Home Blog Page 157

पारगाव जवळ तुळजापूर धुळे बस पलटली; 20ते 25 जखमी

0

चौसाळा — तुळजापूरहून धुळ्याकडे जात असलेली बस धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पारगाव (ता.वाशी जि. धाराशिव )जवळ असलेल्या जुन्या टोलनाक्या जवळील बायपास जवळ वाहकाच नियंत्रण सुटल्यामुळे बाजूच्या शेतात जाऊन पलटी झाली. या दुर्घटनेत वीस ते पंचवीस जण जखमी झाले आहेत. जखमींना पारगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तुळजापूरवरून धुळ्याकडे जात असलेली बस क्र. एम एच 20 बी एल 18 95 ही सकाळी साडेअकराच्या सुमारास पारगाव जवळ आली असता बस वरील चालकाचे नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटल्यामुळे बस शेतात जाऊन पलटी झाली. दरम्यान पारगाव थांबा बसला असला तरी तो थांबा न घेता बायपास वरूनच बस घेऊन जात असल्यास मुळे आशा अनेक दुर्घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत. ही दुर्घटना देखील पारगाव शहरात बस न गेल्यामुळे घडला असल्याचं नागरिकांचे म्हणणं आहे.
या दुर्घटनेत वीस ते पंचवीस जण जखमी झाले असून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर मदत कार्य सुरू केले. दुर्घटनेतील जखमींना पारगाव मधील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

बीड मधून योगेश क्षीरसागर यांना उमेदवारी निश्चित

0

बीड — बीड विधानसभा मतदारसंघाची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची उमेदवारी डॉ.योगेश क्षीरसागर यांना जाहीर झाली आहे. त्यांना पक्षाचा एबी फॉर्म देण्यात आला.

बीडची जागा शिवसेना शिंदे गटाला देण्यात आली होती. त्यावर निश्चिती देखील झाली होती. काल अनिल जगताप यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केला. मात्र भाजपच्या पंकजा मुंडे आणि अजित पवार गटाचे धनंजय मुंडे यांनी आग्रही भूमिका घेतल्यामुळे रात्री एकच्या सुमारास बीडची जागा राष्ट्रवादीला सोडण्यासंदर्भात एकमत झाले. त्यामुळे बीड मधून संदीप क्षीरसागर, जयदत्त क्षीरसागर तसेच योगेश क्षीरसागर यांच्यात लढत होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

आ.संदीप क्षीरसागरांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
महापुरूषांना अभिवादन करून साध्या पद्धतीने अर्ज केला दाखल
बीड — बीड विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असलेले संदीप क्षीरसागर यांनी सोमवारी (दि.२८) रोजी अगदी साध्या पद्धतीने सर्व महापुरुषांना अभिवादन करून, बीड शहरातील देवस्थानांचे दर्शन घेऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
                बीड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांना दुसर्‍यांदा विधानसभा निवडणुकीत संधी मिळाली आहे. आ.संदीप क्षीरसागर यांनी सोमवारी (दि.२८) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व मित्र पक्षांच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून आपला अर्ज अगदी साध्या पद्धतीने दाखल केला. सर्वप्रथम आपल्या नवगण राजूरी गावचे ग्रामदैवत श्री मंगलमूर्ती देवस्थान येथे दर्शन घेतले. त्यानंतर आपल्या आई स्व.रेखाताई क्षीरसागर, त्यांच्या राजकीय गुरू असलेल्या त्यांच्या आजी स्व.केशरकाकू व नाना तसेच बीड जिल्ह्याचे भूमिपूत्र दिवंगत स्व.विनायकराव मेटे साहेब यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर बीड शहरातील देवस्थान श्री कनकालेश्वर, हजरत शहेंशाहवली दर्गा, हजरत मन्सूर शाहवली दर्गा, श्री शनि मंदीर येथील दर्शन घेतले. त्यानंतर आ.क्षीरसागर यांनी शहरातील मॉंसाहेब जिजाऊ, जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, राष्ट्रसंत भगवान बाबा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, छत्रपती शाहू महाराज, लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे, महात्मा बसवेश्वर, राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, राष्ट्रसंत गाडगेबाबा, शिवरत्न जिवाजी महाले, महाराष्ट्रातील कृषी क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब, स्व.द्वारकादास मंत्री साहेब यांना आ.संदीप क्षीरसागर यांनी अभिवादन केले‌.
         दरम्यान सर्व महापुरुषांना अभिवादन केल्यानंतर आ.क्षीरसागर यांनी, बीड विधानसभा मतदारसंघ निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खा.बजरंग सोनवणे, माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.उषाताई दराडे उपस्थित होते.

मला कुणी आव्हान नाही, मीच सगळ्यांना आव्हान-अनिलदादा जगताप

0
अनिलदादा जगताप यांचा शिवसेनेच्या वतीने विधानसभा उमेदवारी अर्ज दाखल
बीड — बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून मी गेल्या चाळीस वर्षांपासून बीड मतदार संघात अठरा पगड जाती-धर्मातील शेतकरी, विद्यार्थी, पीडित, उपेक्षित अशा समाजातील प्रत्येक घटकांना सुख-दुःखात आधार देत काम करत आलोय. 2009 पासून मी विधानसभेची तयारी करतोय, परंतु मला संधी भेटली नाही. मात्र महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते मा. एकनाथ शिंदे साहेब आणि संसदरत्न खासदार यांनी माझ्या निष्ठेची दखल घेऊन मला संधी द्यायचे ठरवले आहे व आज त्यांच्याच आदेशानुसार मी शिवसेनेचा उमेदवार म्हणून उमेदवारीच अर्ज भरला आहे. तळागाळातील माणसांची जाण असणारे मुख्यमंत्री शिंदे साहेब आज महाराष्ट्राभरात सर्व सामान्य जनतेसाठी वाखान्याजोगे काम करत आहेत. अगदी असेच काम मी येणाऱ्या काळात बीड मतदार संघात करणार आहे व माझ्याकडे बीडच्या लोकभिमुख विकासाची संकल्पना व त्यानुसार ब्ल्यू प्रिंट सुद्धा तयार आहे. बीडमध्ये क्षीरसागरांच्या वेगवेगळ्या पिढ्यातील माणसं सत्तेवर बसली. मात्र त्यांनी बीडचा विकास केला नाहीच तर बीडच्या विकासाचा खेळखंडोबा केला आहे म्हणून बीडमधील जनता क्षीरसागर मुक्त बीडचा नारा देत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकात मला कुणाचे आव्हान नसून मीच सर्व उमेदवारांसाठी आव्हान आहे. असे शिवसेनेचे उमेदवार मा. अनिलदादा जगताप यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माध्यमांना सांगितले.
काल दि. 20 रोजी दुपारी 1.00 वाजता अनिलदादा जगताप यांनी महाराष्ट्राची धाकटी पांढरी श्री क्षेत्र नारायण गड येथील नगद नारायणाचे आणि नवगण राजुरी येथील गणपतीचे दर्शन घेऊन हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना वंदन केले व त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते मा. एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या वतीने बीड (विधानसभा-230) अर्ज भरून तहसील कार्यालयात दाखल केला. याप्रसंगी शिवसेना महिला आघाडी, युवासेना आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. योगेश क्षीरसागर बीडच्या मैदानात; उमेदवार अर्ज दाखल

0

बीड — गेली ३५ वर्ष माझ्या वडिलांनी बीड शहराची सेवा केली आहे. आपणही साधारण वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाचे आणि महायुतीचे विचार मतदारसंघात, प्रत्येक वॉर्डात, गल्ली, गाव, वस्तीवर पोहचवले. अनेक कामे आपल्या माध्यमातून झाली आहेत. आपण दिवसभर जनतेच्या दरबारात राहिलोत. त्यामुळे आता कोणीही आणि कितीही आडकाठ्या आणल्या तरीही बीड विधानसभा निवडणूक लढवायचीच, असे स्पष्ट करत फॉर्म कुठला आहे, चिन्ह कोणतं आहे? याची चिंता तुम्ही करू नका. तुम्ही फक्त साथ द्या, जिंकण्याचं गणित डोक्यात आहे, असे आवाहन डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केले.

महायुतीकडून बीडच्या जागेचा तिढा सुटलेला नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असलेले डॉ.योगेश क्षीरसागर यांनी सोमवारी (दि.२८) बैठक घेतली. या बैठकीला मेळाव्याचे स्वरूप आले होते. त्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

पुढे बोलताना ते म्हणाले, आता आपण उमेदवारी अर्ज भरत आहोत, मात्र हा अर्ज काढण्यासाठी नाही तर विधानसभेत जाण्यासाठी असेल. मला परिवारातील लोकांनी एकटे पाडले, तुम्ही एकटे पाडू नका असे भावनिक आवाहन डॉ.योगेश यांनी केले. तसेच, वडील आजारी आहेत, त्यांची उणीव भासतेय असे सांगताना डॉ.योगेश क्षीरसागर हे भावूक दिसले. बैठक संपताच ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात गेले. दरम्यान, योगेशभैय्या आता नाही तर कधीच नाही, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवायचीच असा निर्धार यावेळी केला.

बैठक, रॅलीला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

डॉ.योगेश क्षीरसागर यांनी सकाळी लोकनेत्या स्व.केशरकाकू व नाना यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर बीडचे माजी नगराध्यक्ष आणि माझे वडील डॉ.भारतभूषण क्षीरसागर व आई डॉ.दिपा क्षीरसागर यांचे आशीर्वाद घेतले. शेकडो कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, सर्व बूथ, वॉर्ड, गावपातळीवर प्रभावी यंत्रणा आहे. त्यामुळेच बैठक, रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

निवडणूक जातीपातीच्या नव्हे तर विकासाच्या मुद्द्यावर लढायचीय!

मला ही निवडणूक जातीपातीच्या नव्हे तर विकासाच्या मुद्द्यावर लढायची आहे. मी आजपर्यंत राबविलेले स्वयंरोजगार शिबिर, रोजगार मेळावा, आरोग्य शिबिरे, दरदिवशी जनतेच्या कामांची सोडवणूक, अनेक सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम, कोट्यवधींची विकासकामे, अशा सर्व कामाच्या माध्यमातून २४ तास जनतेच्या दरबारात राहिलो. मला या जनसेवेची पावती मिळेल, असा विश्वास डॉ.योगेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे.

भाजपाची 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आष्टीत सुरेश धस

0

नवी दिल्ली –भारतीय जनता पार्टीकडून महाराष्ट्रातील उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 25 उमेदवारांचा समावेश आहे. आतापर्यंत भाजपानं 146 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. आष्टी मतदार संघातून सुरेश धस तर लातूर मधून अर्चना पाटील चाकूरकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

तिसऱ्या यादीत कुणाला संधी?

मूर्तिजापूर – हरिश पिंपळे
कारंजा – सई प्रकाश डहाके
तिवसा – राजेश वानखडे
मोर्शी – उमेश यावलकर
आर्वी – सुमित वानखेडे
काटोल – चरणसिंग ठाकूर
सावनेर – आशिष देशमुख
नागपूर मध्य – प्रवीण दटके
नागपूर पश्चिम – सुधाकर कोहले
नागपूर उत्तर – मिलिंद माने
साकोली – अविनाश ब्राह्मणकर
चंद्रपूर – किशोर जोरगेवार
आर्णी – राजू तोडसाम
उमरखेड – किशन वानखेडे
देगळूर – जितेश अंतापूरकर
डहाणू – विनोद मेढा
वसई – स्नेहा दुबे
बोरिवली – संजय उपाध्याय
वर्सोवा – भारती लव्हेकर
घाटकोपर पूर्व – पराग शाह
आष्टी – सुरेश धस
लातूर शहर – अर्चना पाटील चाकूरकर
माळशिरस – राम सातपुते
कराड उत्तर – मनोज घोरपडे
पलूस कडेगाव – संग्राम देशमुख

ठरले! आज संदीपभैय्या उमेदवारी अर्ज भरणार

0
साध्या पद्धतीनेच, महापुरूषांना अभिवादन करून दाखल करणार अर्ज
बीड — बीड विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून आ.संदीप क्षीरसारांच्या नावाची अधिकृत घोषणा होताच दुसर्‍या दिवशी आ.संदीप क्षीरसागर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन संवाद साधला. परंतु या बैठकीचे रूपांतर सभेतच झाले. यावेळी, सोमवारी (दि.२८) रोजी साध्या पद्धतीने महापुरूषांना अभिवादन करून अर्ज भरण्याचे ठरले आहे.
                 शनिवारी (दि.२६) रोजी बीड विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून विद्यमान आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप क्षीरसागर यांच्या नावाची घोषणा पक्षाच्या वतीने करण्यात आली. त्यानंतर आ.क्षीरसागर यांनी रविवारी (दि.२७) रोजी राष्ट्रवादी भवन येथे मतदारसंघातील कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. यावेळी उमेदवारी अर्ज भरण्याबाबत चर्चा करण्यात आली. या मध्ये सोमवारी (दि.२८) रोजी साध्या पद्धतीने, सणासुदीचा विचार करून सर्व कार्यकर्त्यांच्या मतानुसार लोकसभा निवडणुकीत खा.बजरंग सोनवणे यांचा अर्ज ज्याप्रकारे भरला होता अगदी त्याचप्रमाणे सर्व महापुरुषांना अभिवादन करून अर्ज भरण्याचे ठरले आहे. आ.क्षीरसागरांना उमेदवारी मिळाल्याने एकनिष्ठतेचा विजय झाला असून त्यामुळे कार्यकर्ते आणि सामान्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. आ.क्षीरसागर यांच्या बैठकीला प्रामुख्याने माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.उषाताई दराडे यांच्यासह बीड विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मतदार मायबापांनी अर्ज भरतेवेळी उपस्थित राहून आशिर्वाद द्यावेत- आ.संदीप क्षीरसागर
सोमवारी (दि.२८) रोजी मी, आपला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचा अधिकृत उमेदवार म्हणून साध्या पध्दतीने अर्ज भरणार आहे. तरी बीड मतदारसंघातील मतदार मायबाप, बंधु-भगिनिंनी उद्या सकाळी १०:०० वाजता उमेदवारी अर्ज भरतेवेळी उपस्थित राहून शुभाशिर्वाद द्यावेत असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले.
आ.क्षीरसागरांनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट
दरम्यान आ.संदीप क्षीरसागर यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन संवाद साधला आणि लगेचच अंतरवाली सराटी येथे जाऊन क्रांतीकारी नेतृत्व मनोज दादा जरांगे पाटील यांची भेट घेतली.

आपण स्वयंपूर्ण आहोत सर्वांनी साथ दिली तर हा डाव देखील जिंकता येईल-माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

0

बीड — बढता बढता कारवा बन गया अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, स्वर्गीय काकु नाना हे आपल्यासाठी शक्तीपीठ आहे आपण एवढा मोठा उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद दिला हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आता आपण स्वयंपूर्ण आहोत सर्वांनी साथ दिली तरच पुढचा डाव जिंकता येईल असे भावनिक आवाहन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहे.

आज माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे आगमन होणार असल्याची माहिती मिळतात तरुण कार्यकर्त्यांनी पाडळसिंगी टोल नाक्यापासून ते बीड शहरापर्यंत भव्य मोटरसायकल रॅली काढून भव्य स्वागत केले 2000 गाड्यांचा ताफा जेव्हा शहरातून जात होता तेव्हा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर देखील भारावून गेले होते रस्त्यात ठीक ठिकाणी लोकांचा समुदाय त्यांच्या स्वागतासाठी उभा होता अनेक कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी तोफांची सलामी देत आपल्या लाडक्या नेत्याचे स्वागत केले स्वर्गीय काकू नाना यांच्या समाधीला अभिवादन केल्यानंतर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांची मनमोकळेपणाने संवाद साधला ते म्हणाले स्वर्गीय काकू नाना हे आपल्यासाठी शक्तीपीठ आहे आपला एवढा मोठा उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद मला प्रेरणा देणार आहे सगळ्याला फाटा देऊन स्वयंपूर्ण होत पुढे जातोय नातेगोते तुटतात काळाच्या ओघात दुरावा निर्माण होऊ लागला आहे सामाजिक वेन विस्कटू लागली आहे आपण आज मला मोठा प्रतिसाद दिला उतणार नाही मातणार नाही घेतला वासा टाकणार नाही हे मी आज सर्वांसमोर जाहीर करतो अनेक चढउतार अनेक वळणे बघितली अनेकांनी मला आग्रह केला आपण सहा महिन्यापासून आपल्या तयारीला लागलो आहोत वाट लावणारे पुढे येत आहेत पण वाट दाखवणारा असावा लागतो याची जाण आणि भान या मतदारसंघातील लोकांना आहे सगळा बाजार भरलाय डिजिटल सारेच दिसू लागले आहेत परंतु वस्तुस्थिती काय असा प्रश्न निर्माण होतो कोण कुणीकडे जातोय याचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे करता करविता परमेश्वर आहे नियती सर्वांचा हिशोब करत असते लोकशाहीत असेच आहे लोक संधी देऊन बघतात आपण आपला वसा आणि वारसा नुसार चालावं लागतं पण आज कुणाचा आदर्श घ्यावा असा कोणी आहे का असा प्रश्न आहे समरसतेचे वातावरण निर्माण झाले आहे लोकशाहीत कुठलातरी निर्णय घ्यावा लागतो आता आपण स्वयंपूर्ण आहोत सर्वांनी साथ दिली तर पुढचा डाव जिंकता येईल जात-पात बाजूला ठेवून आपण सर्वजण पुढे जाऊया आपला आरसा स्पष्ट आहे वास्तव आणि वस्तुस्थिती सर्वांसमोर आहे आपण आपला अधिकार यासाठी वापरण्याची वेळ आली आहे 20 तारखेला आपली ताकद दाखवावी लागेल मी सेवेचे व्रत घेतले आहे माझ्याकडून सेवा करून घेणे हे आपले काम आहे तुम्ही पोटतिडकीने बोलता तसे काम करा आपण वाट बघितली थांबलो देखील पण आपलं मूळ आपल्याला विसरता येणार नाही आपला विश्वासाचा धागा आहे तो कधीही तुटू देणार नाही माझ्या जागी आपणच आहात असे समजून तुम्ही चमत्कार करा उद्या दिनांक 29 तारखेला अर्ज भरणार आहोत हे निवडणूक भाग्यरेषा बनवणारी आहे आपल्याला जे साध्य करायचे यासाठी समर्थ साथ द्या लोकशक्ती हीच माझी शिदोरी आहे आता दिवाळी आहे फटाके तर वाजत असतात परंतु आपले फटाके हे विजयाचे फटाके वाजले पाहिजेत असा दृढ निश्चय करा असे आवाहन करून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी उपस्थित जनसमुदायास भावनिक आवाहन केले
यावेळी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे सर्व प्रमुख समर्थक कार्यकर्ते महिला तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते

बीडचे जिल्हाधिकारी व परळीचे तहसीलदार यांच्या बदलीची  मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली!

0

परळी मतदारसंघात सीसीटीव्ही बसवण्याची मागणी केलेल्या त्या 122 मतदान केंद्राच्या बाबतीत निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयाला केले आश्वस्त

याचिकाकर्त्यांनी अमुक पक्षाचे संभाव्य उमेदवार म्हणून उच्च न्यायालयाची केली दिशाभूल?

छत्रपती संभाजीनगर – लोकसभा निवडणुकीपासून चर्चेत असलेल्या 233-परळी विधानसभा मतदारसंघात 122 मतदान केंद्रांना अति संवेदनशील घोषित करून त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत तसेच बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक व परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांची बदली करावी, अशी मागणी करणारी याचिका काही स्थानिक नेत्यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती, त्या याचिकेवर निर्णय देताना उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने जिल्हाधिकारी व परळीचे तहसीलदार यांची बदली करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे ताशेरे याचिकाकर्त्यांवरती ओढले आहेत.

संबंधित याचिकाकर्ते माधव जाधव व इतरांनी मतदारसंघातील 122 मतदान केंद्रांना अतिसंवेदनशील घोषित करून त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत व मतदानाची संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली व्हावी अशी मागणी केली होती. मात्र त्या केंद्रावरील लोकसभा निवडणुकीतील निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शक पद्धतीने पार पडली असल्याचा खुलासा यापूर्वीच निवडणूक आयोगाने केला होता तसेच पुढील विधानसभा निवडणूक प्रक्रिया देखील शांततेत व निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसारच होणार असल्याचे निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयाला आश्वस्त केले असल्यामुळे विरोधकांची तीही मागणी आता धुळीला मिळाली असल्याचे स्पष्ट होते.

दरम्यान याचिकाकर्त्यांनी आपण अमुक पक्षाचे संभाव्य उमेदवार असल्याचे भासवून उच्च न्यायालयाला सदर प्रक्रिया वेगाने पार पाडून निर्णय द्यायला लावले, मात्र उमेदवारी अर्ज भरण्याचे 5 दिवस उलटूनही संबंधित याचिकाकर्त्यांनी आपला उमेदवारी अर्ज अजूनही भरलेला नाही, त्यामुळे संबंधितांनी उच्च न्यायालयात खोटी माहिती देऊन अवमान केला असून न्यायालयाची दिशाभूल केली असल्याचीही चर्चा जाणकारांमध्ये होत आहे. मा.उच्च न्यायालयाच्या समोर याचिकाकर्त्यांनी वस्तुस्थितीच्या विरुद्ध माहिती अर्जाद्वारे सादर करून न्यालायकडून आदेश प्राप्त करून घेण्याचा डाव मा.उच्च न्यायालयाने हणून पाडला आहे. तसेच या याचिकाकर्त्यांच्या विरोधात आता उच्च न्यायालय काही कार्यवाही करणार का? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

शरद पवार गटातून परळीत राजेसाहेब देशमुख तर माजलगावात मोहन जगताप लढणार

0

मुंबई — राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी च्या लढती निश्चित होत असून राजकीय पक्षांकडून शेवटच्या उमेदवार याद्या जाहीर होत आहेत.कारण, विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत मंगळवार 29 ऑक्टोबर पर्यंतच आहे.

त्यामुळे, उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी तयारी करण्यास वेळ मिळावा, कार्यकर्ते व पदाधिकारी यांची राजी, नाराजी व बंडखोरी टाळली जावी, म्हणून पक्षांकडून खबरदारी घेतली जात आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना युबीटी पक्षाने आत्तापर्यंत 80 उमेदवारांची घोषणा केली असून काँग्रेसनेही उमेदवारांच्या नावांच्या 3 याद्या जाहीर केल्या आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानेदेखील (NCP) उमेदवारांच्या दोन याद्या यापूर्वीच जाहीर केल्या असून आता तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या दोन यादीत राष्ट्रवादीने 67 उमेदवारांची घोषणा केली होती. आता, तिसऱ्या यादीतून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. परळी विधानसभा मतदारसंघातून राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर माजलगाव मतदार संघातून मोहनराव जगताप यांचे नाव निश्चित केले गेले आहे. तत्पूर्वी जयंत पाटील यांनी वांद्र रेल्वे स्थानकावर घडलेल्या घटनेवरुन राज्य व केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या तिसऱ्या यादीची घोषणा केली. त्यामध्ये, राज्याचं लक्ष लागलेल्या माढ्यातून यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडसह, परळी मतदारसंघातही राष्ट्रवादीने आपला उमेदवार जाहीर केला आहे. तत्पूर्वी शनिवारी जयंत पाटील यांनी 22 उमेदवारांची घोषणा केली होती. त्यामध्ये, शिवसेना ठाकरे गटाने जाहीर केलेल्या परंडा मतदारसंघातून राष्ट्रवादीने माजी आमदार राहुल मोटेंना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे, या जागेचा तिढा अद्यापही कायम आहे. आता, तिसऱ्या यादीतून या जागांवरील उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. दरम्यान, माण खटाव विधानसभा मतदारसंघासाठी यांंचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. येथील उमेदवाराच्या नावाची घोषणा होण्यापूर्वीच प्रभाकर देशमुख यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचं पाहायला मिळालंआहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यापूर्वी 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. दुसऱ्या यादीत माळशिरसमधून अखेर उत्तम जानकर यांचे नावं घोषित करण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकीत जानकर यांनी केलेल्या मदतीची परतफेड करण्यात आल्याचे बोलले जात आहे. महायुतीकडून उत्तम जानकर विरोधात कोण रिंगणात असणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. तसेच, माढ्यातून आणि करमाळ्यातूनही महायुतीचा उमेदवार कोण असेल, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी

1. करंजा – ज्ञायक पटणी
2. हिंगणघाट – अतुल वांदिले
3. हिंगणा – रमेश बंग
4. अणुशक्तीनगर – फहाद अहमद
5. चिंचवड – राहुल कलाटे
6. भोसरी – अजित गव्हाणे
7. माजलगाव – मोहन बाजीराव जगताप
8. परळी – राजेसाहेब देशमुख
9. मोहोळ – सिद्धी रमेश कदम