वाशी(धाराशिव) — तालुक्यातील कोठावळे पिंपळगाव मध्ये उत्तर प्रदेश मधील 19 ऊसतोड मजुरांसह 15 मुलांना पोलीस ठेवले गेले होते.तब्बल 45 दिवसापासून गायब असलेल्या या मजुरांच्या टोळीची तीन दिवसाच्या शोध मोहिमेनंतर सुखरूप सुटका करण्यात आली.
उत्तर प्रदेश मधील ऊस तोडी साठी आलेले 19 मजूर 15 मुलांसह अचानक एका एकी गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. तर 3 दिवसाच्या शोधानंतर मजूरांची माहिती मिळाली आणि आता त्यांची सुटका करण्यात आली आहे.या प्रकरणी मजुरांना घेऊन येणाऱ्या दोन ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान उत्तर प्रदेशमधील ललितपुर जिल्ह्यातील हे मजूर असून या मजुरामध्ये 11 पुरुष, 8 महिलांचा समावेश आहे. तसेच त्यांच्यासह 15 मुलांची यातून आता सुटका करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे, थेट उत्तर प्रदेशमधील ललितपुर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून या बाबत तक्रार दिली असता ही सुटका करण्यात आली आहे.ललितपूर जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र येताच धाराशिवच्या जिल्हाधिकारी यांनी कामगार विभागाला या मजूरांना शोधून काढण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या प्रकरणाच्या हालचालींना वेग आला आणि अखेर त्यांची सुटका करण्यात आली आहे.

