बीड — गोदावरी पात्र ज्या भागातून जाते त्या गेवराई अंबड भागात केलेलं काम; त्यातून वाळू माफियांची निर्माण झालेले हितसंबंध पुन्हा बीड सारख्या ठिकाणीच मिळालेल्या नियुक्तीने दिवसेंदिवस वाळू माफियांच्या चंद्र(कांत)कला वाढत असून बीड तहसील मधला वावर वाढला आहे. परिणामी तहसीलदार पदाच्या कर्तव्याची भूमिका शेळ(के)पटत चालली आहे.
गेवराई तहसील चा कारभार असो की अंबड तहसील चा गोदापात्राशी निकटचा संबंध तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचा आला. त्यातूनच वाळू माफीयांशी घनिष्ठता देखील वाढली गेली. त्यातच बीड सारख्या ठिकाणी पुन्हा तहसीलदार पदावर नियुक्ती मिळाली. मग काय? दुधात साखर पडली.वाळू माफिया व शेळके मध्ये असलेला घरोबा महसूल विभाग कमी स्व हितसंबंधासाठी उपयोगी ठरू लागला. यातूनच गेवराईतील बड्या नेत्याचा वरदहस्त “चंद्र”कला दाखवण्यास पुरेसा ठरला. गेवराई, बीडची खडा न खडा असलेली माहिती चोरट्या वाळू वाहतुकीला बळ देणारी ठरली. यातूनच पाडळशिंगी टोल नाका टिप्परला अडचणीचा ठरू नये यासाठी टोलनाका एक किलोमीटर राहिलेला असतानाच धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग सोडून खेड्यात टिप्पर नेले जातात. टोलनाक्याला वळसा घालून जवळच्या खेड्यातील रस्त्यांचा वापर करून राजरोस केलेला वाळू उपसा बीडच्या बाजारपेठेत विकणे माफीयांसाठी सुलभता आणणारा ठरला. यातून लाखो रुपयांची कमाई वाळू माफीयांना तर होतच आहे. शिवाय तहसीलदार यांना देखील यातील मोठा हिस्सा मिळू लागला आहे. यातून बीडच्या तहसीलमध्ये सर्वसामान्य जनतेचा वावर कमी माफियांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गेवराई भागातील बहुतांश वाळू माफिया शेळके यांच्या संपर्कात रात्रंदिवस आहेत. यातून महसूल विभागाला कोट्यावधीचा चुना रोज लावला जात आहे. एवढच नाही तर आपली खाजगी खास माणसं वाळू माफीयांना गैरसोयीचं होऊ नये देवाण घेवाण सोपी व्हावी यासाठी गेवराईतील काही वाळू माफिया तहसील कार्यालयात वावरताना दिसून येत आहेत .या सर्व प्रकाराला नवीन आलेले जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन लगाम लावणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

