Home Blog Page 25

लग्नाचं आमिष, लॉजवर नेऊन महिलेवर बलात्कार; पोलिसाची हैवानियत

0

बीड — लग्नाचे आमिष दाखवून एका विभक्त महिलेला लग्नाचे आमिष दाखवून
पोलिसाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे बीडच्या पोलिस दलात खळबळ उडाली. या प्रकरणी पीडित महिलेने बीडच्या पोलिस अधीक्षकांकडे जाऊन तक्रार दाखल केली. आरोपी पोलिसाविरोधात कठोर कारवाई करण्याची पीडित महिलेने मागणी केली आहे.
पीडित महिलेचे लग्न झाले होते पण ती 2022 पासून नवऱ्यापासून विभक्त राहते. कौटुंबिक वादात आणि कायदेशीर प्रक्रियेत अडकलेल्या या महिलेच्या असहाय्यतेचा फायदा आरोपी पोलिसाने घेतला. हा पोलिस विवाहित आहे. तरी देखील त्याने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या पोलिसाने पीडित महिलेला सांगितले होते की, ‘मी पोलिस आहे. त्यामुळे तुला कोर्टाच्या कामात मदत करून लवकर न्याय मिळवून देईन. तसंच त्याने माझं बायकोसोबत पटत नाही आणि मी तिला घटस्फोट देऊन तुझ्यासोबत लग्न करेल.’ पोलिसाच्या बोलण्यावर महिलेने विश्वास ठेवला आणि ती त्याच्या जाळ्यात अडकली. पोलिसाने य महिलेला अनेकदा लॉजवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
आरोपी पोलिसाने या महिलेला माजलगाव येथील एका लॉजवर नेले. त्याठिकाणी महिलेला विश्वासात घेऊन मी तुझ्यासोबत लग्न करेल असे म्हणत तिच्यासोबत जबरदस्ती शरीरसंबंध ठेवले. आरोपीने त्यावेळी उत्तेजक गोळ्यांचे सेवन केले होते. त्यामुळे पीडित महिलेला गंभीर शारीरिक इजा झाली होती. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. महिलेला तीन टाके पडले होते. याचा खर्च आरोपी पोलिसाने ऑनलाइन पद्धतीने दिला होता.पोलिसाने रुग्णालयाचा खर्च केला होता हाच पुरावा या प्रकरणाचा महत्वाचा पुरावा ठरत आहे. आरोपी पोलिसाने महिलेला वारंवार जातीवाचक शिवीगाळ केला. महिलेने लग्नासाठी तगादा लावला तेव्हा त्याने तिला धमकावले. ‘मी पोलिस आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी माझ्या ओळखीचे आहेत. तू माझे काहीही बिघडवू शकत नाहीस.’, असे म्हणत आरोपी पोलिस महिलेचा छळ करू लागला.

ऐवढेच नाही तर त्याने महिलेसोबतचे खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. या सर्व त्रासाला कंटाळून पीडित महिलेने पोलिस अधिक्षकांच्या कार्यालयात धाव घेत त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. या पोलिसाविरोधात गुन्हा दाखल करत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महिलेने केली आहे.

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या नुतणीकरणासाठी ८.१९ कोटी रुपये मंजुर

0

नववर्षानिमित्त बीडकरांना अजितदादांकडून सुखद भेट

बीड — बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची अतिशय दुरावस्था झाल्यामुळे रसिक प्रेक्षकांसह रंगकर्मींनी या बाबत तिव्र नाराजी व्यक्त केली होती. नगर परिषद निवडणुकीच्या जाहिरनाम्यात या कामाचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने देण्यात आले होते. निवडणुकीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री ना. अजितदादा पवार पहिल्यांदाच बीड शहरात आले, त्यांनी नववर्षाच्या प्रथमदिनी शासन निर्णय निर्गमित करून यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या नुतणीकरणासाठी ८.१९ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. नववर्षानिमित्त बीडकरांना अजितदादांकडून सुखद भेट या माध्यमातून देण्यात आली असल्याचे प्रतिपादन आ. विजयसिंह पंडित यांनी केले असून आ. पंडित यांनी बीडकर नागरीकांच्यावतीने ना. अजितदादा पवार यांचे आभार व्यक्त केले आहेत. व्यासपीठावर उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी याबाबतच्या शासन निर्णयाची प्रत आ. विजयसिंह पंडित यांच्याकडे सुपूर्द केली.

राज्य शासनाच्या नियोजन विभागाने दि.१ जानेवारी २०२६ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयात बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या नुतणीकरणासाठी ८.१९ कोटी रुपये किंमतीच्या विकास कामास शासन मान्यता दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अजितदादा पवार साहेब यांनी नववर्षाच्या प्रथमदिनी बीडकरांना या माध्यमातून सुखद भेट दिली आहे. आ. विजयसिंह पंडित यांनी या बाबत बीड शहरातील रसिक प्रेक्षक, नाट्यकर्मी व नागरीकांच्यावतीने पालकमंत्री ना. अजितदादा पवार यांचे आभार व्यक्त केले आहेत.

या बाबत आ. विजयसिंह पंडित यांनी माहिती देताना सांगितले की, बीड जिल्ह्यातील सुमारे १३६३ विकास कामांचा शुभारंभ करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अजितदादा पवार बीड शहरात आले, नगर परिषद निवडणुकीनंतर पहिल्यांदाच ते बीड शहरात येत होते. बीड शहरातील नागरीकांसाठी महत्वाच्या विषयांच्या अनुषंगाने त्यांनी यावेळी चर्चा केली. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ना. अजितदादा पवार यांनी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची दुरावस्था पाहिली होती, चर्चेदरम्यान त्यांना या बाबीची आठवण होताच त्यांनी तातडीने या बाबतची संचिका मागवून घेऊन त्यास मंजुरी दिली. त्यामुळे नववर्षाच्या प्रथमदिनी बीड शहरातील विकासपर्वाचा प्रारंभ या माध्यमातून होऊ शकला. बीड शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर पडेल असे दर्जेदार काम यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचे करण्यात येईल असेही आ. पंडित यांनी यावेळी सांगितले.

पुढे बोलताना आ. विजयसिंह पंडित म्हणाले की, बीड शहराच्या विकासासाठी भविष्यात निधी कमी पडू दिला जाणार नाही असे आश्वासन पालकमंत्री ना. अजितदादा पवार साहेब यांनी दिले आहे. बीड शहरात भविष्यात दर्जेदार विकास कामे करून नागरीकांचा विश्वास संपादन करण्यासाठी आम्ही कटिबध्द असल्याचेही आ. पंडित यांनी सांगितले. मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला नाट्यगृहाच्या दुरावस्थेचा प्रश्न निकाली निघाल्याबद्दल बीड शहरातील नागरीक, नाट्यकर्मी, कलावंत, रसिक प्रेक्षक यांनी आनंद व्यक्त केला आहे. व्यासपीठावर उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी याबाबतच्या शासन निर्णयाची प्रत आ. विजयसिंह पंडित यांच्याकडे सुपूर्द केली.

नेकनूरचे पत्रकार अशोक शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी शिबीर

0

७६ रुग्णांची तपासणी १६ जणांवर होणार शस्त्रक्रिया

नेकनूर –वाढदिवस म्हटलं की पैशाचा अपव्यय असेच चित्र सध्यातरी दिसून येत आहे . अशा काळात नेत्र तपासणी , शस्त्रक्रिया यासारखे समाजपयोगी उपक्रम काळाची गरज बनली आहे याचा गोरगरिबांना लाभ होतो . त्यासाठी आणखीन अशा उपक्रमांचे आयोजन व्हावे , असे मत नेकनूर चे स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अशोक हुबेकर यांनी व्यक्त केले.

पत्रकार अशोक शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नेकनूर ( ता . बीड ) येथील स्त्री व कुटीर रुग्णालयात आयोजित नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे शुक्रवारी ( दि ०१) आयोजन केले. नेकनूरच्या रुग्णालयात रक्तदान , सर्वरोग निदान शिबिर , स्त्रियांच्या आजारावरील शिबिर अशी शिबिरे यापूर्वी आयोजित करण्यात आली होते . परंतु , नेत्र तपासणीसारखं शिबिर गेल्या सात आठ वर्षापासून पत्रकार अशोक शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राबवून सर्वसामान्य रुग्णावर उपचार करून वाढदिवसाचा उत्सव साजरा करण्याचे कार्य आयोजित करण्यात येत असल्याने अनेकांनी वाढदिवसाच्या निमित्ताने अशा प्रकारचे आदर्श उपक्रम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.

७६ रुग्णांची केली तपासण१६ रूग्णांवर होणार मोतीबिंदू शस्त्रक्रिया

शिबिरात ७६ अधिक रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली असून १६ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार आहेत . नेत्र तपासणी शिबिरात डॉ . गोपाळघरे मॅडम यांच्यासह टीमचे मोलाचे सहकार्य लाभले त्याबद्दल त्यांचेही पत्रकार अशोक शिंदे मित्र परिवाराने आभार मानले आहेत .

नेत्र तपासणी शिबीर हा आदर्श उपक्रम डॉ संतोष शहाणे

वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च न करता पत्रकार अशोक शिंदे यांनी नेत्र तपासणी व शस्त्रक्रियेसारखा आदर्श उपक्रम राबवत उपचाराच्या माध्यमातून वाढदिवसाचा उत्सव साजरा केला असल्याचे मत या वेळी कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक संतोष शहाणे यांनी सांगून या उपक्रमाबद्दल कौतुक केले

रणवीर पंडित यांनी दिलेल्या संधीचे खेळाडूंनी सोने केले—श्रीहरी पवार

0

क्रिडा महोत्सवात मुलांच्या खो- खो स्पर्धेचे शानदार उद्घाटन

गेवराई — शिक्षण क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये शिवछत्र परिवाराने मोठी चळवळ उभी केली, तो वसा आणि वारसा सक्षमपणे रणवीर पंडित पुढे घेऊन जात असताना त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिलेल्या संधीचे ग्रामीण खेळाडूंनी सोने केले आहे असे गौरवोद्गार बाजार समितीचे उपसभापती श्रीहरी पवार यांनी काढले.
जयभवानी आणि जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत सुरू असलेल्या क्रीडा महोत्सवाच्या सहाव्या दिवशी मुलांच्या गटात खो-खो स्पर्धेचे उद्घाटन करताना ते बोलत होते.

शारदा स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष रणवीर पंडित यांच्या संकल्पनेतून जयभवानी आणि जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अंतर्गत भव्य शारदा क्रीडा महोत्सव सुरू असून गुरुवार दिनांक १ जानेवारी रोजी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय पाचेगाव येथे मुलांच्या गटातील खो -खो स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे सभा उपसभापती श्रीहरी पवार संचालक पांडुरंग मुळे, प्राचार्य राजेंद्र दाभाडे, सरपंच तुकाराम प्रधान, वराट, बिपीन डरपे, देविदास तर्फे,भागवानराव मते, श्रीकृष्ण वेताळ, मुन्ना हटवटे, पांडुरंग मुसळे, कृष्णा चव्हाण, अविनाश राठोड यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आयोजक रणवीर पंडित म्हणाले की, क्रीडा महोत्सवात सातत्य ठेवून स्पर्धा आयोजित केल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण झाली त्यामुळे त्याला चार वर्षापासून होणाऱ्या या क्रीडा महोत्सवाला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

यावेळी बोलताना प्राचार्य राजेंद्र दाभाडे म्हणाले गेवराई तालुक्यामध्ये जयभवानी जगदंबा शिक्षण संस्थेने शैक्षणिक संस्थेमुळे शैक्षणिक चळवळ गतिमान झाले आहे. शारदा क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून रणवीर पंडित यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रोसाहित केले आहे. या निमित्ताने ग्रामीण भागात मैदाने उपलब्ध झाले. यातून चांगले खेळाडू घडतील आणि गेवराई तालुक्याचा नावलौकिक होईल असेही ते यावेळी म्हणाले

प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण, दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. मैदानाचे पुजन करुन उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंचा परिचय करून घेतला. यावेळी मुलांच्या गटात दोन मैदानावर सामने सुरु करण्यात आले. खो- खो स्पर्धेत संस्थेच्या आठरा शाळेचे संघ सहभागी झाले आहेत.

खो-खो रिमिक्स गाण्यावर
विद्यार्थ्यांचा नृत्य आविष्कार 

यावेळी माध्यमिक विद्यालय पाचेगावच्या विद्यार्थ्यांनी खो-खो रिमिक्स गाण्याषस विविध गितावर नेत्रदीपक नृत्य करुन उपस्थितांचे लक्ष वेधले…
येगं ये ये बाई…गाऊ आकाशात अ..आ.ई
ये ये अंगनाशी…..वारा बांद पदराशी !
अशा वेगवेगळ्या गाण्यात नृत्य करुन विद्यार्थ्यांनी उपस्थितांची वाहवा मिळवली.

यावेळी जयभवानी व जगदंबा शिक्षण संस्थेतील मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी खेळाडू तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते, क्रिडा प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

जर्मन बेकरी’प्रकरणातील आरोपी बंटी जहागिरदारचा गोळीबारात मृत्यू

2

श्रीरामपूर — पुणे येथे 2012 मध्ये जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी अस्लम शेख उर्फ बंटी जहागिरदार याच्यावर बुधवारी भर दिवसा गोळ्या झाडण्यात आल्या. यामध्ये जखमी झालेल्या अस्लम चा उपचार घेत असताना अहिल्यानगर मधील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला.

बंटी जहागिरदार कॉलेज रोडने दुचाकीवरून जात असताना अचानक दोन अज्ञात इसमांनी जवळ येत त्याच्यावर गोळीबार केला.यामध्ये जखमी झाल्याने त्याला श्रीरामपूर मधील कामगार रुग्णालयामध्ये त्यांना उपचारासाठी हलवण्यात आलं. येथे त्याची प्रकृती गंभीर झाल्यानंतर अहिल्यानगर मधील साईदीप हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले. दरम्यान सायंकाळी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याची घोषणा डॉक्टरांनी केली. बंटी जागीरदार वर गोळीबार झाल्याची घटना घडताच काही सेकंदातच हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. गोळीबाराचा आवाज ऐकताच परिसरात प्रचंड खळबळ उडाली. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, अनेक दुकाने तातडीने बंद करण्यात आली. अस्लम शेख उर्फ बंटी जहागिरदार हे नाव २०१० साली पुण्यात झालेल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणात चर्चेत आला होता. या प्रकरणातील तो प्रमुख आरोपींपैकी एक होता. दीर्घ काळ तुरुंगवासानंतर त्याला २०२३ मध्ये जामीन मंजूर झाला होता. जामिनावर बाहेर आल्यानंतर तो श्रीरामपूर परिसरात राहत असल्याची माहिती आहे.

या पार्श्वभूमीवर झालेला हा हल्ला केवळ वैयक्तिक वादातून झाला की यामागे काही मोठा कट आहे, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी जमली. तसेच, आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी काही समर्थक व नागरिकांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केले. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जमावाला शांत राहण्याचे आवाहन करत, शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.संवेदनशील ठिकाणी पोलीस गस्त वाढविण्यात आली असून, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. या घटनेनंतर पोलिसांनी विशेष पथके तयार करून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. हल्लेखोर कोण होते, त्यांनी कोणत्या दिशेने पलायन केले, तसेच हल्ल्यामागील नेमके कारण काय याचा सखोल तपास सुरू आहे. वैयक्तिक वैर, जुना वाद की गुन्हेगारी पार्श्वभूमी यापैकी कोणता धागा पुढे येतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

छत्तीसगड मधील आदिवासी ऊसतोड मजुरांच्या 2 अल्पवयीन मुलीवर बलात्कार

0

माजलगाव मधील घटनेने खळबळ

माजलगाव — तालुक्यात ऊस तोडणीसाठी छत्तीसगढ मधून 14 जणांची आदिवासी समाजातील लोकांची टोळी आलेली आहे. यातील दोन ऊसतोड मजुरांच्या अल्पवयीन बालिकांवर बलात्कार केल्याची खळबळ जनक घटना घडली आहे.
साखर हंगाम सुरू झाल्यानंतर ऊसतोड कामगारांच्या टोळ्या माजलगाव परिसरात आलेल्या आहेत. छत्तीसगड मधून आदिवासी समाजातील लोकांची 14 जणांची टोळी ऊस तोडणीसाठी माजलगाव मध्ये आली. यातील दोन मजुरांनी आपल्या भाकरीची सोय व्हावी यासाठी आपल्या दोन अल्पवयीन मुलींना देखील सोबत आणले होते. तालुक्यातील रोशनपुरी येथे या ऊसतोड मजुरांचे ऊस तोडणीचे काम सुरू होते. हे मजूर दोन महिन्यापासून ऊसतोड मुकादम उद्धव श्रीकिशन तिडके यांनी आणले होते. दि.24 डिसेंबर रोजी ऊसतोड मजूर तोडणीसाठी गेले असता त्यांच्या झोपडीमध्ये अल्पवयीन मुली एकट्याच होत्या. याचाघ फायदा घेऊन गावातील किराणा दुकानदार गणेश राजाभाऊ घाटूळ आणि त्याचा मित्र ट्रॅक्टर चालक अशोक भास्कर पवार या दोघांनी या 13 व 14 वर्षे वयाच्या दोन अल्पवयीन मुलींना झोपडीतून बाहेर बोलावले. त्यांना बाजूच्या ऊसाच्या व कापसाच्या शेतात नेत त्यांच्यावर बलात्कार केला.या घटनेनंतर दोन्ही मुली प्रचंड दहशतीत होत्या. शेवटी यातील एका पीडित मुलीने दि.28 डिसेंबर रोजी आपल्या वडिलांना घटनेची माहिती दिली. दोन्ही मुलींवर बलात्कार झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली. मुलीच्या वडिलांनी या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात 29 डिसेंबर रोजी तक्रार दाखल केली. या प्रकरणी घटनेतील दोन्ही नराधमांना सपोनि गोविंद पांडव यांनी अटक केली असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी करत आहेत.

“गोविंद गुळ” एक पथदर्शक सेन्द्रीय गुळाचा ब्रॅण्ड‌ ; ग्राहकांना आरोग्यदायी तर शेतकऱ्यांना ठरतोय प्रेरणादायी

0

बीडलोह, कॅल्शियम मॅग्नेशियम,पोटॅशियम विविध खनिज आणि जीवनसत्व यांचा अनमोल खजाना असल्याचं चरक संहिता, सुश्रुत संहिता, अष्टांग हृदयम यासारख्या ग्रंथातून आहार शास्त्रात गुळाचे महत्त्व विशद केलं आहे.


आरोग्यम् धनसंपदा” हाच मूलमंत्र घेऊन प्रदीप गोविंदराव कुलकर्णी यांनी बीड तालुक्यातील चौसाळा नांदूर रोडवर हिंगणी (बु) येथे “गोविंद गुळ” निर्मिती प्रकल्पाची उभारणी केली गेली. कृषी अधिकारी म्हणून काम करताना “नैसर्गिक /जैविक शेतीच”महत्व पटवून देण्याचं मोलाचं काम केलेल्या प्रदीप गोविंदराव कुलकर्णी यांनी याच ज्ञानाचा वापर सेवानिवृत्त झाल्यानंतर स्वतःच्या शेतीतच करायला सुरुवात केली.त्यातूनच गोविंद गुळ प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली.

एकीकडे हरितक्रांतीच्या नावाखाली वारे माप रासायनिक खत तणनाशक यांचा मारा शेतात होऊ लागला त्यामध्ये काळ्या आईचं आरोग्य बिघडलं गेलं. मात्र पी जी कुलकर्णी यांचे वडील गोविंदराव कुलकर्णी यांनी कुठल्याच पिकाला रासायनिक खत कधी वापरलंच नाही. तन नाशकांचा मारा देखील केला नाही. त्यामुळे मूळतः च पी जी कुलकर्णी च्या जमिनीच आरोग्य चांगलं होतं. त्यात पुन्हा भर पडली ती देशी गाईचं शेण गोमूत्र/जैव ऊर्जा शेती यांचा वापर करून जमिनीतली जैव विविधता वाढवण्याचं काम त्यांनी केलं.

त्यामुळे पीजी कुलकर्णी यांनी सुरुवातीच्या काळात केलेल्या भाजीपाला, सोयाबीन, हरभरा, गहू यासारख्या पिकांचे देखील भरघोस उत्पन्न त्यांच्या हाती पडलं. जमिनीची सुपीकता वाढवून रसायनमुक्त उत्पादन घेत असताना गुळ निर्मिती उद्योग सुरू केला. खाद्यपदार्थांना लागणारी सर्व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मानांकन त्यांनी पहिल्या वर्षीच मिळवण्यात यश मिळवलं. त्यामुळे “गोविंद गुळ उद्योग” या ब्रँडच्या नावाखाली ऑनलाइन मार्केटिंग सोबतच विविध ठिकाणी भरणाऱ्या प्रदर्शनांमध्ये सहभाग घेतला.

या प्रदर्शनांमधून गुळ निर्मितीचा दर्जा,हा ब्रँड कसा इतरापेक्षा वेगळा आहे. हे सांगण्यात पटवून देण्यात त्यांनी यश मिळवले. प्रदर्शनाच्या माध्यमातून ज्यांनी या गुळाची चव चाखली त्यांनी या ब्रँडची वारंवार मागणी केली. देशातल्या अनेक राज्यांसह परदेशामध्ये देखील ग्राहकापर्यंत गुळ पोहोचवला .त्यामुळे सतत चार वर्ष गुळ निर्मिती करून उत्पादित माल जास्त काळ सांभाळण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही. गत वर्षी मागणी मोठ्या प्रमाणावर झाल्याने माल लवकरच संपला त्यामुळे अनेक ग्राहकांच्या पदरी निराशा पडली. ऊस उत्पादन घेताना रासायनिक खताचा/कीटकनाशकांचा/तणनाशकांचा वापर करण्यात येत नाही.

खत म्हणून फक्त आणि फक्त जैविक खतांचाच वापर त्यामुळे उसाचा दर्जा देखील उत्तम राखला जातो. गुळ निर्मितीत देखील कुठल्याही रसायनांचा वापर करण्यात येत नाही.

गुळ करण्याची प्रक्रीया स्टेनलेस स्टील च्या भांड्यात केली जाते, हायजेनिक पद्धतीने गुळ निर्मिती केली जात असल्यामुळे या गुळाचा चहा नासत नाही. गुळाचा दर्जा वर्षभर कायम टिकतो. या आणि याच कारणामुळे “गोविंद गुळ” ब्रँड ने आपली स्वतंत्र ओळख निर्माण करून बीड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

खरेदीचा बहाणा करून कार लुबाडणारी टोळी उघडकीस

0

बीड — कार खरेदी करण्याचा बहाणा करून वाहन मालकांची फसवणूक करणारी टोळी बीड शहर पोलिसांनी उघडकीस आणली आहे. या प्रकरणात अमरावती येथील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांनी कार खरेदीच्या नावाखाली वाहन ताब्यात घेऊन ती परत न करता फसवणूक केल्याचे उघडकिस आले आहे .
सचिन आसाराम बोराडे, रा. माळीवेस बारादरी बीड, कडून त्याच्या मालकीची स्विफ्ट डिझायर कार, खरेदी करण्याचा बहाणा करून आरोपींनी सुरुवातीला काही रक्कम ऍडव्हान्स स्वरूपात दिली. उर्वरित पैसे कागदपत्रे तयार करून आणतो, आणि राहिलेले श्रीराम फायनान्स चे सर्व हप्ते भरतो अशी बतावणी केली, असे सांगून त्यांनी कार ताब्यात घेतली. मात्र, वाहनाच्या कागदपत्रांवर कोणतीही कायदेशीर सही करण्यात आली नाही तसेच उर्वरित रक्कमही दिली गेली नाही. त्यानंतर सदरील कार परत न करता आरोपी फरार झाले.
या संदर्भात फिर्यादीकडून तक्रार दाखल झाल्यानंतर बीड शहर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. तपासादरम्यान अमरावती येथील गुड्डू खान रेहमत खान वय ४० वर्षे, रा. बिस्मिल्ला नगर, लाल खडी रोड, अमरावती आणि अब्दुल राजीक अब्दुल सादिक वय ४३ वर्षे, रा. इदगाह गेट, हैदरपूर, अमरावती या दोघांना अटक करण्यात आली आहे.
प्राथमिक तपासात सदरील कारचा वापर गोवंश चोरीसाठी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सदरील कार अमरावती ग्रामीण येथील बेनवडा पोलीस स्टेशन हद्दीत जप्त करण्यात आलेली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर बीड शहर पोलिसांच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की वाहन विक्री करताना अत्यंत दक्षता घ्यावी. केवळ जास्त किंमत देत आहे म्हणून कोणाच्याही ताब्यात वाहन देऊ नये. मध्यस्थामार्फत व्यवहार केला जात असला तरी समोरच्या व्यक्तीची संपूर्ण खात्री पटल्याशिवाय वाहन सुपूर्द करू नये. संपूर्ण रक्कम प्राप्त होऊन वाहनाची कायदेशीर नोंदणी व हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय वाहन विक्री करू नये, अन्यथा सदरील वाहन परत मिळण्याची शक्यता कमी असून ते गुन्हेगारी कृत्यासाठी वापरले जाण्याचा धोका असतो.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक  नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक  सचिन पांडकर व उपविभागीय पोलीस अधिकारी  पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक  शीतलकुमार बल्लाळ, पोलीस जमादार बबन जाधव व पोलीस अंमलदार संजय राठोड यांनी केली आहे.

धनंजय मुंडेंच्या विधानसभा निवडणुकीतील शपथपत्राविरोधात दाखल केलेली फिर्याद न्यायालयाने फेटाळली

0

आणखी एका न्यायालयीन लढ्यात धनंजय मुंडेंचा विजय!

परळी  — माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांचा आणखी एका न्यायालयीन लढ्यात विजय झाला आहे. विधानसभा निवडणूक 2024 मधील त्यांच्या उमेदवारी अर्ज सोबत जोडलेल्या शपथपत्रामध्ये उल्लेख केलेल्या माहितीवर आक्षेप घेत लोकप्रतिनिधी अधिनियम कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी परळी वैद्यनाथ यांच्या न्यायालयात करुणा शर्मा यांनी फौजदारी कारवाई करण्याबाबत फिर्याद प्रकरण दाखल केले होते. याबाबत आज परळी न्यायालयाने निकाल दिला असून सदर प्रकरणातील सर्व आरोप तथ्यहीन असल्याने ते फेटाळून लावले आहेत.

धनंजय मुंडे यांच्या नामनिर्देशन पत्रामध्ये नमूद माहितीवरून करुणा शर्मा यांनी वेगवेगळे आरोप करत शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप करत लोकप्रतिनिधी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

याप्रकरणी परळीच्या प्रथमवर्ग न्यायालयात सुनावणी पार पडली, करुणा शर्मा यांनी नोंदवलेला जबाब, वकिलांचा युक्तिवाद यांसह वस्तुस्थिती लक्षात घेत न्यायालयाने करुणा शर्मा यांनी दाखल केलेली फिर्याद फेटाळून लावली आहे. धनंजय मुंडे यांच्या वतीने ॲड. अशोक कवडे यांनी काम पाहिले तसेच ॲड. हरिभाऊ गुट्टे यांनी त्यांना मदत केली.

दरम्यान धनंजय मुंडे यांच्या बाजूने न्यायालयाने आणखी निकाल दिला आहे. याआधी देखील कृषी विभागाच्या खरेदी वरून निरनिराळे आरोप करत धनंजय मुंडे यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये देखील कोणतेही तथ्य आढळले नाही आणि ते प्रकरण देखील मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावत तक्रारदाराला उलट दंड लावला होता.

नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी परळीत एकहाती सत्ता कायम राखली, तेव्हा देखील न्यायालयाच्या निकालात आणि जनतेच्या निकालात आपला विजय झाल्याची भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

एका पाठोपाठ धनंजय मुंडे यांच्या विरोधातील प्रकरणांचे निकाल पाहता, या याचिका, खटले किंवा ट्रायल या निव्वळ मुंडेंच्या बदनामीसाठी रचण्यात आल्याचे दिसून येते.

शारदा क्रीडा महोत्सवात बुद्धीबळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

0

बुद्धिबळ स्पर्धेत प्राथमिक गटातून अथर्व शिंदे तर माध्यमिक गटातून सिद्धांत निकम प्रथम

गेवराई — शारदा क्रीडा महोत्सवात आयोजित केलेल्या बुद्धीबळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत प्राथमिक गटातून शारदा विद्या मंदिरच्या अथर्व शिंदे याने तर माध्यमिक गटातून विशारदा पब्लिक स्कूलच्या सिद्धांत निकमने प्रथम क्रमांक पटकावलाअसून सर्व विजेत्यांचे शारदा स्पोर्ट्स ॲकडमीचे अध्यक्ष रणवीर पंडित यांनी अभिनंदन केले आहे.

क्रीडा महोत्सवात आयोजित केलेल्या बुद्धीबळ स्पर्धेत जयभवानी आणि जगदंबा शिक्षण संस्थेतील १८ शाळेचे प्रत्येकी दोन स्पर्धक सहभागी झाले होते होते. अंतिम स्पर्धेत प्राथमिक गटातून शारदा विद्या मंदिर गेवराईच्या शिंदे अथर्व याने प्रथम तसेच शारदा विद्या मंदिरच्याच कु. लाड ज्ञानेश्वरी हिने द्वितीय तर माध्यमिक विद्यालय सिरसदेवीच्या कादे जगननीवास याने तृतीय क्रमांक पटकावला. माध्यमिक गटात शिवशारदा पब्लिक स्कूल शिवाजीनगरच्या निकम सिद्धांत याने प्रथम व शारदा विद्या मंदिर गेवराईच्या खकाळ यश याने द्वितीय तर शारदा विद्या मंदिर गेवराईच्या कु. वेताळ सई हीने तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेत आर्बिटर म्हणून शेंडगे आर. एस. आणि
क्षिरसागर डी.के. यांनी काम पाहिले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शारदा स्पोर्ट्स ॲकडमीचे अध्यक्ष रणवीर पंडित यांनी अभिनंदन केले असून लवकरच एका कार्यक्रमात सर्व विजेत्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी क्रीडा शिक्षकांसह, मुख्याध्यापक, प्राचार्य, विद्यार्थी खेळाडू आणि क्रीडा प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.