोठा परिणाम होत होता आणि गैरसोयीच्या तक्रारी वाढल्या होत्या.

🌞 उन्हाळा व पावसाळ्याची तयारी

उन्हाळ्यात विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. तसेच पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी महावितरणकडून आधीच देखभाल-दुरुस्तीची कामे केली जातात. ही कामे साधारणतः मे महिन्याच्या अखेरीस पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले जाते.

असे आहेत नवीन निर्देश 

महावितरण मुख्यालयाकडून क्षेत्रीय कार्यालयांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत: देखभाल व दुरुस्तीची कामे फक्त सकाळी 7 ते 11 या वेळेत करावीत नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी वेळेत बदल. ग्राहकांना SMS द्वारे पूर्वसूचना देणे बंधनकारक, प्रसारमाध्यमांद्वारे माहिती देणे, शक्य असल्यास पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध करून देणे.

असा होणार फायदा

दुपारच्या उकाड्यात वीज खंडित होणार नाही,दैनंदिन कामांमध्ये अडथळा कमी,नियोजित वीजपुरवठा बंदची आधीच माहिती मिळणार

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles