बीड — नेकनूर गोमांस तस्करीचा अड्डा तर आहेच शिवाय चौसाळात देखील खुलेआम गोमांस विक्री केली जाते. मात्र पोलिसांच्या नाकावर टिच्चून हा धंदा सुरू असला तरी पहिल्यांदाच नेकनूर पोलिसांनी धाडसी कारवाई करत बुधवार बाजारात आलेलं अंदाजे 90 किलो गोमांस जप्त केलं आहे. पोलिसांच्या या कधी नवे ते कर्तव्यदक्षतेमुळे कौतुक केलं जात आहे.
नेकनूर अतिशय संवेदनशील भाग म्हणून ओळखल जातं. गुरांचा आठवडी बाजार प्रसिद्ध असतानाच गोमांस तस्करी मध्ये देखील नेहमीच अग्रेसर राहिला आहे. त्याचप्रमाणे चौसाळा शहरात देखील गेल्या कित्येक महिन्यांपासून राजरोस गोमांसाची विक्री केली जात आहे. पोलिसांना याची सगळीच माहिती आहे.मात्र कायद्यापेक्षा मिळणारा “हप्ता” महत्त्वाचा त्यामुळे आज पर्यंत कारवाई कधीच झाली नाही. बुधवारी बाजारात देखील खुले आम विक्री सुरूच असते.पण चौसाळा शहरातून जात असलेल्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पवित्र प्रार्थनास्थळाच्या जवळच शुक्रवार मंगळवार आणि रविवारी गोमांसाची विक्री केली जाते. कायदा काय सांगतो यापेक्षा पोलिसांनी गोमांस विक्री व्यवसायाला आश्रय दिला तो गोरगरिबांची पोट भरावीत आणि रोजगारांच्या नवीन संधी निर्माण व्हाव्यात यासाठी त्यामुळे कधीच कारवाई केली गेली नाही. एखाद्याची चुकून तक्रार गेलीच तर वरवरची चौकशी चा ड्रामा करून त्या तक्रारीला केराची टोपली कशी दाखवायची याची हातोटी ठाणे प्रमुख चंद्रकांत गोसावींना चांगलीच माहित आहे. त्यामुळे गोमांस विक्रीला कायद्याने बंदी असली तरी संविधानापेक्षा गोसावींनी राबविलेला कायदा मोठा आहे.मग कारवाई करायची कशाला माध्यमांनी तरी अवैध धंद्यांच्या गोष्टी प्रसिद्ध कराव्यात कशाला ? शेवटी चंद्रकांत गोसावी यांचा कार्यकाळ संपत आला आहे. विशेष म्हणजे ते पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचे मर्जीतले आहेत.
गोसावींनी अनेक वेळा मला कंट्रोल ला टाका असं एसपींना अर्जव केलं मात्र दरवेळी त्यांच्या या मागणीला एस पीं नी दुर्लक्षित केलं. हीच बाब कायद्याचे तीन तेरा वाजवून सुव्यवस्थेला सूरुंग लावण्यासाठी महत्त्वाची ठरली मग कोणाच्या भावना दुखावल्या तरी चालेल पण मर्जीतला माणूस पदावर राहणं हे महत्त्वाचं मानलं गेलं. पोलीस अधीक्षक कर्तव्यदक्ष आहेत निष्कलंक आहेत हे वास्तव जरी असलं तरी माध्यमांच्या बातम्यांकडे ते करत असलेल्या दुर्लक्षामुळे व आपल्या सहकाऱ्यांवर असलेल्या अति विश्वासामुळे कायदा सुव्यवस्थेची घडी सगळी सडली आहे. अवैध धंदे नेकनूर परिसरात पोलिसाश्रयात चालत आहेत. पोलीस प्रमुख पदावर कोणीही बसलं तरी सामान्य जनतेने केलेल्या पापाची फळ त्यांना भोगायचीच आहेत असं म्हणून गप्प बसण्याची वेळ सध्या तरी आलेली आहे.
आज बुधवारी चौसाळाचा आठवडी बाजार असल्याने पोलिसांनी बाजारात धाडसी कारवाई केली. याला धाडसीच म्हणावं लागेल कारण कारवाई आजपर्यंत कधीच झाली नव्हती ती अखेर झाली. पोलिसांनी बाजारात खुलेआम विक्री होत असलेलं अंदाजे 90 किलो गोमांस जप्त केलं. ज्या तीन चाकी रिक्षातून हे गोमांस आणला गेलं तो रिक्षा ही पोलिसांनी जप्त केला. तीन जणांना पोलिसांनी बाजारातून उचललं ही धाडसी कारवाई पोलीस उपनिरीक्षक आहेर साहेब, पो, हे, जायभाय, पो, हे, क्षीरसागर, विद्वान , यांच्यासह चौसाळा ठाणे अमलदार मुरुमकर, पो, हे, पुंडे, पो, ना, घुले यांनी केली आहे.

