अवादा कंपनीच्या कर्मचाऱ्याचा केज मध्ये आढळला मृतदेह
केज — सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या अवादा पवन ऊर्जा कंपनीचा कर्मचारी केज मधील एका दारूच्या दुकानासमोर मृत अवस्थेत आढळल्यामुळे खळबळ माजली आहे.
पंजाब राज्यातील हा कामगार केज तालुक्यातील मस्साजोग येथील आवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीत मजूर म्हणून काम करीत होता. त्याचे नाव रचपाल हमीद मसीह असून तो पंजाब राज्यातील गुरुदासपूर येथील रहिवासी आहे. केज – अंबाजोगाई रोडवर असलेल्या चांदणी बार समोर त्याचा मृतदेह रस्त्यावर पडला असल्याचे आढळून आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली.पोलिसांनी याची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात नेला असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.दरम्यान सदरील मृतदेह आढळल्यानंतर वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले होते. मात्र सदरील व्यक्तीचा मृत्यू हा सर्पदंशाने झाला असल्याची प्राथमिक माहिती पोलिस आणि रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.
आ. संदीप क्षीरसागरांची नवी संकल्पना; प्रशासन मतदारसंघातील प्रत्येक गावात जाणार
शासकीय योजनांची माहिती गावकऱ्यांना देण्यासाठी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात कॅम्प
बीड — ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांना शासनस्तरावरील योजनांची माहिती देण्यासाठी गावोगावी जाऊन प्रशासनाने शिबीर घ्यावेत आणि सर्वसामान्य नागरिकांना विविध योजनांची माहिती द्यावी अशी नवीन संकल्पना आ.संदीप क्षीरसागर यांनी सुचवून याबाबतचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आता जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात बीड तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन प्रशासनाकडून शिबीर घेण्यात येणार आहेत.
शासनाच्या योजना विविध योजना शेतकरी, दुर्बल घटक आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी अधिक प्रभावी मार्गाचा अवलंब केला जावा. या हेतूने आ.संदीप क्षीरसागर यांनी नवीन संकल्पना सूचविली. महसूल विभाग, कृषी विभाग, ग्रामविकास विभाग यांसह इतर विभागांच्या अधिकारी व कर्मचारी यांनी गावोगावी जाऊन संयुक्तरित्या शिबीर घ्यावेत. या शिबीरांमध्ये प्रत्येक घटकातील लोकांसाठी असलेल्या योजनांची त्या-त्या लोकांना देऊन त्यांना असलेल्या शंका आणि समस्यांचे निराकरण करावे. असे निर्देश आ.संदीप क्षीरसागर यांनी तहसिलदार, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी यांना दिले होते. यावर आता तहसिलदार यांनी आदेश काढले आहेत. दि.२२ जानेवारी ते ३१ जानेवारी या काळात बीड तालुक्यातील प्रत्येक गावात असे शिबीर घेण्यात येणार आहेत. दरम्यान आ.संदीप क्षीरसागरांच्या या नाविन्यपूर्ण संकल्पनेचा फायदा ग्रामीण भागातील लोकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.
भीषण हत्याकांडाने आष्टी हादरले; दोन सख्ख्या भावाची हत्या तिसरा गंभीर
आष्टी — तालुक्यातील वाहिरा येथे गुरुवारी दि.16 जानेवारी रात्री दहाच्या दरम्यान जुन्या वादातून तीन सख्खा भावांवर त्यच्याच समाजातील काही लोकांनी लोंखडी रॉड, धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात दोन चुलत सख्खा भावांचा जागीच मृत्यु झाला. तर अन्य एक भाऊ गंभीर जखमी झाला. ही घटना अंभोरा पोलिस ठाणे हद्दीत घडली.
अजय विलास भोसले, भरत विलास भोसले असे मयताचे नावे असून कृष्णा विलास भोसले तिघे राहणार हतोळण ता. आष्टी हा गंभीर जखमी आहे आष्टी तालुक्यातील हातोळण येथील अजय विलास भोसले, भरत विलास भोसले, कृष्णा विलास भोसले हे तिघे भाऊ वाहिरा येथे गुरूवार (दि.१६) रोजी आले होते. याच ठिकाणी वाहिरा गावातील व बाहेरील काही लोक जमा झाले होते. गुरूवारी दुपारपासून हे सगळे याच ठिकाणी होते. रात्री साडे नऊ ते दहाच्या दरम्यान यातील काही लोकांनी या तीनही भावांवर लोंखडी रॉड, धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या हल्ल्यात अजय विलास भोसले, भरत विलास भोसले या दोन सख्खा भावांचा जागीच मृत्यू झाला. तर तिसरा भाऊ कृष्णा विलास भोसले हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत. या घटनतेली सात संशयित आरोपीना अंभोरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा खून का व कोणत्या कारणावरुन केला हे अद्याप समजले नाही. दोन्ही मृतदेह आष्टी ग्रामीण रूग्णालयात ठेवण्यात आले आहेत.
धनंजय मुंडेंचा परळीत जनता संवाद, जगमित्र कार्यालय गजबजले
परळी — नियमित प्रमाणे परळीत आल्यानंतर आज राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी परळी येथील आपल्या जगमित्र या कार्यालयामध्ये बसून मतदारसंघातून व मतदारसंघ बाहेरून आलेल्या नागरिक कार्यकर्ते तसेच पदाधिकारी यांच्याशी संवाद साधत त्यांची कामे अडचणी समजून घेतल्या तसेच ती मार्गी लावण्याबाबत संबंधितांना योग्य त्या सूचना देत संबंधितांची कामे मार्गी लावली.












