Home Blog Page 69

डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केलं अन् अंत्यसंस्कारा वेळी ते रडू लागल

0

अंबाजोगाई — जन्म घेताच नवजात बालकाला डॉक्टरांनी मृत घोषित केलं दुःखी कुटुंब बाळाला घेऊन गावाकडे गेले अंत्यसंस्काराची तयारी केली. त्याचवेळी बाळाने अचानक टाहो फोडला. उपस्थितां मध्ये आनंदाचा वातावरण निर्माण झालं. ही घटना अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात उघडकीस आली ‌पण वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

केज तालुक्यातील होळ येथील रहिवासी घुगे कुटुंबाच्या नवजात बाळाला मृत घोषित केल्यानंतर अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच बाळ अचानक रडू लागल्याने नातेवाईकही थरथर कापले.
मिळालेल्या माहितीनुसार,केज तालुक्यातील होळ येथील रहिवासी घुगे कुटुंबातील
महिलेला प्रसुतीसाठी अंबाजोगाई च्या स्वामी रामानंद वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रसुतीनंतर डॉक्टरांनी बाळ मरण पावल्याचं सांगितलं. कुटुंबीय बाळाला आपल्या गावी घेऊन गेले आणि अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली.मात्र या तयारी दरम्यान बाळाने अचानक रडायला सुरुवात केली. हा प्रकार पाहून नातेवाईक आश्चर्यचकित झाले. त्यांनी तत्काळ परत अंबाजोगाई येथील रुग्णालय गाठलं आणि बाळाला तातडीने अति दक्षता कक्षात दाखल केलं. ही घटना घडल्यानंतर रुग्णालय प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.डॉक्टरांनी मृत घोषित केलेलं बाळ जिवंत निघणं, ही बाब केवळ धक्कादायक नसून संतापजनकही आहे. हा अक्षम्य दुर्लक्षाचा प्रकार आहे की उपचार प्रक्रियेत काही चूक झाली होती, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. विशेष म्हणजे, बाळाच्या कुटुंबीयांनी अद्याप रुग्णालय प्रशासनाकडे कुठलीही तक्रार दाखल केलेली नाही. या घटनेनंतर रुग्णालयाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नवजात बाळांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

शिक्षण विभागातील अनेक गंभीर घोटाळे बाहेर काढल्यामुळे माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला : इंजि. सादिक इनामदार

0

“प्रामाणिक समाजसेवकांवर खोटे गुन्हे ही लोकशाहीची शोकांतिका इंजि. सादेक इनामदार यांची पत्रकार परिषदेत भावनात्मक प्रतिक्रिया

बीड — भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि निस्वार्थ समाजसेवेसाठी ओळखले जाणारे सामाजिक कार्यकर्ते इंजिनिअर सादिक इनामदार यांच्यावर दाखल करण्यात आलेला विनयभंगाचा गुन्हा खोटा असून तो सूडबुद्धीने दाखल करण्यात आला आहे, असा आरोप त्यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला.

बीड येथील शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या या पत्रकार परिषदेत इनामदार यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की मी आजवर अनेक भ्रष्टाचार प्रकरणांची चौकशी व उकल केली आहे. जिल्हा परिषदेतील शिक्षक भरतीतील कथित गैरप्रकार उघडकीस आणल्यामुळेच माझ्यावर दबाव आणण्यासाठी व बदनाम करण्यासाठी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती प्रियाराणी पाटील यांच्या द्वारे खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. ते पुढे म्हणाले की, गुन्हा दाखल झाला तेव्हा मी धारूर पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित होतो, त्याचबरोबर, वैध शस्त्र परवाना असूनही कोणताही गैरवापर न करतानाही माझा शस्त्र परवाना रद्द करण्यात आला, हे माझ्या सुरक्षेसाठी अत्यंत गंभीर आहे.

माझ्या जीवाला काही धोका झाला, तर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक जबाबदार असतील,” असा थेट इशाराही त्यांनी दिला.

पत्रकार परिषदेद्वारे इंजिनीयर सादिक इनामदार यांनी खालील मागण्या केल्या दाखल खोटा गुन्हा तात्काळ मागे घ्यावा. शिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील यांच्यावर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे.माझ्या जीवितास धोका असून मला तात्काळ शस्त्र परवाना परत बहाल करण्यात यावा जर या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर अनेक सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही इनामदार यांनी दिला.

विनाअनुदानित शिक्षकांना दिलासा; सरकारने केल्या मागण्या मान्य

0

मुंबई — गेल्या चार दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानात विनाअनुदानित शिक्षकांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरु आहे.
तर आता या आंदोलनाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. विनाअनुदनित शिक्षकांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या असल्याची घोषणा राज्याचे मंत्री गिरीष महाजन यांनी केली आहे. यामुळे विनाअनुदानित शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मंत्री गिरीष महाजन यांनी आंदोलनस्थळाला भेट देत ही मोठी घोषणा केली आहे.
यावेळी मंत्री गिरीष महाजन म्हणाले की, आमची जी भूमिका आहे ती सकारात्मक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणि सरकारला तुमची काळजी आहे. आम्हाला माहिती आहे की, आपण सामन्य कुटुंबातील आहात. तुमची रोजीरोटी ही आहे. त्यामुळे धाडसी निर्णय फडणवीसांनी घेतला आहे. त्यानुसार 20 टक्के, 40 टक्के त्यानंतर 60 टक्के पगार खात्यात जमा केला जाणार आहे. सरकारी तिजोरीवरील आर्थिक संकटामुळे आमच्याकडून पुढचे टप्पे देण्यास उशीर झालेला आहे. मात्र आता तुमचा प्रश्न मार्गी लागला आहे. तुमच्या शिक्षकांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत हे ठरलं की, आम्हाला तुमच्या खात्यात पगार टाकायचाच आहे. पण या दोन-तीन दिवसात सर्व तांत्रिक बाजू समाजावून घेऊन 18 जुलैला अधिवेशन संपेल तेव्हा तुमच्या खात्यात पैसे पडलेले असतील आणि यात कोणताही बदल होणार नाही. असं मंत्री गिरिष महाजन म्हणाले.तर दुसरीकडे विनाअनुदानित शिक्षकांना न्याय मिळावा या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे , राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यासह आमदार रोहित पवार यांनी देखील शिक्षकांची भेट घेत राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

ड्रीम 11, रमी ॲपमध्ये पैसे बुडाले; कर्ज फेडण्यासाठी सहायक फौजदार बनला चोर

0

बीड –ड्रीम एलेव्हन व रमी ॲपमध्ये पैसे बुडाले. लोकांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी पोलिसच चोर बनल्याचे तपासात समोर आले आहे. त्याच्यासोबत आणखी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने उशिरा केली.पोलिस अधीक्षक कार्यालयातून 12 व्होल्टच्या 58 बॅटऱ्या चोरल्या. त्यात जामीन होताच पुन्हा सात दुचाकी या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने चाेरल्या.
अमित मधुकर सुतार वय 35 वर्ष, रा. खोकरमोहा, ता. शिरूर कासार अस सहाय्यक फौजदाराचं नाव आहे. ऑनलाइन जुगारात पैसे हरल्याने कर्ज फेडीसाठी त्याने हे कृत्य केल्याचे तपासातून समोर आले आहे. अमित सुतार हा पोलिस अधीक्षक कार्यालयात वायरलेस विभागात कार्यरत होता. त्याने डिसेंबर 2024 मध्ये कार्यालयातील 10 बॅटऱ्या चोरल्या होत्या.

अधिक तपासात त्याच्याकडे 58 बॅटऱ्या आढळल्या होत्या. याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन त्याला अटकही झाली. त्यानंतर पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली.
पूर्वीच्या चोरीच्या गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने स्वराज कोंडीराम बोबडे वय 26 वर्ष, रा. अंबिकानगर, बीड, हितोपदेश गणेश वडमारे 30 वर्ष, रा. अंकुशनगर, बीड या दोन साथीदारांसह सात दुचाकी चोरल्या. त्याला सोमवारी मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली.यातील दुचाकी चोरीचे दोन गुन्हे शहर पोलिस ठाणे हद्दीतील असल्याने अमित सुतार याला शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी दिली. चार दुचाकी चोरीचे गुन्हे शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नोंद आहेत. त्यामुळे त्याला नंतर शिवाजीनगर पोलिसांकडेही तपासासाठी वर्ग करण्यात येणार आहे.

सरकारची दमदार कामगिरी:शेतकरी आत्महत्यांचा मराठवाडा हॉटस्पॉट बनलं; 520 पैकी 126 आत्महत्या बीडमध्ये

0

मुंबई — वाढते कर्ज, नैसर्गिक आपत्ती, शेतमालाला भाव नाही सरकारकडून ठोस उपाययोजना नाही परिणामी मराठवाडा आत्महत्यांचा हॉटस्पॉट बनत असल्याची धक्कादायक माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली आहे. विरोधी पक्षाच्या आमदाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यात 767 तर मराठवाड्यात 520 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यामध्ये बीड जिल्ह्यात सर्वाधिक 126 आत्महत्या शेतकऱ्यांनी केल्या असल्याची आकडेवारी त्यांनी मांडली.
यावर्षी राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत असल्याचं वास्तव सरकारने नुकतंच विधान परिषदेत मांडलेल्या आकडेवारीतून स्पष्ट केलं आहे.
या वर्षी जानेवारी ते मार्च 2025 या अवघ्या 3 महिन्यांच्या कालावधीत राज्यात तब्बल 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली आहे. विरोधी पक्षाच्या आमदारांनी वाढत्या शेतकरी आत्महत्यांबद्दल प्रश्न उपस्थित केल्यानंतर राज्याचे मदत आणि पुनर्वसन विभागाचे मंत्री मकरंद पाटील यांनी विधान परिषदेत त्यांच्या लेखी उत्तरात ही आकडेवारी सादर केली.
राज्य महसूल विभागाच्या अहवालानुसार, 2025 च्या पहिल्या सहामाहीत (1 जानेवारी ते 26 जून) तब्बल 520 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे. ही संख्या 2024 मधील याच कालावधीतील 430 आत्महत्यांपेक्षा 20 टक्क्यांनी जास्त आहे. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी पीकविम्याची प्रतिक्षा, कधी बाजारभावाची अनिश्चितता अशा या संकटांच्या साखळीत अडकलेले शेतकरी शेवटी आयुष्यच संपवतात.

पीक नुकसान, राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांकडून किंवा परवानाधारक सावकारांकडून कर्ज फेडण्यास असमर्थता, वाढत्या कर्जामुळे झालेल्या शेतकरी आत्महत्या आर्थिक मदतीसाठी पात्र मानल्या जातात. अशा शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना 1 लाख रुपये दिले जातात. राज्यभरात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या 373 कुटुंबे आर्थिक भरपाईसाठी पात्र असल्याचे आढळून आले. तर 200 कुटुंबांना अपात्र घोषित करण्यात आले, असे राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी विधान परिषदेत शेतकरी आत्महत्यांबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले.

बीडमध्ये सर्वाधिक आत्महत्या

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी बीड जिल्हा सर्वाधिक आत्महत्या नोंदवलेल्या जिल्ह्यांच्या यादीत पुन्हा पहिल्या क्रमांकावर आहे. जानेवारी ते जून 2025 दरम्यान बीडमध्ये तब्बल 126 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, तर मागील वर्षी याच कालावधीत ही संख्या 101 होती. तर मराठवाड्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये जानेवारी ते जून 2025 तब्बल 520 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

तब्बल 520 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर – 92,

नांदेड – 74,

परभणी – 64,

धाराशिव – 63,

लातूर – 38,

जालना – 32,

हिंगोली – 31

बीड – 126

भारत बंदची हाक..! बँकिंग, टपाल आणि वाहतूक सेवा ठप्प होण्याची शक्यता

0

नवी दिल्ली — देशभरातील 25 कोटींपेक्षा अधिक कामगार उद्या (बुधवार 9 जुलै) केंद्र सरकारच्या श्रमविषयक धोरणांच्या विरोधात ‘भारत बंद’मध्ये सहभागी होणार आहेत. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेससह (आयटक) 10 प्रमुख केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त मंचाने या बंदचे आयोजन केले आहे.
या आंदोलनात बँकिंग, विमा, टपाल सेवा, कोळसा खाणी, औद्योगिक कामगार आणि परिवहन कर्मचारी सहभागी होणार असून, ग्रामीण भागातील शेतकरी आणि मजूर संघटनांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. बंदचा परिणाम देशभरातील विविध सेवा व्यवस्थांवर जाणवण्याची शक्यता आहे.

कोणत्या सेवा ठप्प, कोणत्या सुरू?

संघटनांच्या माहितीनुसार, बँकिंग, विमा आणि टपाल सेवा ठप्प राहतील, तसेच अनेक राज्यांतील सरकारी वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत होऊ शकते.
दरम्यान, शेअर बाजार आणि सराफा बाजार मात्र नेहमीप्रमाणे सुरू राहतील, अशी माहिती आहे.

मागण्या काय?

कामगार संघटनांनी केंद्र सरकारकडे 17 मागण्या मांडल्या आहेत. या मागण्यांमध्ये किमान वेतन, सामाजिक सुरक्षा, स्थायी रोजगार, निवृत्तिवेतन, आणि कामाचे तास यासारख्या मूलभूत बाबींचा समावेश आहे.

हिंद मजदूर सभेचे हरभजन सिंग सिद्धू यांनी सांगितले की, “सरकारने गेल्या 10 वर्षांत एकही वार्षिक श्रम संमेलन घेतले नाही. ही सरकारची कामगारांप्रती असलेली उदासीनता दाखवते.”

सरकारवर गंभीर आरोप

संयुक्त मंचाचा आरोप आहे की, सरकारने अमलात आणलेल्या चार नव्या श्रम कायद्यांमुळे कामगारांच्या हक्कांवर गदा आली आहे. या कायद्यांमुळे सामूहिक करार प्रक्रियेवर मर्यादा, संघटनांच्या कार्यक्षमतेवर बंधने, आणि संपाचा अधिकार निष्प्रभ करण्याचा प्रयत्न आहे.

संघटनांनी असेही म्हटले आहे की, सरकार सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे खाजगीकरण, आउटसोर्सिंग, आणि कंत्राटी कामगार पद्धतीला प्रोत्साहन देत आहे. यामुळे कामगारांचे भविष्य अंधारात जाते आणि त्यांच्या सामाजिक सुरक्षेवर गदा येते.

आंदोलनाला शेतकरी संघटनांचा पाठिंबा

संयुक्त किसान मोर्चा आणि कृषी कामगार संघटनांच्या मंचानेही या संपाला संपूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

संघटनांचे स्पष्ट मत आहे की, सरकारने केवळ भारतीय व विदेशी कॉर्पोरेट्सच्या हितासाठी काम केले असून, कामगार कल्याणाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे हा संप म्हणजे केवळ मागण्यांचा लढा नाही, तर कामगारांच्या अस्तित्वासाठीचा संघर्ष आहे.

आ. सुरेश धस च्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

0

याच अपघात स्थळी मृताचे वडील चुलत्यांचाही झाला होता अपघाती मृत्यू

बीड — आष्टी मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या मुलाने सोमवारी (ता.7) कार चालवताना एका दुचाकीस्वाराला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. नितीन शेळके असे मृत व्यक्तीचे नाव आहे. नितीन शेळके चा ज्या ठिकाणी अपघात झाला त्याच ठिकाणी वर्षभरापूर्वी त्यांचे वडील प्रकाश शेळके आणि काही वर्षांपूर्वी चुलते यांचाही अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे.

सुपा पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.नगर-पुणे महामार्गा ७ जुलै रोजी रात्री १०.३० च्या सुमारास पारनेर तालुक्यातील जातेगाव फाटा येथे ही घटना घडली आहे. या अपघातात नितीन प्रकाश शेळके (वय ३४, रा. पळवे खुर्द ता.पारनेर) यांचा मृत्यू झाला आहे. आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर सुरेश धस हा अपघातावेळी एम.जी. ग्लॉस्टर (क्र. MH 23 BG 2929) ही कार चालवत होता. सुपा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

मृत नितीन शेळके हे सह्याद्री खादी हॉटेलवरून आपल्या गावाकडे मोटारसायकलने निघाले होते. जातेगाव फाटा येथे महामार्गावर यु-टर्न घेत असताना पुण्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एम. जी. ग्लॉस्टर कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातात ते रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले. नागरिकांनी त्यांना तातडीने सुपा येथील रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच सुपा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कारचालक सागर धस व त्याच्यासोबत असलेल्या एका मित्राला ताब्यात घेतले असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पारनेर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. ८ जुलै रोजी सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आणि पळवे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मृत नितीन शेळके यांच्या मागे पत्नी, दोन लहान मुले, भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्याच ठिकाणी वर्षभरापूर्वी त्यांचे वडील प्रकाश शेळके आणि काही वर्षांपूर्वी चुलते यांचाही अपघाती मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.

आ. संदीप क्षीरसागरांनी महावितरणचा मुद्दा विधानभवनात गाजवला;हायटेक कंपनीच्या चौकशीची केली मागणी

0

प्रस्ताव मंजूर होत नाही अन् झाले तर कामे लवकर होत नाहीत; हायटेक कंपनीच्या चौकशीची केली मागणी

मुंबई — बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मतदारसंघातील वीज, पाणी, रस्ते, स्वच्छता यासह नागरीकांच्या दैनंदिन अडचणींवर लक्ष केंद्रित केले आहे. अनेकवेळा महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन ही काहीच फरक पडत नसल्याने, सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात प्रश्न उत्तर सत्रात महावितरण कंपनीच्या गलथान कारमाराची चिरफाड केली.
               बीड शहर, बीड ग्रामीण व शिरूर कासार तालुक्यात महावितरणचा गलथान कारभार सुरू आहे. या विरोधात आज आ. संदीप क्षीरसागर यांनी पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करीत महावितरण आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्या मिलिभगतवर बोट ठेवत चिरफाड केली असून, आधीच प्रस्ताव मंजूर होत नाही आणि झाले तरी काम लवकर पूर्ण होत नाही. तसेच मागील दोन वर्षांपासून आरमोड केबल चे काम पूर्ण न केलेल्या हायटेक कंपनीची चौकशी करावी अशी मागणी केली. आ.क्षीरसागर म्हणाले की, महावितरणचे कोणतेही काम असले की, प्रथम आरडीएसएस योजनेचे नाव पुढे केले जाते. या योजनेतून एखादे काम करण्यासाठी प्रस्ताव दाखल केला तरी त्यास लवकर मंजुरी मिळत नाही. मंजुरी मिळाली तर ते काम लवकर होत नाही. माझ्या शहरात १५ सप्टेंबर २०२३ पासून मंजूर असलेले आरमोड के बल टाकण्याचे काम सुरु आहे. दोन वर्ष झाली हे कामच पूर्ण होत नाही. हे काम हायटेक कंपनीकडून करण्यात येत आहे. हा गैरप्रकार महावितरण आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुरू आहे. यासोबतच बीड तालुक्यातील पाली येथे ३३/११ के.व्ही. उपकेंद्र मंजूर आहे. परंतु याचे काम सुरू नाही. तसेच ११ के.व्ही. लाईन बदलणे, तसेच जीर्ण तारा बदलणे, पोल शिफ्टिंग अशी कामे कधी होणार आहेत? आणि दोन वर्षांपासून केबल टाकण्याचे काम संथगतीने करणाऱ्या हायटेक कंपनीची चौकशी करणार का? असे प्रश्न आ. क्षीरसागर यांनी सभागृहात उपस्थित केले.

नराधम शिक्षक विजय पवार वर बाललैंगिक अत्याचारासह ॲट्रॉसिटी चा दुसरा गुन्हा दाखल

0

बीड — उमाकिरण लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी विजय पवार याच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट तसेच बाललैंगिक अत्याचाराचा आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.
खाजगी कोचिंग क्लासेस मध्ये झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी पालक व विद्यार्थ्यांनी पुढे येऊन गुन्हा नोंद करावा असे आवाहन केले होते. अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी शिक्षक विजय पवार व प्रशांत खटोकर या दोघांना न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी शनिवारी भेट घेत पीडितेची व पालकांशी चर्चा केली. 2023 मध्ये विजय पवार विरोधात जिल्हा परिषदेचे सीईओ यांच्याकडे बाललैंगिक अत्याचाराची तक्रार केली होती. मात्र या प्रकरणात काहीच कारवाई झाली नव्हती. या प्रकरणात चौकशी करून गुन्हा दाखल करण्याच्या सूचना चाकणकर यांनी दिल्या होत्या. दरम्यान विजय पवार विरोधात बाललैंगिक अत्याचार (पाॅक्सो अॅक्ट) तसेच ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन-तीन दिवसांपूर्वीच पवारच्या संस्थेत शिक्षण घेत असलेल्या मुलीच्या पालकांनी पुढे येत पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.

सर्वोच्च न्यायालयातील नोकऱ्यांमध्ये आता ओबीसींनाही आरक्षण लागू

0

नवी दिल्ली — सर्वोच्च न्यायालयातील नोकऱ्यांमध्ये केवळ एससी-एसटीच नाही तर ओबीसी-दिव्यांग जनांनाही आरक्षण मिळणार आहे.दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने प्रथमच कर्मचारी नियुक्त्यांमध्ये इतर मागासवर्गीय ( ओबीसी ) प्रवर्गासाठी आरक्षण लागू केले आहे.
त्याच प्रमाणे शारीरिकदृष्ट्या अपंग, माजी सैनिक आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या आश्रितांसाठी देखील आरक्षण देण्यात आले. याआधी सर्वोच्च न्यायालयात असे कोणतेही आरक्षण नव्हते.
दरम्यान, न्यायालयात कर्मचारी नियुक्त्यांमध्येअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती(एससी/एसटी)साठी आरक्षण लागू करण्याचा अलीकडेच घेण्यात आला होता. त्यानंतर आता ओबीसी आरक्षणदेखील लागू करण्यात आले आहे. तब्बल ६४ वर्षांनंतर यासंदर्भात निर्णय घेण्यात आला असून आता सर्वोच्च न्यायालय कर्मचाऱ्यांच्या भरतीमध्ये ओबीसी, एससी, एसटी, दिव्यांगजन, माजी सैनिक व स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.महत्त्वाचे म्हणजे, सरन्यायाधीशांनी एक खूप मोठा व महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता सर्वोच्च न्यायालय त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या भरतीत एससी/एसटी व्यतिरिक्त ओबीसी, दिव्यांग जन, माजी सैनिक व स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांना आरक्षणाचा लाभ देणार आहे. सर्वोच्च न्यायालयातही समाजातील सर्व घटकातील लोकांना नोकरीत समान संधी मिळावी यासाठी हा बदल करण्यात आला आहे. सामाजिक न्यायाच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे.

नवीन निर्णय काय आहे?

हा निर्णय मुख्य न्यायाधीश बीआर गवई यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी व सेवक(सेवेच्या अटी आणि आचारसंहिता) नियम, १९६१ च्या नियम ४अ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. राज्यघटनेच्याकलम १४६(२) अंतर्गत सर्वोच्च न्यायालयस्वतःचकर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी नियम ठरविते. आता या सर्व राखीव वर्गांना केंद्र सरकारने निश्चित केलेल्या आरक्षणानुसार लाभ मिळणार आहे.