बीड — जिल्हा सध्या इव्हेंट(event) आणि स्टंटबाजीच्या विळख्यात सापडला आहे. हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत (Green Maharashtra Campaign )हरित बीडचा इव्हेंट साजरा केला जाणार आहे. एकाच दिवसात तीस लाख वृक्ष लागवड करून देश पातळीवर नवा विक्रम करण्याची विवेकी संकल्पना (Concept) मांडली गेली. उपक्रम (Activities)चांगला आहे प्रत्येक नागरिकाची वृक्ष लागवड ही जबाबदारी आहे. मात्र तुती(Mulberry tree) सारख्या झुडपाला वृक्षाचा दर्जा देऊन स्टंटबाजी केली जात असेल तर बेसरमालाही वृक्षाचा दर्जा दिला असता तर “दिसला खड्डा खव काटूक “मोहीम राबवता आली असती. यातून रस्त्यावर निर्माण झालेल्या खड्ड्यांना ही सहभागी होता आलं असतं. खड्डे खणण्याचा खर्चही वाचला असता. तीस लाखच काय तीस कोटी वृक्ष लागवड होऊन जिल्हा ॲमेझॉन (Amazon)जंगलासारखा झाला असता. तूतीला वृक्षाचा दर्जा देऊन केलेला हा इव्हेंट म्हणजे रातभर पाखडलं, काही नाही सापडलं आशाचं इव्हेंट च्या जाळ्यात अजित दादांचं गाड अडल असं म्हणण्याची वेळ आली आहे.जिल्ह्याच्या बदनामीचं हे नव षडयंत्र असल्याचं जनतेत बोललं जाऊ लागला आहे.

जिल्हाधिकारी (collector) विवेक जॉन्सन (Vivek Johnson) जिल्ह्यात आल्यानंतर ते तरुण असल्यामुळे प्रशासकीय व्यवस्थेत (Administrative system) बदल होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र इव्हेंट ची जॉन्सन मलमपट्टी करून रडतीचे डोळे पुसण्याचा प्रकार केला जात असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. प्रामाणिकपणाने वृक्ष संवर्धनाचाच काम करायचा आहे तर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध आरा गिरण्यांकडे (Illegal sawmills)त्यांनी दुर्लक्ष का केले आहे. वन विभागाला आतापर्यंत किती कारवाया केल्या अवैध वृक्षतोडीवर (Illegal logging) का आळा घातला नाही म्हणून धारेवर का धरले नाही हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे शेकडो वर्ष जगणारी वृक्षतोड करायला कायदे, चौकशी आदेशाचे लखोटे गुंडाळून बासनात बांधायचे अन दुसरीकडे स्टंटबाजी साठी तूतीला ही वृक्षाचा दर्जा देऊन इव्हेंट साजरा करायचा तोही अजित पवार सारख्या सुजाण नेत्यासमोर हे बीडच्या जनतेला मात्र पचणार नाही. अजित दादा या प्रकारावर जिल्हाधिकाऱ्यांना कानपीचक्या देतीलच अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात आजपर्यंतचा विकासाच्या नावाखाली होत असलेली वृक्षतोड आणि रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांचा विचार केला तर सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक वेळा या खड्ड्यांमध्ये बेशरमाची झाड लावली. त्यातूनच अधिकाऱ्यांच्या कर्तबगारीने बोडखा झालेला जिल्हा हरित करण्यासाठी जॉन्सनची मलमपट्टी करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी तुतीला जसा वृक्षाचा दर्जा दिला तसा बेसरमालाही दिला असता तर वेगळे खड्डे खांदून सरकारी तिजोरी रिकामी करायची वेळ आली नसती. आयत्या रस्त्यावरच्या खड्ड्यावरच बेशरमाचं काटुक खवून विक्रमाचा इव्हेंट साजरा करता आला असता. तीस लाख काय तीस कोटी वृक्ष लागवड देखील एकाच दिवसात पार पडली असती. महिना दीड महिन्यात ॲमेझॉन (Amazon)जंगलात स्वरूप जिल्ह्याला प्राप्त झालं असतं. हा एक नवा जागतिक विक्रम (world record)जिल्ह्याच्या नावावर नोंदला गेला असता. तीन वर्षानंतर तुतीची झाडं शेतकऱ्यांनी तोडल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या विवेकी जॉन्सन मलमपट्टीने जिल्हा पुन्हा बोडखा होणार नाही काय? विक्रमासाठी तुतीची झाड, कापसाची झाड वृक्ष म्हणून गणतीत धरायची काय? जर ती धरायची तर बेसरमाच्या झाडांनीच काय घोडं मारलं? कमीत कमी अजितदादा (Ajit Pawar) आपल्यासारख्या जमिनीवर पाय असणाऱ्या नेत्यांनी तरी आशा इव्हेंटला बळी पडायला नको एवढीच जनतेकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

