पालीच्या बिंदुसरा धरणात पाच तास जलसमाधी आंदोलन
बीड – ऊसतोड कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी ऊसतोड कामगार पांडुरंग वामनराव आंधळे (Pandurang Andhale hunger strike) हे जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे मागील १४ दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

सरकारच्या उदासीन धोरणाचा निषेध म्हणून व ऊसतोड कामगार पांडुरंग वामनराव आंधळे यांना पाठिंबा देण्यासाठी श्री.बाळासाहेब मोरे पाटील (संस्थापक अध्यक्ष, शिव शाहू ऊसतोड कामगार संघटना) यांच्या नेतृत्वाखाली पाली येथील बिंदुसरा प्रकल्पात तब्बल पाच तास जलसमाधी आंदोलन (Sugarcane workers protest Maharashtra) करण्यात आले. या आंदोलनाद्वारे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
📌 प्रमुख मागण्या:
ऊस तोडणी व भरणी दर ₹500 प्रति टन करण्यात यावा व वाहतूक दरात दुप्पट वाढ करावी
ऊसतोड भरणी व वाहतुकीचा करार दरवर्षी करण्यात यावा
ऊस तोडणीदरम्यान प्रसूती झाल्यास माता भगिनींना ₹25,000 प्रसूती भत्ता देण्यात यावा
ऊसतोड कामगारांची अधिकृत नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्यात यावे
तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी 2014-15 गळीत हंगामासाठी जाहीर केलेली 20% दरवाढ तात्काळ लागू करावी
या जलसमाधी आंदोलनादरम्यान मंडळ अधिकारी शितलताई चाटे या उपस्थित होत्या व त्यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. मात्र, बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके हे प्रत्यक्ष उपस्थित नसल्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये काही काळ असंतोष निर्माण झाला.
यानंतर माजी सैनिक अशोक येडे (जिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी बीड) यांच्या मध्यस्थीने तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करण्यात आली. तहसीलदारांनी प्रतिनिधी मंडळासह उपोषणकर्ते पांडुरंग आंधळे यांची जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
या आश्वासनानंतर जलसमाधी आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले असून, कामगारांच्या न्याय्य मागण्या पूर्ण होईपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
या आंदोलनात बाळासाहेब मोरे पाटील, माजी सैनिक अशोक येडे, जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी सामाजिक कार्यकर्त्या किस्किंदाताई पांचाळ (विश्व कल्याण महिला सेवाभावी संस्था), सीताबाई भोसले (महिला जिल्हाध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया)प्रदीप बांगर, बाळसिंह परदेशी, केशव तांदळे, रेवन येडे, माऊली शिरसाट,सतीश (भाऊ) जोगदंड, ज्ञानेश्वर तांदळे,आयुब पठाण, मोहन आघाव,संभाजी कदम,रोशन केकान,
अरुण साठे कर्जणीकर,अमोल चौरे, महादेव नाईकवाडे,संपत नागरगोजे,
अमोल सावंत,अविनाश मुंडे, बाळासाहेब कळसकर आदींची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

