धारूर — धारूर तालुक्यात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने heavy rain पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. वाण नदीला पूर आल्याने रुई धारूर,अंजनडोह या दोन गावा मधील पुलावरून पाण्याचा अंदाज न आल्याने अंजनडोह येथील आडत व्यापारी नितीन शिवाजीराव कांबळे यांचा वाहून गेल्याने मृत्यू झाला तर याच नदीवर आवरगाव जवळ ऑटो रिक्षा सह एक जण वाहून गेला. ऑटो चालकाचा शोध सध्या सुरू आहे.

धारूर dharur तालुक्यात बुधवारपासून पावसाने जोरदार heavy rain हजेरी लावली असून झालेल्या पावसामुळे नद्या नाल्यांना पूर आले आहेत तर तालुक्यातील सर्वच तळी ओसंडून वाहत आहे.झालेल्या पावसाने वाण नदीला पूर आल्याने तालुक्यातील पूर्वे कडील गावांचा सम्पर्क तुटला आहे.वाण नदीवरील रुईधारूर व अंजनडोह या गावाच्या मधील पुलावर पाणी आल्याने चार चाकी गाडी वाहून गेल्याची घटना घडली.यात अंजनडोह येथील आडत व्यापारी नितीन कांबळे वय 42 वर्ष यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याच वाण नदीवरील आवरगाव वरील पुलावर मध्यरात्री ऑटो चालक अनिल लोखंडे वय तीस वर्ष व ऑटो वाहून गेल्याची घटना घडली या घटनेत ऑटो सापडला आहे मात्र ऑटो चालक अनिल लोखंडे गेल्या 12 तासांपासून बेपत्ता असून प्रशासनाच्या वतीने शोध कार्य सुरू आहे. सर्वच नद्यांना,तळ्याना पूरजन्य परिस्थिती Flood situation निर्माण झाली असून प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान तालुक्यातील नदीकाठच्या गावातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी नदी नाला ओढा ओलांडताना पाण्याची पातळी धोक्याची नाही याची खात्री करूनच पार करावा असे आवाहन किल्ले धारूर चे तहसीलदार श्रीकांत निळे नायब तहसीलदार सुरेश पाळवदे पोलीस निरीक्षक देवीदास वाघमोडे सह पोलीस – महसूल प्रशासनाने केले आहे.

