विजयसिंह पंडित यांना विजयी करण्याचा गेवराई विधानसभा मतदारसंघाचा निर्धार
गेवराई — भाजप शिवसेना रिपाई राष्ट्रवादी काँग्रेस महायुती मित्र पक्षाचे लोकप्रिय उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या प्रचारार्थ भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे आणि न भूतो न भविष्यती अशी सभा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रचंड जनसागर लाभलेली प्रचार सभा संपन्न झाल्याने. तालुकाभरातील मतदारांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. गेवराईचा आमदार विजयसिंह पंडित यांच्या रूपाने फिक्स झाल्याने विरोधक आजी-माजी आमदारांचा करेक्ट कार्यक्रम झाल्यामुळे त्यांनी प्रचार खर्चावर नियंत्रण ठेवले असून त्यांच्या प्रचार यंत्रणा थंड पडल्या आहेत.
याबाबत अधिक वृत्त असे की, विधानसभा निवडणूक प्रचारापूर्वीच गेल्या वर्षभरापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह पंडित यांनी आपल्या प्रचार कार्याची तयारी सुरू केली होती. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत काठावर पराभवाचा सामना केल्यानंतर नाउमेद न होता आणि पराभवाची कारणे न शोधत बसता नव्या जोमाने ते जनतेत जाऊन आपल्या कामाला सुरुवात केली होती. पद- सत्ता नसताना देखील जनसामान्यांच्या अडीअडचणीला धावून गेले. कोविड सारख्या महाभयंकर महामारीच्या संकटात शिवछत्र परिवाराने विविध ठिकाणी रुग्णांसाठी कोविड सेंटर स्वखर्चाने उभारून अनेकांना जीवदान दिले. शारदा प्रतिष्ठान मार्फत व्हेंटिलेटर मशीन उपलब्ध करून दिल्या ही कामे विजयसिंह पंडित यांच्या जमेची बाजू ठरणार आहेत. विजयसिंह पंडित यांनी संपूर्ण मतदारसंघ यापूर्वीच पिंजून काढला होता. मतदार संघातील शेवटच्या घटकापर्यंत ते पोहोचले होते कारण त्यांना ठाऊक होते आगामी काळात आपणच उमेदवार असणार आहोत. त्यांच्या प्रचार कार्याचे फारसे गांभीर्य आजी-माजी आमदारांनी घेतले नसावे. ऐनवेळी तू-का मी या विवंचनेत शेवटपर्यंत गाफील राहिले तर विजयसिंह पंडित हे जोमाने प्रचार कार्यात सक्रिय राहिले.
महायुती मित्र पक्षाचे उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या प्रचारार्थ चकलांबा येथे भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी मोठी प्रचार सभा घेऊन युतीधर्म पाळा कमळ समजून घड्याळाला विजयी करण्याचे भावनिक आवाहन करून भाजपाची संपूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी लावली. त्याच पाठोपाठ राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवार यांची प्रचंड अशी न भूतो न भविष्यती प्रचार सभा संपन्न झाली या सभेला मोठा जनसागर लोटला होता ही गर्दी पाहून भारावून गेलेले अजित दादा यांनी जाहीर संकेतच दिले. तुम्ही विजयसिंह पंडित यांच्या पाठीशी राहून त्यांना विजयी करा मी त्यांच्या पाठीमागे राज्याची ताकद उभी करतो.याचाच अर्थ सत्तेत त्यांना वाटा देऊ असा होतो. दरम्यान दोन्ही सभांनी मतदारांमधून प्रचंड नवचैतन्य निर्माण झाले आहे तर हा धसका घेतल्याने विरोधकांनी आपल्या प्रचारावर नियंत्रण ठेवल्याने त्यांची प्रचार यंत्रणा कोलमडून पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

