Home Blog Page 150

पंकजा मुंडेंनी असं करायला नको होतं — सुरेश धस

0

आष्टी — निवडणुकीत तुम्ही माझ्यासोबत राहणे गरजेचे होते पण तुम्ही मला एकटे पाडत विरोधकांचा छुपा प्रचार केला असा खळबळ जनक आरोप सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केला आहे. यामुळे बीडच्या राजकारणात खळबळ माजली आहे.

आष्टी मतदारसंघात भाजपाचे सुरेश धस यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवल्यानंतर आयोजित जाहीर सभेत पंकजा मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. आ.धस म्हणाले, पंकजा मुंडे यांनी या निवडणूकीत तुम्ही माझ्या सोबत राहणे आवश्यक होते मात्र तुम्ही मला एकटे पाडले. तुमच्या दुटप्पी भूमिकेमुळे मतदार राजामध्ये संभ्रम निर्माण झाला. शेवटी मतदार राजा हा हुशार आणि चतुर आहे. त्यांनी मलाच हेरल. मी आयुष्यात कधीच जातीपातीचे राजकारण केले नाही. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा मी चेला आहे. त्यामुळे आयुष्यात कधीच मला राजकारण करण्यासाठी जात पात शिवणार नाही.

मी लोकसभेच्या वेळेस एकतर्फी माझ्या मराठा समाजाचा तुमचा प्रचार करून अंगावर रोष घेतला मात्र तुम्ही या विधानसभा निवडणुकीत छुपा डाव खेळलात हे चांगलं केलं नाही. त्यामुळे तुम्ही हलक्या कानाने राजकारण करता असं मला वाटलं. असा थेट आरोप सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्यावर आष्टी येथील जाहीर विजयी सभेत केला. पंकजा मुंडे यांनी असं करायला नको होतं, असं देखील सुरेश धस यांनी म्हटले आहे.

मुंडेंचा धनंजय “अजय”; राज्यात विक्रमी मतांनी मिळवला विजय

0

बीड — महायुतीच्या विजयात भर घालताना धनंजय मुंडे यांनी स्वतःचा बालेकिल्ला असलेला बीड आपल्याकडेच राखण्यात यश मिळवले. इतकच नाही तर परळीतून एक लाख 40 हजार 224 मतांनी विजय मिळवत राज्यात विक्रमी मताधिक्य मिळवत धनंजय “अजय” असल्याचं सिद्ध केलं. त्यांना 75.97% मत परळीच्या जनतेने दिली आहेत.

मराठा आरक्षण आंदोलनाचा फायदा घेण्यासाठी तसेच ओबीसी समीकरणं जुळवत समाजातील अनेक नेत्यांना आपल्या कंपूत सामील करून घेत धनंजय मुंडे विरोधात चक्रव्यूह रचल्या गेलं. मतदार संघातच अडकून पडावं यासाठी सर्व चाली राजकारणातील धुरंदर समजल्या जाणाऱ्या शरद पवारांनी खेळल्या. मात्र या सर्व चालींना चोख प्रत्युत्तर देत चक्रव्यूह भेदण्यात धनंजय मुंडे यशस्वी ठरले. राज्यात महायुतीची सत्ता आणण्यासाठी प्रचार सभा घेत असताना त्यांनी स्वतःच्या मतदारसंघात एकाही मोठ्या नेत्याची सभा घेतली नाही. जनतेशी जोडली गेलेली नाळ नियोजनबद्ध प्रचार या गोष्टी त्यांच्या कामाला आल्या.नेता म्हणून हाकेला ओ देण्याची त्यांची तयारी आज भरभरून प्रतिसाद देणारी ठरली. धनंजय मुंडे यांना एक लाख 94 हजार 889 मत पडली. टक्केवारीचा विचार केला तर 75.97% मत त्यांनी एकट्याने मिळवली आहेत.
राजेसाहेब देशमुख यांना 54 हजार 665 मतं मिळाली आहेत. एकूण 21.31% इतकीच मतं त्यांना मिळू शकली. राज्यात सर्वाधिक एक लाख 40 हजार 224 मत मिळवून धनंजय मुंडे यांनी नवा विक्रम स्थापन केला आहे.

आष्टीतील चौरंगी लढतीत सुरेश धस यांचा दणदणीत विजय

0

बीड — आष्टीत झालेल्या चौरंगी लढतीकडे राज्याचे लक्ष झालेल्या बंडखोरीमुळे लागले होते. भीमराव धोंडे यांनी निवडणुकीत शड्डू ठोकली तर आ. बाळासाहेब आजबे ,मेहबूब शेख यांनी देखील उडी घेतली होती मात्र या निवडणुकीत सुरेश धस यांनी सरस कामगिरी करत 77 हजार 732 अशा विक्रमी मताधिक्याने भीमराव धोंडे यांना मात दिली.

भीमराव धोंडे यांनी बंडखोरी केल्यानंतर आष्टी पाटोदा मतदारसंघातील वातावरण देखील त्यांच्यासाठी प्रचंड अनुकूल बनले होते. त्यामुळे त्यांच्या विजयाच्या अटकली बांधल्या जात होत्या. मात्र मतदानाच्या दोन-तीन दिवस आधी सुरेश धस यांनी मतदार संघातील वातावरण अनुकूल करून घेण्यात यश मिळवले. सुरेश धस यांना पंकजा मुंडे यांनी देखील साथ दिली नाही. ओबीसी मतदारांचा चांगला प्रभाव या मतदारसंघावर आहे. त्यामुळे मराठा आरक्षण आंदोलन सुरू असताना भाजपला लोकसभेला केलेली मदत यामुळे सुरेश धस यांना मराठा मतदारांचा देखील विरोध होता. बंडखोर उमेदवार ओबीसी असल्याने अडकित्यात अडकल्यासारखी परिस्थिती सुरेश धस यांची निर्माण झाली होती. मात्र मातब्बर राजकारणी असल्याने त्यांनी या कात्रीतून सोडवनूक करून घेतली.
या निवडणुकीत सुरेश धस यांना एक लाख 38 हजार 638 इतकी मतं मिळाली. दुसऱ्या नंबर वर असलेल्या भीमराव धोंडे यांना साठ हजार 906 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मेहबूब शेख यांना 52 हजार 37 मत मिळाली. विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे एकवीस हजार 332 मतांनी चौथ्या क्रमांकावर राहिले गेले. या निवडणुकीत सुरेश धस यांना 77 हजार 732 मतांनी दणदणीत विजय मिळाला आहे.

चितपट केले दिग्गज सर्व; गेवराईत “विजय ” पर्व

0

बीड — गेवराई विधानसभा मतदारसंघात पंडितांचे “विजय” पर्व सुरू झाले आहे. तब्बल 42 हजार 390 मतांनी दणदणीत विजय त्यांनी मिळवला आहे. गेल्यावेळी ज्यांच्याकडून पराभव पत्करावा लागला ते लक्ष्मण पवार तिरंगी लढतीत यावेळी तिसऱ्या स्थानावर राहिले आहेत.

गेवराई मतदार संघ तिरंगी लढतीमुळे प्रत्येकांचे लक्ष खेचून राहिला होता. बदामराव पंडित, लक्ष्मण पवार यांच्याबरोबर लढत देताना विजयाची समीकरणं माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी सटिक मांडली होती. त्या अनुषंगाने प्रयत्न केले जात होते. नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा, आज पर्यंत जनतेशी जोडलेली नाळ, विकासासाठी आजपर्यंत शिवछत्र ने दाखवलेली तळमळ या निवडणुकीत विजयसिंह पंडित यांच्या कामाला आली. विजयसिंह पंडित यांना एक लाख 16 हजार 141 मत पडली दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार बदामराव पंडित यांना 73 हजार 751 मत मिळाली. तर गेल्या वेळी आमदार राहिलेले लक्ष्मण पवार हे यावेळी केवळ 38,171 मतं मिळवू शकले. विजयसिंह पंडित 42 हजार 390 अशा भरघोस मतांनी विजयी झाले आहेत.

नमिताने साठेला नमवलं; पुन्हा केज वर वर्चस्व मिळवलं

0

बीड — राखीव मतदार संघ असलेल्या केज विधानसभा मतदार संघात नमिता मुंदडा यांनी वर्चस्व राखण्यात यश मिळवलं आहे. 26 87 मतांनी त्या विजयी झाल्या आहेत.

नमिता मुंदडा यांचे विरोधी उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट मोठ्या प्रमाणावर होती. याबरोबरच पंकजा मुंडे यांना केज विधानसभा मतदारसंघात लोकसभेला मोठा दणका बसला होता. त्यामुळे या मतदारसंघाची समीकरणे पूर्ण बदलली होती. असा असताना देखील नमिता मुंदडा यांनी विजयश्री आपल्याकडे खेचून आणण्यात यश मिळवले त्यांना एक लाख 17 हजार 81 मतं पडली तर पृथ्वीराज साठे यांना एक लाख 14 हजार 394 मत मिळाली. 2687 मतांनी त्या आपला गड कायम राखण्यात यशस्वी ठरलेल्या आहेत.

उमेदवारांना मिळालेली मतं

नमिता मुंदडा-117081
पृथ्वीराज साठे–114394
अशोक थोरात — 3559
वैभव स्वामी–2007
रमेश गालफाडे –1537

बीडमध्ये संदीप क्षीरसागरांची तुतारी वाजली

0

बीड — बीड विधानसभा मतदारसंघात दोन्ही क्षीरसागर बंधूत झालेल्या अटीतटीच्या लढतीत संदीप क्षीरसागर साडेपाच हजार मतांनी विजयी झाले आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गट व शरद पवार गटामधून योगेश क्षीरसागर व संदीप क्षीरसागर यांनी एकमेका विरोधात मैदानात उडी घेतली होती. विजय कोणाचाही होवो शेवटी क्षीरसागर हेच विजयी होणार हे समीकरण बनलं होतं. मात्र त्यातही योगेश क्षीरसागर यांच्या बाजूने माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी ताकद उभी केल्यानंतर योगेश क्षीरसागर विजयी होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. समीकरण बदलली असली तरी संदीप क्षीरसागर यांनी आपला गड काय कायम ठेवण्यात यश मिळवले. 5559 मतांनी संदीप क्षीरसागर विजयी झाले आहेत.संदीप क्षीरसागर यांना 99300 मत पडली तर योगेश क्षीरसागर 93739 इतकी मतं पडली आहेत.

उमेदवारांना पडलेली मतं
संदीप क्षीरसागर-101874
डॉ.योगेश क्षीरसागर –96550

अनिल जगताप -15613
डॉ. ज्योती मेटे – 9768
कुंडलिक खांडे -3359

धर्मापुरी मतदान केंद्रावर राडा; मतदान केंद्रावरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद

0

परळी — मतदार संघातील धर्मापुरी येथे मतदान केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचा प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी उघडकीस आणला.

लोकसभा निवडणुकीत देखील परळी तालुक्यात बोगस मतदान झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. हीच बाब लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने यावेळी असे प्रकार घडू नयेत यासाठी काळजी घेतली आहे. मात्र धर्मापुरी येथील मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बंद ठेवून त्याचे कनेक्शन कट करण्यात आले. ही बाब महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी उघडकीस आणला. त्यानंतर राजेसाहेब देशमुख त्यांचे समर्थक व धर्मापुरीतील विरोधी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी राजसाहेब देशमुख यांनी मतदान प्रक्रिया बंद ठेवण्यास सांगितले. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा पूर्ववत सुरू केल्याची माहिती मिळत आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मात्र जिल्ह्यात खळबळ माजली आहे

नमिता मुंदडा यांना मोठ्या मताधिक्यांनी विजयी करा — अक्षय मुंदडा

0

केज — केज मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार नमिता मुंदडा यांनी केलेली विकास कामे लक्षात घेऊन जनतेने मोठ्या माताधिक्याने विजयी करावे असे आवाहन अक्षय मुंदडा यांनी केले आहे.

भाजपाच्या उमेदवार नमिता मुंदडा यांनी केज मतदार संघात विकास काम राबवून जनतेशी बांधीलकी जोपासलेली आहे. रस्ते विकास ,वीज, पाणी, व्यापार, आरोग्य यासारख्या मूलभूत गोष्टींवर जास्त भर देत विकास करण्याचं काम केलेलं आहे. येणाऱ्या काळात देखील आमदार म्हणून त्या जनतेची काम करण्यास तत्पर राहतील यात शंका नाही. त्यांनी केलेली विकास काम लक्षात घेऊन जनतेने मतदान रुपी दान त्यांच्या पदरात टाकावे. नमिता मुंदडा यांना मोठ्या माताधिक्याने विजय करावे असे आवाहन अक्षय मुंदडा यांनी केले आहे.

गेवराईत इतिहास घडणार; विकासाच्या विजयपर्वाकडे वाटचाल

0

विजयसिंह पंडित यांना विजयी करण्याचा गेवराई विधानसभा मतदारसंघाचा निर्धार
गेवराई  — भाजप शिवसेना रिपाई राष्ट्रवादी काँग्रेस महायुती मित्र पक्षाचे लोकप्रिय उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या प्रचारार्थ भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे आणि न भूतो न भविष्यती अशी सभा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रचंड जनसागर लाभलेली प्रचार सभा संपन्न झाल्याने. तालुकाभरातील मतदारांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. गेवराईचा आमदार विजयसिंह पंडित यांच्या रूपाने फिक्स झाल्याने विरोधक आजी-माजी आमदारांचा करेक्ट कार्यक्रम झाल्यामुळे त्यांनी प्रचार खर्चावर नियंत्रण ठेवले असून त्यांच्या प्रचार यंत्रणा थंड पडल्या आहेत.

याबाबत अधिक वृत्त असे की, विधानसभा निवडणूक प्रचारापूर्वीच गेल्या वर्षभरापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह पंडित यांनी आपल्या प्रचार कार्याची तयारी सुरू केली होती. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत काठावर पराभवाचा सामना केल्यानंतर नाउमेद न होता आणि पराभवाची कारणे न शोधत बसता नव्या जोमाने ते जनतेत जाऊन आपल्या कामाला सुरुवात केली होती. पद- सत्ता नसताना देखील जनसामान्यांच्या अडीअडचणीला धावून गेले. कोविड सारख्या महाभयंकर महामारीच्या संकटात शिवछत्र परिवाराने विविध ठिकाणी रुग्णांसाठी कोविड सेंटर स्वखर्चाने उभारून अनेकांना जीवदान दिले. शारदा प्रतिष्ठान मार्फत व्हेंटिलेटर मशीन उपलब्ध करून दिल्या ही कामे विजयसिंह पंडित यांच्या जमेची बाजू ठरणार आहेत. विजयसिंह पंडित यांनी संपूर्ण मतदारसंघ यापूर्वीच पिंजून काढला होता. मतदार संघातील शेवटच्या घटकापर्यंत ते पोहोचले होते कारण त्यांना ठाऊक होते आगामी काळात आपणच उमेदवार असणार आहोत. त्यांच्या प्रचार कार्याचे फारसे गांभीर्य आजी-माजी आमदारांनी घेतले नसावे. ऐनवेळी तू-का मी या विवंचनेत शेवटपर्यंत गाफील राहिले तर विजयसिंह पंडित हे जोमाने प्रचार कार्यात सक्रिय राहिले.

महायुती मित्र पक्षाचे उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या प्रचारार्थ चकलांबा येथे भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी मोठी प्रचार सभा घेऊन युतीधर्म पाळा कमळ समजून घड्याळाला विजयी करण्याचे भावनिक आवाहन करून भाजपाची संपूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी लावली. त्याच पाठोपाठ राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवार यांची प्रचंड अशी न भूतो न भविष्यती प्रचार सभा संपन्न झाली या सभेला मोठा जनसागर लोटला होता ही गर्दी पाहून भारावून गेलेले अजित दादा यांनी जाहीर संकेतच दिले. तुम्ही विजयसिंह पंडित यांच्या पाठीशी राहून त्यांना विजयी करा मी त्यांच्या पाठीमागे राज्याची ताकद उभी करतो.याचाच अर्थ सत्तेत त्यांना वाटा देऊ असा होतो. दरम्यान दोन्ही सभांनी मतदारांमधून प्रचंड नवचैतन्य निर्माण झाले आहे तर हा धसका घेतल्याने विरोधकांनी आपल्या प्रचारावर नियंत्रण ठेवल्याने त्यांची प्रचार यंत्रणा कोलमडून पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

लाडक्या बहिणी योगेश क्षीरसागर यांच्या पाठीशी उभ्या — डॉ .सारिका क्षीरसागर

0

बीड — बीड विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ तब्बल ९८ हजार महिलांना मिळाला आहे. या या लाडक्या बहिणी डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत. लाडक्या बहिणींचा मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद पाहता महायुतीचे उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर हे मोठ्या मताधिक्याने विजय होतील, असा विश्वास डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे.

पत्रकात पुढे म्हटले आहे की, लोकनेत्या स्व.केशरकाकू यांच्या सामाजिक, राजकीय कार्याचा वसा आणि वारसा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी उत्तमरित्या सांभाळला आहे. हेच क्षीरसागर कुटुंबाचे कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न डॉ.योगेश हे करत आहेत. ५ वर्षात विरोधकांना जे जमले नाही, ते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी कुठलेही महत्त्वाचे पद नसताना अवघ्या एकाच वर्षात साध्य करून दाखवले. आमदार फंडाइतका निधी काही महिन्यातच खेचून आणला. त्यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात स्वयंरोजगार, अविरत आरोग्य सेवा, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम, महिला, तरुण, शेतकऱ्याच्या योजना तळागाळातील व्यक्तींपर्यंत पोहचविणे, असे अनेक उपक्रम राबविले. त्यांनी कधीही जातपात, धर्म या मुद्द्याकडे लक्ष दिले नाही. २४ तास लोकांमध्ये राहून विकासाच्या मुद्द्यावर मते मागितली आहेत. बीड विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ तब्बल ९८ हजार महिलांना मिळाला आहे, हा लाभ प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचविण्यासाठी डॉ.योगेश क्षीरसागर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भाजप, शिवसेना, रिपाइं अशा महायुतीच्या सर्व मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींचा प्रचंड प्रतिसाद पाहता बीड विधानसभा मतदारसंघातून डॉ.योगेश क्षीरसागर हे मोठ्या मताधिक्याने विजय होतील. त्यांना लाडक्या बहिणीच विधानसभेत पाठवतील, असा विश्वास डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, डॉ.योगेश क्षीरसागर यांना मतदान करून बीड मतदारसंघाला विकासाच्या वाटेवर आणण्याची संधी माय-बाप जनेतेने द्यावी, असे आवाहन डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांनी दिले आहे.