शेतकऱ्यांची घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं
बीड — मराठवाड्यात २०२५ या वर्षात एकूण ११२९ शेतकरी आत्महत्या झाल्या असून, त्यामध्ये बीड जिल्ह्यातील २५६ शेतकऱ्यांनी आत्महत्या करत मरणाला कवटाळले आहे. मागील दोन वर्षांपासून बीड जिल्हा मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांमध्ये आघाडीवर असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.
शासन व प्रशासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढले असून, “सरकारचे धोरण हेच शेतकऱ्यांचे मरण” या घोषणेच्या निषेधार्थ आज शुक्रवार दि. ०९ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ” सरकारचे धोरण हेच शेतकऱ्यांचे मरण” घोषणाबाजी करत जोरदार निदर्शने करण्यात आली.
ही निदर्शने सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ (महाराष्ट्र राज्य) डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
यावेळी आंदोलकांनी सरकार व प्रशासनाने केवळ फोटोसेशनपुरते मर्यादित न राहता शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी ठोस व परिणामकारक पावले उचलावीत अशी ठाम मागणी केली.
मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांची मालिका सुरूच असून, त्यामागे कर्जबाजारीपणा, नापिकी, सावकारांचा विळखा, शेतीमालाला योग्य भाव न मिळणे, तसेच प्रशासनाची उदासीनता ही प्रमुख कारणे आहेत.
२०२४ मध्ये मराठवाड्यात ९८४ शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या, तर २०२५ मध्ये हा आकडा वाढून ११२९ वर पोहोचला आहे.
यावर्षी मराठवाड्यावर आसमानी संकट कोसळल्याने ४० लाख हेक्टरपेक्षा अधिक शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसला आहे. परिणामी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत.
सरकारचे धोरण हेच शेतकऱ्यांचे मरण ठरत असून, प्रशासन व राजकीय पुढाऱ्यांनी निव्वळ दिखाऊ उपाय न करता शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठोस धोरणे तात्काळ राबवावीत, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना देण्यात आले. यावेळी आंदोलनात माजी सैनिक अशोक येडे ( जिल्हाध्यक्ष,आम आदमी पार्टी ,रामधन जमाले (जिल्हाध्यक्ष इंटक), कुलदीप करपे ( जिल्हाध्यक्ष क्रांतिकारी शेतकरी संघटना ) शेतकरी पुत्र राजेंद्र आमटे, सुहास जायभाये , माहिती आधिकार कार्यकर्ते शेख मुबीन , पांडुरंग हराळे , गणेश नाईकवाडे (जिल्हाध्यक्ष मराठा महासंघ),प्रा.डी.जी.तांदळे(अध्यक्ष म.रा.किसानसभा जि.बीड, प्रा.राजकुमार यादव, डॉ.संजय तांदळे आदी सहभागी होते.






. बीड जिल्ह्यात खून, दरोडे, चोऱ्या, गोळीबार, अपहरण, राजरोस चालणारे अवैध धंदे यांच्यापुढे हे प्रकरण तसं पाहिलं तर अतिशय क्षूल्लक आहे.पण पोलीस अधीक्षकांनी नववर्षाच्या स्वागतालाच किती लोकाभिमुख कामं केली आहेत.पोलीस प्रशासन किती सतर्क आहे. याचा ढोल वाजवला. तो वाजवायला ही हरकत नाही. पण कायदा सुव्यवस्था आणि एस पी चा आदेश कितपत मानला जातो. हा खरा प्रश्न सगळ्याच परिस्थितीतून निर्माण होतो. एसपींनी मर्जीतली माणसं अनेक ठिकाणी जनतेच्या माथी बळच मारली. अनेक वेळा कंट्रोलला बसवा असे सांगूनही एसपींनी त्यांच्या विनंतीला मान दिला नाही. मग काय? नंगा नाच करायला अख्खं रान यांना कमी पडू लागलं. अवैध धंद्यांची भरमार झाली. त्यातून स्वतःचे बंगल्यांचे इमले बांधले गेले. ही कहाणी आहे एसपींच्या मर्जीतल्या नेकनूरच्या ठाणे प्रमुख चंद्रकांत गोसावी ची त्याच्या अकार्यशैलीची गौरव गाथा माध्यमांनी अनेक वेळा मांडली.पण पिंडीवरच्या विंचवाला ठेचायचं कसं हे माध्यमांना देखील कळालं नाही. शेवटी अनेकांनी आपल्याच पापाचे भोग आहेत म्हणून घडतय ते घडू द्या म्हणून गोसावी चा नंगानाचाकडे दुर्लक्ष केलं.पण लोकाभिमुख प्रशासनाचा ढोल वाजवला त्यामुळे सत्य सांगण्यासाठी अशा गोष्टी पुढे आणण्याची वेळ “सह्याद्री माझा”वर आली.





