धारूरजवळ पोलिसांवर हल्ला;कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

बीड — जिल्ह्यातील धारूर शहराजवळील घाटपाटी परिसरात पोलिसांवर झालेल्या धक्कादायक हल्ल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मध्यरात्री पेट्रोलिंग करत असताना मद्यधुंद टोळक्याने पोलिसांवर थेट जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस उपनिरीक्षक बाबासाहेब भवर हे आपल्या पथकासह नियमित गस्त घालत असताना अचानक काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर दगडफेक सुरू केली. या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले असून, घटनेमुळे पोलिस यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे, या हल्ल्यात सहभागी असलेल्या आरोपींपैकी एक व्यक्ती पोलीस कर्मचारी असल्याचा आरोप केला जात आहे. “आम्हाला कोणी काही करू शकत नाही,” अशी उघड दादागिरी करत आरोपींनी पोलिसांनाच लक्ष्य केल्याने परिस्थितीचे गांभीर्य वाढले आहे.
या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली असून, तीन जण फरार आहेत. इतर संशयितांचा शोध सुरू आहे. धारूर पोलिस या घटनेचा अधिक तपास करत असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी मोहीम राबवली जात आहे.
दरम्यान, “पोलिसच सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांचे काय?” असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील सुरक्षा व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles