Home Blog Page 158

गेवराईतून विजयसिंह पंडित मैदानात; पवार लढतीत रंग भरणार का?

0

बीड — गेवराई विधानसभेची जागा महायुतीतील कोणत्या पक्षाला सुटेल असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाने आज जाहीर केलेल्या तिसऱ्या यादीत उमदा चेहरा असलेल्या विजयसिंह पंडित यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

गेवराईतील लढतीचे चित्र आज स्पष्ट झाले असून शिवसेना ठाकरे गटाचे बदामराव पंडित मैदानात उतरलेले आहेत. त्याबरोबरच आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून विजयसिंह पंडित यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ही लढाई तुल्यबळ पंडितांमध्ये होणार असल्याचे सध्या तरी दिसत आहे. दरम्यान भाजपाला राम राम केल्यानंतर आमदार लक्ष्मण पवार यांनी निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं होतं. मात्र ते देखील निवडणुकीच्या मैदानात अपक्ष उतरून लढतीत रंग भरण्याच काम करतील का? असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने तिसरी यादी जाहीर केली असून गेवराईतून विजयसिंह पंडित तर फलटण मधून सचिन सुधाकर पाटील, निफाड मधून दिलीप काका बनकर तसेच पारनेर मधून काशिनाथ दाते यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

जखमेला मलमपट्टी करण्याऐवजी कृत्रिम त्वचा लावता येणार !

0

नागपूर विद्यापीठाच्या संशोधकांना यश

नागपूर — जखम झाली की मलम लावत पट्टी बांधायची असा उपचार वर्षानुवर्षेपासून केला जात आहे. मात्र आता अशी मलमपट्टी करण्यापेक्षा जखमेच्या ठिकाणी दुसरी त्वचाच लावण्याचे संशाेधन नागपूर विद्यापीठाच्या संशाेधकांनी केले आहे.
अँटीमायक्रोबियल गुणधर्म असलेली कृत्रिम त्वचा लावल्याने जखम वेगाने बरी हाेईल आणि संक्रमणही वाढणार नाही, असा दावा संशाेधकांनी केला आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मॉलिक्युलर बायोलॉजी विभागातील संशोधकांनी अँटीमायक्रोबियल गुणधर्म असलेली कृत्रिम त्वचा शोधून तयार केली आहे. मॉलिक्युलर बायोलॉजी विभाग प्रमुख डॉ. दयानंद गोगले आणि लिटूच्या बायोटेक्नॉलॉजी विभाग प्रमुख डॉ. आरती शनवारे यांनी प्रकल्प प्रमुख डॉ. बिपिन लाडे यांच्या मदतीने हे संशोधनकार्य पूर्ण केले आहे. बायोटेक्नोलॉजीचे विद्यार्थी आकाश कांदी यांचाही सहभाग आहे. राजीव गांधी जैविक तंत्रज्ञान (आरजीबीसी) प्रकल्पाअंतर्गत विद्यापीठातील पदव्युत्तर वनस्पती विभागाने जखमांमुळे हाेणारे संक्रमण रोखण्यासाठी व बरे होण्यासाठी अँटीमायक्रोबियल गुणधर्म असलेली नवीन कृत्रिम त्वचा विकसित करण्याबाबत २०१९-२०२० मध्ये संशोधनास सुरुवात केली. यात विद्यापीठाच्या संशाेधकांना क्रांतिकारी यश मिळाले आहे.
कसा करायचा उपयाेग?

जखम झालेल्या जागेवर पट्टीच्या ऐवजी या कृत्रिम त्वचेचा तुकडा लावल्याने जखम सुकेल आणि बरी होईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या औषधीय घटकांचा वापर या कृत्रिम त्वचेत करण्यात आला आहे. या त्वचेमुळे जखम झाकली जाईल आणि बरीही होईल. जखम झालेल्या ठिकाणी कमी वेळात नैसर्गिक त्वचा येण्यासही या संशोधनामुळे शक्य होणार आहे. ही त्वचा जैवविघटनशील असल्याने जखमेवरून काढून टाकल्यानंतरही ती आपोआप विघटित होईल आणि त्यातून दीर्घकाळ टिकणाऱ्या कचऱ्याचा प्रश्नही निर्माण होणार नाही.

काेणते घटक वापरले?
या नाविन्यपूर्ण संशोधनात सोडियम अल्जिनेट, जिलेटिन, किटोसन आणि अँटीमायक्रोबियल एजंट यांचा वापर करून कृत्रिम त्वचा तयार केली. ज्यामुळे उच्च दर्जाच्या जखमा लवकर बरी होण्याकरिता मदत मिळेल.
नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये
जखमांवर मलमपट्टी करण्याची वर्षानुवर्षीची पद्धत अनेकदा संक्रमण रोखण्यात अपयशी ठरते. कृत्रिम त्वचेमध्ये अँटीमायक्रोबियल गुणधर्म असून ज्यामध्ये गॅलिक ॲसिड आणि थायमॉल यांचा समावेश आहे. यातील नैसर्गिक गुणधर्म जंतूंना मारत संक्रमण रोखण्यास मदत करते. कृत्रिम त्वचा ही नैसर्गिक त्वचेसारखी दिसू शकते. संशोधकांनी निर्माण केलेली कृत्रिम त्वचा ही नैसर्गिक त्वचे करिता हानिकारक नसल्याचे विविध चाचण्यांमधून दिसून आले.

धनंजय मुंडेंच्या प्रयत्नातून परळीत अल्ट्राटेक सिमेंट कंपनी उभारणार 600 कोटींचा अतिरिक्त प्रकल्प

0

स्थानिकांना मोठ्या प्रमाणात मिळणार रोजगार

परळी — बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अल्ट्राटेक कंपनीला दिलेल्या विश्वासामुळे कंपनीने त्यांच्या परळी येथील सिमेंट ग्रायडिंग युनिटच्या उत्पादन क्षमतेमध्ये पाच पटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला असून याठिकाणी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक कंपनीने दोन टप्प्यात करणार असल्याचे जाहीर केले आहे.

या उद्योगामुळे अल्ट्राटेक या जागतिक दर्जाच्या कंपनीचे अतिरिक्त युनिट परळीत उभा राहणार असून त्याद्वारे मोठ्या प्रमाणात स्थानिकांना रोजगार निर्मिती होणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी यांचे शिष्टमंडळ परळी येथे धनंजय मुंडे यांच्या भेटीला आले होते, यावेळी झालेल्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली असून, कंपनीने क्षमता वाढीसाठी दि.24 रोजी संपन्न झालेली पर्यावरण जनसुनावणी पार पडल्यानंतर परळी येथील युनिट साठी दोन टप्प्यांत अतिरिक्त 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास मान्यता दिली असल्याचे कंपनीच्या वतीने कळविण्यात आले आहे.

या आधी देखील धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून परळी वैजनाथ शहरालगत इंडिया सिमेंट कंपनीने सदरील युनिट सुरू केले होते. त्याद्वारे देखील मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झालेली आहे.

त्यानंतर आता जागतिक दर्जा प्राप्त असलेली अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या या मोठ्या गुंतवणुकीमुळे मोठ्या प्रमाणात विविध इतर पूरक उद्योगांना चालना मिळणार असून स्थानिकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती देखील होणार आहे. या गुंतवणुकीसाठी मान्यता दिल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी अल्ट्राटेक कंपनीच्या संचालक मंडळाचे आभार मानले आहेत.

संदीप क्षीरसागर यांच्या एकनिष्ठतेची तुतारी वाजली

0

बीड— राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आज उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करतानाच बीडच्या सस्पेन्स वर अखेर पडदा टाकला. संदीप क्षीरसागर यांच्या एकनिष्ठतेचे फळ म्हणून बीडची उमेदवारी जाहीर केली. परंड्यातून राहुल मोटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

बीड विधानसभा मतदार संघात उमेदवाराच्या नावाचा सस्पेन्स कायम ठेवत शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा बीडचा बालेकिल्ला मजबूत कसा होईल यासाठी प्रयत्न केले. डॉ .ज्योती मेटे यांना पक्षप्रवेश देऊन जातीय समीकरणे जुळवण्याच काम केलं. याबरोबरच राजेंद्र मस्के यांना सोबत घेत बीडच्या बालेकिल्ल्याची तटबंदी मजबूत केली. त्यानंतर आज शनिवारी दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये संदीप क्षीरसागर बीड मधून फायनल झाले आहे.जयंत पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेमधून २२ नावांची घोषणा केली

एरंडोल- सतीश पाटील

परंडा- राहुल मोटे

बीड- संदीप क्षीरसागर

आर्वी- मयुरा काळे

बागलाण- दीपिका चव्हाण

येवला- माणिकराव शिंदे

सिन्नर- उदय सांगले

एस पीं च्या पथकाची कामगिरी:कोट्यावधींचा घोटाळा करणारा रामकृष्ण बांगर पकडला; सपोनि दराडेंची कामगिरी

0

बीड — महात्मा फुले बँकेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांच्या घोटाळा प्रकरणातील आरोपी रामकृष्ण मारोतराव बांगर यांना वाशिम येथून अटक करण्यात आली आहे. एस पी च्या आदेशावरून सपोनी बाळराजे दराडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

रामकृष्ण मारोतराव बांगर वय 70 वर्ष यांनी शैक्षणिक संस्था, दूध डेरी, महात्मा फुले अर्बन बँक यासारख्या संस्था स्थापन करून राजकारणात देखील आपली छाप उमटवली होती.मात्र आपल्या राजकीय हितसंबंधाचा वापर करून सहकारी संस्थांमध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केला. त्यांचे वेगवेगळे कारनामे उजेडात येऊ लागले. महात्मा फुले अर्बन बँकेच्या माध्यमातून 14 कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचा गुन्हा देखील त्यांच्यासह 41 जणांवर दाखल झाला होता.
गेल्या 30 ते 40 वर्षापासून अनभिषिक्त सम्राट बनलेल्या रामकृष्ण बांगर यांचे कुटुंब फरार झाले होते. रामकृष्ण बांगर यांच्यावर कलम 420, 409, 467, 468, 471, 120 (ब) अन्वये गुन्हा दाखल आहे. त्यांच्या पत्नी सत्यभामा बांगर यांना सपोनी बाळराजे दराडे यांनी सापळा रचून तुळजापूर येथे देवीचे दर्शन घेऊन घरी आलेल्या असताना मंगळवार दि. 8 ऑक्टोबर रोजी घरातून पकडले होते.
दरम्यान पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या आदेशावरून सपोनी बाळराजे दराडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.उ.निरीक्षक महेश विघ्ने, पो.ह. दुबाले जायभाये यांना सोबत घेऊन मिळालेल्या माहितीवरून वाशीम येथे सापळा रचला. रामकृष्ण बांगर हॉटेल गुलाटी समोर आले असताना त्यांना जेरबंद करण्यात आले. पुढील कारवाईसाठी पाटोदा पोलीस ठाणे याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईमुळे खळबळ माजली आहे.

पोलिसांनी 138 कोटीचं सोनं असलेला कंटेनर पकडला

0

पुणे — विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या राज्यात वाहत असल्याने पोलिस यंत्रणा देखील गाड्यांची झाडाझडती घेत आहे. त्यातच खेड-शिवापूर येथे 5 कोटींची रोकड तपास यंत्रणांच्या हाती लागली होती.कोल्हापूर च्या दिशेने जात असलेल्या इनोव्हा गाडीतून ही मोठी रोख रक्कम पकडण्यात आली. पुणे ग्रामीण पोलिसांकडून चेक पोस्टवर ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी पुण्यात तब्बल 138 कोटींचे सोने पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान पकडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

पुण्यातील सहकार नगर येथे पोलिसांनी एमएच 02 ईआर 8112 या कंटेनरला तपासणीसाठी थांबवले. तपासणीदरम्यान या पांढर्‍या रंगाच्या कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात सोने असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. या कंटेनरमधील सोन्याची एकूण किंमत 138 कोटी रुपये इतकी असल्याची माहिती समोर आली आहे. नियमित नाकाबंदीदरम्यान सदर सोन्याचा कंटेनर थांबवून तपासणी करण्यात आली. सहकार नगर परिसरातून ताब्यात घेतलेला हा टेम्पो एका खासगी लॉजिस्टिक कंपनीचा असून यामधील सोनं पुण्यातील कुठल्या व्यापार्‍याकडे जात होतं, याचा तपास सध्या सुरू आहे. पोलिसांनी या संदर्भात सगळी माहिती आयकर विभाग तसेच निवडणूक आयोगाला कळवलेली आहे.

शेतात गांजाची लागवड;120 झाड जप्त

0

बीड — एका शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती मिळाल्यावरून चकलांबा पोलिसांनी केलेल्या कारवाईत गांजाची 120 झाडे जप्त करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, चकलांबा पोलीस ठाणे हद्दीतील पौळ्याची वाडी येथील कैलास शेषराव शेंडगे यांची गट नंबर 472 मध्ये शेती आहे. या शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती ठाण्याचे प्रभारी सपोनी संदीप पाटील यांना मिळाली.
यावरून त्यांनी शेतात छापा मारला असता. त्यांना गांजाची 100 किलो वजनाची 120 झाडे आढळून आली. या कारवाईत जवळपास दहा लाखाचा गांजा जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या कारवाईने खळबळ माजली आहे.

रमेश आडसकरांच्या हाती तुतारी; मानली जात आहे फिक्स उमेदवारी

0

माजलगाव — राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार जाहीर झाला असला तरी शरद पवार गटाच्या उमेदवाराच्या नावाची प्रतीक्षा आहे. त्यातच पंकजा मुंडे यांचे समर्थक रमेश आडसकर यांनी तुतारी हाती घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या नावावर शिक्का मुहूर्त होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या एक वर्षात मराठा आंदोलनामुळे माजलगाव मतदार संघ ढवळून निघाला होता.आ. प्रकाश सोळंके यांनी मराठा आरक्षण आंदोलना बाबत एका कार्यकर्त्याशी फोनवर बोलताना अपशब्दांचा वापर केला होता. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्याचे पडसाद मोठ्या प्रमाणावर उमटले होते. लोकसभा निवडणुकीत देखील जरांगे फॅक्टरचा प्रभाव माजलगाव मतदार संघात दिसून आला. माजलगाव मतदार संघात शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळावी यासाठी अनेक जण प्रयत्नशील असल्याचे पाहायला मिळाले.दोन दिवसांपूर्वी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आ. प्रकाश सोळंके यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. परंतु शरद पवार गटाकडे अनेक जण इच्छुक असल्यामुळे पहिले यादीत माजलगाव मतदार संघातील उमेदवाराचे नाव जाहीर झाले नव्हते. यातच शुक्रवारी रमेश आडसकर यांचा शरद पवार गटात प्रवेश झाल्याने त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
रमेश आडसकर हे गोपीनाथराव मुंडे व पंकजा मुंडे यांचे समर्थक मानले जातात. मागील विधानसभा निवडणुकीत मतदारसंघा बाहेरील असताना देखील केज व परळी मतदारसंघातील भाजपच्या उमेदवाराला फायदा व्हावा म्हणून रमेश आडसकर यांना माजलगावची उमेदवारी जाहीर झाली होती. नवखे असताना रमेश आडसकर यांनी चांगली फाईट दिली. त्यांचा अल्पमताने पराभव झाला होता. महायुतीमध्ये माजलगाव मतदार संघ हा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्यामुळे रमेश आडसकर यांना पक्ष बदलल्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे त्यांनी शरद पवार यांची जवळीक करत आज शरद पवार गटात प्रवेश केला. मतदारसंघातील राजकीय गणिते पाहता त्यांची उमेदवारी फिक्स मानली जात आहे. मात्र, आडसकर यांनी ‘तुतारी’ हाती घेत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केल्यामुळे पंकजा मुंडे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

अनिश्चिततेच्या राजकीय हिंदोळ्यावर क्षीरसागर घराण्याचे झोके

0

बीड — जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या चार दशकाहून अधिक काळापर्यंत क्षीरसागर घराण्याचा “शब्द”परवलीचा मानला गेला. कार्यकर्त्यांचा राबता हा बंगल्यावर कायम असायचा निवडणुका आल्या की त्याला अक्षरशः भरती यायची मात्र घरात बेकीच राजकारण निर्माण झाल्यामुळे बीडच्या सारीपाटावर या निवडणुकीत मात्र क्षीरसागरांना आतापर्यंत डावललं गेल्याचा चित्र पाहायला मिळतं. भूमिका स्पष्ट नसल्यामुळे जयदत्त क्षीरसागर संधी कोणाकडे मिळते यावर लक्ष ठेवून आहेत. तर संदीप क्षीरसागर एकनिष्ठतेचं फळ मिळेल या आशेवर विसंबून आहेत.योगेश क्षीरसागर देखील अनिश्चिततेच्या हिंदोळ्यावर झोके घेत असल्याचे सध्यातरी पाहायला मिळत आहे. कधी नव्हे ते बंगला अलग थलग पडल्याचं तर दिसतच आहे पण अनेक वावड्या नुसत्याच घोंगावत आहेत.

केशरबाई क्षीरसागर यांच्या काळापासून जिल्ह्याच्या राजकारणात बंगल्याच महत्व जयदत्त क्षीरसागर यांच्या पर्यंत कायम राहिल्या गेलं. जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात क्षीरसागरांची ताकद कायम राहिली गेली. त्यामुळे त्यांना वजा करून मतदार संघाच गणित मांडणं मी मी म्हणणाऱ्या धुरंधर राजकारण्याला देखील कधीच जमलं नाही. ही बीडची परिस्थिती माहिती असल्यामुळे ते ज्या पक्षात राहिले त्या पक्षाने देखील कधीच क्षीरसागर यांचा उपमर्द होईल अशी कृती होऊ दिली नाही. उलट त्यांना विचारात घेऊनच मतदार संघाची त्यातील उमेदवारांची आखणी केली जायची. प्रशासनावर असलेली मजबूत पकड जनतेशी जोडली गेलेली नाळ यामुळे पराभव स्वीकारावा लागला असला तरी क्षीरसागरांच वलय त्या काळातही तितकच महत्त्वाचं राहिला गेलं. त्यामुळे अडकलेलं प्रत्येक काम हे बंगल्यावर गेलं तर होणारच ही आशा कायम जनतेच्या मनात असायची परिणामी निवडणुका असो अथवा नसो कार्यकर्त्यांसह समर्थकांची गर्दी बंगल्यात पाहायला मिळायची. एवढच की निवडणुकीत त्याला उधाण आलेलं असायचं‌. हा जवळपास 40 – 45 वर्षाचा इतिहास आहे. मात्र कालाय तस्मै नमः घरातील प्रत्येकाचीच राजकीय महत्त्वकांक्षा जागी झाली अन घराला घरघर लागली. 2019 च्या निवडणुकीत त्याचा परिणाम जाणवला गेला जयदत्त क्षीरसागर यांना पुतण्याकडूनच निसटता पराभव स्वीकारावा लागला. तसं काका पुतण्याच्या राजकारणाची समाजकारणाची पद्धती बदलली गेली. यातून बंगल्याचे महत्व कमी होऊ लागलं. जसजसं निवडणूक जवळ येऊ लागली तसं तसं बीडच्या नगरपालिकेवर अधिराज्य गाजवणाऱ्या भारत भूषण क्षीरसागर यांच्या मुलाची राजकीय महत्त्वकांच्या देखील वाढली गेली. त्याने देखील नवे राजकीय डावपेच निवडणूक आखाड्यात उतरण्यासाठी आखायला सुरुवात केली. त्यामुळे एकाच घरातून विधानसभा उमेदवारीसाठी वेगवेगळ्या पक्षातून का होईना तिघांची दावेदारी केली जाऊ लागली. जयदत्त क्षीरसागर यांनी राज्याच्या राजकारणाची बदलती समीकरणे पाहून वेट अँड वॉच असं म्हणत भूमिका स्पष्ट केली नाही.कुठल्याही राजकीय पक्षाशी त्यांनी बांधील की जपली नाही. कदाचित ते पूर्वीच्या आपलं जनतेवर असलेलं वर्चस्व आपल्याला तारुन नेईल. राजकीय पक्ष आपल्याला पायघड्या घालतील अशी अपेक्षा कदाचित त्यांना असावी. ती आता फोल ठरू लागल्याचं दिसू लागला आहे. काहीशी अशीच अवस्था संदीप क्षीरसागर यांची देखील आहे. पक्ष फुटीच ग्रहण लागल्यानंतर शरद पवारांची त्यांनी साथ सोडली नाही. लोकसभा निवडणुकीत मातब्बर समजल्या जाणाऱ्या पंकजा मुंडे यांचा भावाची साथ मिळवून देखील पराभव करून विजयाची माळ पवारांच्या गळ्यात घालता आली. याच एकनिष्ठतेचा फळ आपल्याला मिळेल असा आशावाद “गृहीत” धरला गेला. राजकारणात “गृहीत”या शब्दाला फारसा अर्थ नसतो. हे मात्र संदीप क्षीरसागर यांना कळालं नाही. राज्याच्या राजकारणात शरद पवारांसारखं व्यक्तिमत्व कधी काय डावपेच अखेल त्यात कोण चित पट होईल हे कुणालाच सांगता आलं नाही. हा इतिहास संदीप क्षीरसागरांना लक्षात राहिला नाही. त्याहूनही वेगळी स्थिती डॉ.योगेश क्षीरसागर यांची आहे. त्यांची मदार सर्वस्वी दुसऱ्यावर अवलंबून आहे. दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला ही जुनी म्हण अजूनही बदलली नाही. धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांच्यावर ते विसंबून आहेत. वास्तविक पाहता बीडची जागा शिवसेनेच्या शिंदे गटालाच मिळाली पाहिजे यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे शिंदे गटाला जागा सुटली तर योगेश क्षीरसागरांचे भवितव्य अंधारात जाणार आहे. तसंही उमेदवारी मिळाली तरी त्यांचा जनसंपर्क मतदारसंघात कमीच आहे.
एकंदरच क्षीरसागर घराण्याचे तीन मल्ल निवडणूक आखाड्यात उतरण्यासाठी तेल लावून सज्ज असले तरी वरिष्ठांच्या खेळीने मैदानात उतरण्याआधीच चितपट होतात की काय? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. यातील संदीप क्षीरसागर याची  उमेदवारी निश्चित मानली जात आहे. जयदत्त क्षीरसागर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करण्याच्या वावड्या उडत आहेत. तर बीडची जागा आपल्याच पक्षाला मिळावी यासाठी पक्षश्रेष्ठींच्या खेळीत योगेश क्षीरसागरांची कोंडी झाली आहे.तरी बीडच्या राजकारणात महत्त्वाचं राजकीय घराणं समजल्या जाणार क्षीरसागर घराण्यातील प्रत्येक नेता अनिश्चिततेच्या हिंदोळ्यावर झुलत असल्याचं पाहायला मिळत आहे.

काँग्रेसची 48 उमेदवारांची यादी जाहीर

0

मुंबई — विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पाथरीतून सुरेश वरपूडकर, विलासराव देशमुख यांच्या दोन्ही मुलांना लातूर – ग्रामीण मध्ये धिरज देशमुख तर शहर मधून अमित देशमुख उमेदवारी देण्यात आली आहे.

अशी आहे उमेदवारांची यादी
अक्कलकुवा – ॲड. के.सी. पडवी (ST)
2.शहादा – राजेंद्रकुमार कृष्णराव गावित (ST)
3. नंदुरबार – किरण दामोदर तडवी (ST)
4.नवापूर – श्रीकृष्णकुमार सुरुपसिंग नाईक (ST)
5.साक्री – एसटी प्रवीणबापू चौरे
6.धुळे ग्रामीण – कुणाल रोहिदास पाटील
7.रावेर – ॲड. धनंजय शिरीष चौधरी
8.मलकापूर – राजेश पंडितराव एकाडे
9.चिखली – राहुल सिद्धिविनायक बोंद्रे
10.रिसोड – अमित सुभाषराव झनक
11.धामणगाव रेल्वे -प्रा.वीरेंद्र वाल्मीकराव जगताप
12.अमरावती – डॉ. सुनील देशमुख
13.तेओसा – ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर
14.अचलपूर – अनिरुद्ध उर्फ बबलूभाऊ सुभानराव देशमुख
15.देवळी – रणजित प्रताप कांबळे
16.नागपूर दक्षिण पश्चिम – प्रफुल्ल विनोदराव गुडधे
17.नागपूर मध्यवर्ती – बंटी बाबा शेळके
18.नागपूर पश्चिम – विकास पी. ठाकरे
19.नागपूर उत्तर – SC डॉ. नितीन काशिनाथ राऊत
20 साकोली – नानाभाऊ फाल्गुनराव पटोले
21.गोंदिया- गोपालदास शंकरलाल अग्रवाल
22.राजुरा- सुभाष रामचंद्रराव धोटे
23.ब्रह्मपुरी – विजय नामदेवराव वडेट्टीवार
24.चिमूर – सतीश मनोहरराव वारजूकर
25.हदगाव – माधवराव निवृत्तीराव पवार पाटील
26 भोकर- तिरुपती बाबुराव कदम कोंडेकर
27 नायगाव – मीनल निरंजन पाटील (खतगावकर)
28 पाथरी – सुरेश अंबादास वरपुडकर
29 फुलंब्री – विलास केशवराव औताडे
30 मीरा भाईंदर – सय्यद मुजफ्फर हुसेन
31 मालाड पश्चिम – अस्लम आर. शेख
32 चांदिवली – मोहम्मद आरिफ नसीम खान
33 धारावी – डॉ.ज्योती एकनाथ गायकवाड (ST)
34 मुंबादेवी – अमीन अमीराली पटेल
35 पुरंदर – संजय चंद्रकांत जगताप
36 भोर – संग्राम अनंतराव थोपटे
37 कसबा पेठ – रवींद्र हेमराज धंगेकर
38 संगमनेर – विजय बाळासाहेब थोरात
39 शिर्डी – प्रभावती जे.घोगरे
40 लातूर – ग्रामीण धिरज विलासराव देशमुख
41 लातूर शहर – अमित विलासराव देशमुख
42 अक्कलकोट – सिद्धाराम सातलिंगप्पा म्हेत्रे
43 कराड दक्षिण – पृथ्वीराज चव्हाण
44 कोल्हापूर दक्षिण – रुतुराज संजय पाटील
45 करवीर – राहुल पांडुरंग पाटील
46 हातकणंगले – राजू जयंतराव आवळे (SC)
47 पलूस-कडेगाव – डॉ.विश्वजीत पतंगराव कदम
48 जाट – विक्रमसिंह बाळासाहेब सावंत