Home Blog Page 151

संदीप क्षीरसागर चुलत्याच्या मताधिक्याचा विक्रम मोडीत काढणार!

0

बीड — विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणं प्रचंड बदलली असून संदीप क्षीरसागर प्रचंड मतांनी विजयी होतील अस चित्र निर्माण झाला आहे. 2009 च्या निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांचे चुलते जयदत्त क्षीरसागर यांनी 70 हजाराहून अधिक मताधिक्य मिळवत दणदणीत विजय मिळवला होता. या निवडणुकीत त्यांचा हा विक्रम संदीप क्षीरसागर मोडीत काढणार असल्याचं सध्याच्या परिस्थितीवरून तरी दिसत आहे.

मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत गेला तस तसं राजकीय समीकरणं बदलू लागली. अजित पवार गटातील राष्ट्रवादी चे डॉ.योगेश क्षीरसागर यांना काही प्रमाणात अनुकूल असणारे वातावरण होते. त्यामुळे दोन्ही भावात होणारी लढाई चुरशीची होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र मनोज जरांगे पाटील बीडला येऊन गेल्यानंतर प्रतिकूल बनू लागले. मराठा समाजामध्ये उमेदवार जातीचा असल्यामुळे निर्माण झालेला संभ्रम जरांगे पाटलामुळे दूर झाला गेला. त्यामुळे नेहमीच मराठा आरक्षणाला साथ देणाऱ्या संदीप क्षीरसागर यांना मतदारांचा कौल अनुकूल बनला. लोकसभेचा निवडणूक निकाल बदलवण्यात कारणीभूत ठरलेल्या बालाघाटावर तर संदीप क्षीरसागर यांच्यासाठी एकतर्फी परिस्थिती अनुकूल बनू लागली. पूर्वीपासूनच भाजप विरोधात असलेला मुस्लिम समाज देखील संदीप क्षीरसागर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू लागला.ओबीसी मतदार हे दोन्हीही उमेदवार ओबीसी असल्याने काही प्रमाणात विभागला गेला असला तरी, संदीप क्षीरसागर यांना तो जास्त प्रमाणात पूर्वीपासूनच झुकलेला आहे. एकंदरच बीड मतदार संघाची परिस्थिती पाहता यापूर्वी जयदत्त क्षीरसागर यांनी 2009 च्या निवडणुकीत एक लाखाहून अधिक मतदान पदरात पाडून जवळपास 70 हजाराची आघाडी घेतलेली होती. तीच स्थिती पुन्हा संदीप क्षीरसागर यांच्या बाबतीत निर्माण झाल्याचं राजकीय विश्लेषक सांगत आहेत. या निवडणुकीत संदीप क्षीरसागर आपले चुलते जयदत्त क्षीरसागर यांचा मताधिक्याचा विक्रम मोडीत काढतील असं जनतेतून बोललं जात आहे.

नमिता मुंदडांनी केलेल्या रस्त्यामुळे विकासाला मिळाली गती; विरोधकांची खूंटली मती

0

केज — विकासाला गती मिळावी यासाठी चांगल्या रस्त्यांची आवश्यकता असते ही बाब लक्षात घेऊन निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत नमिता मुंदडा यांनी नगरोधान योजनेच्या माध्यमातून 76 कोटींचा निधी मंजूर करून घेतला. केजकरांच्या विकासालाच चालना रस्त्यामुळे मिळाली नाही तर आरोग्याच्या दृष्टीने देखील ही बाब महत्त्वाची ठरल्याने या निवडणुकीत त्यांच पारड जड आहे.

प्रचंड धूळ, रस्त्यावरील खड्डे यामुळे पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्या यामुळे केजचा व्यापारी वर्गासह सर्वसामान्य नागरिक त्रस्त झालेला होता. यावर तोडगा काढण्यासाठी व व्यापारी ,जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी गेल्या वर्षी खा. प्रीतम मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नमिता मुंदडा यांनी व्यापारी वकील, शहरातील प्रतिष्ठित नागरिकांची संवाद बैठक बोलावली. त्यामध्ये रस्त्यांच्या प्रश्नासंदर्भात व्यापक चर्चा करण्यात आली. मुख्य बाजारपेठ असलेल्या मंगळवार पेठ कानडी रोड ची दुरावस्था अतिशय वाईट झाली होती. हे रस्ते नव्याने तयार करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याला प्रतिसाद देत वर्षभरात रस्ते पूर्ण करण्यात येतील असं आश्वासन नमिता मुंदडा यांनी दिलं. नुसतं आश्वासन दिलं नाही तर आपला शब्द खरा करण्यासाठी शासन दरबारी नमिता मुंदडा यांनी प्रयत्न केले. नगरोत्थान योजनेच्या माध्यमातून 76 कोटींचा निधी मिळवला. नुसता मिळवला नाही तर रस्त्यांची काम मोठ्या धडाक्यात सुरू केली. गेल्या आठ महिन्यापासून सुरू असलेल्या उमरी रोड मंगळवार पेठ नगरपंचायत ते पोस्ट ऑफिस नगरपंचायत चे टिपू सुलतान रोड ही कामे पूर्णत्वास नेली. दिलेल्या शब्दांची पूर्तता करताना नमिता मुंदडा यांनी दळणवळणाला नवी गती मिळवून दिली. यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात आरोग्याच्या समस्या जनतेला भेडसावणार नाहीत. खड्ड्यातून जाण्याची वेळ येणार नाही. याबरोबरच धुळीचे साम्राज्य देखील नाहीस करण्यात मुंदडा यांनी यश मिळवलं. नुसत्या नगरोत्थान योजनेतून शहराचा कायापालट केला नाही तर पानंद रस्ता योजनेतून गावातील शेतकऱ्यांच्या विकासाला नवी गती देण्याचा काम मुंदडा यांनी केलं. खेड्यापाड्यात देखील रस्त्यांचं जाळं उभा करताना सत्ताधारी पक्षातील आमदार म्हणून जितकं वजन वापरता येईल तितकं वापरलं त्यामुळे केज विधानसभा मतदारसंघ आज प्रगतीची नवी फळ चाखत आहे. या नमिता मुंदडा यांच्या जमेच्या बाजू असल्याने विरोधकांना विरोध करताना अनेक ठिकाणी तोंड घशी पडावं लागलं आहे. त्यामुळे ही निवडणूक नमिता मुंदडा यांच्यासाठी औपचारिकता ठरत आहे.

माझी निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची — संदीप क्षीरसागर

0

तुतारी वाजवणारा माणूस चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा:आ.संदीप क्षीरसागर यांचे आवाहन

बीडच्या विकासासाठी संदीपभैय्यांना प्रचंड मतांनी विजयी करा- खा. बजरंग सोनवणे

विरोधकांना धडकी भरवणाऱ्या चौसाळ्यातील विराट विजयी संकल्प सभेने आ.संदीप क्षीरसागर यांच्या विजयावर केले शिक्कामोर्तब

चौसाळा — माझी ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे.बालाघाटवरील मतदारांनी प्रचाराच्या शेवटची विजयी सभा घेऊन मला आशीर्वाद दिला आहे. त्यामुळे उद्याच्या २० नोव्हेंबरला आपण सर्व मायबाप जनतेने बीड मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी अनुक्रमांक ३ “तुतारी वाजवणारा माणूस” या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन आ. संदीप क्षीरसागर यांनी केले तर बीड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाची विचारधारा सर्व मतदारांना आपलेसे करणारी आहे.मतदारसंघात ठिकठिकाणी आ. संदीप क्षीरसागर यांना जनतेने स्वीकारले असून आपण सर्वांनी जनसेवेसाठी कायम उपलब्ध असणाऱ्या आ. संदीप भैय्यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्ष महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे बीड विधानसभेचे अधिकृत उमेदवार संदीप क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ सोमवारी दुपारी चौसाळा येथे जाहीर सभा घेण्यात आली. या सभेला खासदार बजरंग सोनवणे, माजी आमदार सुनील धांडे, उमेदवार आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह बालाघाटावरील राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि चौसाळा जि. प.गटातील मतदार बंधू,भगिनी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी आ. संदीप क्षीरसागर म्हणाले, बीड लोकसभेचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत माझ्या प्रचारानिमित्त चौसाळा येथे भव्य विजयी संकल्प सभा पार पडत असल्याचा आणि आपण सर्वांनी इतक्या विराट संख्येने या सभेला दर्शवलेल्या उपस्थितीवरून मला समाधान वाटत आहे. मागील पाच वर्षात मतदार संघाच्या विकासासाठी सातत्याने काम केले नागरिकांचे प्रश्न सोडवले.शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी यंत्रणा उभारली. याचेच फळ म्हणून आज ही निवडणूक धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची झालेले असताना तुम्ही सर्वजण माझ्यासोबत खंबीरपणे पाठीशी उभा राहिला आहात. या सभेला महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, नेते व पदाधिकारी, तरुण कार्यकर्ते, वयस्कर मंडळी तसेच कार्यकर्ते, माता भगिनींनी दाखवलेली अलोट गर्दी विरोधकांची धडकी भरवणारी असेल हे नक्की.मायबाप जनतेची झालेली ही अफाट गर्दीच, माझी निवडणूक जनतेने हाती घेतली असल्याचे सांगून जाते. आता येत्या २० तारखेला अनुक्रमांक ३, तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून मला पुन्हा एकदा आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी द्या असे आवाहन आ. संदीप क्षीरसागर यांनी प्रचंड जनसमुदायासमोर केले.

उपस्थितांशी संवाद साधताना खासदार बजरंग सोनवणे यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यशैलीचे आणि लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी मागील पाच वर्षात केलेल्या कामाचे कौतुक करत मतदारसंघातील जनतेने पुन्हा एकदा त्यांना आपला प्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाठवावे असे आवाहन केले.यावेळी इतर पदाधिकारी कार्यकर्त्यांनीही मनोगत व्यक्त करत संदीप क्षीरसागर यांच्या पाठीशी मतदार खंबीरपणे उभे राहतील असा विश्वास व्यक्त केला.

कार्यकर्त्यावर आता खेटरं राखण्याची वेळ; चप्पल आचारसंहितेच्या कचाट्यात?

0

धाराशिव –जिल्ह्यातील परंडा विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार गुरुदास संभाजी कांबळे यांनी चर्चेला नवे तोंड फोडले आहे.त्यांनी स्वत:च्याच निवडणूक चिन्हाबद्दल केलेल्या मागणीवरुन सध्या मोठी चर्चा सुरू आहे. या अपक्ष उमेदवाराचं चिन्ह आहे चप्पल. विधानसभा निवडणुकीचं मतदान अवघ्या दोन दिवसांवर आलं आहे. यावेळी कांबळे यांनी निवडणूक आयोगाकडे वेगळीच मागणी केली आहे. निवडणूक आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून मतदान केंद्राच्या 200 मीटर अंतरावर चप्पल घालायला बंदी करा, अशी मागणी या उमेदवाराने केली आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राजवळ निवडणूक प्रचार आणि प्रसार करण्यास बंदी असते. त्यामुळे आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी संभाजी कांबळे स्वत:चं निवडणूक चिन्हाबद्दल ही मागणी केली आहे.

कांबळेंनी सांगितलं की, मतदारांना बाहेरच चप्पल ठेऊन यायला सांगा. ते चप्पल घालून आले तर माझ्या निवडणूक चिन्हाचा प्रचार होऊन आचारसंहितेचा भंग होईल. कांबळे यांनी मतदारांच्या पायाला दुखापत होऊ नये म्हणून मतदान केंद्रापर्यंत गालिचे अंथरण्याची देखील मागणी देखील केली आहे. याशिवाय मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी येणारे कर्मचारी, अधिकारी यांनी देखील चप्पल बाहेर काढून याव्यात अशी कांबळे यांची मागणी आहे. त्याबाबत रीतसर लेखी मागणीच त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे. आता निवडणूक अधिकारी यावर काय भूमिका घेतायत ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जर ही मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मान्य केली तर विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांना मतदानासाठी आधी स्वतःच्या चपला झिजवाव्या लागल्या आता मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांच्या चपला राखण्याची वेळ येणार आहे.
अशी आहे कांबळे यांची मागणी
मतदान केंद्राच्या दोनशे मीटर अंतरात चप्पल घालायला बंदी करा
मतदान कर्मचारी, अधिकारी यांच्या चप्पल ही बाहेर काढून ठेवा
चप्पल या निवडणूक चिन्हाचा प्रसार होऊ नये म्हणून आयोगाकडे लेखी मागणी

जातीपातीचे राजकारण सोडून विजयराजेंना प्रचंड मताने निवडून द्या- ना. धनंजय मुंडे

0

उमापूर येथील सभेमध्ये विजयसिंह पंडित यांच्या विजयावर शिक्कामोर्तब
गेवराई — लोकसभेला झाले ते चुकीचे झाले. आम्ही कधी जातीपातीचे राजकारण केलेले नाही. जातीपातीच्या राजकारणामुळे येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य बरबाद होणार आहे. लोकसभेचा पराभव लक्षात ठेवून मतदान केले, तर आपले मत विभाजन होऊन याचा फायदा महाविकास आघाडीला होणार आहे. महाविकास आघाडीचा फायदा म्हणजे धनंजय मुंडे पंकजाताई मुंडे, अमरसिंह पंडित या सर्वांचेच नुकसानच आहे तेव्हा जातीपातीचा आणि किंतू परंतु चा विचार न करता महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन ना. धनंजय मुंडे यांनी केले. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या प्रचारार्थ आयोजित उमापूर येथील सभेमध्ये बोलत होते.

यावेळी माजी आमदार अमरसिंह पंडित, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे अध्यक्ष कल्याण आखाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. सुरेश हात्ते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मूजीब पठाण, आरपीआय कवाडे गटाचे अनिल तुरूकमारे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गेवराई तालुका अध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, भाजपा तालुका अध्यक्ष प्रकाश सुरवसे, अशोक हिंगे, जेष्ठ नेते आप्पासाहेब औटी, महेश रावडे, श्रीकांत सानप, उद्धव खाडे, जालिंदर पिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, मी मुंडेची अवलाद आहे. मुंडेंची अवलाद अंधारामध्ये काही निर्णय घेत नाही. आम्ही जो निर्णय घेतो तो स्पष्ट असतो आणि आमचा निर्णय म्हणजे विजयराजे पंडित यांना आमदार करण्याचा आहे. यासाठी पंकजाताई मुंडे, मी व भैय्यासाहेब मिळून विजयराजे यांना आमदार करू. २००२ ला मी व भैय्यासाहेब जिल्हा परिषद सदस्य असताना असलेली मैत्री कायम आहे. मी त्यांना तेंव्हापासून ओळखतो. तालुक्याच्या विकासाचे स्वप्न ऊराशी बाळगुन हा माणूस अविरत कार्यरत आहे. आपल्या छोट्या भावाला आमदार करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करतोय. असे बंधुप्रेम विरळच असते. भैयासाहेब मी तुम्हाला शब्द देतो विजय राजे उद्याच्या 23 तारखेला आमदार असतील आणि गुलाल आपलाच असेल, उपस्थितांचे चेहरे पाहता विजयसिंह पंडित यांचा विजय निश्चित आहे असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे अध्यक्ष कल्याण आखाडे म्हणाले की, राज्यातील महायुती सरकारने विविध समाजासाठी महामंडळे सुरू करून वेगवेगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत. सुरू केलेल्या विविध योजना पुढील काळात चालू ठेवायच्या असतील तर महायुतीचे सरकार निवडून देणे आवश्यक आहे, यासाठी विजयसिंह पंडित यांना आशीर्वाद द्या.

यावेळी बोलताना अमरसिंह पंडित म्हणाले की, गेवराई विधानसभा मतदारसंघ पाणीदार करणे हे आमचे ध्येय आहे, त्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवत आहोत, विरोधक मात्र केलेल्या कामावर न बोलता माझ्यावर व माझ्या परिवारावर टिका करत आहेत, आम्ही त्याला भिक घालत नाही. आम्हाला लोकांची साथ आहे. विजयसिंह पंडित यांना विजयी करून राज्याच्या सर्वोच्च पंचायतीमध्ये पाठवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी सभापती मुजीब पठाण अशोक हिंगे, आप्पासाहेब औटी यांनी मनोगत व्यक्त केले. या सभेला पंचक्रोशतील मतदार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. नामदार धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये झालेली ही जाहीर सभा या जाहीर सभेने विजयसिंह पंडित यांच्या प्रचाराची सांगता झाली. सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. ना. धनंजय मुंडे यांच्या सभेने विजयसिंह पंडित यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले आहे.

विजयसिंह पंडित यांना

गुरव महासंघाचा पाठींबा
महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांना राष्ट्रीय गुरव समाज महासंघाच्या वतीने जाहीर पाठिंबा दिल्याची घोषणा महासंघाचे अध्यक्ष राजेश गवळी, सचिव रंगनाथ मोकाशी यांनी केली.राष्ट्रीय गुरव समाज महासंघाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय महासंघाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. याप्रसंगी
प्रदीप गवळी, अमोल दायमा, राजेंद्र माने,
वैभव चिंचोलकर, राजू गावडे यांच्यासह राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

बीडला विकासाच्या वाटेवर आणण्याची संधी द्या — डॉ. योगेश क्षीरसागर

0

बीड — प्रचाराच्या अखेरच्या दिवशीही महायुतीचे उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ ठिकठिकाणच्या सभांना प्रचंड गर्दी होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भाजप, शिवसेना, रिपाइंसह मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचारात झोकून दिल्याने अनेक कॉर्नर बैठका, रॅली, प्रचार सभांना गर्दी होत होती. त्यामुळे विरोधकांना धडकी भरल्याचे चित्र बीड विधानसभा मतदारसंघात निर्माण झाले आहे.

डॉ.योगेश क्षीरसागर यांनी गेल्या वर्षभरापासून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघ पिंजून काढला होता. त्यामुळे बूथवर सक्षम यंत्रणा उभारण्यात त्यांना यश आले आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच मतदारसंघातील ग्रामीण भागाचा निवडणुकीच्या दौरा केला होता. त्यामुळे त्यांनी ग्रामीण भागाचा प्रचार वेळेत पूर्ण करून शहरात लक्ष घातले होते. त्यांच्या प्रचाराची धुरा मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या ताकदीने सांभाळली. प्रत्येक मित्र पक्षाने मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे भरगच्च मेळावे घेतले. प्रचाराच्या पूर्वसंध्येला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मांजरसुंबा (ता.बीड) येथे मेळावा घेतला. यावेळी ऊसतोड कामगार, बालाघाटवरील जनतेचे प्रश्न सोडविणार असल्याचे आश्वासन डॉ.योगेश क्षीरसागर यांनी दिले. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने शहरातील गांधीनगर, मोमीनपुरा भागात प्रचंड सभा झाल्या. या दोन्ही सभांमुळे अल्पसंख्याक समाजाला गृहीत धरणाऱ्यांचे टेन्शन वाढल्याचे चित्र निर्माण झाले होते. तिकडे शहरात पेठ बीड भागात रिपाइंचे युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी मतदारसंघाचा मेळावा घेतला. तसेच, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महायुती धर्म पाळत युवासेनेचे मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बीडमध्ये प्रचंड गर्दीचा मेळावा पार पाडला. डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या पाठीशी उभे असलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत पेठ बीड भागातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या गर्दीच्या प्रचार मेळावे, सभांमधून महायुतीचे उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या घड्याळाचा गजर सर्वत्र होताना दिसून येत आहे.

दुर्दैवाने जात-पात, धर्माच्या मुद्द्यावर निवडणूक लढविली जात आहे. आपण कायम विकासाच्या मुद्द्यावर काम करत आलो. त्यामुळे बीडच्या सुज्ञ जनतेने मतदान करताना माझा विचार जरूर करावा. मतदारसंघाला पुन्हा एकदा विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी मला सेवेची एक संधी द्यावी.

   —    डॉ.योगेश क्षीरसागर, महायुतीचे उमेदवार.

आ.संदीप क्षीरसागर विकासकामे मार्गी लावून स्वत:ला सिध्द केलेले नेतृत्व –दीपक कुलकर्णी

0

तुतारी वाजवणारा माणूस चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा –दीपक कुलकर्णी

बीड — आ.संदीप क्षीरसागर म्हणजे कसोटीच्या काळात स्वत:ला सिध्द करुन पुढे आलेले सर्वमान्य नेतृत्व असल्याचे पक्षाचे नेतेही मान्य करतात.त्यांचा हा बहुमान म्हणूनच आ.संदीप क्षीरसागर यांना मतदारसंघातील जनतेने आपला हक्काचा लोकप्रतिनिधी संबोधले आहे. म्हणूनच येत्या २० तारखेला पुन्हा एकदा संदीप क्षीरसागर यांना आपला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देण्यासाठी मतदान करताना अनुक्रमांक ३, तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी त्यांना विजयी करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्षाचे ऍड.दीपक कुलकर्णी यांनी केले आहे.

आ. संदीप क्षीरसागर यांचे
बीड मतदारसंघातील सर्वांसोबत असलेले आपुलकीचे नाते हीच त्यांची खरी राजकीय ताकद ठरली आहे. विकासकामांसाठी कायम आग्रही असलेल्या या नेतृत्वाला बीडमधून संधी मिळावी हीच भावना कार्यकर्ते अन् जनतेची असून सुज्ञ मतदारांनी पुन्हा एकदा संदीप क्षीरसागर यांना निवडून देण्याचे आवाहन ऍड.दीपक कुलकर्णी यांनी मतदारांना केले आहे. मागील पाच वर्ष मतदारसंघाचा आमदार म्हणून जनसेवा करताना अनेक योजना मार्गी लावल्यानंतर आणि विरोधकांकडून बिनबुडाचे आरोप झाल्यानंतरही आ.संदीप क्षीरसागर यांनी त्यांना उत्तर दिले नाही. बीड मतदारसंघातील जनता हे सर्व जाणून आहे असेही दीपक काका कुलकर्णी यांनी पत्रकात म्हटले असून येत्या २० नोव्हेंबर रोजी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून आमदार संदीप क्षीरसागर यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले आहे.

विरोधकांच्या कामाची पाहिलीय मिळमिळ; नमिता मुंदडांच्या कामाला घालायचीय खिळ!

0

बीड — केज विधानसभा मतदारसंघ नमिता मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली विकासाकडे वाटचाल करत असताना निवडणुकीतील विरोधकांना विकासाला खिळ घालायची असल्याचं जनतेतून सांगितलं जात आहे. त्याला कारणही तसेच आहे. 2012 मध्ये त्यांची कर्तबगारी जनतेने अनुभवली आहे. त्यामुळे यापूर्वी अनुभवलेल्या उमेदवारावर डाव खेळून तो आंगलट आणण्याच्या मानसिकतेत केजकर नसल्याचं चित्र मतदारसंघात पाहायला मिळत आहे. लोकनेत्या  स्व. विमल मुंदडा यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून निघावी यासाठी 2012 मध्ये पृथ्वीराज साठे यांच्याकडे मतदार संघाची धुरा जनतेने सोपवली. मात्र त्यांना नेतृत्व देऊनही आपल्या कामाची चुनुक दाखवता आली नाही. शेवटी स्व.विमल मुंदडा यांनी लोकविकासाचा चालवलेल्या रथाची चाकं जागच्या जागीच रुतली गेली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत साठेंना पराभव स्वीकारावा लागल्यानंतर देखील माजी लोकप्रतिनिधी या नात्याने जनतेशी कधी नाळ जोडून ठेवली नाही. त्यांना तशी गरज वाटली नाही. जनतेच्या प्रश्नासाठी ते कधी रस्त्यावर उतरले नाहीत. कामातला मिळमिळीतपणा जनतेच्या अंगलट आला.शेवटी विकास रथाची चाक कायम रुतली गेलेलीच राहिली. त्याला गती मिळालीच नाही. अखेर केजच्या मतदारांनी स्व.विमल मुंदडा यांचा वारसा त्यांच्या सुनेकडे म्हणजेच नमिता मुंदडा यांच्याकडे 2019 साली पुन्हा सोपवला. जनतेच्या अपेक्षेला नमिता मुंदडा देखील बांधिलकी म्हणून खऱ्या उतरू लागल्या.लोकहिताची काम करताना त्यांनी जात धर्म पंथ यांना तसूभर देखील थारा दिला नाही. त्यामुळे मतदार संघामध्ये सांघिक भावना निर्माण होऊन विकासाला गती मिळणं सोपं गेलं. विकास निधी खेचून आणताना जनतेचे प्रश्न सोडवताना नमिता मुंदडा यांनी सभागृह अक्षरशः डोक्यावर घेतलं. सातत्याने जन विकासाची तळमळ ठेवून पाठपुरावा केल्यामुळे वेळप्रसंगी सत्तेतील आपल्याच माणसाशी भांडून जेवढा निधी खेचून आणता येईल तेवढा निधी खेचून आणला. नुसता तो खेचून आणलाच नाही तर विकास करूनही दाखवला. विकासाची गंगा वाहती ठेवताना धार्मिक श्रद्धास्थाने असलेल्या मंदिरांचा कायापालट करण्यासाठी देखील निधी उपलब्ध करून दिला. साठेंच्या काळात झालेली साठमारी त्यांनी मोडीत काढून नव्या अशा जनतेमध्ये निर्माण केल्या. त्यामुळे केज मतदार संघात तरी नमिता मुंदडा यांच्यासाठी 2024 ची विधानसभा निवडणूक एकतर्फी होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. निवडणुकीत विरोधका असलेल्या साठेंच्या कामाचा यापूर्वीच मिळमिळीतपणा  जनतेने पाहिला आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीत तरी सव्वा लाखांनी विजय त्यांच्या पदरात पडला होता. यावेळी हा विजय विरोधकांचे डिपॉझिट जप्त करणारा ठरणार असल्याचा विश्वास जनतेतून व्यक्त केला जात आहे.

काकूंचा लोकसेवेचा वारसा डॉ. योगेश क्षीरसागरकडे सोपवला ; त्याला विजयी करा –जयदत्त क्षीरसागर

0

बीड — काकूंच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात पाऊल ठेवले आणि आयुष्यभर लोकसेवेचा वसा अखंडपणे चालविला. कधीही काकूच्या नावाला गालबोट लागेल असे काम केले नाही. जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद मिळवून लोकसेवा केली, असे सांगत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी ‘आता हा लोकसेवेचा वारसा डॉ.योगेश क्षीरसागर यांच्याकडे सोपवत आहे’ असे जाहीर केले. सर्व जात-पात, धर्म, गट-तट, आपसातील मतभेद बाजूला ठेवून विधानसभा निवडणुकीत डॉ.योगेश क्षीरसागर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.

बीड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ नवगण राजुरी येथे रविवारी (दि.१७) आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी ह.भ.प.अमृत महाराज जोशी, ज्येष्ठ नेते रवींद्र क्षीरसागर, प्रा.जगदीश काळे, दिनकर कदम, नानासाहेब काकडे, माजी उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, अशोक हिंगे, विलास बडगे, रामचंद्र बहिर, सखाराम मस्के, मंदाताई गायकवाड यांच्यासह राजुरी ग्रामस्थ, युवक, युवती जेष्ठ नागरिक व महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

पुढे बोलताना जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, सत्ता हे परिवर्तनाचे साधन आहे. आम्ही विना मोबदला घरपोच सेवा देणारी माणसं आहोत. आपला सालकरी कसा असावा हे ठरवण्याची जबाबदारी मतदारांची आहे. येत्या २३ तारखेला विजयाचा गुलाल उधळण्यासाठी घड्याळाच्या चिन्हासमोरील बटण दाबून डॉ. योगेश क्षीरसागर यांना आपण प्रचंड बहुमताने निवडून द्यावे. प्रत्येकाने गावोगावी जाऊन मतदान करून घ्यावे. आपला गाव, परिसर व मित्रमंडळी यांना जागृत करून मतदान केंद्रापर्यंत आणावे, आहे त्या साधनासह गट, तट बाजूला ठेवून डॉ.योगेश क्षीरसागर यांना विजयी करावे असे आवाहन जयदत्त क्षीरसागर यांनी यावेळी केले. यावेळी डॉ.योगेश क्षीरसागर म्हणाले, १५ वर्षांपूर्वीचे क्षीरसागर घराण्याचे वैभव पुन्हा राजुरीला प्राप्त करून देण्यासाठी, आणि काकूंचा वसा चालवण्यासाठी, मला तुमचे मतदान रुपी आशीर्वाद हवे आहेत. राजुरीकडे जायकवाडीच्या कालव्याचे पाणी आणण्याचे प्राथमिक प्राधान्य असेल आणि राजुरी सर्कलचा विकास पुन्हा सुरू करेन. माजी उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी देखील मनोगत व्यक्त करून डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. यावेळी दिलीप आहेर, मुकेश भोकरे, निलेश जगताप, गणेश जावळे, अशोक सोळुंके, विष्णू जाधव, शेषनारायण कोळेकर, पांडुरंग भोसकर, प्रा.सुदाम नवले, धनंजय जगताप, विश्‍वास आखाडे, सुरेश काशिद, राजाभाऊ सोळुंके, हनुमान जगताप, मारूती वाघ, बाबूराव जमदाडे, परमेश्‍वर सपकाळ, भाऊसाहेब जानवळे, जयराम गिते यांच्यासह परिसरातील कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप आहेर यांनी केले. सुत्रसंचालन नितीन गायकवाड यांनी केले. शेवटी अ‍ॅड.सदाशिव राहिंज यांनी उपस्थितांचे आभार मानले.

आमदाराने पैसे गोळा करण्यापलिकडे दुसरे कुठले काम केले नाही -रविंद्र क्षीरसागर

ज्येष्ठ नेते रविंद्र क्षीरसागर म्हणाले की, मागच्या वेळी मी राजुरी सर्कलमधील मतदारांना, माझ्या झोळीत माप टाका असे म्हणालो होतो. परंतु आता माझीच झोळी फाटली आहे. ज्याने मला घराबाहेर काढले, माझ्यावर अन्याय केला, जो व्यक्ती बापावर एवढा अन्याय करतो, तो जनतेवर किती अन्याय करत असेल याचा अनुभव तुम्ही घेतला आहे. या आमदाराने ५ वर्ष टक्केवारीच्या माध्यमातून पैसे गोळा करण्यापलिकडे दुसरे कुठले काम केलं नाही. फक्त आपली दुकानदारी सुरू ठेवली. त्यामुळे काकू आणि अण्णांचा लोकसेवेचा वसा योगेशमध्ये आहे, आता त्याला आपला पाठिंबा द्या, असे आवाहन त्यांनी केले.

संदीप भैय्यांचे तुफान…! तुम्ही दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही

0

मोमीनपुऱ्यातील कॉर्नर बैठकीने विधानसभेचे विजयावर शिक्कामोर्तब रेकॉर्डब्रेक गर्दी; आ. संदीप भैय्या मतदारांसमोर भावूक

बीड— नजर पोहोचेल तिथपर्यंत फक्त मतदारांची गर्दी… गर्दी… आणि गर्दीच… व्यासपीठाच्या चारही दिशेला पहावे तिकडे गर्दीच…गर्दी आणि ‘संदीप भैय्या आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा एकमुखी घोषणा, अशा रेकॉर्डब्रेक गर्दीने बीड शहरातील मोमीनपुरा भागातील कॉर्नर बैठकीला अक्षरशः जाहीर सभेचे स्वरूप प्राप्त झाले. या बैठकीतील मतदारांच्या प्रचंड गर्दीने आ. संदीप क्षीरसागर यांच्या विधानसभेच्या विजयावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले. ही गर्दी पाहून बीड मतदारसंघात आ. संदीप क्षीरसागर यांचे तुफान असल्याच्या प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.

उपस्थित मतदारांसमोर आ. संदीप क्षीरसागर यांनी तुमचे हे प्रेम आणि आशीर्वाद मी कधीच विसरणार नाही. तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, असे सांगत सर्वांनी येत्या २० तारखेला अनुक्रमांक ३, तूतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या सर्वांची सेवा करण्याची पुन्हा संधी द्या, असे आपुलकीचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत प्रतिसाद दिला.

बीड विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्ष, महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आ. संदीप क्षीरसागर यांची मतदार संघात असलेली लोकप्रियता मोमीनपुरा येथील बैठकीला झालेल्या गर्दीतून दिसून आली. शनिवारी (दि.१६) रात्री आ. संदीप क्षीरसागर, माजी आ. सय्यद सलीम, जावेद कुरेशी, शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वरेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मोमीनपुरा भागात कॉर्नर बैठक संपन्न झाली. यावेळी आ. संदीप क्षीरसागर इतर मान्यवरांचे मोमीनपुरा भागातील युवकांनी जल्लोषात स्वागत केले. युवकांचा जोश आणि जल्लोष येणाऱ्या २० तारखेच्या मतदानातून नक्कीच दिसेल असा विश्वास आ. संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

उपस्थितांशी संवाद साधताना आ. संदीप क्षीरसागर म्हणाले, तुमच्या या प्रेमाने मी भारावून गेलो आहे. बीड मतदारसंघातील जनता हीच माझी खरी ताकद आहे. आपण कायम आदरणीय पवार साहेबांच्या विचाराने वाटचाल करणार असून आपल्या भूमिकेसोबत आज अनेक जण उभे राहत आहेत. आपला पक्ष अडचणीत असताना तुम्ही मला जी साथ दिली, त्यामुळेच आज आपण पुन्हा एकदा पक्षाची भूमिका घेऊन निवडणुकीत सामोरे जात आहोत.या निवडणुकीमध्ये मतदार संघाच्या विकासाचे मुद्दे घेऊन आपण प्रचार पुढे नेत आहोत. मागील पाच वर्षात मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना विकासाच्या अनेक योजना राबवल्या.अनेक प्रश्न मार्गी लागले. जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि बीड मतदार संघाला सर्वांगीण विकसित करण्यासाठी आपण येत्या काळात काम करणार आहोत. मतदार संघातील काही प्रश्न प्रलंबित आहेत, त्यासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद मला हवे आहेत. आज या बैठकीच्या माध्यमातून तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि मला आशीर्वाद दिला आहे. या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. आपण सर्वांनी येत्या बुधवारी दि.२० नोव्हेंबरला आपण अनुक्रमांक ३ “तुतारी वाजवणारा माणूस” या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन आ. संदीप क्षीरसागर यांनी यावेळी केले. याप्रसंगी माजी आ.सय्यद सलीम शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वरेकर, जावेद कुरेशी यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त करत हा संदीप क्षीरसागर यांच्या पाठीशी मतांची ताकद उभी करावी असे आवाहन मतदारांना केले.