Home Blog Page 123

तर.. मी राजीनामा देईल — खा. बजरंग सोनवणे

0

बीड — गेल्या काही दिवसांपासुन बीडचे खासदार बजरंग सोनवणे कोणत्याना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत आहे. तर त्यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये थेट खासदारकीचा राजीनामा देईल असं म्हटलं आहे.त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

आज खासदार बजरंग सोनवणे  यांनी बीड जिल्ह्यातील बिंदू नामावलीच्या विषयावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे  यांनी मला कॉल केला होता असा दावा देखील केला होता. तसेच जर माझा बिंदू नामावलीच्या गैरप्रकारात काही पुरावे आढळले तर मी जिल्ह्यातील सर्वांची माफी मागून राजीनामा देईल असं देखील खासदार सोनवणे म्हणाले.

बिंदू नामावलीच्या गैर प्रकारात माझ्याबद्दल काही पुरावे सापडले तर जिल्ह्यातील सर्वांची माफी मागून राजीनामा येईल देईल असं बजरंग सोनवणे म्हणाले. तसेच बिंदूंनी नामावली संदर्भात बीड जिल्ह्यात ओपन प्रवर्गावर अन्याय होत असल्याचा देखील खासदार सोनवणे यांनी सांगितलं. तर पुढील 1 ते दीड महिन्यात बीड पर्यंत रेल्वे येणार आहे आम्ही परळीमधील रेल्वे स्टेशन संदर्भातील अडचणी देखील दूर केल्या आहेत अशी माहिती देखील त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये दिली.तर या पत्रकार परिषदेमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून वाल्मिक कराडवर  गंभीर आरोप केले आहे. वाल्मिक कराड परळीत बसून सर्व चालवत होता.असा दावा खासदार बजरंग सोनवणे यांनी केला आहे. तसेच पालकमंत्री अजित पवार  जिल्ह्यात चुकीचं काम करु देणार नाही असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

घरासमोर तुटून पडलेल्या विद्युत तारेस स्पर्श झाल्याने वकिलाचा मृत्यू

0

आष्टी — रात्रीच्या वेळी किर्तन संपल्यानंतर घराकडे येणाऱ्या वकिलाचा घरासमोर तुटून पडलेल्या विद्युत तारेला स्पर्श होऊन विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. मात्र त्यांचे वडिल थोडक्यात बचावले.
अमोल पंढरीनाथ पारखे वय 30 वर्ष असे मृत वकिलाचे नाव आहे. ही घटना हनुमंतगाव येथे गुरूवारी रात्री साडेअकराच्या दरम्यान घडली.
आष्टी तालुक्यातील हनुमंतगाव येथे गुरूवारी रात्री किर्तन होते. ते संपल्यानंतर रात्री साडेअकरा वाजेच्या दरम्यान वकील अमोल पंढरीनाथ पारखे हे वडिल आणि चुलत भावासह घराकडे निघाले. मात्र, घराच्या समोर विद्युत वाहिनी तुटून पडली होती. अमोल व त्याचे वडील पंढरीनाथ यांच्या हाताला विद्युत वाहिनीचा स्पर्श झाल्याने ते दोघेही बाजूला फेकले गेले. यावेळी अमोल पारखे हे अत्यावस्थ होते. तर त्यांचे वडील जखमी झाले.
दरम्यान, अमोल यांना लगेच आष्टी ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यानी तपासून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या दुर्घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे

शेतकऱ्यांनो पा”ठका”च्या अविनाशी सत्या नाशापासून सावध व्हा! पवन ऊर्जा सौरऊर्जा कंपन्यांकडून ताकद दाखवून मावेजा घ्या..! ✒️ भाग -1

0

बीड — जिल्हाधिकारी म्हणून शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेण्याची जबाबदारी टाळत पवन ऊर्जा सौर ऊर्जा कंपन्यांचे “बटीक”बनून काम करण सध्या सुरू आहे. शेतकऱ्यांचा “अविनाशी” सत्यानाश करण्याचा विडा उचललेल्या (पा)ठका पासून सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे. पवन ऊर्जा सौर ऊर्जा कंपन्यांकडे गावगुंडांना, पोलीस यंत्रणेला, महसूल यंत्रणेला इतकंच नाही तर सर्वोच्च पदावर बसलेल्या लोकप्रतिनिधी सह अधिकाऱ्यांना पाय चाटायला लावण्या इतका द्यायला पैसा आहे. पण शेतकऱ्यांना देताना शेतकऱ्यांना देताना हाताला मात्र महारोग झाल्यासारखी स्थिती आहे. शेतकऱ्यांनो सावध व्हा…! जिल्हाधिकारी आपली आर्त हाक ऐकेल न्याय देईल ही अपेक्षा बाजूला ठेवा. गाव पातळीवर संघटित होऊन प्रकल्पाला विरोध करण्यापेक्षा जास्तीत जास्त मावेजा कसा पदरात पडेल यासाठी पारदर्शक विश्वासाच वातावरण तयार करा असं म्हणण्याची वेळ आली आहे.
पवन ऊर्जा सौर ऊर्जा कंपन्यांनी बीड जिल्ह्यात शेतकऱ्या विरोधात धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे शासनाच्या उद्योग ऊर्जा विभागाने 21 ऑक्टोबर 2023 रोजी पवन ऊर्जा प्रकल्प जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय स नियंत्रण समिती स्थापन करून पवन ऊर्जा कंपन्यांबाबत असलेल्या जमिनीच्या व्यवहाराबाबत कायदेशीर बाबी व अनिश्चितता तपासून जमिनीच्या व्यवहारात योग्य मोबदला देण्यासाठी योग्य नियोजन लावण्याची जबाबदारी दिली होती. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी तर पोलीस अधीक्षक सदस्य आहेत. मात्र ही स नियंत्रण समिती कागदावरच राहिली. सध्या शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी साहेब तुम्ही कंपनीचे दलाल का? असा प्रश्न विचारावा लागतो आहे हे दुर्दैव आहे. कंपन्यांची पाय चाटणे, लाळ घोटण हे आपलं कर्तव्य आहे असं समजून सगळा कारभार सुरू आहे. यामध्ये मात्र शेतकरी वर्ग भरडला जात आहे.
पवन ऊर्जा कंपन्यांनी ज्या ज्या गावांमध्ये पाय ठेवला त्या गावांमधील गावगुंडांना आधी हाताशी धरलं त्यांना टॉवर लाईन साठी रनिंग मीटर प्रमाणे पैसा ठरला. त्यांनी स्वतःच्या ताकतीचा वापर करून अनेक ठिकाणी काम करून घेतली. रनिंग मीटर प्रमाणे पैसा ठरल्यामुळे जास्तीत जास्त मोबदला आपल्या खिशात यावा यासाठी अनेकांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसली. गावात पदार्पण करताना ग्रामपंचायत ची ना हरकत घेण्याची गरज सुद्धा कंपन्यांना पडली नाही. गावोगाव फूट पाडा आपलं इप्सीत साध्य करून घ्या एवढीच इंग्रजांच्या पैदाईशीची शिकवण कंपन्यांनी अंगीकारली. कठपुतली बाहुली झालेल्या जिल्हाधिकारी अविनाश पाठक नावाच्या व्यक्तिमत्त्वाने त्याला साथ दिली. गुंडांच्या टोळ्या पोलीस संरक्षणात शेतकऱ्यांच्या शेतात धुमाकूळ घालू लागल्या. एखादा शेतकरी काम करत असताना आडवा आलाच तर त्याला बाजूला घ्यायचं दहा पाच लाखाचं माप त्याच्या पदरात टाकायचं. आम्ही तुला इतका पैसा दिला हे गावात कोणाला कळू देऊ नको हे सांगत फुटीची पेरणी केली. परिणामी गोर गरिबी शेतकऱ्यावर देखील अन्याय झाला. कोणाला किती मोबदला मिळाला याची माहिती शेतकऱ्यांना मिळालीच नाही. जसा शेतकरी तावडीत सापडेल तसा त्याचा चुराडा करायचा ही भूमिका कंपन्यांनी ठेवली. शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायाला सामाजिक कार्यकर्त्यांसह जिल्ह्यातील प्रसारमाध्यमांनी वाचा फोडली. पण जिल्हाधिकाऱ्यांनी ‌ जनाची ही नाही मनाची ही नाही खुर्चीची तर नाहीच नाही अख्खी लाजच सोडली. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळणं अवघड होऊन बसला आहे. शेतकऱ्यांनो आता तरी गाव पातळीवर संघटित व्हा प्रकल्पाला विरोध करण्यापेक्षा सगळ्यांना कंपन्यांकडून जास्तीत जास्त मावेजा कसा मिळेल याचा विचार करा. नाहीतर तुमच्यातली दूही, भांडण कंपन्यांच्या फायद्याची आहे. गिधाड तुमची लचके तोडायला टपलेली आहेत याचा विचार करा. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कांवत कर्तव्यदक्ष आहेत. जनमानसावर होणाऱ्या अन्यायाची त्यांना जाण आहे. पवन चक्की कंपन्यांसोबत पोलिसांचा फौजफाटा असला. तरी शेतकऱ्यांनी कंपन्यांच्या लोकांना इजा पोहोचवू नये शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलू नये यासाठी आहे. हे लक्षात ठेवा अनेक वेळा संरक्षणाच्या मुद्द्यावरून पोलीस अधीक्षकांची व जिल्हाधिकाऱ्यांची तू तु मै मै झाल्याची माहिती मिळत असली. तरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं पालन करण्याची मजबुरी पोलीस अधीक्षकांची झाली आहे ही बाब लक्षात घ्या.
शेतकऱ्यांचा घास घेणाऱ्या लचके तोडणाऱ्या कंपन्या विरोधात दंड थोपटून रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. व्यवस्थित मोबदला कंपन्यांनी दिला तर त्यांचं स्वागत करा पण कुणावर अन्याय करीत असतील तर संघटितपणे लढा देण्याची वेळ आली आहे. प्रशासकीय व्यवस्था सद्यस्थितीत विस्कळीत झाली आहे. नव्या क्रांतीची गरज शेतकऱ्यांना निर्माण झाली आहे कारण (पा) ठकच कंपन्यांचे पाय सध्या चाटतो आहे.

26/ 11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड तहव्वुर राणा भारतात दाखल, तिहार जेलमध्ये होणार रवानगी

0

नवी दिल्ली – 2008 च्या 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणा अमेरिकेतून प्रत्यर्पणानंतर भारतात दाखल झाला आहे.एनआयएच्या पथकाने तहव्वूरला अमेरिकेतून दिल्लीला एका विशेष विमानाने आणले.

https://x.com/ani_digital/status/1910350519853342772

दरम्यान, भारतात दाखल झालेल्या तहव्वुर राणाचा एक फोटो समोर आला आहे. राणाचा हा पाठमोरा फोटो असून, यात त्याचे पांढरे झालेले केस आणि अंगावर चॉकलेटी रंगाचे कपडे दिसत आहेत.

पटियाला हाऊस कोर्टाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था
मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेतून प्रत्यार्पण केल्यानंतर एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर केले जाणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी न्यायालय परिसरात सीआयएसएफसह निमलष्करी दलांचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

राणाला तिहार तुरुंगात ठेवले जाणार
तहव्वुर राणाला तिहार तुरुंग ठेवले जाणार आहे. तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितले की, राणाला तुरुंगात उच्च सुरक्षा वॉर्डमध्ये ठेवण्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. राणावर डेव्हिड कोलमन हेडली, लष्कर-ए-तैयबा (एलईटी), हरकत-उल-जिहादी इस्लामी (एचयूजी) आणि इतर पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या मदतीने 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे.

विशेष एनआयए न्यायालयात खटला चालणार
दिल्लीतील विशेष एनआयए न्यायालयात खटला चालवला जाणार आहे. आता या प्रकरणाची सुनावणी दिल्लीत होणार असल्याने, राणाला मुंबईत पाठवले जाणार नाही. या हाय-प्रोफाइल प्रकरणात भारताच्या वतीने वरिष्ठ वकील दयान कृष्णन हे खटला चालवतील. त्यांच्यासोबत विशेष सरकारी वकील (एसपीपी) नरेंद्र मान हे कायदेशीर कार्यवाहीचे नेतृत्व करतील.

पाकिस्तानची हात झटकले
तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर त्याच्याशी आपला काहीही संबंध नसल्याचे पाकिस्तानने गुरुवारी स्पष्ट केले. पाकिस्तानने म्हटले की, तहव्वुर राणा हा कॅनेडियन नागरिक आहे. त्याने जवळजवळ दोन दशकांपासून त्याचे पाकिस्तानी कागदपत्रे अपडेट केलेली नाहीत.

वाल्मिक कराड तुरुंगातून बाहेर येणार? निर्दोष असल्याचा अर्ज केला न्यायालयात दाखल

0

बीड — सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील खटल्यात महत्त्वाची घडामोड घडली आहे. आज  मकोका न्यायालयात झालेल्या दुसऱ्या सुनावणीत मुख्य आरोपी वाल्मिक कराडने मोठा दावा करत, आपण निर्दोष असल्याचा अर्ज न्यायालयात सादर केला त्यामुळे खळबळ माजली आहे.

वाल्मिक कराडसह महेश केदार, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे, सुधीर सांगळे यांना या प्रकरणात अटक झाली आहे, तर कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार आहे. पोलिसांनी घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवले असून, काही गोपनीय साक्षीदारांच्याही जबाबांची नोंद झाली आहे.

आज कोर्टात वाल्मिक कराडने अर्ज सादर करत सांगितलं की, ‘माझ्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नाही. खंडणी मागितल्याचा आरोपही सिद्ध झालेला नाही. त्यामुळे मला या प्रकरणातून दोषमुक्त करण्यात यावं.’ त्याच्या अर्जावर पुढील सुनावणी २४ एप्रिल रोजी होणार आहे. त्या दिवशी सरकारी पक्ष आपली बाजू मांडणार आहे.

सरकारी पक्षाकडून विशेष सरकारी वकील अॅड. उज्जवल निकम यांनी युक्तिवाद केला. सुनावणीनंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘आज आरोपी वाल्मिक कराडने काही कागदपत्रांची जंत्री मागितली होती, ती न्यायालयात सादर करण्यात आली आहे. त्याने पुन्हा एकदा दोषमुक्ततेची मागणी केली आहे.’

विशेष म्हणजे, न्यायालयात संतोष देशमुख यांच्यावर झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ सादर करण्यात आला आहे. तसेच, वाल्मिक कराड याची संपत्ती जप्त करण्यासाठी मोक्का कायद्यानुसार अर्ज दाखल करण्यात आला आहे. या खटल्यात आरोपींविरोधात अजूनही आरोप निश्चित झालेले नाहीत, अशी माहिती अॅड. निकम यांनी दिली.

या प्रकरणाच्या पुढील सुनावणीत आरोप निश्चिती आणि तपास यंत्रणांचे सादरीकरण यावरून या खटल्याला नवे वळण मिळू शकते. आरोपींच्या मुक्ततेबाबतचा निर्णय २४ एप्रिल रोजी होणाऱ्या सुनावणीत स्पष्ट होईल.

मुकादमाकडून अत्याचार व्हिडिओ व्हायरल; त्रासाला कंटाळून ऊसतोड मजूर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

0

दिंद्रुड — ऊस तोडीची थकबाकी दे नाहीतर शारीरिक संबंध ठेवले नाहीस तर तुझ्या पतीला मारून टाकण्यात येईल असे धमकी देत अत्याचार करत अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या मुकादमाच्या त्रासाला कंटाळून महिलेने विष देऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना दिंद्रूड पोलीस ठाणे हद्दीत मंगळवारी घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की दिंद्रुड पोलीस हद्दीतील एका गावातील ऊसतोड मजूर जोडपं अमोल श्रीमंत शिनगारे याच्याकडे ट्रॅक्टरवर कामाला होते, दरम्यान दोन लाख रुपयांची थकबाकी त्यांच्याकडे शिल्लक राहिली होती .तुमच्याकडे असलेले पैसे दे अन्यथा माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव म्हणत अमोल शिनगारे याने जबरदस्तीने महिलेने अत्याचार केले. तसेच भेटायला ये अन्यथा फोटो व्हायरल करेल अशा धमक्या दिल्या.दरम्यान, सात महिन्यांपासून महिला भेटण्यास टाळाटाळ करत असल्याने अमोलने महिलेचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल केले. शिनगारे याच्या मानसिक आणि शारीरिक जाचाला कंटाळून पीडित महिलेने मंगळवारी सकाळी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. माजलगाव येथील खाजगी रुग्णालयात महिलेवर उपचार सुरू आहेत. गुरुवारी पीडित महिलेच्या तक्रारीवरून अमोल श्रीमंत शिनगारे याच्या विरोधात अत्याचारासह अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी फरार असून दिंद्रुड पोलीस शोध घेत आहेत.

मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातील संबंध लग्नासारखे, न्यायालयाचा झटका

0

मूंबई : वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने काही दिवसांपूर्वी करुणा शर्मा यांना धनंजय मुंडे यांची पत्नी असल्याचा निकाल देताना दर महिन्याला 2 लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले होते.वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाच्या या निकालाविरोधात धनंजय मुंडे यांनी माझगाव सत्र न्यायालयात धाव घेतली होती. या खटल्यावर 05 एप्रिल रोजी सुनावणी झाली, तेव्हा माझगाव सत्र न्यायालयाने वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाचा निकाल कायम ठेवला होता. यानंतर आता माझगाव सत्र न्यायालयाचा सविस्तर आदेश समोर आला आहे. त्यानुसार, धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा झटका बसला आहे. धनंजय मुंडे यांचे करुणा शर्मांसोबतचे संबंध विवाहाच्या स्वरूपाचे असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत त्या दिलासा मिळण्यास पात्र असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने 4 फेब्रुवारी रोजी करुणा शर्मा यांची याचिका मान्य केली होती. कोर्टाने धनंजय मुंडे यांना दरमहा 1,25,000 रुपये आणि करुणा शर्मा यांच्या मुलीला 75,000 रुपये देण्याचे आदेश दिले होते. मात्र या सुनावणीवेळी धनंजय मुंडे यांनी मुलांचा सांभाळ करण्याची तयारी दर्शवली होती. तर करुणा शर्मा यांना पत्नी मानण्यास नकार दिला होता. यानंतर माझगाव सत्र न्यायालयात झालेल्या पहिल्या सुनावणीवेळी धनंजय मुंडे यांच्या वकिलाने करुणा शर्मा यांना पोटगी मिळू नये, म्हणून दोघांचे अधिकृत लग्न न झाल्याचा दावा केला होता. मात्र करुण शर्मा यांच्या वकिलाने लग्नाचे पुरावे असल्याचे म्हटले. याप्रकरणी 5 एप्रिल रोजी सुनावणी झाली. तेव्हा करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांची मीच पहिली पत्नी असल्याचा पुरावा म्हणून धनंजय मुंडे यांचे अंतिम इच्छापत्र आणि स्वीकृती पत्र दिले होते. स्वीकृती पत्रात माझ्या घरच्यांच्या दबावापोटी मी लग्न करत आहे. पण करुणा मुंडे यांचा मी सांभाळ करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले होते. हे सर्व पुरावे तपासल्यानंतर माझगाव सत्र न्यायालयाने वांद्रे दंडाधिकारी न्यायालया निर्णय कायम ठेवला होता. यानंतर आज (09 एप्रिल) न्यायालयाचा सविस्तर आदेश समोर आला आहे.

न्यायालयाने म्हटले की, धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातील संबंध लग्नासारखे आहेत. कारण त्यांनी दोन मुलांना जन्म दिला आहे आणि एकाच घरात राहिल्याशिवाय हे शक्य नाही. तसेच एका प्रसिद्ध नेत्याची जीवनशैली लक्षात घेऊन, करुणा शर्मा यांना अंतरिम देखभालीचा आदेश देणे योग्य आहे. करुणा शर्मा आणि त्यांच्या मुलांनाही नेत्यासारखीच जीवनशैली मिळायला हवी. याशिवाय घरगुती हिंसाचाराची बळी पडलेली आणि लग्नासारख्या लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिलेली महिला घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत दिलासा मिळण्यास पात्र आहे, असे न्यायालयाने सविस्तर आदेशात म्हटले आहे.

देशात यंदा धो-धो पाऊस कोसळणार; महाराष्ट्रात काय स्थिती, पहिला अंदाज समोर

0

 नवी दिल्ली — यावर्षी राज्यात मान्सूनचं प्रमाण कसं असणार याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे, या संदर्भात स्कायमेटचा एक रिपोर्ट आता समोर आला आहे. यावर्षी राज्यात पडणाऱ्या मान्सूनसंदर्भात स्कायमेटकडून पहिला पू्र्व अंदाज जारी करण्यात आला आहे.स्कायमेटनं वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनची सुरुवात संथ गतीनं होईल.

जूनमध्ये मान्सूनचं आगमन होईल, मात्र तो संथ गतीने पुढं सरकरणार आहे. मात्र त्यानंतर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यंदा देशभरात पावसाचं प्रमाण सामान्य राहणार असून, 103 टक्क्यांपर्यंत पाऊस पडू शकतो असं स्काय मेटनं म्हटलं आहे.

याबाबत माहिती देताना स्काय मेटच्या तज्ज्ञांनी सांगितलं की, ला लीनाची स्थिती बदलली आहे, मात्र तरी देखील यावेळी देशात मान्सून सामान्य स्थितीमध्ये राहणार आहे, यावेळी देशभरात सरासरीच्या 103 टक्के इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे. एक जून ते तीस सप्टेंबर या काळात देशभरात 895 मिमी इतका पाऊस होण्याचा अंदाज आहे. यंदा देशात मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज 40 टक्के इतका आहे, तर सामान्य पेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता 30 टक्के असून, अतिवृष्टीची शक्यता दहा टक्के इतकी आहे.

स्कायमेटनं वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी जून ते सप्टेंबर महिन्यांमध्ये सामान्य किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. जूनमध्ये सरासरीपेक्षा थोडा कमी 158.7 मीमी इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक 286.1 मीमी इतक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात 275.3 मिमी तर सप्टेंबर महिन्यामध्ये 174.6 मिमीटर पाऊस पडू शकतो.

स्कायमेटनं वर्तवलेल्या अंदाजानुसार आसाम, अरुणाचल प्रदेश, आणि जम्मू -काश्मीरमध्ये यंदा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा या राज्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान यावर्षी पाऊस चांगला पडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रात देखील यंदा पावसाचं प्रमाण चांगलं राहणार आहे.

चौसाळा ग्रामीण रुग्णालयाच्या इमारत बांधकामासाठी २४ कोटींचा निधी मंजूर

0

प्रशासकीय मान्यता मिळाली; उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे डॉ.योगेश क्षीरसागर यांनी मानले आभार

बीड — तालुक्यातील चौसाळासह परिसरातील आरोग्य सुविधांमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. यासाठी राज्य सरकारकडून २४ कोटी ४५ लक्ष ६३ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून बुधवारी (दि.९) अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या निधीतून ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम होणार आहे. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर झाला आहे. त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

चौसाळा येथील ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यासाठी आणि जागा उपलब्धतेसाठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी सातत्याने पाठपुरावा केलेला होता. आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली निधीसाठी डॉ.योगेश क्षीरसागर यांनी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा केला आहे. भरीव निधी प्राप्त झाल्यामुळे चौसाळा परिसरातील हजारो नागरिकांना दर्जेदार आणि आधुनिक वैद्यकीय सुविधा स्थानिक पातळीवरच मिळू शकणार आहेत. आतापर्यंत अनेकवेळा रुग्णांना प्राथमिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालय गाठावे लागत होते. मात्र, ग्रामीण रुग्णालय स्थापन झाल्यानंतर विविध उपचार, तपासण्या व तातडीच्या सेवा याठिकाणीच उपलब्ध होतील. या रुग्णालयासाठी निधी मिळवण्यासाठी डॉ.योगेश क्षीरसागर यांनी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा केला होता. विविध स्तरावर पाठपुरावा करून त्यांनी ही मागणी शासनदरबारी मांडली होती. त्यांच्या या प्रयत्नांना आता यश आले असून, त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विशेष आभार मानले आहेत. या निर्णयामुळे चौसाळा परिसरातील आरोग्यसेवा क्षेत्रात मोठी क्रांती होणार असून, गावातील नागरिकांबरोबरच आजूबाजूच्या भागातील लोकांनाही त्याचा लाभ मिळणार आहे. लवकरच कामाला सुरुवात होणार असून, येत्या काही महिन्यांत ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम व सुविधा उभारणीचे काम वेगात सुरू होईल, अशी माहितीही मिळत आहे.

पा”ठक” साहेब…!जनाची नाही मनाचीही नाही किमान खूर्चीची तरी लाज बाळगा;पवन कंपन्यांचे दलाल ही प्रतिमा पुसून काढा

0

बीड — बीड जिल्ह्याची अर्थव्यवस्था ऊसतोड कामगारांच्या घामावर अवलंबून आहे. मात्र ती पवन ऊर्जा कंपन्यांच्या जीवावर असल्याचा आभास निर्माण करत कंपन्यांच्या ताटाखालचे मांजर होऊन शेतकऱ्यांना दमदाटी करणे, धमक्या देणे, गुन्हे दाखल करणे एवढेच नाही तर न्याय हक्कासाठी 70 दिवसापासून आंदोलन करत विष पिण्याची वेळ अंबाजोगाई तालुक्यातील जवळगावच्या शेतकऱ्यावर आणली आहे. शेतकऱ्यांपाशी वाघाची भूमिका घेणारे अविनाश पाठक त्याचवेळी पाटोदा तालुक्यातील धनगर जवळका येथील शासकीय साठवण तलावाची जागा बळकावून पवनचक्की कंपनीने पाच कोटी रुपये खर्चून विद्युत उपकेंद्र उभे केले आहे. त्याची चौकशी करताना “शेळ “पटाची भूमिका का घेत आहेत. चौसाळ्याच्या शेतकऱ्याने पाठक साहेब तुम्ही कंपनीचे दलाला आहात का असा प्रश्न उपस्थित केला होता. कमीत कमी हा लागलेला कलंक पुसायचं काम करा. तुमचं द्या हो सोडून किमान जिल्हाधिकारी पदाच्या खुर्चीची तरी इभ्रत राखा अशी मागणी जोर धरू लागली आहे.


पा “ठक” साहेब…! जिल्ह्यात तुम्ही अनेक वर्ष सेवा बजावली आहे. राजकारण्यांसह जनमानसाची नाडी एवढ्या वर्षाच्या सेवेच्या कारकिर्दीत समजली आहे. आपल्यातलाच एक माणूस जिल्हाधिकारी पदावर विराजमान झाला याचा आनंद जिल्ह्यातील जनतेला झाला. पण तो तुम्ही क्षणीक ठरवला. पवन ऊर्जा कंपन्यांनी सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांचं जीन हराम केलं‌‌. कंपन्यांच्या काळ्या गाड्यांच्या दहशतीत वावराव लागतं. कधी कुठून आपल्या शेतावर आक्रमण होईल याची सतत धास्ती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. शेतकऱ्यांना गुन्हे दाखल करू, तुरुंगात टाकू, वेळप्रसंगी खंडणी सारखे गुन्हे दाखल करू, कंपन्यांच्या गुंडा मार्फत दमदाटी करणे ,खोटे धनादेश देणे, संपादित जमिनीपेक्षा अधिकच्या जमिनीवर कब्जा करणे यासारख्या एक ना अनेक घटनांनी वर्तमानपत्रांचे रकाने भरू लागले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी न्याय भूमिका घेत शेतकऱ्यांना अश्वस्त करणं हे काम करायचं सोडून शेतकरी कसा अस्वस्थ राहील याकडे तुमचं प्रामाणिक लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी पदाची खुर्ची देखील कलंकीत होऊ लागली आहे. यापूर्वी तुमची गाडी माजलगाव न्यायालयाच्या आदेशाने जप्त झाली. ती मावेजा न दिल्यामुळेच झाली होती. एवढंच नाही तर बीडच्या दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तराने शेतकऱ्यांचा मावेजा न्यायालयीन निर्णयानंतर देखील दिला नव्हता म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना कैद करा असे आदेश दिले होते. खरे तर त्यावेळीच सगळी इभ्रत गेली होती. कुठेतरी सुधारणा होईल अशी अपेक्षा होती. पण जुनी म्हण आहे “नाक कापलं तरी भोक तयार”या म्हणीचीच “रि ” पुन्हा ओढली गेली. हे कमी की काय म्हणून‌ चौसाळ्याच्या शेतकऱ्याने महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या उद्घाटनाला आलेले असताना पाठक साहेब तुम्ही कंपनीचे दलाल का? असा प्रश्नही उपस्थित केला होता. याच्या बातम्या ही माध्यमांनी लावल्या होत्या. पण छेऽऽ! धृतराष्ट्राची एकदा भूमिका घेतल्यावर शेतकऱ्यांचं काहीही होऊ द्या आपण कंपनीशी प्रामाणिक राहायचं याचा एकदा चंग बांधल्यावरच काय करणार?
‌. अंबाजोगाई तालुक्यातल्या जवळगाव येथील सरकारी जमिनीवर भूमिहीन शेतकरी 1981 पासून उपजीविका करत आहेत. या सरकारी जमिनीवर सोलार प्लांट करण्यात येत आहे. हा प्रकल्प रद्द करून अन्यत्र स्थलांतरित करावा या मागणीसाठी गेल्या 70 दिवसापासून भूमीहीन शेतकरी जवळगाव येथे बेमुदत धरणे आंदोलन करत आहेत. लोकशाही मार्गाने चाललेल्या या आंदोलन पोलीस बळाचा वापर करत त्यांच्या राहत्या झोपड्यावर जेसीबी चालवून चिरडण्याचा प्रकार आठ एप्रिल रोजी झाला. या घटनेच्या निषेधार्थ चार गायरान धारक शेतकऱ्यांनी उपजीविकेचे साधन जाणार जगून तरी काय करायचं म्हणून विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिस बळाचा वापर करून वाघाची भूमिका निभावली. पण त्याचवेळी विरोधाभासी भूमिका पाटोदा तालुक्यात घेतली. खेडवळ भाषेत बोलायचं तर शेळपटपणाचा कळस गाठला. धनगर जवळका येथील शासकीय साठवण तलावाच्या जागेवर पवनचक्की कंपनीने अतिक्रमण करून पाच कोटी रुपये खर्च होऊन विद्युत उपकेंद्र तयार केले आहेत. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते यांनी जिल्हाधिकारी बीड पोलीस अधीक्षक बीड यांना लेखी तक्रारी केल्या. या शिवाय महाराष्ट्रात आघाडीवर असलेल्या पुण्यनगरी नावाच्या दैनिकाने आठ भागांची मालिका छापली. पण वातावरणुकूलित केबिन मध्ये बसलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना घाम फुटला नाही. त्याची दखल देखील घ्यावी या प्रकरणाची चौकशी करावी. याची हिम्मत झाली नाही. जणूकाही कंपन्यांचे ताटा खालचे मांजर आहोत. एकादा घास आपल्याला मिळेल अशी अपेक्षा ठेवून वाट पाहत बसल्यासारखी स्थिती साहेब तुमची झाली आहे. असा आरोप आता शेतकरी वर्ग करू लागला आहे. पा“ठक” साहेब..! आयुष्यात पैसा मिळेल हो पण तळतळाटाने कमावलेला पैशाची परतफेड वार्धक्य करावी लागते हो ऽऽऽ! किमान याची तरी जाणीव ठेवा असं शेतकरी म्हणू लागला आहे. कमीत कमी जनाची नाही मनाची नाही किमान खुर्चीची तरी इभ्रत राखा होऽऽ! अशी अर्त हाक तळतळलेला शेतकरी मारू लागला आहे याची जाणीव ठेवा. कुठेतरी याला पाय बंद घाला आपलं इमान जनतेशी आहे याची जाणीव होऊ द्या? असं देखील जनतेत बोललं जाऊ लागला आहे.

बुजगावणं उपयोगाच नाही
जिल्हाधिकारी, पोलीस यंत्रणा पवन ऊर्जा सौर ऊर्जा कंपन्यांच्या बाजूने सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यावर अन्याय करत आहेत. काय चुकलं त्या चौसाळ्याच्या शेतकऱ्याचं ज्याने जिल्हाधिकाऱ्यांना तोंडावर पाठक साहेब तुम्ही कंपनीचे दलाल आहात का? असा प्रश्न विचारला. मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून फिरताना गोरगरीब शेतकरी किती बेंबीच्या देठापासून तळतळाट देत आक्रोश करतोय तो आक्रोश आता कानालाही ऐकावा वाटेना. पण आमच्या जिल्हाधिकाऱ्यांना याचं काहीच कसं वाटेना याचा विचार करतोय. तळतात फेडावा लागतो म्हणतात. ते भेडतील ही पण गोरगरीब शेतकरी आज भरडला जातोय त्याचं काय? पवनचक्की सौर ऊर्जा कंपनी यांनी हे पाठक नावाचं बुजगावणं उभा करून पोटाच्या मागे लागलेल्या जनतेला भेडवायचं काम सुरू केलेला आहे. लक्षवेधी आंदोलन करून देखील त्याचा फायदा झाला नाही. जिल्ह्यात घडणाऱ्या घटनांसह जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे त्या खुर्चीची “पत” ढासळली असल्याचं पाहायला मिळत आहे. आतापर्यंतच्या काळात ताटा खालचं मांजर असल्यासारखी भूमिका एका जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली नव्हती. ती आता घेतली जात आहे. पालकमंत्री अजित दादा पवार यांनी असल्या माणसा विरोधात कारवाई करून हकालपट्टी करावी.
डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर