Home Blog Page 146

अपहरणापूर्वी आरोपींना सरपंच संतोष देशमुख यांचे लोकेशन देणारा सिद्धार्थ सोनवणे जेरबंद

0

बीड — मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यासाठी त्यांचं लोकेशन देणारा मस्साजोग येथीलच सिद्धार्थ सोनवणे याच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी काल कल्याण (मुंबई) येथून एका उसाच्या गाडीवर काम करत असताना मुसक्या आवळल्या आहेत. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा आता पूर्णपणे उलगडा होण्यास मदत होणार आहे.

केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या केल्याच्या घटनेने जिल्ह्यासह राज्याला हादरवून सोडले होते.या हत्या प्रकरणातील फरार प्रमुख आरोपी सुदर्शन घुले व सुधीर सांगळे या दोघांनाही बीडच्या पोलिसांनी शुक्रवारी (दि.३) रात्री पुण्यातून ताब्यात घेतले आहे. तर या आरोपींना सरपंचाचे अपहरण करण्यापूर्वी लोकेशन देणारा मस्साजोग गावातीलच सिद्धार्थ सोनवणे याला देखील मुंबईतून बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. यापूर्वीच जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले यांना अटक केली आहे. तर तर पुरवणी जबाब आवरून विष्णू चाटे यांना देखील अटक करण्यात आलेली होती. सध्या या प्रकरणात कृष्णा आंधळे हा फरार आहे.
दरम्यान संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सिद्धार्थ सोनवणे हा गावातच होता. मयत देशमुख यांच्या अंत्यविधीला देखील तो उपस्थित होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस सुरुवातीला आरोपींचा तपास करत असताना त्यांनी आपले लक्ष गावातच केंद्रित केलेले होते. अपहरण करण्यापूर्वी कोणीतरी जवळचा व्यक्ती लोकेशन देत असावा असा संशय पोलिसांना होता. लोकेशन देणाऱ्यांचा पोलीस शोध घेत असल्याची कुणकूण सिद्धार्थ सोनवणे याला लागली होती. घटनेच्या दोन दिवसानंतर तो देखील गावातून फरार झाला.
सिद्धार्थ सोनवणे फरार झाल्यानंतर त्याच्या संदर्भातील गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मिळवण्यास सुरुवात केली. त्यानंतर सिद्धार्थ हा देखील या गुन्ह्यात सहभागी असल्याची खात्री स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना पटली. त्यानंतर 15 दिवसांपासून त्याचा शोध सुरू होता.
सिद्धार्थ सोनवणे हा फरार झाल्यानंतर मुंबईत लपून बसला होता. त्याने या काळात वेगवेगळी पाच सिम कार्ड देखील वापरली होती. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना त्याचे मुंबईतील लोकेशन मिळताच त्या ठिकाणी त्यांनी सापळा लावला. एका मोकळ्या पटांगणात उसाच्या गाड्यावर काम करत असतानाच पोलिसांनी त्याच्यावर झडप मारली.
दरम्यान ही कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय महेश विघ्ने, तुळशीराम जगताप, विकास वाघमारे, भागवत शेलार, गणेश मराडे, विक्की सुरवसे यांनी केली.

मोठी अपडेट! संतोष देशमुख हत्या प्रकरणातील घुले व सांगळे पोलिसांनी पकडले

0

बीड — सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार असलेल्या तीन आरोपी पैकी सुदर्शन घुले व सुधीर सांगळे या दोघांना एस पी च्या विशेष पथकाने पुण्यातून ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे.

खंडणी व संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी पकडण्यात पोलिसांना 25 दिवस उलटून गेल्यानंतर देखील अपयश येथे असल्याने जनतेतून संताप व्यक्त होत होता. परिणामी पोलिसांनी दोन दिवसापूर्वी सापडत नसलेल्या आरोपींना फरार घोषित करून माहिती देण्याचे आवाहन जनतेला केले होते. दरम्यान राज्यभरातून आरोपींच्या अटकेची मागणी होत आहे. या प्रकरणातील तीन आरोपी यापूर्वी पोलिसांनी पकडले होते तर वाल्मीक कराड याने सीआयडी समोर आत्मसमर्पण केले. त्यानंतर मसाजोग ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केले असता आरोपींना दहा दिवसात जेरबंद करण्यात येईल असं बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी आश्वासन दिलं होतं. दरम्यान या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेला सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना पोलिसांच्या विशेष पथकाने पुण्याजवळ ताब्यात घेतले आहे. दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी सीआयडीच्या ताब्यात देण्यात येणार आहे. या प्रकरणातील आरोपी पैकी कृष्णा आंधळे हा अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

अखेर…! वाल्मीक कराडची पुण्यात सीआयडी समोर शरणागती

0

पुणे — सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात चर्चेत असलेली आरोपी वाल्मिक कराड आज पुण्यात शरण आले आहेत. पुण्याच्या सीआयडी कार्यालयात येऊन त्यांनी स्वत: आत्मसमर्पण केले.

विशेष म्हणजे या घटनेच्या काही तासांपुर्वी त्यांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला होता. या व्हिडिओत त्यांनी पुण्याच्या सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केलं.त्यानंतर ते सीआयडी कार्यालयात दाखल झाले होते.या संबंधित आत्मसमर्पणाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
सीआयडीला शरण जाण्यापुर्वी वाल्मिक कराडने एक व्हिडिओ जारी केला होता. या व्हिडिओत वाल्मिक कराड केज पोलिस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाल्यामुळे मला अटकपुर्वचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाशाण रोड येथे सरेंडर होत, अशी त्यांनी सूरूवातीला माहिती दिली. त्यानंतर संतोष भैय्या देशमुख यांच्या जे कुणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि फाशीची मागणी द्यावी,अशी कराड यांनी मागणी केली. आणि राजकीय द्वेषापोटी माझे नाव त्याच्याशी जोडले जातं आहे. तरी पोलीस तपासात मी दर दोषी आढळलो तर न्यायदेवता जी शिक्षा देईल ती भोगायला तयार आहे, असे शेवटी वाल्मिक कराडने सांगितले.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव समोर आले. विरोधकांनी सातत्याने कराडवर टीका केली. कराड हा मंत्री मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप करण्यात आला होता. प्रकरण आणखीच तापल्यानंतर वाल्मिक कराड गायब झाला होता. त्याचा कसून शोध घेतला जात होता. अखेर वाल्मिक कराडने आज शरणागती पत्करली.संतोष देशमुख आतापर्यंत चार आरोपीला अटक करण्यात आली होती. तर तीन आरोपी फरार होते. या प्रकरणाचा तपास सीआयडी करत असून गेल्या 4 दिवसांपासून सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. या प्रकरणाचा मास्टरमाईंड म्हणून वाल्मिक कराडचे नाव घेतले जात आहे. सीआयडीने वाल्मिक कराडच्या भोवती तपासाचा फास आवळला. संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराडचे नाव घेऊन आरोप होऊ लागले होते. सीआयडीने आपल्या वाल्मिक कराडच्या निकटवर्तीयांची कसून चौकशी सुरू केली होती.

कराडांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी मयुरी बांगर यांचे उपोषण

0

बीड — मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण व अवादा पवन ऊर्जा कंपनी खंडणी प्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मीक कराडला अटक करण्यात यावी अशी एकीकडे मागणी होत आहे.दुसरीकडे मात्र वाल्मीक कराडावरील गुन्हे मागे घेण्यात यावेत यासाठी मयुरी विजयसिंह बांगर उपोषणाला बसल्या आहेत

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचा दावा केला जात असून त्याच्या अटकेसाठी सीआयडीकडून शोध सुरु आहे. बीड येथे पवनऊर्जा कंपनीच्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आता वाल्मिक कराडच्या समर्थनात उपोषण करण्यात येत आहे. बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मयुरी विजयसिंह बांगर या उपोषण करत आहेत.
वाल्मिक कराडवर पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले असल्याचा दावा मयुरी विजयसिंह बांगर यांनी केला आहे. “राजकीय द्वेषातून हे आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्यावर जी चिखलफेक करण्यात येत आहे ती थांबवली पाहिजे. वाल्मिक कराड यांच्यावर असलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत. आरोप खरे असतील तर त्यावर कारवाई केली जाईल. तुमच्याकडे काही पुरावा आहे का? तुम्ही पुराव्याशिवाय अण्णांवर चिखलफेक कशी करु शकता त्यांचा हा खरा चेहरा नाही. त्यांनी खूप समाजकार्य केले असून अनेक भगिनींचे कल्याण केले आहे. माझ्या सारखे अनेकजण त्यांच्यासाठी आवाज उठवू पाहत आहेत,” असं उपोषणकर्त्या मयुरी विजयसिंह बांगर यांनी म्हटलं आहे.

आमदारांना अंगरक्षक नाही मात्र 26 गुन्हे असलेल्या वाल्मीक कराडला दोन पोलीस अंगरक्षक?

0

बीड — संतोष देशमुख हत्या प्रकरण 9 डिसेंबरला घडल्यानंतर वाल्मीक कराड फरार असून शेवटचं लोकेशन उज्जैन पोहचला होता. त्याने उज्जैनच्या महाकाल मंदिराबाहेर काढलेला फोटोही त्याच्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर केला आहे. विशेष म्हणजे यावेळी त्याचे अंगरक्षक असलेले पोलीस कर्मचारीही त्याच्यासोबत होते. दरम्यान वाल्मीक कराड वर तब्बल 26 गुन्हे नोंद असूनही पोलीस अंगरक्षक असल्याने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
संतोष देशमुख हत्येनंतर व खंडणी प्रकरणाचे सीआयडी या धागेदोरे खंगाळत आहे. याच प्रकरणातील फरार आरोपी वाल्मिक कराडवर तब्बल 26 गुन्ह्यांची नोंद असूनही पोलिस संरक्षणात असल्याने भूवया उंचावल्या आहेत. तसेच, कराडला दोन पोलिस अंगरक्षक देखील आहेत. बीड पोलीस अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेला अहवालामध्ये ही माहिती नमूद आहे. बीड जिल्ह्यामध्ये विद्यमान आमदारांपैकी सुरेश धस, विजयसिंह पंडित, नमीता मुंदडा यांना अद्याप अंगरक्षक नाहीत.तर अमरसिंह पंडित, भीमराव धोंडे, प्रकाश सोळंके, पंकजा मुंडे, जयदत्त क्षीरसागर, राम खाडे, बजरंग सोनवणे, मयत सरपंच यांचे भाऊ धनंजय देशमुख, संदीप क्षीरसागर यांना एक पोलिस अंगरक्षक आहे. धनंजय मुंडे, सुभाष राऊत यांना प्रत्येकी दोन अंगरक्षक आहेत.दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईमुळे वाल्मिक कराड लवकरच पोलिसांसमोर शरण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी दोन दिवसात गजाआड — सीआयडी अधिकाऱ्यांनी दिला विश्वास?

0

बीड — सध्या राज्यात गाजत असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना वीस दिवस उलटून गेले असले तरी पकडण्यात यश आले नाही. मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेतली असता दोन दिवसात फरार आरोपी गजाआड करण्यात येतील असा विश्वास सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सीआयडी या प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणाचे धागेदोरे मिळवण्यासाठी सीआयडीची पथक बारकाईने लक्ष ठेवून आहेत. अनेक महत्त्वाचे पुरावे देखील सीआयडीच्या हाती सापडले आहेत. दरम्यान मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज सीआयडी कार्यालयात जाऊन तपास कुठपर्यंत आला आहे या संदर्भातली माहिती घेण्याचा प्रयत्न केला. उद्या सीआयडी चे अधिकारी केज मध्ये जाऊन धनंजय देशमुख यांना तपासाची माहिती देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या भेटीदरम्यानच या गुन्ह्यातील फरार आरोपींना दोन दिवसात पकडून गजाआड केले जाईल असा विश्वास सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आला असल्याची माहिती देखील मिळत आहे. धनंजय देशमुख यांनी सीआयडी करत असलेल्या तपासावर आपला विश्वास असल्याचं मत माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. याच प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया तसेच खासदार बजरंग सोनवणे आमदार सुरेश धस यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांची भेट घेतली.

वाल्मीक कराडसह फरार आरोपींचे बँक खाते सीआयडी कडून सिज; देशमुख यांना चार वेगवेगळ्या ठिकाणी मारहाण झाल्याची बाब उघड!

0

बीड — सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामूळे वातावरण सध्या तापलेले आहे. बीडच्या रस्त्यावर जनतेच्या असंतोषाचा आक्रोश पाहायला मिळाला. दरम्यान हे प्रकरण सीआयडी कडे गेल्यानंतर फरार आरोपी वाल्मीक कराड सह चारही आरोपींचे बँक खाते सीज करण्यात आले आहे. संपत्ती जप्तीची कारवाई सीआयडीने सुरू केली असून संतोष देशमुख यांना चार वेगवेगळ्या ठिकाणी मारहाण झाल्याचे तपासातून उघड झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.

शनिवारी बीडच्या रस्त्यावर संतोष देशमुख हत्याप्रकरणी न्यायासाठी जनतेचा आक्रोश पाहायला मिळाला. जनक्षोभ लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खंडणी व देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या मालमत्ता जप्तीची कारवाई करण्याच्या आदेश सीआयडीला दिले. यानुसार सीआयडीने वाल्मीक कराडसह फरार असलेल्या चारही आरोपींचे बँक खाते सिज करून संपत्ती जप्तीची कारवाई सुरू केली आहे. खून व खंडणी प्रकरणाचा तपास सीआयडी ची नऊ पथक सध्या करत असून जवळपास दीडशे अधिकारी व कर्मचारी ही जबाबदारी संभाळत आहे. सीआयडीने आतापर्यंत केलेल्या तपासात संतोष देशमुख खून झाला त्यावेळी वापरण्यात आलेल्या गाडीतील बोटांचे ठसे आरोपींच्या बोटांच्या ठशाशी मॅच झाले आहेत. दरम्यान गुन्हा करताना वापरण्यात आलेल्या गाडीत सापडलेल्या दोन मोबाईल मधील डाटा रिकव्हर करण्यात सीआयडी ला यश आले आहे. तसेच संतोष देशमुख यांचा खून केल्यानंतर आरोपींनी एका मोठ्या राजकीय नेत्याची संपर्क साधल्याची बाब देखील तपासात उघडकीस आल्याची माहिती मिळत आहे. संतोष देशमुख यांना मारहाण करताना आरोपींनी केलेल्या चित्रीकरणातून देशमुख यांना चार वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन मारहाण केली असल्याची बाब उघडकिस आली आहे. सीआयडी ची पथक फरार आरोपींचा तपास राज्यासह देशभरात सध्या करत आहे. आरोपींच्या संपत्ती जप्ती सोबतच त्यांनी देशाबाहेर पलायन करू नये यासाठी पासपोर्ट रद्द करण्याची कारवाई सुरू केली असल्याची माहिती देखील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

देशमुख हत्या प्रकरण:फेक स्क्रीन शॉट व्हायरल; जितेंद्र आव्हाडांची बीड पोलिसात धाव

0

बीड — सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आज निघालेल्या आक्रोश मोर्चात जितेंद्र आव्हाड देखील सहभागी झाले होते. दरम्यान धनंजय मुंडे यांच्या नावाचा उल्लेख असलेला एक व्हाट्सअप चा स्क्रीन शॉट समाज माध्यमांवर फिरत आहे. यावर अजित वर गटातील नेत्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टिका केली आहे.

https://x.com/Awhadspeaks/status/1872966371652583486

जितेंद्र आव्हाड यांचा फोटो असलेला एक व्हाट्सअपचा स्क्रीन शॉट फिरत आहे. यामध्ये त्यांनी बीड जिल्ह्यात जाण्यापूर्वी एका अनोळखी व्यक्तीशी संवाद साधला आहे. त्या व्यक्ती त्या या स्क्रीन शॉटमध्ये धक्कादायक शब्दांचा उल्लेख करत धनंजय मुंडे तसेच इतर नेत्यांवर नेत्यांचा उल्लेख केला आहे. यावरूनच आता अजित पवार गटातील अमोल मिटकरी, सुरज चव्हाण तसेच इतर नेत्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका करत हे स्क्रीन शॉट अपलोड केला आहे.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी या स्क्रीनशॉट फेक असल्याचा म्हटले आहे. तसेच माझ्या आजच्या बीड मधील भाषणांनी धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते फार बिथरले आहेत. त्यांना सत्य पचना म्हणून माझ्या नावाचे फेक स्क्रीन शॉट बनवले आहेत. तरी माझी सायबर पोलिसांकडे तक्रार आहे की हा स्क्रीन शॉट कोणी बनवलाय त्याची पाळले मुळे शोधून काढा अशी विनंती जितेंद्र आव्हाड यांनी केले.

बीडचे रहिवाशी शिवराज बांगर यांच्यासोबतचे न केलेले चॅट माॅर्फ करून वायरल करण्यात आले. त्यात महत्वाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गटाच्या ॲड. रूपाली ठोंबरे यांची आहे. हास्यास्पद आहे की, एक ज्येष्ठ वकील असूनदेखील सत्य – असत्य न तपासता त्यांनी हा माॅर्फ केलेला चॅट वायरल केला. ३ वाजून ०७ मिनिटांनी भाषण संपले आणि ३ वाजून २६ मिनिटांनी हा चॅट या भूमीवर अवतरला. मला समजतच नाही की, जर गुन्हा केलाच नाही तर एवढे अस्वस्थ का होतात? कर नाही तर डर कशाला? असो, बीड शहरातील शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. खेडकर यांना भेटून मी, संदीप क्षीरसागर, राजेश देशमुख, सातपुते आणि शिवराज बांगर यांनी गुन्हा नोंदविलेला आहे. ज्या शिवराज बांगरचा चॅट दाखविला गेलेला आहे. तो फेक असून पोलिसांनी या विरोधात कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करा– फडणवीसांचे सीआयडीला आदेश

0

मुंबई — बीडमध्ये मूक मोर्चा च्या माध्यमातून संतोष देशमुख हत्या प्रकरणामूळे जनतेत असलेला असंतोषाचा आक्रोश आज पाहायला मिळाला. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठा निर्णय घेत फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश सीआयडीला दिले आहेत.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून बीड जिल्ह्यासह राज्यातील वातावरण तापलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींना अटक करण्याच्या मागणीवरून आज बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व नेत्यांनी आरोपींवर कडक कारवाईची मागणी करत धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठा निर्णय घेत फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश सीआयडीला दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशामुळे आरोपींच्या गळ्याभोवतीचा फास आणखी आवळला आहे.
जवळपास २० दिवस उलटूनही संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी फरार आहेत. आरोपींना अटक होत नसल्याने बीडमध्ये आज सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता.आरोपींना तात्काळ अटक करत फाशी देण्यात यावी, अशी मागणी मोर्चातील लोकांनी केली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीला दोन महत्त्वाचे आदेश दिले आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक बुरडे यांना आदेश दिले आहेत की, संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे आरोपी अद्याप फरार आहेत, त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा. त्याचबरोबर रिव्हॉल्वहर सोबत ज्यांचे-ज्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत, ते जर खरे असतील तर त्या सर्वांच्या बंदुकीचा परवाना रद्द करण्याची कारवाई करावी, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. तसेच बंदूक परवान्याचा फेरआढावा घेण्यासही सांगण्यात आले आहे.

फरार असलेल्या 3 आरोपींची हत्या ?
या हत्या प्रकरणातील तीन आरोपींचा हत्या झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. दमानिया यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, काल रात्री मला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्याने व्हॉट्सअप कॉलवर बोलण्याची विनंती केली. पण नेटवर्क नसल्यामुळे आमचे बोलणे होऊ शकले नाही. त्यानंतर त्या व्यक्तीने मला व्हॉईस नोट पाठवली. ज्यात संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी आता कधीच सापडणार नाहीत, कारण त्यांची हत्या झाली, अशी माहिती त्या व्यक्तीने दिली. हे ऐकून मी हबकलेच.ही माहिती मी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना दिली आहे. तसेच या तिघांचे मृतदेह कुठे पुरले? याचीही माहिती समोरच्या व्यक्तीने दिली आहे, असा खळबळजनक दावा अंजली दमानिया यांनी केला.

न्यायासाठी जनतेच्या ‘अ’संतोषाचा बीडच्या रस्त्यावर आक्रोश !

0

देशमुख हत्याकांड: अन्यायाच्या विरोधात जनक्षोभ!

बीड — मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येतील आरोपींना अटक करा, या मागणीसाठी शनिवारी बीडच्या रस्त्यावर जनता उतरली होती. यामध्ये सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते दाखल झाले होते. बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली असल्याचे फलक हातात घेऊन तीव्र निषेध व्यक्त केला. या बीड मधील सर्व पक्षीय मोर्चाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.


सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना अद्याप पकडण्यात अपयश येत आहे.या अन्याया विरोधात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर असंतोषाचे वातावरण निर्माण झाल्याने आज मोठ्या संख्येने जिल्हाभरातून जनता मोर्चात सहभागी झाली जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते या मुक मोर्चात सहभागी झाले होते. यामध्ये देशमुख कुटुंब, मनोज जरांगे, संभाजीराजे, नरेंद्र पाटील ,आ. जितेंद्र आव्हाड,खा. बजरंग सोनवणे, आ. सुरेश धस, आ. संदीप क्षीरसागर, आ. प्रकाश सोळंके, आ. अभिमन्यू पवार,ज्योती मेटे, संगीता ठोंबरे, राजेसाहेब देशमुख, राहुल सोनवणे, अनिल जगताप, परमेश्वर सातपुते,दीपक केदार, रणवीर पंडित, महेबुब शेख,रमेश पोकळे, रमेश आडसकर, मोहन जगताप, माजी आ. सय्यद सलीम, राजेंद्र मस्के, सक्षणा सलगर, आदींचा सहभाग होता.शनिवारी सकाळी 9 वाजल्या पासूनच जिल्हाभरातून नागरीक मोर्चात सहभागी होण्यासाठी यायला सुरुवात झाली होती. दुपारी साडेबारा पर्यंत मोठ्या प्रमाणात नागरीक शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जमा झाला.साधारणत: दुपारी 1वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन मुक मोर्चाला सुरुवात झाली. पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुक मोर्चा दाखल झाला. यावेळी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चा पावणे दोन दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर पोहोचला.हातात काळे झेंडे घेऊन फडकवत बीड जिल्ह्यातील अन्यायाच्या विरोधात देखील जोरदार घोषणाबाजी केली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघालेल्या या मोर्चात महिलांची मोठा सहभाग असल्याचे चित्र पाहायला मिळाले. अत्यंत शांततेत हा मोर्चा निघाला होता.

तरुणांची अन्यायाच्या विरोधात घोषणाबाजी
मोर्चा दरम्यान जिल्हाभरातून दाखल झालेल्या तरुणांनी अन्यायाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अमर रहे…. अमर रहे…. संतोष देशमुख अमर रहे च्या घोषणांनी संपूर्ण बीड शहर दणाणून गेले होते.

मूंडे बंधू भगीनीच्या राजीनाम्याची केली मागणी

धनंजय मुंडे अन पंकजा मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या…. अशी मागणी देखील मोर्चा दरम्यान काही बीड जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी केली.सरपंच संतोष देशमुख यांचा निर्घृण खूण करणाऱ्या त्या आरोपीना फाशीची सजा द्या, अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी मागणी केली. यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकाच्या हातात विविध मागण्यांचे फलक पाहायला मिळाले. यामध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय पाहिजे, संतोष देशमुख आमचं कुटुंब, वाल्मीक कराड ला अटक करा,
संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याना फाशी द्या…. यासह विविध मागण्यांचे फलक मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांच्या हातात पाहायला मिळाले.

बीड जिल्हा… बीड जिल्हा…. मोडीत काढा, दहशतीचा बालेकिल्ला !

मागील काहीं दिवसात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. दिवसाढवळ्या खूण, मारामाऱ्या, किडन्यापिग, बलात्कार अशा घटना घडत आहेत. बीडमध्ये होत असलेल्या या अन्याया विरोधात बीडची जनता आता रस्त्यावर उतरली आहे. मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकान मध्ये आक्रोश व संताप पाहायला मिळाला.

धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे

संतोष देशमुख प्रकरणातील फरार असलेले आरोपी तात्काळ अटक करा, शिवाय खडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याला तात्काळ अटक करा, तसेच धनंजय मुंडे याचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्या… अशी मागणी आ. संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.

मूलीची न्यायाची मागणी

माझ्या वडिलांना अत्यंत क्रूरपणे मारले आहे…. माझ्या कुटूंबाला न्याय द्या…. जे माझ्या कुटूंबासोबत घडले आहे ते इतरां बरोबर घडू नये…. त्यासाठी मला न्याय द्या…. अशी भावना स्व. संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी संतोष देशमुख हिने केली आहे.

बोगस मतावरचे धनंजय मुंडे आमदार झाले–आ.धस

दोनशेहून अधिक बूथ ताब्यात घेत बोगस मतदान केले. मतदानाच्या आदल्या दिवशीच काहीं मतदाराच्या हाताला शाई लावली. लोकांना मतदान करू दिले नाहीं… बोगस मतावर धनंजय मुंडे आमदार झाले आहेत. असा आरोप आ. सुरेश धस यांनी केला.

आरोपीचा आश्रयदाता मुंडे- छत्रपती संभाजी महाराज

बीडमध्ये हे चाललय तरी काय? आरोपी उघड माथ्याने फिरत आहेत. माझी मागणी आहे की धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पद देऊ नये…. जर धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पद दिले तर मीच बिड चे पालकत्व घेणार…. यापुढे असे हे घाणेरडे प्रकार खपाऊन घेणार नाहीं…. अत्यंत क्रूर पणे संतोष देशमुख यांना मारले आहे… आता हे आम्ही सहन करणार नाही…. आता आम्हाला यां प्रकरणात आरोपी तात्काळ अटक करुन त्यांना कडक करवाई करा..