Sunday, February 1, 2026

आपणच गरुड असल्याचा आव; घाणीत चोंचं बुडवण्याचा कसा जाईल कावळ्याचा स्वभाव?

बीड — कावळा गरुडावर स्वार झाला. त्याकडे दुर्लक्ष करत गरुडाने उंच भरारी घेतली मात्र त्या कावळ्यालाच आपण किती उंच भरारी घेऊ शकतो.आपण गरुडा पेक्षा शक्तिशाली झालो असा भास होण स्वाभाविक बनलं पण घाणीत चोंच बुडवण्याची सवय कशी जाणार ? याचा विचार मात्र केला जात नसल्याचं चित्र अनेक वेळा पाहायला मिळतं.अशीच स्थिती बीडमध्ये लाटेवर स्वार होऊन नशीबाच “खास”असलेलं “दार” उघडलेल्याची निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे.
घाणीत तोंड घालायचं हा कावळ्याचा मूळचा स्थायीभाव तो कधीच विसरला जात नाही.मग तो कावळा एखाद्या मंदिराच्या कळसावर बसो की आणखी गरुडावर स्वार होवो.आणखी त्याला एखाद्या देवाच्या नावाने कोणी लाडाने हाक मारो त्याच्यात बदल काय होणार? अशीच प्रवृत्ती काही मंडळींमध्ये देखील आढळते. मग ती कितीही उच्च पदावर गेली तरी मूळचा स्थायी भाव कधीच विसरत नाही.हे प्रत्यक्ष प्रमाण बीडच्या जनतेला तरी सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणात तर अशा डोमकावळ्यांची कमतरता कधीच भासत नाही. नगरपंचायत च्या निवडणुकीत एखाद्याला निवडून आणण्याची क्षमता नसलेली व्यक्ती निर्माण झालेल्या लाटेवर स्वार होतो मतलबासाठी पक्षाची अदलाबदल करतो. सुदैवाने तो निवडूनही येतो. निवडून येताना प्रत्येक घटकाला तितकच महत्त्व देतो. मात्र निवडून येताच ज्या लाटेवर आपण स्वार झालोत. त्या लाटेच्या जीवावर आपल्यासाठी “खास”असलेलं नशिबाचं “दार”उघडलं हे चक्क विसरून जातो.ती लाट निर्माण करणाऱ्यांनाच पश्चातापाची वेळ आणतो. कृतघ्नपनाची परिसिमा गाठतो. आपली चूक झाली याची जाणीव मदत करणाऱ्यांना होईल अशी वर्तवणूक करतो. ज्या भागातून आपल्याला मताधिक्य मिळालं. त्याला स्वतःच कर्तुत्व समजतो. ज्याने पायाला भिंगरी बांधून गावोगाव हिंडत याच्यासाठी प्रत्येकापुढे झोळी पसरली,अंधारलेल्या स्थितीत असताना (सं) “दीप” पेटता ठेवत भविष्य प्रकाशमान केलं त्याच्याच बाबतीत तो कसा काजवा होता याची वानगी वाटत वाट्टेल इतक्या बोंबा मारल्या. गेल्या महिनाभर तर गरुड झेप घेण्यात आपण कसे तुर्रम खान आहोत याच्या भूशारक्या
देखील मारल्या. त्या कितीही “बजा” “बजा” के मारलेल्या असल्या तरी त्याचा “रंग” उघडाच पडला
गरुडाचा आव आणून ज्याने जनतेला फसवले त्यांचा भ्रमनिरास झाल्यामुळे कावळ्याला त्याची जागा जनतेने दाखवली. त्याच्या भूशारकीला भिक घातली गेली नाही. अनेकांना कावळ्याच्या नादी लागून नुकसान मात्र सहन करावे लागले. असे असले तरी
जनरोषाच्या वादळात देखील (सं) दीप च एकटा तेवत राहण्यात यशस्वी ठरला.पण ज्यांनी गरुडावर स्वार झालेल्या कावळ्याला गरुड असल्याचीच आवई उठवण्यात मदत केली त्यांनाच चोंच मारण्याचं काम आता सुरू केलं आहे. कावळा कळसावर बसून तेथून प्रत्येकाला कस्पटासारखा पाहू लागला. कळसावर घाण करण्याची वृत्ती देखील विसरला नाही. कळसावर बसून आपल्यात कळसाचं पावित्र्य आलं असा भास देखील झाला.मात्र घाणीत चोंच बुडण्याच्या स्थायी भावाने मात्र गरुडावर स्वार होऊन उंच घेतलेली भरारी आकाशाशी केलेलं हितगुज क्षणार्धात कवडीमोल झालं.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles