बीड — लग्नाचे आमिष दाखवून एका विभक्त महिलेला लग्नाचे आमिष दाखवून
पोलिसाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे बीडच्या पोलिस दलात खळबळ उडाली. या प्रकरणी पीडित महिलेने बीडच्या पोलिस अधीक्षकांकडे जाऊन तक्रार दाखल केली. आरोपी पोलिसाविरोधात कठोर कारवाई करण्याची पीडित महिलेने मागणी केली आहे.
पीडित महिलेचे लग्न झाले होते पण ती 2022 पासून नवऱ्यापासून विभक्त राहते. कौटुंबिक वादात आणि कायदेशीर प्रक्रियेत अडकलेल्या या महिलेच्या असहाय्यतेचा फायदा आरोपी पोलिसाने घेतला. हा पोलिस विवाहित आहे. तरी देखील त्याने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या पोलिसाने पीडित महिलेला सांगितले होते की, ‘मी पोलिस आहे. त्यामुळे तुला कोर्टाच्या कामात मदत करून लवकर न्याय मिळवून देईन. तसंच त्याने माझं बायकोसोबत पटत नाही आणि मी तिला घटस्फोट देऊन तुझ्यासोबत लग्न करेल.’ पोलिसाच्या बोलण्यावर महिलेने विश्वास ठेवला आणि ती त्याच्या जाळ्यात अडकली. पोलिसाने य महिलेला अनेकदा लॉजवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
आरोपी पोलिसाने या महिलेला माजलगाव येथील एका लॉजवर नेले. त्याठिकाणी महिलेला विश्वासात घेऊन मी तुझ्यासोबत लग्न करेल असे म्हणत तिच्यासोबत जबरदस्ती शरीरसंबंध ठेवले. आरोपीने त्यावेळी उत्तेजक गोळ्यांचे सेवन केले होते. त्यामुळे पीडित महिलेला गंभीर शारीरिक इजा झाली होती. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. महिलेला तीन टाके पडले होते. याचा खर्च आरोपी पोलिसाने ऑनलाइन पद्धतीने दिला होता.पोलिसाने रुग्णालयाचा खर्च केला होता हाच पुरावा या प्रकरणाचा महत्वाचा पुरावा ठरत आहे. आरोपी पोलिसाने महिलेला वारंवार जातीवाचक शिवीगाळ केला. महिलेने लग्नासाठी तगादा लावला तेव्हा त्याने तिला धमकावले. ‘मी पोलिस आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी माझ्या ओळखीचे आहेत. तू माझे काहीही बिघडवू शकत नाहीस.’, असे म्हणत आरोपी पोलिस महिलेचा छळ करू लागला.
ऐवढेच नाही तर त्याने महिलेसोबतचे खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. या सर्व त्रासाला कंटाळून पीडित महिलेने पोलिस अधिक्षकांच्या कार्यालयात धाव घेत त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. या पोलिसाविरोधात गुन्हा दाखल करत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महिलेने केली आहे.






शारदा स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष रणवीर पंडित यांच्या संकल्पनेतून जयभवानी आणि जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अंतर्गत भव्य शारदा क्रीडा महोत्सव सुरू असून गुरुवार दिनांक १ जानेवारी रोजी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय पाचेगाव येथे मुलांच्या गटातील खो -खो स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे सभा उपसभापती श्रीहरी पवार संचालक पांडुरंग मुळे, प्राचार्य राजेंद्र दाभाडे, सरपंच तुकाराम प्रधान, वराट, बिपीन डरपे, देविदास तर्फे,भागवानराव मते, श्रीकृष्ण वेताळ, मुन्ना हटवटे, पांडुरंग मुसळे, कृष्णा चव्हाण, अविनाश राठोड यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आयोजक रणवीर पंडित म्हणाले की, क्रीडा महोत्सवात सातत्य ठेवून स्पर्धा आयोजित केल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण झाली त्यामुळे त्याला चार वर्षापासून होणाऱ्या या क्रीडा महोत्सवाला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.



एकीकडे हरितक्रांतीच्या नावाखाली वारे माप रासायनिक खत तणनाशक यांचा मारा शेतात होऊ लागला त्यामध्ये काळ्या आईचं आरोग्य बिघडलं गेलं. मात्र पी जी कुलकर्णी यांचे वडील गोविंदराव कुलकर्णी यांनी कुठल्याच पिकाला रासायनिक खत कधी वापरलंच नाही. तन नाशकांचा मारा देखील केला नाही. त्यामुळे मूळतः च पी जी कुलकर्णी च्या जमिनीच आरोग्य चांगलं होतं. त्यात पुन्हा भर पडली ती देशी गाईचं शेण गोमूत्र/जैव ऊर्जा शेती यांचा वापर करून जमिनीतली जैव विविधता वाढवण्याचं काम त्यांनी केलं.
या प्रदर्शनांमधून गुळ निर्मितीचा दर्जा,हा ब्रँड कसा इतरापेक्षा वेगळा आहे. हे सांगण्यात पटवून देण्यात त्यांनी यश मिळवले. प्रदर्शनाच्या माध्यमातून ज्यांनी या गुळाची चव चाखली त्यांनी या ब्रँडची वारंवार मागणी केली. देशातल्या अनेक राज्यांसह परदेशामध्ये देखील ग्राहकापर्यंत गुळ पोहोचवला .त्यामुळे सतत चार वर्ष गुळ निर्मिती करून उत्पादित माल जास्त काळ सांभाळण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही. गत वर्षी मागणी मोठ्या प्रमाणावर झाल्याने माल लवकरच संपला त्यामुळे अनेक ग्राहकांच्या पदरी निराशा पडली. ऊस उत्पादन घेताना रासायनिक खताचा/कीटकनाशकांचा/तणनाशकांचा वापर करण्यात येत नाही.
गुळ करण्याची प्रक्रीया स्टेनलेस स्टील च्या भांड्यात केली जाते, हायजेनिक पद्धतीने गुळ निर्मिती केली जात असल्यामुळे या गुळाचा चहा नासत नाही. गुळाचा दर्जा वर्षभर कायम टिकतो. या आणि याच कारणामुळे “गोविंद गुळ” ब्रँड ने आपली स्वतंत्र ओळख निर्माण करून बीड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.



