Home राजकीय जन आक्रोश मोर्चा:सहिष्णुता, नम्रता , शांतता हिंदूनेच बाळगायची का? — आ. महेश...

जन आक्रोश मोर्चा:सहिष्णुता, नम्रता , शांतता हिंदूनेच बाळगायची का? — आ. महेश लांडगे

0
5

लोकसंख्या वाढीमुळे हा उन्माद वाढतो – आमदार संग्राम जगताप

नेकनुर — आमची भगिनी व्यासपीठावर येऊन रडत असेल तर आम्ही षंढ झालोत का संहीष्णता फक्त आमचीच का नम्रता आमच्याकडेच पाहिजे का सर्वधर्म समभाव आम्हीच पाळायचा का आम्ही छत्रपती शिवरायांच्या, संभाजी महाराजांच्या विचाराने चालतो पण ज्यांना येथील संविधान मान्य नाही, घटना ,कायदे मानत नाहीत त्यांना येथे राहण्याचा अधिकार नाही इथून पुढे आम्ही अन्याय केल्यास उठाव दांडे असा इशारा पुण्याचे आमदार महेश लांडगे यांनी नेकनूरमध्ये आयोजित जनआक्रोश मोर्चाच्या व्यासपीठावर दिला.

यावेळी आमदार संग्राम जगताप,मठाधिपती लक्ष्मण मेंगडे महाराज , ह भ प नाना महाराज कदम , राम महाराज डोंगरे , मा जी प सदस्य भारत काळे यांची उपस्थिती होती. या वेळी पीडित कुतुबियांनी झालेल्या घटना व्यक्त केल्या त्यामध्ये बीड येथील सानप आणि बीड येथील ज्ञानेश्वर निर्मळ तर बाळापूर येथील रणजीत लोखंडे आणि त्याच्या बहीण आणि भाचीवर झालेल्या मारहाणी बाबत यांनी घडलेल्या अन्यायाबाबत मत व्यक्त केले

भारताची जनगणना झाल्यानंतर आकडेवारी समोर आली तर त्यांची लोकसंख्या चाळीस कोटीपर्यंत पोचलेली असेल हे लक्षात ठेवा त्यामुळेच हा उन्माद वाढलेला आहे त्यामुळे जातीपातीत विखरून राहण्यापेक्षा हिंदू मनून अन्याय झाल्यानंतर एक व्हा यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान मान्य नाही वेगवेगळे जिहाद वाढत आहेत आदी बाबीवर आमदार संग्राम जगताप यांनी नेकनुर येथील जन आक्रोश मोर्चात वाढत चाललेल्या घटनेचा समाचार घेतला.

आमदार जगताप यांनी मोर्चा आयोजित करणाऱ्या बांधवांना धन्यवाद देत सदैव मदतीला धावणाऱ्या काळे बंधूंची भाषणात दखल घेतली. जगताप यांनी वाढते जिहाद यावर कटाक्ष टाकत सावध राहण्याचे आवाहन केले. अन्याय केल्यानंतर राजकारणी मिटवामिटवी करण्यासाठी धावतात आणि हेच मिटवता मिटवता आता त्यांची हिंमत वाढली आणि सहा वर्षाच्या मुलीवर हात घालण्याची हिंमत आली अन्याय होऊनहीं आपण आपल्या माणसाच्या मागे उभे राहण्यास कमी पडतो हे दुर्दैवी आहे. जातीपातीत विखरून राहण्यापेक्षा हिंदू म्हणून एक होऊन राहा . बीडच्या घटना आम्हाला नेहमीच विविध लोकांकडून जवळचे असल्याने ऐकायला येतात शासकीय जमीन तिथे अतिक्रमण यांची आर्थिक नाकाबंदी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या वेळी प्रास्ताविक रवींद्र काळे यांनी केले तर आभार सरपंच लालासाहेब सालुगडे यांनी मानले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here