Home Blog Page 154

अठरापगड जातींचा डॉ. योगेश क्षीरसागर यांना पाठिंबा

0

बीड —  महायुतीचे बीड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ.योगेश भारतभूषण क्षीरसागर यांना अठरापगड जातीधर्माचा पाठिंबा मिळत आहे. बीड शहरात रविवारी (दि.१०) माळी, विरशैव लिंगायत, भावसार, कोष्टी, साळी, गवळी, लोणारी, रंगारी, बुरुड समाजबांधवांशी मेळाव्यातून डॉ.योगेश क्षीरसागर यांनी संवाद साधला.

विविध समाजाच्या बैठकीत डॉ.योगेश क्षीरसागर यांना जाहीर पाठिंबा देत मोठ्या मताधिक्याने निवडून आणणार असल्याची ग्वाही समाजबांधवांनी दिली. माळी समाजाच्या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसीचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, माजी नगराध्यक्ष बाबुराव दुधाळ, सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष किशोर राऊत, नामदेव दुधाळ, मोहनराव गोरे, सतीश शिंदे, ॲड.राजेंद्र राऊत, माजी नगरसेवक किशोर काळे, लक्ष्मण दुधाळ, नितीन साखरे यांच्यासह माळी समाजातील प्रतिष्ठित नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच, विविध जातीधर्माच्या संयुक्त मेळाव्याला डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांनी संबोधित केले. या मेळाव्यास गवळी समाजाचे नेते तथा भाजपचे शहराध्यक्ष जगदीश गुरखुदे, दत्ता परळकर, तेली समाजाचे आदित्य पवार, रजपूत समाजाचे सूरजसिंग जयसिंग चुंगडे, माजलगावकर मठाचे प्रमुख अनिलअप्पा मिटकरी, विरशैव लिंगायत समाजाचे अशोकअप्पा चिफाडे, शिवप्रकशअप्पा कानडे, कोष्टी समाजाचे दगडूअप्पा म्हेत्रे, सुरेश आसलेकर, साळी समाजाचे जिल्हाध्यक्ष राजू ताटे, भावसार समाजाचे प्रकाश कानगावकर, लोणारी समाजाचे अनिलअप्पा मुळेकर, बुरुड समाजाचे अर्जुन वडतिले यांच्यासह समाजाचे नेते, संघटनांचे पदाधिकारी, समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परशुराम महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांचे स्वागत; वीर सावरकर प्रतिष्ठानचा पाठिंबा

वीर सावरकर सामाजिक प्रतिष्ठानच्या सर्व संस्था संचालक, हितचिंतकांची डॉ.योगेश क्षीरसागर यांनी सदिच्छा भेट घेत सामाजिक परिस्थिती विषयांवर चर्चा केली. तसेच, परशुराम आर्थिक विकास मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष आशिष दामले यांचे स्वागत केले. यावेळी अनेक समाजबांधव उपस्थित होते. याप्रसंगी वीर सावरकर सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने डॉ.योगेश क्षीरसागर यांना पाठिंबा देण्यात आला.

बाबुराव पोटभरे यांचा मिळाला पाठिंबा

डॉ.योगेश क्षीरसागर यांनी बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोठभरे यांची भेट घेऊन पाठिंबा देण्याची विनंती केली. काल बाबुराव पोटभरे यांनी बीडमध्ये पक्षाची बैठक घेतली. त्यांनतर पत्रकार परिषद घेऊन जाहीर पाठिंबा दिला. या बैठकीस महायुतीचे उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर हे देखील उपस्थित होते.

निवडणूक कर्तव्यात कसूर; पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

0

बीड — निवडणूक काळात सतर्कता बाळगली जात असताना चेक पोस्टवर नियुक्त केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने कामात दांडी मारल्याच्या कारणावरून नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मांजरसुंबा रोडवरील रत्नागिरी फाट्यावर वाहनांची तपासणी करण्यासाठी चेक पोस्ट उभारण्यात आला आहे या ठिकाणी पोलीस अंमलदार सुदाम सुखदेव शेलार यांची नियुक्ती करण्यात आली होती. अंमलदारांना या ठिकाणी बारा तासांची ड्युटी देण्यात आलेली आहे. मात्र 9 नोव्हेंबर रोजी सुदाम शेलार हे गैरहजर राहिले. ते कर्तव्यावर हजर झाले नाही म्हणून त्यांना मोबाईल वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. शेवटी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशावरून सहशिक्षक अण्णा कसबे यांच्या फिर्यादीवरून नेकनूर पोलीस ठाण्यात सुदाम शेलार यांच्या विरोधात कलम 134 लोकप्रतिनिधीत्व कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदीप भैया ना निवडून द्या; त्यांना सत्तेत मोठी जबाबदारी देणार — खा.शरदचंद्र पवार 

0

शरद पवारांच्या सभेने संदीप भैय्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब

बीड — बीड मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ.संदीप क्षीरसागर यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खा.शरदचंद्र पवार यांनी रविवारी (दि.१०) रोजी बीड शहरात सभा घेतली. यावेळी, “राज्यात सत्ता आल्यानंतर संदीपभैय्या महत्वाच्या पदावर बसलेले असतील, त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या.” असे उद्गार बीडच्या सभेत खा.पवार साहेबां यांचे होते.


बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे शनिवारी (दि.९) रोजी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व मित्र पक्षांची महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ, खा.शरदचंद्र पवार यांनी विजयी सभा घेतली. यावेळी, राज्यात आणि देशातील जनतेच्या मनात या सरकारच्या धोरणांमुळे एकप्रकारची अस्वस्थता आहे. बळीराजाला आपला जीव द्यावा लागत आहे. राज्यात उद्योगधंद्याची गरज असताना उद्योगधंदे बाहेर पाठवले जात आहेत. आमचे सरकार आल्यानंतर उद्योगधंदे वाढीसाठी आम्ही काम करू. अडचणीच्या काळात संदीपभैय्या विचारासोबत आणि भूमिकेसोबत राहीले त्यामुळे आता तुम्ही संदीपभैय्यांच्या मागे उभे रहावे. आता चांगला आल्यानंतर‌ सर्वप्रथम संदीप भैय्यांसारख्या निष्ठावंताचा विचार होईल.‌ खा.पवार साहेबांच्या सभेला बीड

लोकसभा मतदारसंघाचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे, राजे भूपनसिंह होळकर, माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.बदामराव पंडीत, माजी आ.पृथ्वीराज साठे, माजी आ.संगिताताई ठोंबरे, प्रा.नितेश कराळे सर, रविंद्र दळवी, अजिंक्य चांदणे, राहुल सोनवणे, गणेश वरेकर, परमेश्वर सातपुते, उल्हास गिराम, कॉ.नामदेव चव्हाण, कॉ.मोहन गुंड, अशोक येडे, सुभाष लोनके आदी महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

सिमेंट ट्रकच्या टायर खाली येऊन पोलिसाचा मृत्यू

0

बीड — सिमेंट घेऊन जाणार्‍या ट्रकच्या पाठीमागील टायरच्या खाली आल्याने दुचाकीस्वार पोलीस कर्मचार्‍याचा जागीच मृत्यु झाल्याची घटना शनिवारी दुपारी 12 च्या सुमारास शहरातील अंबिका चौकात पांगरी रोडवर घडली.

सुनील सुंदरराव घोळवे हे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होते. आज दुपारी 12 च्या सुमारास ट्रक क्रमांक एम. एच. 44 यू. 9871 सिमेंट
घेऊन अंबिका चौकातून पांगरी रोड कडे चालला होता. यावेळी पोलीस कर्मचारी दुचाकी क्रमांक एम. एच. 44 ए ए 9076 वरून जात होते. यावेळी ट्रक जवळून जाताना अचानक ते दुचाकीवरुन पडले अन् ते ट्रकच्या पाठीमागील चाका खाली आले.यात पोलीस कर्मचारी सुनील घोळवे यांचा जागीच मृत्यु झाला. घटना घडताच पोलीस उपाधीक्षक विश्‍वांभर गोल्डे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केला. अपघात घडताच ट्रक चालक घटनास्थळावरुन फरार झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

काहींच्या डोक्यात सत्ता गेली; परळीत गुंडगिरी वाढली त्यांना हद्दपार करा — शरद पवार

0

परळी — परळी सह जिल्ह्यात वाढलेल्या गुंडगिरीने जनतेत दहशत आहे. व्यापाऱ्यांना देखील याचा फटका बसत आहे. ज्याला संकटाच्या वेळी आम्ही मदत केली त्यानेच आमचा पक्ष फोडला काहींच्या डोक्यात सत्ता लवकर गेल्यामुळे हे घडत आहे अशा व्यक्तीला कायमचा हद्दपार करा यासाठी राजेसाहेब देशमुख यांना विजयी करा असा आवाहन शरद पवार यांनी केले.

परळी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारासाठी आज शनिवारी बीड जिल्ह्यात शरद पवार यांनी परळीत सभा घेतली.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, अडचणीच्या काळात ज्यांना साथ दिली. मदतीचा आधार दिला. संकटकाळात धिर दिला. त्यांनी माझा पक्ष फोडण्यासाठी पुढाकार घेतला, असे म्हणत शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला.
ते पुढे म्हणाले की काही वर्षापूर्वी स्व.पंडित अण्णा मुंडे हे आपल्या मुलाला धनंजयला घेऊन माझ्याकडे आले. आम्हाला तुमची मदत हवी आहे असे म्हणत आमच्याकडून मदतीची अपेक्षा केली. संकटकाळात त्यांना मदत करण्याचा मी शब्द दिला. तो शब्द पूर्ण करत धनंजय मुंडेंना विधान परिषदेवर मोठी संधी दिली. एवढेच नाही तर विधान परिषदेचा विरोधी पक्षनेते पद देखील दिलं. त्यानंतर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली. मंत्रिमंडळातही त्यांना संधी दिली.सत्ता कधी डोक्यात जाऊ द्यायची नसते. काहींच्या डोक्यात सत्ता फार लवकर गेली.काही वर्षातच त्यांनी आमचा पक्ष फोडला. मोठा धोका दिला, अशा गद्दारांना सत्तेतून हद्दपार करा.परळीत गुंडगिरी वाढली आहे. लोकांना त्रास देणं हे कुठेतरी थांबल पाहिजे ही गुंडगिरी संपविण्याचे काम तुम्हाला करायचे आहे. या गुंडगिरीला पोसणाऱ्या लोकांना पराभूत करायचे आहे असे आवाहनही शरद पवार यांनी केले.

डॉ. योगेश क्षीरसागरांची ताकद वाढू लागली; पक्षप्रवेशाचा ओघ वाढला

0

बीड —  विधानसभेची निवडणूक जस जशी जवळ येत आहे तस तशी बीड मतदार संघातील महायुतीचे उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. बीड मतदारसंघातून हजारो शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश होत असतानाच आता विकासाच्या मुद्द्यावर १० सरपंच व २ उपसरपंचांनी डॉ.योगेश क्षीरसागर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत डॉ.योगेश क्षीरसागर यांची ताकद वाढली आहे.

बीडच्या मतदारसंघात मागील पाच वर्षात विकासकामे न झाल्याने नाळवंडी सर्कल आणि शिरूर तालुक्यातील अनेक गावातील सरपंचांनी डॉ.योगेश क्षीरसागर यांना पाठिंबा दिला असल्याचे सांगितले. पाठिंबा देणाऱ्या सरपंच आणि उपसरपंच यामध्ये कैलास घुगे सरपंच (बोरफडी), अशोक शिंदे सरपंच (हिवरापहाडी), संजय सलगर सरपंच (बाबुळखुंटा), अभिजीत खाडे सरपंच (जांब), सतीश वनवे सरपंच (पाटोदा बेलखंडी), शिवमूर्ती सानप सरपंच (पौंडूळ), रवीदादा गंगावणे सरपंच जुजगव्हाण), जयराम गीते सरपंच (रुद्रापूर), बालाजी शिंदे सरपंच (खांबा लिंबा), संतोष तांदळे सरपंच (हिंगणी. खू) श्रीराम सुरवसे उपसरपंच (जुजगव्हाण),
रेवणनाथ धांडे उपसरपंच (खांबा लिंबा) यांचा समावेश आहे.

डॉ.योगेश क्षीरसागर मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील; सरपंच, उपसरपंचांचा प्रवेश

डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली बीड मतदारसंघाचा विकास करण्यासाठी अनेक सरपंच, उपसरपंच यांनी डॉ.योगेश क्षीरसागर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. डॉ.योगेश क्षीरसागर हे सर्व जाती धर्मातील सोबत घेऊन पुढे जाणारे नेतृत्व आहे. सुख-दुःखात धाऊन जाणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी कसलेही संविधानिक पद नसताना आमच्या सर्कलमध्ये अनेक विकासाची कामे केली आहेत. मागील पाच वर्षात आमच्या भागातील विकासकामे झाली नाहीत. त्यामुळे त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत मोठ्या मतधिक्याने निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करणार असल्याचे पाठिंबा देणाऱ्या सरपंच, उपसरपंच यांनी सांगितले.

गायरान जमिनीत गांजाची लागवड; 58 लाखाचा गांजा जप्त

0

बीड — केज तालुक्यातील बनसारोळा येथे सरकारी गायरान जमिनीवर पोलिसांनी छापा मारून 57 लाख 90 हजार रुपये किमतीची गांजाची 500 किलो झाडे जप्त करण्यात आली.सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्यासह युसुफवडगाव पोलिसांनी शुक्रवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली.

. बनसारोळा येथील शासकीय गायरान जमिनीत हा गैरप्रकार सुरु होता. या जमिनीत पारधी समाजाची लोकवस्ती आहे. या वस्तीलगत गांजाची लागवड करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली.माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना व युसुफवडगाव ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांनी सहकाऱ्यांसह शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. यावेळी गायरान जमिनीत गांजाची झाडे लागवड केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलीस कर्मचाऱ्यांनी दोन तासाहून अधिक वेळ परिश्रम घेऊन गांजाची झाडे उपटून काढली.

नायब तहसीलदार आशा वाघ व तलाठी श्रीमती वाघमारे यांच्या उपस्थितीत सदरील गांजाच्या झाडांचे जागेवरच वजन करण्यात आले. तेव्हा पोलिसांनी अंदाजे 57 लाख 90 हजार रुपयांचा 550 किलो गांजा ताब्यात घेतला. ही गांजाची झाडे
नेमकी कोणी लागवड केली? याचा पोलीसांकडून तपास करण्यात येत आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना, सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे, पोलीस उपनिरीक्षक राहुल पतंगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक थोरात, दिनकर तोंडे, योगेश समुद्रे, गणेश राऊत, महादेव केदार, जीवन जाधव, सुधीर बामदळे, भगवान खेडकर, प्रेमीला गाडेकर यांच्या पथकाने कारवाई केली आहे. या प्रकरणी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रघुनाथराव पेशव्यांची आठवण करून देणारे प्रकाश दादा जनतेचं भलं कसं करणार?

0

बीड — पेशवाईची वस्त्र अंगावर यावीत यासाठी रघुनाथराव पेशव्यांनी नारायणराव पेशव्यांचा घात केला होता. याच इतिहासाची पुनरावृत्ती माजलगाव मध्ये प्रकाश दादा सोळंके यांनी केली. आरक्षण आंदोलनात सोळंकेंची भूमिका वादग्रस्त ठरली.जे जातीचे झाले नाहीत पुतण्याचे झाले नाहीत ते गोरगरीब जनतेचे भलं कसं करणार? असा मतप्रवाह जनतेत बनल्याने प्रकाश दादांसाठी धोक्याची घंटा वाजू लागली आहे.

प्रचाराचा नारळ फोडून पुरुषोत्तमाच्या साक्षीने डोळ्यात अश्रू आणणाऱ्या प्रकाश सोळंके यांचे मगरीचे अश्रू म्हणून गणना होऊ लागली आहे.
प्रत्येक वादा मतदार संघाला भकास करणारा आहे.राजकारणी हा कलाकार असतो;रडून केलेलं कर्म धुण्याचा प्रयत्न करत जनतेला मूर्ख बनवायच असतं याच हातखंड्याचा वापर सोळंकेंनी केला.प्रत्येक वेळी मतदारांनी संधी दिली.यामुळे राजकीय अनुभवाने त्यांच्यात कोडगेपणा इतका आला की अक्षरशःभावनाच संपल्या गेल्या. विकासाची वाट लावत त्यांनी स्वतःची सरंजामशाही निर्माण केली. मात्र लोकशाहीत असं होत असतं असं म्हणून जनतेने प्रत्येक वेळी दिलेली संधी जनतेच्या विकासाला घातक ठरली. त्यांच्या याच कोडगेपणातून मराठा आरक्षण आंदोलनाच्या काळात सगळ्यात वादग्रस्त ठरलेलं व्यक्तिमत्व म्हणून आपली ओळख प्रकाश सोळंके यांनी निर्माण केली. समाजात त्यांच्या वागणुकीमुळे प्रचंड चिडही निर्माण झाली. पण हा माझा शेवटचा कार्यकाळ आहे.असं म्हणून जनतेच्या मनात पेटलेली विरोधाची भावना त्यांनी शांत केली. हे करताना प्रकाश दादांनी आपला नवा राजकीय डाव खेळत समाजात असलेली आग शांत करण्यासाठी पुतण्याचा वापर केला. आपला राजकीय उत्तराधिकारी जाहीरही करून टाकला. मात्र ऐनवेळी राजकीय सारीपाटावर चाली खेळत पुतण्याच्या पाठीत खंजीर खुपसत “पेशवाईची आठवण करून दिली. पेशवाईत देखील पेशवाईची राज वस्त्र आपल्याला मिळावीत यासाठी रघुनाथराव पेशव्यांनी नारायणराव पेशव्यांचा असाच घात केला होता. आजही इतिहासाची पानं चाळली तर “काका मला वाचवा” ही हाक ऐकायला मिळते. “नुसता काका मला वाचवा”ही हाक कानी पडताच महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यासमोर पेशवाई चा इतिहास उभा राहतो. धोका, दगाबाजी साठी हे उदाहरण आवर्जून आजही दिलं जातं. प्रकाश सोळंके च्या बाबतीत देखील “ध”चा “मा” झाल्याचं पाहायला मिळालं.
जे प्रकाश दादा सोळंके प्रत्येक वेळी जनतेच्या भावनेशी खेळून त्यांची वाट लावण्यात वाकबगार झाले. ते कधी स्वार्थापुढे जनतेचे ही झाले नाहीत. स्वतःच्या जातीचे देखील झाले नाहीत. स्वतःच्या भावाने “धैर्यशील सोळंके काकांनी” त्याग करून प्रकाशदादांची पाठराखण केली.त्यांच्या मुलाच्या भवितव्य घडवण्याची वेळ आली त्यावेळी धाकट्या भावासोबतच पुतण्याच्या सोबत देखील दगाबाजी केली. एवढं करूनही धैर्यशील काकांनी धैर्याचा परिचय देत गप्प बसण्याचा मार्ग स्वीकारला. त्याचा परिणाम देखील प्रकाश सोळंकेवर यत्किंचितही झाला नाही. ते प्रकाशदादा माजलगावकरांच्या अंधारलेल्या वाटा म्हातारपणी म्हणे प्रकाशमान करणार आहेत. उमेदीच्या काळात मतदार संघाकडे त्यातील जनतेच्या भल्याकडे ढुंकूनही बघितले नाही. ते दादा आता शेवटच्या काळात जनतेचा भलं करणार आहेत. हे सांगूनही विश्वास कसा ठेवायचा? असा प्रश्न जनतेपुढे निर्माण झाला आहे. जातीचे न होणारे दादा, पुतण्याचे झाले नाहीत ते जनतेचे गोरगरिबांचे कसे होणार?
जाता जाता एकदा माजलगावची उरली सुरली सुद्धा वाऽऽट ते लावणार? असा मतप्रवाह सुरू झाल्याने प्रकाश दादांसाठी धोक्याची घंटा वाजू लागली आहे.

पाडळशिंगी जवळील अपघातात पिता पुत्राचा मृत्यू

0

बीड — नातेवाईकाच्या लग्नासाठी मुंबईहून बीडकडे येणाऱ्या चारचाकी गाडीला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात पिता-पुत्र जागीच ठार झाले तर चौघे जण जखमी झाले.हा अपघात इतका भीषण होता की, एका मयताच्या मृतदेहाच्या चिंधड्या झाल्या होत्या. ही दुर्दैवी घटना आज सकाळी सहा वाजता पाडळसिंगीच्या टोल नाक्याजवळ घडली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सय्यद हमीद वय 70 वर्षे रा. मुंबई यांच्या नातेवाईकाचे 10 नोव्हेंबर रोजी बीड येथे लग्न होते. या लग्नानिमित्त ते आपल्या कुटुंबियासमवेत चारचाकी गाडीने बीडकडे येत होते. सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान पाडळसिंगी टोलनाक्याजवळ त्यांच्या गाडीला पाठीमागून अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात सय्यद हमीद वय 70 वर्ष व त्यांचा मुलगा सय्यद मुदस्सीर वय 35 वर्षे, रा. अंधेरी, मुंबई हे दोघे जागीच ठार झाले तर गाडीतील अन्य चार जण जखमी झाले. त्यामध्ये दोन लहान मुलांचा आणि दोन महिलांचा समावेश आहे. अपघात इतका भीषण होता की, गाडी चक्काचूर झाली होती. त्यातील एका मयताचा मृतदेह छिन्नविछिन्न झाला होता. जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेबद्दल बीड शहरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

शरद पवारांची बीडमध्ये शनिवारी सभा; मुक्कामाने संदीप क्षीरसागरांचा विजयावर शिक्कामोर्तब

0

सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहा-आ.संदीप क्षीरसागर

बीड — बीड विधानसभा मतदार यांनी मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार आ.संदीप क्षीरसागर यांच्या विजय निश्चिततेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) चे अध्यक्ष, महाविकास व इंडिया आघाडीचे प्रमुख नेते खा.शरदचंद्र पवार यांची बीड शहरात शनिवारी (दि.९) रोजी छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे जाहीर प्रचार सभा होणार आहे. याबरोबरच खा. शरद पवार बीडमध्ये मुक्काम करून आपले डावपेच खेळणार असल्याने संदीप क्षीरसागर यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होणार आहे. या मुक्कामात बीड जिल्ह्यात अनेक राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर बीड जिल्ह्यात सगळे आमदार आणि पुढारी सत्तेत सहभागी झाले. परंतु जिल्ह्यात एकमेव निष्ठावंत आमदार संदीप क्षीरसागरांनी पवार साहेब व आपल्या पक्षाची साथ सोडली नाही. याच एकनिष्ठतेचे आणि आपली भूमिका व विचार न सोडण्याचे फळ म्हणून आ.संदीप क्षीरसागर यांना दुसर्‍यांदा संधी मिळाली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व मित्रपक्षांची महाविकास आघाडी यांचे अधिकृत उमेदवार असलेले संदीप क्षीरसागर यांच्या प्रचारासाठी खा.शरदचंद्र पवार यांची  बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे शनिवार दि. 9 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६:०० वाजता भव्य जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या तयारीची पाहणी संदीप क्षीरसागर यांनी आज करत प्रसार माध्यमांशी देखील संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवारांच्या मुक्कामामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय समीकरण प्रचंड बदलणार असल्याचे संकेत दिले. त्यामुळे खा. शरद पवारामुळे बीड चा बालेकिल्ला मजबूत होणार असून मोठमोठे राजकीय भूकंपांना देखील विरोधकांना सामोरे जावं लागणार आहे.या जाहीर सभेला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.