केज — सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी प्रशासनाकडून आपल्याला न्याय मिळत नसल्याने न्याय मिळेपर्यंत देशमुख कुटुंब,महिला व ग्रामस्थांसह मंगळवारी सकाळी 10 वाजल्या पासून महादेव मंदिरासमोर सामूहिक अन्नत्याग आंदोलन सुरु होणार असल्याची घोषणा सोमवारी रात्री 9 वाजता झालेल्या बैठकीत सर्व एकमताने करण्यात आली.
मस्साजोग ग्रामस्थांनी 25 फेब्रुवारी पासून सामूहिक अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार यांना यापूर्वीच दिले होते. मात्र सोमवारी रात्री 9 पर्यंत प्रशासनाकडून गावकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या नाहीत त्यामुळे सामूहिक अन्नत्याग आंदोलनाचा निर्णय गावाकऱ्यांनी घेतला आहे. दरम्यान अन्नत्याग आंदोलन स्थळी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी दिली.

