बीड — नेकनूरच्या ठाणेदाराचा छेऽऽ। राजेंचा कारभार मोगलाईला साजेसा सुरू आहे.वेगवेगळ्या धंद्यामधून राजेंच्या व्यक्तिगत खजिन्यात दररोज भर पडत आहे. हे कमी की काय म्हणून लेकीबाळींच्या अब्रूवर हात घालणारांना देखील अभय दान देऊन त्यातूनही खजिन्यात कशी भर पडेल याची काळजी घेतली जात आहे. अपहरण झालेल्या 14 वर्षाच्या पीडितेचे कुटुंब असा आरोप करत आहेत. कांवत साहेब “त्या” पिडीत बापाला न्याय देण्याची शिफारस तरी तुम्ही करा आरोपीच्या अटकेची विनंती तरी करा अशी पीडित कुटुंब आंदोलन करून अर्त हाक देऊ लागलं आहे.
नेकनूर संस्थानच्या सिंहासनावर चंद्रकांत राजे गोसावी विराजमान झाल्यापासून प्रचंड भरभराटीला हे राज्य येऊ लागला आहे. मटका जुगार, दारू, गांजा, यासारख्या अनेकविध उद्योग धंद्यांमधून राजेंच्या खजिन्यात दररोज भर पडत आहे. त्यामुळे राज्याचा नावलौकिक वाढलेला आहे. मोगलाईच्या सुवर्णकाळाला कुठेही कमी पडणार नाही म्हणून त्यांनी आता लेकीबाळींना पळवून घेऊन जाणाऱ्या कडून देखील खजिन्यात भर कशी पडेल यावर जोर दिला जात आहे. नेकनूर राज्याच्या हद्दीतून 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण एका महाभागाने केलं.याचं गाऱ्हाण पीडित कुटुंबांने चंद्रकांत गोसावी राजेंच्या दरबारात मांडलं. अल्पवयीन मुलीला पळवून नेणारा सुरज पंजाब झोडगे याचं नाव देखील सांगितलं. या घटनेला दीड महिन्यांचा कालावधी उलटला पण अपहरण करणाऱ्या व्यक्तीला राजाश्रय देऊन राजेंनी खजिन्यात भरला असा आरोप पीडित कुटुंबाने केला. दरबारात मांडलेल्या गाऱ्हाण्याचा आवाज सिंहासनाधिश्वरा पर्यंत पोहोचलाच नाही. याच दरबारात ला सचिन मुरूमकर नावाचा दरबारी देखील पळवून घेऊन जाणारा च्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. या सगळ्या घडलेल्या प्रकाराची माहिती त्यांनी बीडचा दरबार मुख्य समजून व्यथा मांडली.पण कोण कुणाचा मांडलिक हे न कळाल्यामुळे पीडित कुटुंबाची दिशाभूल झाली. त्यांनी बीडच्या दरबारात तपास न झाल्यास ठिय्या आंदोलन करण्याची जाहीर केलं.मात्र स्वतंत्र राजाच्या कारभाराला लगाम घालणार कोण? हे मात्र पीडित कुटुंब विसरलं. मांडलिक असलेल्या दरबारातूनही न्याय न मिळाल्यामुळे शेवटी कुटुंबाने 5 एप्रिल रोजी ठरल्याप्रमाणे आंदोलन केलं. पुन्हा आंदोलनकर्त्यांच्या तोंडाला आश्वासनाचं पान पुसलं गेल. दीड महिन्यापासून अपहरण झालेल्या 14 वर्षाच्या मुलीचा ठावठिकाणा नाही. आरोपीला राजाश्रय मिळतो आहे. आदेश देणं तुम्हाला शक्य नसलं तरी कमीत कमी नवनीत कांवत साहेब चंद्रकांत राजे गोसावींना पीडित कुटुंबाला
न्याय देण्याची अर्जव विनंती तरी करा अशी मागणी होऊ लागली आहे.
आज नेकनुर संस्थानच्या राज दरबाराबाहेर ठिय्या देणाऱ्यांमध्ये पीडित मुलीचे नातेवाईक, सामान्य नागरिक, शिवशाही ऊसतोड कामगार संघटनेचे बाळासाहेब मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

