अपघाताने एलसीबी ला 21 लाखाचा गांजा पकडण्यात यश

बीड — गस्तीवर असलेल्या एलसीबीचे वाहन पाहून कार चालकाने भरधाव वेगाने गाडी पळविल्याने नवगन राजुरी-खालापुरी रस्त्यावर अपघात घडला अन् कारची तपासणी केली असता त्यामध्ये पाच पोते 105 किलो 750 ग्रॅम किंमत 21 लाख 15 हजार रुपयांचा गांजा मिळून आला. याप्रकरणी दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गांजा नगर जिल्ह्यातून विक्रीसाठी बीड जिल्ह्यात आणण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नवगन राजुरी परिसरात तपास करीत होते.यावेळी मारुती सुझुकी कंपनीची सियाझ कार चालकाने पोलिसांचे वाहन पाहून भरधाव वेगाने पळविली, काही अंतरावर गेल्यानंतर राजुरी रस्त्यावर हनुमान वस्तीजवळ सदरील कारचा अपघात घडला, याची माहिती मिळताच एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर यांनी पथकासह जाऊन पाहणी केली असता त्यामध्ये 5 काळ्या रंगाचे पोते आढळून आले.त्यामधून गांजा सारखा वास येऊ लागल्याने याची माहिती वरीष्ठांना दिली. माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, एलसीबीचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी घटनास्थळी धाव घेतली पाहणी केली असता त्या पाच पोत्यांमध्ये 105 किलो 750 ग्राम गांजा मिळून आला. ज्याची किंमत 21 लाख 15 हजार रुपये आहे. तो जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी आरोपी बाबासाहेब विश्वनाथ दहातोंडे रा. चांदा ता. नेवासा व दत्तु मुरलीधर सकट रा. टाकळी खंडेश्वरी ता. कर्जत जि. नगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. हा गांजा नगर जिल्ह्यातून चांदा येथून बीड जिल्ह्यात विक्रीसाठी आणल्याचे सांगितले आहे. यामुळे नगर मधून बीडमध्ये गांजाची तस्करी होत असल्याचं उघड झाला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles